(॥५॥४/८॥२5७/१|_
(13२, र
0) 192024
२०) १०० हि.
॥४5७04/॥५)
09344. एपाशारडाप४ ारि4४ .
०41 १०. [१ १2.६ |) -& १०९४०0 प०. ४ ५॥1॥ 2,
०५० मोशे शॉ. भर.
गप भन्ते झे १५ ८८४
"115 001 51001 06 चेट 07 0" ७टरल0ि९लट घाट वाट
15 115711.604 60100,
व
ह
ग
हकक
क
ह
(र
त
का
“५
र
ल >> 2
की
क
रभ
सर
/*
- वती
कोट
व
बर
हन
कन,
>>
र,
कक
ल
धा
>> क नमा रळ
यी का,
कोत ताच मी
मुन्शी प्रेमचंद
व्हौनस एरवणी वाचनमाला : क्र. ऐे
मुन्शी प्रेमचंद
लेखक :
डॉ. प्रल्हाद नरहर जोशी
एम्. ए., एम्. एड्., पीएच्. डी-
ग्रल्य १-८-५०
डड लावली
व्हीनस प्रकाशन : पुणें
आबृत्ति १ ली £: १९५५
सवे हक्क प्रकाशकाचे स्वाधीन
/
प्र का दश क
सदाशिव कृष्ण पाध्ये
व्ही नस प्रकाशन
४१० दानिवार पेठ : पुर्णे २
मु द्र॒ क
दत्तात्रय गणेशॉ॒& गपचूप
श्रीशिवाजी प्रिंटिंग वर्क्स
४९५-४९६ शनिवार: पुर्ण २
निबेदन
१९५४ मर्ध्ये माध्यमिक शाळांच्या बदललेल्या अभ्यासक्रमास अनुसरून
आम्ही ही नवीन पुरवी वाचनमाला तयार करीत आहोंत. भारत देश
स्वतंत्र झाल्यानंतर जीवनांतील सर्व अंगांना परिपुष्ट करण्याचे सतत प्रयत्न
सुरू झाले आहेत. या देशाच्या वैभवाचा स इमला ज्यांच्या खांद्यांवर आज
ना उद्यां येणार आहे अश्या आजच््या कोवळ्या विद्यार्थ्याच्या मनाच्या जोपा-
सनेचें कार्य या दृष्टीने फारच महत्त्वाचे आहे, या नव्या पिढीच्या शिक्षणाबद्दल
सवेत्र चर्चा होत आहे. जुनें बदलून टाकावे असें सवंत्र बोलळें जात आहे; पण
नेमक नवे काय आकारास आणार्वे याबद्दल मात्र अजून निश्चिति झाळिडी
दिसून येत नाही. जीवनाचा सर्वागीण विकास व्हावा म्हणून शिक्षणाच्या
कल्पना आज मोठ्या विस्ताराने वाढीस लागल्या आहेत. विद्यार्थ्यांचे अनु-
भवक्षेत्र विस्तृत व्हावे, नव्या नव्या प्रश्नांची त्यांना माहिती व्हावी व नव्या
ज्ञानाची भूक त्यांच्यांत निर्माण व्हावी म्हणून सतत प्रयत्न चालू आहेत.
शिक्षणाची व्यापकताहि दिवसेंदिवस वाढत आहि. या देशांतील बहुसंख्य जनता
आतां क्षिक्षणाच्या मागीवर वाटचाल करू ढागलेली आहे. तेव्हां या संक्र-
मणाच्या काळांत विद्यार्थिवर्ग ब सामान्य वचक साधारणपणे काय वाचार्व
या प्रश्नांतच गोंधळून जाण्याची शक्यता आहे. मनाची व शरीराची झपाट्याने
वाढ ज्या वयांत होत असते त्याच वयांत विद्यार्थ्याच्या मनाच्या विकासाच्या
दृष्टीनें कांहीं सकस व सद्विचारसंपन्न वाडमय त्यांच्या हातीं देण्यासाठी नव्या
अभ्यासक्रमास अनुसरून आम्ही ही पुरवणी बाचनमाला तयार करीत
आहोत. लघुकथा, कादंभऱ्या, एकांकिका, प्रवासदृ्त, चौरि्त्रे इत्यादि विविध
वाडूमय-प्रकारांची निवड' या मालेसाठी जाणीवपूवेक केळेलळी आहे. नामवंत
लेखकांच्या व व्यासंगी शिक्षकांच्याच साह्यावर या माढेची उभारणी झालेली
असल्याकारणाने विद्यार्थ्याना ती अतिशय उपयुक्त होईल अर्से वार्टते,
प्रस्तुतच्या मालेतील पुस्तके सव दृष्टींनी परिपूर्ण व संवोगसुंदर बनविण्याचा
प्रयत्न आम्हीं केढेढा आहे,
->” स्ँपादक-मंडळ
"ण" प्रकाशक
स्पादक-मंडळ :
श्री. के. नारखेडे,
एस. टी. सी.
डॉ. द. न. गोले,
बी. ए. (ऑनस), बी. टी.,
पीएच्. डी.
डॉ. प्र. न. जोशी,
परम. ए,, पम, पडू,
पीएच्. डी.
माझे मनोगत
हिन्दी भाषेतील सर्वश्रेष्ठ कथाकार मुन्शी प्रेमचंद यांचें चरित्र पूर्ण करून
आज वाचकांच्या हावी देत आहें. हिन्दी ही आपली राष्ट्रभाषा असल्याकारणानें
तिचा परिषय थोड्याफार प्रमाणांत यापुर्टे प्रत्येकास करून घ्यावयास पाहिगे,
हिन्दीच्या प्रचारपरीक्षांस बसणाऱ्या विद्याथ्यांच्या वाचनांत प्रेमचदांची एस्वादी
कथा किंबा एखादी कादंबरी आलेळी असते. पण तेवढ्यावरून प्रेमचंदांची
ओळख संपूर्णतया होईलच असें नाहीं, प्रेमचंदार्ना आपले कथासाहित्य व्या
विप्तृत अश्या अनुभूतीवर उभे केळें आहे तिचा परिचय त्यांच्या नीवनाबरोबर
होणारा आहे, शेतकऱ्याचे, मजुराचें जीवन प्रेमचद स्वतः जगे ब तेंच विश्व
तन्मयतेने त्यांनीं आपल्या कलात्मक लेखणीने हिंदी साहित्यांत अजरामर नेढें. हा
देश शेतकऱ्यांचा आहे, मजुरांचा आहे, कामकऱ्यांचा आहे, असा नयघोष स्वा-
तंत्र्याच्या काळानंतर तर विशेषत्वाने होत आहे. खराज्य आल तें सर्वसामान्य
जनतेच्या सुखांत भर घालण्यासाठी, त्यांच्या आशाआकांक्षा पूण व्हाव्यात,
त्यांच्या भावना पछवित व्हाव्यात, त्यांची दुःखें दूर व्हावीत, विद्येचा आणि
ज्ञानाचा अधिकार त्यांनाहि मिळावा म्हणून तर या देशांत स्वराज्याचा घ
स्वातंत्र्याचा एवढा पुरस्कार झाळा, आनहि सर्वसामान्य लोकांसार्ठींच स्वराब्य
ब स्वातंत्र्य असा सूर सर्वश्र व्याख्यानांवून ब ळेखनांतून प्रकट झाळेढळा दिसून
येतो. किंबहुना भारताच्या स्वारतत्य-चळवळींतीळ ती एक प्रागभूत कश्पना आहे
असें म्हटश्यास अतिशयोक्त होणार नाही.
साहित्याच्या प्रान्तांत या दृष्टीने खराखुरा प्रामाणिकपर्णे प्रयत्न कर -
णारा मुन्शी प्रेमचंद यांच्याएवढा दुसरा कथाकार शरवेद्र चट्टोपाध्याय यांच्या
खेरीज भारतांत दुसरा झाला नाहीं, जे दळित आहेत, पीडित अहित, दुःखी-
कष्टी आहेत, त्याची विचारपूस करणारा, त्यांचे अभ्र पुसणारा प्रक थोर
हृदयाचा कडावंत म्हणून मुन्शी प्रेमचंद यांचें नांव. आपण ध्यानांत ठेवावयास
पाहिन, किसान-मजुरांचें जीवन प्रेमचंदांनी प्रामाणिकपणे रेखाटठेंच, पणे घनी
आहेत, संपत्तिवान् आहेत, भांडवलदार-कारखानदार आहेत त्यांच्याहि ळॉळांवर
त्यांनी योग्य तो प्रकाश टाकला आहे. साहित्यांतील वा राजकारगांतीळ प्रचारा-
ची एक टूम म्हणून प्रेमचंदांनी साम्यवादाचा पुरस्कार केढा असे नव्हे, तर
सहा मुन्शी प्रेमचंद
"५५- “0.७ “५. “70...” ८४१७. “४४४७ ४७४७ ५.४७ 0 0४.” ”- ५-४...” ४५...” “हीच “को
प्रारंभीच्या जीवनापासून त्यांना अनेक धक्के सहन करावे लागले, मोठ्या
निकट परिस्थितीतून शिक्षण घ्यावे लागलें, विपतींना टक्कर देत देत सतत संग्राम
करावा लागला म्हणूनच या संत्र्षमय जीवनांतून त्यांच्या तत्त्व्वतानाचा जन्म
आपोआप झालेला आहे. साम्यवाद या शब्दाचा अर्थहि येथें स्पष्ट करून
सांगावयास पाहिजे. राजकारणांत अनेक पंथोपर्पथ रोज़ उदयास येतात नि रोज
ळयास जातात, यांपेकांचा साम्यवाद प्रेमचंदांच्या मनांत होता असें नव्हे. पर-
देशचें तत्त्वज्ञान बा'चून त्यांनीं आपल्या देशाच्या उद्घाराची कमर कसली असें
नाहीं; दुसऱ्या देशचे क्रषिमुनि काय म्हणतात ईं पाहून प्रेमचंदांनी आपल्या
तात्विक विचारांची बैठक अथरली असें नव्हे- तर मुन्शी प्रेमचंद यांनीं हिंदु-
त्थानांतील शेतकऱ्याचे दारिद्य व त्याचें देन्य उघड्या डोळ्यांनी पाहिल; कांही
काळ तें स्वतः भोग, तेव्हांच श्ारोरिक क्टतून मातीचे सोनें बनविणाऱ्या
या कष्टाळू माणसांची दया त्यांच्या मनांत निमीण झाली, या दयामय वृत्तींतूनच
प्रेमचंद यांच्या साहित्याची निर्मिति झाली आहे. विस्तृत अशी सहानुभूति व
मनोर कलासक्ति यांच्या मिश्रणाचे मधुर रूप म्हणजे प्रेमचेद यांचें कथा-वाडूमय !
हिन्दी आपली राष्ट्रभाषा, तेव्हां तिच्यातील एका श्रेष्ठ साहित्यकाराचा
परिचय आपण करून घ्यावा, एवढाच हेतु या चरित्रापाठीमार्गे नाही. हिंदी
ही राष्ट्रभाषा झाली तेव्हां तिर्च वैभव वाढलीहृे असेळ, पण ती एका फार
मोठ्या ननसमूहाची भाषा आहे ही गोष्ट ध्यानांत घेऊनच प्रेमचंद यांच्या
साहित्याकडे ब त्यांच्या चरित्राकडे पाहिलें पाहिज, या देशांतील सागराएवढ्या
पसरलेल्या अथांग ननतेची सवीगीण सुधारणा व्हावयाची असेळ तर * माझें,
माझ्या प्रांतापुरते ' असे म्हणून चालणार नाहीं. आपळा भारत खंडप्राय देश
असला तरी व त्याच्यांत जगांतीळ सवे बाबतींतील विविधता एकवटलेली
असली तरी सांस्कृतिक कल्पनांची समानता मात्र सववत्र दिसून येते. ही एकता
टिकवून धरावयाची असेल तर एकमेकांचे आचारविचार, एकमेकांच्या
चालीरीती, एकमेकांची भ्रद्धास्थाने, एकमेकांची आदरस्थानें आपग सहानु-
भूतीने समजावून घेतलीं पाहिजेत. भारत देशाच्या या आंतरिक ऐक्यासाठी'
आन “ आंतरभारती ? किंबा मध्यवर्ती सरकारची “ साहित्य अकादमी ?
यांसारख्या संस्था आपापल्यापरीने सख्वटपट करीत आहेत, १ण एकमेकांतील गैर-
समन दूर होण्यासाठी, एकमेकांच्या भावना नीटपणे समजावून घेण्यासाठीं, माझ्या
माझे मनोगत सात
४“६./५-/१ £ -” ५ ४८-€४-/९-.” ४ -“४६५/४- ४ ५४६५-४५-८५ € ६४ ४ ४५४” ४-/४५/%/ ४” ४०४ ४.४ ४ ४-९ “२०४० ४.८४. ४-५
मते, आज दोन साघने आपल्यासमोर उरढडीं आहेत. वरवर दिसणाऱ्या
विविधतेत एकता निर्माण करणारे आपे अदैतारचें तत्त्वतान आहे. याच तत्त्व
ज्ञानावर आधारलेल विविध भक्तिपंथह्ि आपल्या देशांत उदयास आले. भक्ति-
मार्गाच्या प्रच[रकांनीं समाजकार्येहि फार मोठ्या प्रमाणावर केढे आहे. ज्या
माणुसधर्मांची महती आज सर्वत्र गायिळी जात आहे त्या माणुसधमांचा पुरस्कार
आपल्या देशांतील साधुसंतांनी प्राचीन काळापासून केला आहे, ज्ञानदेव, नाम-
देव, कीर, तुळशीदास, सूरदास, गौरांगप्रभु, नरसी मेहता इत्यादि संत-
पुरुषांनी एकाच परमेश्वराची आराधना करून सर्वस'मान्य लोकांना श्रद्धेस योग्य
अशा प्रकारचा आसरा निमाण करून दिला. देवधमाच्या कश्पनांमुळे जगांत
प्रचंड वादविवाद आणि भयकर रणे माजली ही गोष्ट खरीच, पण भारतीय
भक्तिमार्गाचा इतिहास मात्र वेगळा आहे. कमीरदास ब ज्ञानेश्वर यांनी सांगि-
सलेळा मानवधर्म आजहि आचरून पाहण्यासारखा आहे.
एकमेकांच्या भावना समजावून घेणे, विचार पटवून धेर्णे ब मनाच्या
ऐक्याची अनुभूति प्राप्त करून धेर्णे यासाठी आपलें भक्तिसाहित्य जर्स उप-
योगी पडणार आहे त्याचप्रमागे ललित साहित्याचाहि उपयोग मोठया प्रमाणांत
होण्यासारखा आहे. निरनिराळ्या प्रान्तांतील समाजाच्या गुणावगुणांचें व मान-
सिक ठउक्कांतीचे प्रतिबिंब लळित साहित्यांत पडलेळें असतें. मानवाची सुख-
दुःखें समान भूमिकेवरून ललित साहित्यांतच चित्रित झालेढी असतात. देश-
काळातीत असणाऱ्या अशा थोर कलाकृति निमोण करणारे प्रेमचंद्रांसारस्थरे
'कलाकारहि देशाच्या एकजिनसी बांधीव ब भरभक्कम उभारणीस खचित हातभार
लावतील, मराठी भाषा बोलणाऱ्या विद्यार्थ्यानी व सामान्य जनसमुदायान
प्रेमचंदांसारख्या कथाकाराची ओळख करून घ्यावयाची ती याच कारणासाठी.
केवळ हिन्दी ही राष्ट्रभाषा आहे म्हणून नव्हे तर बहुसंख्य लोकांची सुस्व-
दुःखें तींत चिञित झालेळीं आहेत म्हणून हिन्दीस मीं मान्यता दिली व उदू
आणि हिंदी या भाषांत सारख्याच प्रभावाने कथावाडूमय निर्माण करणाऱ्या
प्रेमचंदांचा परिचय मराठी बाचकांना करून देण्याचा यथामति प्रयत्न मीं
'केलेळा आहे. याच धोरणास अनुसरून भारताचे सर्वश्रेष्ठ कथाकार शर्वंद्र
चट्टोपाध्याय यांबेहि चरित्र मुन्यी प्रेमचंद यांच्या चरित्राबरोबरच मी मराठी
भाषिकांच्यासमोर ठेवीत आई,
आठ... मुन्शी प्रेमचंद
'*“४-€* “.”९५../४/१. ४.” २ .““१५..५७५.””-” *०५€%/५.»/५./..९१../४.””९५.५५ ९. “४६.४.” ४५.0 “४९. »”२..”* .»€४./४./१ “४५४७१७”
वेथे॑ एका आक्षेपाचा खुलासा केहा पाहिजे, हिंदी किंवा बंगाली'
भाषेतील साहित्य वाचून ' मराठी वाछमयांत कोठें आहेत अशा कलाकृति ! ”
वासारखे प्रश्न विचारण्यासःठीं हा प्रयत्न नाहीं, मराठी वाडूमयांतील कथा-
बाकूमयाचें मोनमाप या दृष्टीनें करावे असेहि माझ्या मनांत नाहीं, ' हे पहा
शरजंद्र-प्रेमचंद; यांसारखे चंद्रसूर्य आपल्या मराठी:माप्रेस केव्हां लाभणार! ! अशा
प्रकारच्या धिटाईचा प्रभनहि माझ्यासमोर निश्चितपणे नाहीं. हरिभाऊ आपटे,
वामनराव जोशी, शानकोशकार केतकर, नाथमाधव, तात्यासाहेब केळकर, ,
बरेरकर, माडखोलकर, खांडेकर, फडके यांची ओळख जशी आपला विद्यार्थि-
वर्ग करून घेणार आहे. त्याचप्रमाणे त्यार्ने प्रेमचंद व शरचंद्र इत्यादींच्या
वाड्मयाची गोडी अनुभवाबी व त्यांच्याहि परिचयास उत्सुक व्हावे म्हणून
या चरित्रांचा उपक्रम आहे. मातृभाषेतील साहित्याच्या अभ्यासास पूणंता आण-
ण्याच्या दृष्टीनें शेजारच्या भाषांतील साहित्यकारांचॅं दर्शन निश्चितपणे उपकारक.
होणार आहे, भारतीय जनतेतील वेचारिक व भावनात्मक ऐक्याचे स्वप खरें
व्हावयार्चे असेल तर अश्शा साहित्यसेबकांचा परिचय आवश्यकच आहे अर्से वाटतें,.
तर्से पाहिलें तर प्रेमचंदांर्चे नांव मराठी वाचकांना नर्वे नाही, मराठी
मासिकांतून मधून मधून प्रेमचंदांच्या गोष्टी आपल्या भार्पेत अनुवादित
झालेल्या आहित. आजहि कोठें कोर्ठे त्यांच्या कथा आपणांस वाचावयास
मिळतात. नागपूरचे आनंदराव जोशी यांचें * प्रेमचंदांच्या गोष्टी' ब श्री.
ह. बा. अन्ने यांचे ' कथामंजरी ' ही दोन पसतके प्रेमचंद यांच्या कथांचा
परिचय करून देणारी आहेत. श्री. यदुनाथ थत्ते यांनीहि प्रेमचंद यांच्या
कांहीं गोष्टींचा अनुवाद मराठींत कलेला आहे. प्रेमचंद याच्या ' प्रेमाश्रम ?
कादनरीचा अनुवादहि श्री. प्र, श्री. भसे यांनीं प्रसिद्ध केडा आहे. श्री..
शं. बा. शास्त्रा यांचें ' कायाकल्प? या प्रेसवंदांच्या कादंबरीचे ' चिरजीवन
हें भाषांतरहि मराठीस परिचेत आहे.
मुन्शी प्रेमचंद यांच्या सहानुभूतीची मयादा अति विश्वृत अशी होती..
घरांतील नोकरमाणसें, मुढेंबाळे यांच्यावरच नव्हे तर स्वतःच्या छायखान्यांतील
कामगारांवरहि मुन्शी प्रेमचंदांची विलक्षण ममता होती. कोटें हिंदुस्थान, कोर्ठे
रशिया ! पण मुन्शी प्रेमचंद यांच्या हृदयास मॅक्झिम गॉकीं यांच्या मृत्यूने
धक्का बसल्यासारखे झाळे. याच मनोगतांत मार्गे मीं असें म्हटडे आहे कीँ,,
निवेदन नऊ
दुसऱ्यांच्या तत्त्व्ञानावर प्रेमचंदांनी आपल्या कथाविश्वाची इमारत उभी केली
नाही. त्यांच्या अनुभवांचा पाया अति विस्तृत असा होता. त्यामुळें त्यांच्या
ललित कृतींना देशकालाचें बंधन उरले नव्हते. त्यांचाच समानधर्षाय मॅक्झिम
गाकीा, दोघेहि दलितांच्या-पीडितांच्यासाठी झटले, दोघांच्याहि आयुष्यांत
संग्राम होता. त्याचमुळे गॉकींच्या मृत्यूमुळे प्रेमचंद विव्हळ होऊन उठले,
अनेक टीकाकारांनी प्रेमचंद व गॉर्की यांची तुलना केलेली आहे. त्यांतील
आठाय असा कीं, दोघेहि मानवधमोचे महान् पुरस्कते होते. एकाचे तत्त्व-
ज्ञान वा एकाची स्फूर्ति दुसऱ्याने घेतडी असें नव्हे, अद्वितीय कलाकार,
ध्येयवादी साहित्यिक, कमेयोगी संपादक आणि दीन-दुःखितांचा वाली म्हणून
मुन्शी प्रेमचंद यांचें नांव भारतीय कथासृष्टींत अजरामर होण्यासारखे आहे.
या चरित्राचा मी नाममात्र लेखक आहें. मूळची कथावत्तुच श्रेष्ठ असल्या-
कारणानें या चरित्रांत जर थोडा चांगुलपणा असेल तर तो त्या वस्तूचा आहे;
माझा नाहीं. श्रीमती शिवरानीदेवी यांचें * प्रेमचंद घरमें ', श्री, हंसराज रद्दषर
यांचें ' प्रेमचंद : जीवन और कुतित्व , मन्मथनाथ गुप्त व रमेंद्रनाथ बमा यांचे
: कथाकार प्रेमचंद ) या पुस्तकांचा मळा फार उपयोग झाला आहि. सन
१९३७ सालीं प्रसिद्ध झालेल्या “ हंस 'च्या प्रेमचंद-स्मारकांकाचाहि मी
उपयोग करून घेतळेळा आहे. या सवे लेखकांचा मी अतिशय कणी आहि.
येथील सर परशुरामभाऊ केलिजमधील हिन्दीचे प्राध्यापक श्री. प्र. रा. भुपटकर
यांनी आपल्या संग्रही असलेळें मुन्शी प्रेमचंद यांचें दुर्मिळ चित्र उपलब्ध
करून दिले त्याबद्दल त्यांना जेबढे धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच होतील. राष्ट्र-
भाषा प्रचार समितीचे संचालक श्री. डांगरे यांचीहि दर वेळीं मळा मदत झाली
आहे. त्यांच्या स्नेहशील वृत्तीचे मोजमाप तरी कसें करावें !
येथील व्हीनस प्रकाशनाचे उत्साही चालक श्री. स. कृ. पाध्ये या हौशी
व तडफदार प्रकाशकांचें साह्य नसते तर ही. दोनहि चरित्रें या आकर्षक
स्वरूपांत वाचकांपुर्टे येती ना. तेव्हां त्यांच्या कर्तृत्वाचे चीज मराठी वाचकवर्ग
उत्साहाने करील अशी आशा व्यक्त करून येथेंच हे मनोगत थांत्रनि्तो,
४२७ नारायण पेठ, प्र. न. जोशी
पुर्ण २ -7 २६-१-५५
१.५.
अनुकमणिका
घनप तराय
डेप्युटी इन्स्पेक्टर
धनपतराय प्रेमचंद झाले
कमयोगी संपादक
फिल्मी दुनिर्यत प्रेमचंद
ध्येयवादी साहित्यिक
किसानमित्र प्रेमचंद
: मी तर मजूर आई
घरगुती वातावरणांत प्रेमचंद
६ पै ळुट गयी ?
प्रेमचंद कोण होतें !
प्रेमचंदांची सादित्यसष्टि
प्रेमचंद : विचारदर्शन
प्रेमचंद : भाषार्सोदर्य
प्रेमचंदांचा जीवनसंदेरा
4
मुन्शी प्रेमचंद
धनपतराय प <
सन १९२९ मधील चेत्रांतील एका अष्टमीचा दिवस होता. अलाहाबाद
स्टेशानांत उभी असलेळी गाडी उतारूनीं भरून गेली होती. मिळेल तेथें
जागा मिळविण्याचा, धक्काबुक्की करण्याचा, डब्यांत घुसून बाचाबाची कर-
व्याचा प्रयत्न शेतकरी लोक करीत होते. या भाबड्या खेडुतांना नाहीतर
सहजासहजी जागा कशी मिळणार £ कांही खेडवळ शेतकरी एका इंटरच्या
डब्यांत घुसले. त्यांना वाटलें, ह्या तिसऱ्या वर्गांचाच डबा असावा. इंटर वर्गाच्या
डब्यांतहि खूप गदी होती. आंतील घनवान् माणसें संत्रस्त झालेलीं असल्यानें
खेड्यांतील या भोळ्या शेतकऱ्यांना डब्यांत घुसतांना पाहतांच त्यांना अधि-
कच अडचण भातूं लागली, याच डब्यांत एक उमदा ग्रह्स्थ आपल्या पत्नी-
बरोबर कांही बातचीत करीत बसला होता, त्या व्यक्तीचा चेहरा भव्य होता.
पाणीदार डोळ्यांनी एकंदरींत रुबाबांत चांगलीच भर पडलेली होती. गर्दी-
गर्दीने आंत घुसणाऱ्या खेडतांना त्यानें दटावले, “ हा इंटरचा डबा आहे.
दीडपट भार्डे पडते. तिकिटे आहेत तुमच्यापाशी १... १? शेतकऱ्यांनी दीन
मुद्रेने उत्तर दिलें, ““ बाबूजी, काय करावें £ दोन दिवस इथेच पडून
आहोंत. .. शीतलादेवीच्या दर्शनाला गेला होतो. .. ??
दोतकऱ्यांचें गाऱ्ह।णें ऐकल्य़ासारखे|ं करून बाबूजी म्हणाले, “ शीतला-
देवीच्या दर्शनाने काय मिळालें तुम्हांला ! प्रत्येकाने पंधरापबरा रुपये खर्च
केले. या खर्चात चार माहिन्यांचें घान्य मिळाले असतें तुम्हांला, यापेक्षां
देवांची पूजा तुम्ही घरीच कां नाहीं केळी ! परमेश्वराचा वास तर सर्वत्र आहे,
घरच्या घरी आरामांत देवीची पूजा केढी तर तुमची दगदग थांब्रेळ वब
त्यामुळें दे वीहि संतुष्ट होईल. /?
मुन्शी प्रेमचंद ऱ
गाडीचा डञा खच्चून भरलेला होता. श्वास धेर्णेहि कठीण झालें होते,
उक'डा मनस्वी असल्यामुळें बाबूजींची बायको बोलली, “ उगाच घेतलेत
आंत यांना, देवधमाचा उपदेश तरी यांना काय कामाचा ! ,..अडागी. ..
पुढल्या स्टेशनवर द्या उतरवून साऱ्यांना... ?
“ वा ! खूप सांगतेस... ” बाबूजी चकित होऊन बाळू लागले, “' याच
लोकांसार्ठी तूं तुरुंगांत जातेस, सरकारशीं झुंज खेळतेस. .. आगि आज प्रसंग
आल्यानरोबर तूंच त्यांना दूर लोटतेस |! बिचारे अर्धपोटी राहून खोट्या
धर्मांच्या नांवाखाली मरत आहेत. यांना कोण शहाणे करणार ! कोण शिकतव-
णार आहि यांना १ ??
६ कोण म्हणजे ? तुम्दी तर द्र महिन्याला यांच्यासाठी पानेंच्या पार्ने
लिहितां... ”
६६ घण माझ्या कथा-कार्दैमऱ्प़ा हे लोक थोडेच वाचतात ? हो, एक उवाय
आहि; माझपा कथांचे चित्रपट तयार करून गांवोगांव मोफत दाखविले तर
होईल काम. ..
पतिपत्नींचे एवढे बोलणे होत आहे तो. एक रेल्वे पोढीस डब्यांत येऊन
पोचला. खेडुतांना धमकी देत आणि दरडाबीत तो विवारू लांगडा, “कां
तुम्ही येर्थे घुसलांत १ हा इंटरचा डबा आहे. जादा पैसे द्या; नाहींतर उतरा
लोकर खालीं, '? या अरेराबीमुळें बाबूजी एकदम क्रुद्ध झाले आगि पोलिसास
उद्देशून आवाज चढवीतच ते बोलले, “' आपण कोण माणूस आहांत कीं
पशु ? तिसऱ्या वगाच्या डब्यांत जागा असती तर ते येथे येतात तरी कश्याला १
त्या वर्गार्चे भाडे तुम्ही घेतळें पण जागा देण्याची जञाजदारी मात्र जणुं तुमची
नव्हे, जनावरांसारखे माणसांना डब्यांतून कोंबून बसविळें आहे ! यांचें भाडे
घेतर्ळे, .. यांची सोय कोण लावणार ! चला, अगोदर जागा करून द्या तिसऱ्या
वगौच्या डब्यांत, ..मीहि येतो तुमच्याबरोबर. .. ?
आणि खेडुतांच्य़ाबरोबर बाबूजी खरोखरच खालीं उतरले, रेल्वे पोलीस
मनांत वरपळा, त्यानें प्रत्येकाला कशीबशी जागा करून दिली. बाबूजी मनांतल्या
.मनांत संतुष्ट झाले.
गरीञ खेडुतांची कड घेऊन रेल्वे पोलिसांशी भांडण करणारे हे बाबूजी
म्ह्णजे हिन्दी भाषेतील सर्वश्रेष्ठ कपाक्रार मुन्शी प्रेमचंद होत. आपल्पा कथा-
ऱ्डे धनपतराय
'कादंबऱ्यांतूनच नव्हे तर प्रत्यक्ष व्यावहारिक जीवनांतहि भारतीय शेतकऱ्यांबद्दल
'कमालीची सहानुभूति प्रेमचंद यांना वाटत असे. दलितांबद्दल, दुः$ःखितांबद्दळ
त्यांच्या अंतःकरणांत दया भरपूर भरलेळी असे. दलितांचा कैवार घेणारा
'एवढा मोठा कथाकार शरच्चंद्र चतर्जीखेरीज आपल्या देशांत दुसरा झाला
.नाहीं, किसान-मजुरांचे दुःख प्रेमचंदांनी त्वतः अनुभविळे ब आपल्या
कथांतून तन्मयतेने रंगविले, त्यांच्या कादंबऱ्या गरिबांच्या व दुःखितांच्या सहानु-
भूतीनें कांठोकांठ भरलेल्या आहेत. मानवजातीनद्दल वाटणारी विशाळ ममता
हाच भ्रेष्ठ ललितकृताचा आत्मा मानला जातो. प्रेमचंदांच्या कथांतन व
कादंभऱ्यांमधून भारतीय जनतेच्या सामाजिक व राजकीय संघर्षाचे चित्र तर
मिळतेंच; पण त्याबरोबरच आपला देश शेतकऱ्यांचा आहे, मजुरांचा आहे
त्यांची दुःखें दूर झालीं तरच या देशाचे वैभव बाढेळ, ही एकच भावना
प्रेमचंदांच्या सर्व साहित्यांत प्रकट झालेली दिसून येते. त्यांनी भारतीय किसानां-
चें जीवन नवळून निरखलें होतें. ते स्वतःला मजूर म्हणूनच समजत. शेत-
'कऱ्यांच्या आशा-आकांक्षा, सुख-दुःखाच्या भावना त्यांनी बरोबर घेतल्या जाणून
होत्या. दारिद्याची, अज्ञानाची, विपत्तीची आंच कशी असते, हॅ त्यांनी
अनुभवबिले होतें. प्रेमचंदांचें जीवनहि एक संग्राम-कथाच आहे
सन १८८० च्या ३१ जुळे रोजीं प्रेमचंदांचा जन्म बनारसपासून चार
मैळ दूर असणाऱ्या लमही गांवीं झाला. त्यांच्या पित्याचे नांव अजायबराय
असून ते पोस्ट खात्यांत कारकून होते. त्या वेळीं कारकुनास मुन्शी म्हणण्याची
वहिवाट असल्याने अजायनराय यांना सव लोक मुन्शीच म्हणूं लागले आणि
मग ते नांव या घराण्याच्या उपनांबासारखं बनून गेठे. पोस्ट खात्यांतील
'कारकुनास पगार असा किती मिळणार ? बीस रुपयांपासून वाढतां वाढतां
चाळीस रुपयांपर्यंत पगाराची मर्यादा पोंचडी असली तरी वाढत्या संसारांत
त्याची मदत अपुरीच होती, वडिलोयार्जित थोडी जमीन होती, पण तिचे
उत्पन्न मात्र अवून नसल्यासारखेंच होतें. मुन्शी अजायतरायांनीं आपल्या
मुलाचे नांव मोठ्या हौसेनें घनपतराय असें ठेवे, पण या कुटुंबांत कधी
धनाचा वा संपत्तीचा पाय मात्र ठरत नसे. सर्वसाधारण मध्यमवर्गौय
लोकांप्रमाणेंच आपत्तींशी झगडण्यांतच त्यार्चे सर्व जीवन खच व्हावे, असा ईश्वरी
-संकेत असावा. मुन्शी घराण्यांत प्रत्यक्ष शोती कोणीं केली नसली तरी राहणी
मुन्शी प्रेमचंद फि
खेड्याची असल्यामुळे शेतकऱ्यांची पुखदुःखें, त्यांची संकटे, त्यांच्या आशा-
आकांक्षा इत्यादींचा परिचय त्यांच्या घराण्यांत सवाना जवळून होता.
घनपतराय हें प्रेमचंदांचे वडिलांनी ठेवलेळें नांव. पण त्यांचे चुलते त्यांना
मुन्शी नवाबराय असें म्हणत. घनपतराय बालपणापासून मोठे उपद्व्यापी आणि
विनोदी वृत्तीचे होते. एके दिवशी कांहीं मुले-मुलळें मिळून केस कापण्याचा
खेळ खेळूं लागलीं, धनपतराय न्हावी बनले व समोरच्या मुलांचे केस कापू
लागले, कापतां कापतां त्यांनी त्या मुलाच्या कानास जवर जखम केली, भळ-
भळां रक्त वाहूं लागळें. पोराच्या किंचाळीनें त्याची आई गून धांबत आली.
भनपतराय दाराआड लपून राहिले. पण त्यांच्या आईसहि या गोष्टींचा राग:
आला होता. तिनें या उपद्व्यापी पोराला पकडळें ब तीनचार थपडा ठेवून
दिल्या आणि बोलली, “' मोठी कामागैरी केलीस | कां! त्या पोराचा कान कां
कापलांस ! ?? त्यावर रडत रडतच धनपतरायांनीं उत्तर दिले, “ मी नार्ही
त्याचा कान कापला; फक्त केस कापले, ” पोराच्या कानांतून रक्त वाहत अस-
ल्यामुळे धनपतरायांची कारागिरी सवोना समजली होती. पुनः असले खेळ.
करावयाचे नाहींत, अर्से त्यांस बजावण्यांत आलें.
घनपतरायांचें शिक्षण वयाच्या पांचव्या वघ्रीपासून सुरू झारे, एका मौलवी
साहेनापार्शी उदू शिकण्यासाठी ते जात असत, शिक्षणांत 'घनपतरायांची बाडे
चांगली होती. त्या वेळीं उर्दू-फारसी यांच्या अभ्यासासच महत्त्व असल्यामुळे.
थनपतरायांनाहि तोच अभ्यास लहानपणी करावा लागला. घरची गरिबी अस-
ल्यामुळे फार कष्टांतच त्यांना दिवस काढावे लागळे, तळवे फाटलेळें पायताण,
आणि जाडेभरडे कपडे त्यांना कित्येक दिवसपयंत वापरावे लागत होते. त्यांच्या
सोबतीला त्यांचें चार चुलतभाऊ नेहमीं असत. गांबांतील पोरें जमवून विटी-
दांडूचा खेळ खेळण्याची मनस्वी हौस धनपतराय यांना होती. या खेळाच्या
ऐन भरांत त्यांची तहानभूकहि हरपून जात असे. पुढील आयुष्यांत प्रेमचंदांनी
: विटीदांडू ? ( गुाडिंडा ) नांवाची एक सुंदेर कथा लिहिली. तींत या खेळाची
आपणांवर किती पकड' होती यार्च चित्रण त्यांनीं उठावदार रीतीने केळे आहे..
त्यांत त्यांच्या देशाभिमानाचीहि छटा उमटलेली दिसते, कथेच्या प्रारंभीच प्रेम-
चंदांनीं लिहिठें आहे, “ आपले इंग्रज मित्र मानोत किंबा न मानोत, विटीदांडू
हाच खेळांचा राजा असे माझें मत आहे. हा खेळ मुलें खेळूं लागली की मी?
घनपतराय
व
जेपैन होतो व त्यांच्यांत जाऊन खेळावे अर्से मलाहि वाटूं लागतें, ,. विलायती
खेळांच्या सर्व वस्तु महाग असतात. ..पण इंग्रजी वस्तूंची हौस आपण एवदी
वाढवली कीं, आपणांस त्याच महागड्या वस्तु आवड लागल्या, भारतीय खेळ
'एक पैसाहि खर्चे न होतां खेळले जात असतांना विलायती खेळांसाठी शेकडो
रुपये आमच्या शाळा कां खर्च करतात ! धनवानांच्यासाठीं इंग्रजी खेळ आहेत.
गरिबांच्या मार्थी हे महागडे खेळ कशासाठी !. . , . .. विटीदांहूच्या खेळांत मौ
बालपणापासून रमून गेलो आहे. ते सकाळीं घरांतून बाहेर पडगें, झाडावर
चद्वून फांदी तोडणे, बिटीदांडू बनविणें,. .. . .. तो उत्साह, तें ममत्ब, तो लढाई-
झगडा ** 'घरचे लोक रागावलेले असत, वडील संतापत, आई दाराशी येऊन
वाट पाहत आहे, '*'पण मी आपला खेळण्यांत गुंग ! आंघोळीची कीं नेवणा-
खाण्याची शुद्ध असे कोणाला १ विटी पाहिली तर पुरी बीतभरहि नाहीं पण
तिच्यांत सव जगतांतील गोडी आणि आनंद भरला आहे असेमला वाटे ... ”
गोष्टींतील हँ वर्णन पुष्कळशा अथाने घनपतरायांच्या बालपणाला लागू पडतें.
परंतु खेळण्याबागडण्याच भाग्य त्यांना फार दिवस लाभले नाहीं. घनपत-
राय आठ वर्षाचे असतांनाच त्यांच्या आईचा अखेरचा आजार सुरू झाला.
सहा महिनेपर्यंत त्यांची आई अंथरुणाला खिळून राहिली होती. तिच्या
उश्या्शी बसून लहानगे धनपतराय पंख्याने वारा घालीत असत. त्यांचे चुलत-
माऊ औषधपाण्याची ठ्पवस्था करीत, पग कोणताहि उपाय न चालून धनपत-
रायांची आई मुलांना त्यांच्या वडिलांच्या हाती सोपवून देवाघरी गेली.
प्रेमचंदांनींच या प्रसंगाचे वर्णन केळें आहे : “ बहीण, पिताजी, भाऊ सर्व जण
रडत होते, काय झालें आहे हँ माझ्या नीट ध्यानांत येत नव्हते. आईच्या
मृत्यूनंतर बहीण आपल्या घरी निघून गेली. ..माझे भाऊ दुघांत साखर
घालन मला देत असत; पण आईचे प्रेम त्यांत कोठें होत ! एकांतांत बखून
मी खूप रडत असें. * येथून प्रेमचंदांचें स्नेहृशून्य जीवन सुरू झालें. आईच्या
मृत्यूने त्यांच्या सुकुमार हृदयावर मोठाच आघात झाला. आपल्या कथांतून
पुढें घनपतरायांनीं - प्रेमचंदांनी - मातृप्रेमाचा मंगल महिमा मुक्तकठानें गायिळा
आहि. ' प्रेरणा ? नांबाच्या एका कर्थेत ते लिहितात; “ दूध, मिठाई ब
खेळणी यांपेक्षांद्वि मुलांना प्रेमाची भूक अधिक असते. आईच्या मांडीवर
असून राहिलेल्या मुलास सर्वे बगताचें राज्यहि तुच्छ वाट्ते... *? “घरनमाई?
मुन्शी प्रेमचंद द
-“१९२/ ५/४./”५६/”४./”६./"५//५/”/४./€ “ “५./५-४*./४-/ “४५८५४१ -<* / ४-१: -“-”/4€ -““ “-*“४/५/४-€
या कथेत ते लिहितात; “' लहान मुलाचे सर्वस्व म्हणजे त्याची आई. एक.
मिनिटाचा वियोग त्याला सहन होत नाहीं, बाप कोठेंहि असला तरी त्याला
फारशी फिकीर नसते. पण आई मात्र सोळा आणें त्वतःची हृवी असते... *?
घनपतरायांच दुदैव असें कीं, त्यांच्या पिता्जीनीं पुनः लम केळे व त्यांना
नबी आई आली. लहानग्या धनपतला या सावत्र आईपासून त्रास होऊं.
लागला. नबी आई आली आणि लागळीच मालकीण बनली. तिच्याबरोबर
तिचा भाऊहि आला वब त्याचाच बडेजाव घरांत सुरू झाला. दीड रुपया
भाड्याचे एक घर होते, त्यांत दाराशी असणाऱ्या एका घाणेरड्या खोलींत
घनपत रात्रीं एकटाच झोपत असे. सावत्र आईच्या स्वभावाचे चित्रणहि पुढे
प्रेमचंदांनी अनेक ठिकार्णी केळे आहे. ' सोतेली मॉ? नांवाची एक कथा
त्यांनीं याच विषयावर करुणाजनक अशी लिहिली आहे. आईच्या मरणाने,
घनपतरयांच्या मनावर मोठाच दुःखद असा आघात केला, मातृसुखास आंच-
वलेल्या घनपतरायांच्या मनांत बालपणींच कल्पनांचे किले निमोण होऊं लागले,
व्नेहदून्य झालेळे बालमन कलल्पर्नेतील हेनेहमय वातावरणांत रममाण होऊं.
लागलें, हवीहवीशी बाटणारी आवर्यक अशी वस्तु अप्राप्य असली म्हणजे
मनुष्य कल्पनाशीळल बनूं लागतो. कल्पनापूर्तीतीळ विलक्षण अनुभूतीमुळें ती
भारावून गेलेला असतो. ज्या अद्भुत अशा मायानगरीची इच्छा खऱ्या
जीवनांत मनुष्य करीत असतो ती त्याला सहसा कधींच मिळत नाहीं; मग तो
कल्पनेच्या साम्राज्यांतील इमारती बांधू लागतो. त्याच मायाविश्वांत त्याला
विशेष आनंद प्राप्त होतो. धनपतच्या बालमनासहि हीच चटक पहिल्यापासून,
लागली
रामचंद्राचे जीवनसार नृत्य-नाट्याच्या साह्याने उभें करणारी रामलीला
लहानग्या धनपतरायला विलोभनीय अशी वाटे, रामलीलच्या खेळांत त्याला
मनस्वी सुख प्राप्त होई. “' माझ्या शेजारींच रामलीलेचा खेळ होत असे.
त्यांतील राम, लक्ष्मग, सीता मळा फार आवडत असत. त्या वेळी माझ्या-
जवळ जी मोल्यवान वस्तु असे ती घेऊन मी रामचरणीं अर्पण करीत असें..
थोडेफार पैसे जवळ असले कीं रामरायाला अर्पण कराण्यांत मळा धन्यता
वाटे, रामचंद्र माझ्याशी थोडे बोळेलळ तर काय मजा येईल असे मनांत येई. . .
मी किती भोळा व भोंदू होतो, आजकालची मुळें माझ्यापेक्षा अधिक चलाख
9 धघनपतराय
दिसतात. *' असे उद्गार त्यांनीं आपल्या बालपणींच्या रामभक्तीवद्दल काढ
लेळे आहेत. पुर्दे प्रेमचंदांनी लहानपणींच्या या जिवंत रामठीलेवर एक छोटी
कथाहि रंगविली आहे.
धनपतरायाच्या कल्पनाप्रवण स्वमावास आणखी एक खाद्य याच वेळीं
मिळाठें., शाळेंत जाण्याचे विसरूनहि धनपतराय उद कथा-कादंबऱ्या वाच-
ण्यांत दंग होऊन जात असे. मौलाना शरर, पं. रतननाथ सरशार, मिजी
रुसवा, मोलवी महम्मदअली इत्यादि त्या वेळच्या प्रसिद्ध उद कथाकारांचें
सारं वाडमय धनपतरायांनीं वाचून काढले होतें. रंनाल्ड या इंग्रजी कादंबरी
काराच्या कल्पनारंजित ब अद्भुत अशा कादंञजऱ्यांचे उदू अनुवाद त्या वेळीं
भराभर प्रसिद्ध होत होत, तेहि या कोंबळ्या विद्याथ्यांच्या हातून सुटले नाहींत,
“६ दोन-तीन वर्षात मीं शेकडो काद्अऱ्या बाचून काढल्या. कथा-कादंबऱ्यांचा
संच संपत आला तेव्हां नवलकिशोर प्रेसनें प्रसिद्ध केलेळे पुराणांचे उर्दू
अनुवादहि मी वाचू लागला. ' तिल्स्मी होशरुभा ? नामक अदूभुत ग्रंथाचे
सतरा भाग त्या वेळीं प्रासेड्ध झाळे होते. एक एक भाग मोठा रॉयल आकारा-
चा असून प्रत्येकाची पृष्ठे दोन हजारांपेक्षां कमी नव्हतीं, यांतील कांहीं
भाग मीं त्याच वेळीं वाचून काढले, ?? घनपतरायाच्या या आत्मकथनांतील
सार ध्यानांत येग्यासारखें आहे. घनपतचें मन संदेव भुकेलेळ॑ होते. समोर
दिसेल तें बाचून काढणें एवढेंच तें जाणत होते. वाडिलांची बदली गोरख-
पूर येथें झाल्यावर धनपतच्या शिक्षणाची सोय याच गांवी करण्यांत आली.
खेड्यांतून शहरांत आल्यावर घनपतचे बालमन अधिकच चकित होऊन
गेलें. गोरखपूर येथील एका मिडूल स्कूलमध्ये घनपतांचें शिक्षण सुरू झाटे
आणि याच वेळीं त्यांना उद् कथा-कादंबऱ्यारचे विलक्षण वेड लागलें. “ गोरखपूर
येथे मिशन हायस्कूलमध्ये मी आठव्या वर्गात होतो. बुद्धिलाल नांवाचा एक.
पुस्तक-विक्रेता माझ्या ओळखीचा होता. त्याच्या दुकानांत बसून तेथील
कादूजऱ्य़ा वाचण्याचा सपाटा मीं सुरू केला... ?' आणि लहानपणीच कथा
वाचण्यास चटावलेल्या घनपतच्या मनांत डोकावून गेळें असेल कीं, आपणहि
अशाच प्रकारचें लेखन करावे, कारण शाळेच्या अभ्यासू वातावरणांत धनपतचे
लक्ष कधींच फारसं रमलें नाहीं, इतिहासांतील शुष्क सनावली व गणितांतील
नि्जीब आंकडे' यांचा लोभ त्याच्या मनाला केव्हांच बाटला नाही. भरमसाट
मुन्शी प्रेमचंद ८
वाचन झालिळें असल्यामुळें तसल्याच प्रकारच्या लेखनाचा उद्योगहि धनपतनें
बालपर्णीच सुरू केठेला होता, वाचावे, लिहार्वे ब फाडून टाकावे याच क्रमाने
त्याच्या लेखनक्रियेस प्रारंम झाला,
घरच्या गरिजीमुळे घनपतराय नेहर्मीच दैराण झालेला असे. वयाच्या
पंधराव्या वर्षीच विद्याभ्यास चाळू असतांनाच धनपतर्चे लग्न करून दिलें
होते. वडिलांना पगार प्रारंभीं वीस रुपये होता. तो वाढतां वाढतां चाळीस
रूपयांपर्यते वाढला, पण या वेळी धनपतच्या पितार्जीचाहि स्वर्गवास झाला.
मधून मधून विचारपूस करणारें एवर्ढे एकच मायेचे मनुष्य त्याला होर्ते तेहि
काळानें हिरावून नेल्यावर धनपत अधिकच उदास बनला. घरांत जो कांही
थोडासा पैसा होता तो वडिलांच्या आजारयणांत व क्रियाकर्मात खर्च
होऊन गेला, घनपतच्या मनांत प्रबल इच्छा अशी की, आपण एम्. ए.,
एळूएलू. बी. व्हार्वे व वकिली करावी. पण दारिद्यानें पाठ एकसारखी पुर-
विल्यामुळे धनपतच्या साऱ्या इच्छा-आकांक्षा धुळीस मिळाल्या. देहावर घड
कपडे' नसत, अनवाणी पायांसींच त्याला भटकार्वे लागे. महागाई विलक्षण
होती. खाण्यापिण्याची थोडी सोय व्हावी म्हणून घनपतला आदल्या वर्षीच
हौसेने शिवलेळा कोट विकावा लागला ! या कष्टदायक परिस्थितींत असतांना
त्याची प्रवेश-परीक्षा उत्तीण झाली. नंबर वर आलेला नव्हता म्हणून त्या वेळीं
नांवाजलेल्या क्वीन्स कॉलेजमध्ये जाण्याची शकयता संपली. तेर्थ धनपतला
नादारी कोण देणार !
धॅनपतचे सुदैव असे की, त्याच वर्षी दिन्दु केळिज नव्यानेच निघाले, त्या
कॅलिजांत जाण्याचा निश्चय त्यानें केला, फीच्या सवलतीचा वशिला लावणें
भाग होते. प्रिन्सिपांल रिचर्डसन यांच्या घरीं घनपतराय गेले, “ कॉलेजमधीळ
काम घरी नाहीं होणार, कॅलिजांत या ? असें उत्तर मिळालें. अथोत् पुढे
कॉलेजमध्ये भेटनहि कांहीं उपयोग झाला नाहीं. कोणा प्रतिष्ठित माणसाने
शिफारस केळी तर काम होणार होतें. घनपतरायांस शिफारस-पत्र कोण
देणार १ नाशिबानें ठाकुर इंद्रनारायण सिंह या एका प्रतिष्ठित ग्रहस्थारचे
शिफारस-पत्र हातीं आल्यावर घधनपतच्या आनंदास सीमा उरली नाहीं, पण
शिफारस-पत्र प्रिन्सिपांलना दाखविण्यापूर्वीच धनपतराय तापाने आजारी
झाले. यांत एक महिना निघून गेला, भीतभीतच धनपतराय शिफारस-पत्र
९ . ' घनपतराय
घेऊन प्रिन्सिपॉलसाहेबांना भेटावयास गेळे. करड्या नजरेनें पाहून प्राचायौनौ
निचारलें, “ इतके दिवस कुठें होती स्वारी ! ?
“६ आजारी होतो.
£६ काय होत होते ? ?'
धनपतरायांना उत्तर देतां येईना, केवळ तापासाठीं एक महिन्याचा उशौर
साहिब कसा सहन करील ! कष्टसाध्य असणाऱ्या एखाद्या रोगार्चे नांब मनां-
तल्या मनांत ते आठवूं लागले. शिफारस-पत्र देत असतांना ठाकुर इंद्रनारायण
सिंहांनीं आपल्या धडकणाऱ्या हृदयाच्या विकारासंबर्धी कांही बातचीत केळी
होती, ती आठवून धनपतरायांनीं बेघडकपणें उत्तर दिले, “' पास्पिटेशन ऑफ
डाटे, सर! ”
साहेबाने विचारे, “ आतां ठीक आहि ना! ”
६६ हो 2 ५१
“६ ज्ञा, आजच्या आज कॉलिजांत नांव घाल, ??
'घनपतरायांच्या शिरावरील पर्वतच जणुं खाली उतरला. अर्ज भरून त्यांनी
कॉलेजच्या ऑफिसमध्ये दाखल केला. कांहीं तासांनी अर्ज परत आला. * उमेद-
वाराची चांचणी घेऊन त्यास प्रवेश द्याबा ' असा शेरा त्यावर होता ! घनपत-
रायांच्या सर्वे आकांक्षा येथेंच संपल्या, इंग्रजीशिवाय कोणत्याहि विषयांत एका-
'एकी पास होण्याची शक्यता त्यांना वाटेना. बीजगणित व भूमिति यांचें नांव
काढल्याबरोबरच त्यांना भीति वाटे, सवे कांहीं विसरून गेलेळें असल्यामुळें पास
डोण्याची आज्याच नव्हती. वगोत याच घडकीने त्यांनी प्रवेश केला, पहिला
इंग्रजीचा तास कसाबसा गेला. दुसऱ्या तासास बीजगणित शिकविणारे बँगाली
प्राध्यापक वर्गात आले, धनपतरायांची परीक्षा घेण्यांत आली. अपयदा आल्या-
मुळे फॉमेवर “ असंतोषजनक ' असा शेरा मिळाला. हताश झालिल्या घन-
'पंतरायांस खिन्न होऊन घरचा रस्ता सुधारण्याखेरीज दुसरा मार्ग नव्हता.
“६ गाणित मेरे लिये गौरीशंकर की चोटी थी | *' असे उद्गार त्यांनीं या वेळेस
काढले, घनपतरायांच्या कॉलेजमधील अध्ययनाची ही तऱ्हा, पण मनांत शिक-
ण्याची तर मनस्वी दहवौस. गणिताचा अभ्यास त्यांनीं पुनः सुरू केला, एका
वाकिलाच्या मुलांना शिकविण्याचें काम त्यांनीं पत्करले व या पांच रुपये मिळ-
णार्या मासिक वेतनांतील कांहीं माग घरी पाठवून उरलेल्यांत आपलें शिक्षण
मुन्शी प्रेमचंद १०
२०४४४०५१५० ०” ४०/९९..»४५.००७०*-€ *“४-/"४-०/”*//*
घनपतरायांनीं सुरू केळे, मोठ्या काबाडकष्टांत दिवस काढीत गणिताच्या अध्य-
यनास प्रारंभ केला खरा, पण धनपतरायांचें मन कर्से विचित्र पहा, गणित करण्या-
साठीं मिणमिणर््या दिव्प्रासमोर जसत पण सारी रात्र जागून एखादी अद्भुत
कादंभरी वा-चून काढीत. “ फिसाना आजाद ?, ' चंद्रकान्ता संतति ' आणि
बोकमचंद्रांचे कांही अनुबाद त्यांनीं या वेळीं वाचून गणिताच्या अभ्यासाचा
फार्स केला. गारिबी त्यांच्या पाठीमागे हात धुऊन लागली होती. कांहीं चांगली.
नोकरी मिळेल तर बरी, या विचारांत धनपतराय होते. पण सहजासहजी नोकरी
या विक्षिप्त माणसास कोण देणार ! दारिद्य आणि गणितांतील कचचेपणा यांमुळे
धनपतरायांस कॉलिजचें शिक्षण घेणें अशक्य होऊन बसलें. त्यांना आतां पोट.
भरण्यासाठी नोकरीच्या शोधांत भटकर्णे भाग होते. पण मनांतील विद्येची लालसा
स्वस्थ झाली नव्हती. पुर्टे दद्दाबारा वर्षांनीं जेव्हां परीक्षेस गागित हा ऐच्छिक.
विषय झाला तेव्हां धनपतरायांचें उच्च शिक्षण मार्गी लागलें.
दारिद्यामुळें विद्या घेण्याची इच्छा कित्येकांना मारावी लागत असल्याचे
धनपतरायांनीं पाहिलें होतें; त्वतः अनुभविलें होते. आपल्या कथा-कादंभऱ्यांतून
अशा प्रकारची टोचणी त्यांनीं रंगविळेली दिसून येते. ' कमभूमि ? या त्यांच्या
गाजलेल्या कादंबरीची सुरुवातच अशी आहे : “' आपल्या शाळा-केलिजांतून
फीचे पैसे ज्या प्रकारें वसूल केळे जातात तसा प्रकार कदाचित् सावकारहि
करीत नसेल, महिन्यांतील एखादी तारीख ठरवून त्या दिवसापर्यंत पैसे आले
नाहींत तर नांब काढलें जातें किंबा रोजचा दंड सुरू होतो. ., अश कठोर
नियमांचा उद्देश गरिबांना शिक्षण घेतां येऊं नये याशिवाय दुपरा कोणता
असणार १. ..शाळा-कॉलेजांतहि पैशाचे राज्य आहे; आगि तेंहि निर्दय आणि
कठोर, उशिरां आलें तर दंड. आलंच नाहींतरी दंड, ग्रह्पाठ झाला नाहीं
तर दंड, पुस्तके विकत घेणें शक्य नसळें कीं दंड ! कोणताहि अपराघ होऊं
द्यात, त्याला दंड हा असणारच. हीं विद्यालर्ये कीं दंडालथे ! पाश्चात्य शिक्ष-
णाचा हाच आदर्श आहे आगि याच शिक्षणाची मोठी तारीफ केली जात.
या प्रकारच्या विद्यालयांत पेश्याकडेच लक्ष देणारे असतील, गरिबांचे गळे
कापणारे असतील, पैशासाठी आत्मा विकणारे असतीळ, तर त्यांत आश्चर्य
तैं कोणते £ ?
धनपतरायांना आलेला अनुभवच त्यांनीं येथें साकार केलेला आहे.
११ डेप्युटी इन्स्पेक्टर
"२४१४०४ ४४.” ४०७ 0४७४ फो४.०-४ ५० १७.१.» ॥..”.४ ४८४ ४.५४.” ४५.४ ४५०४ १५०४१५९. ४७०४१७. 0९५०४७ करट
आपल्या आत्मकथनपर वृत्तान्तांत त्यांनी लिहिळें आहे; “ शाळेतून साडेतीन
वाजतां सुट्टी मिळे. हेडमास्टरनें फी माफ केली होती, पण परीक्षा आ वासून
उभी होती. शिकवण्या चाढूच असत. थंडीचे दिवस होते. चार वाजतां शिक-
वणी संपे. तेथून पांच मैल दूर असणाऱ्या खेड्याकडे मी निघे. वेगाने चाळूनहि
रात्री आठाच्या आंत घरीं येणें केव्हांच मला जमलं नाहीं, सकाळीं आठ
वाजतां परत शाळेला निघत असे. वेळेवर जाणें कर्घबीच जमले नाहीं. रात्री
बेवण झाल्यानंतर मिणमिणत्या दिव्यासमोर घसून राही. झोंप केव्हां ठागत असे
हेंहि ध्यानांत नसे. पण हिंमत सोडली नव्हती.
७ ७७
डेप्युटी इन्स्पेक्टर १२
शिक्षणाची तीत्न लालसा आणि घरच्या प्रपंचाची हलाखीची अवस्था
यामुळें धनपतराय क्षणभर वैतागून गेळे, घरीं सावत्र आई व सावत्र भाऊ
यांचा त्रासच होई. शिकवणीचे पैसे अपुरे पडत. नोकरीच्या ज्योधांत अस-
तांनाचा एक प्रसंग घनपतरायांनांच वर्णन केला आहे :
५ शेडीचे दिवस होते. जवळ एक कवडीहि नव्हती, एक-एक पैक्यारचे
खाऊन दोन दिवस घालविले होते. यापुढे उघार देण्यास दुकानदार तयार
नव्हता. एका पुस्तकविक्रेत्याच्या दुकानांत कांहीं पुत्तर्के बिकण्यासार्ठी मी
गेलो होतो. चक्रवर्ती गागितकुंजी ( गाइड ) दोन बषोपूर्वी विकत घेतलें
होते, चोहोंबाजूनीं निराश झाल्यानंतर आज तें पुस्तक विकावयास काढलें
होतें. दोन रुपयांच्या पुस्तकाचा सौदा एका रुपयावर ठरला, एक रुपया घेऊन
मी दुकानाच्या पायऱ्या उतरत होतों, तों मोठ्या मोठ्या मिश्यावाल्या एका
सौम्य मागसानें मला विचारलें, “ तुम्ही कोठें शिकत असतां ! ?
: तूते कुठेंच शिकत नसतो. पण इच्छा मात्र आहे,
५ प्रवेशपरीक्षा पास झाळी आहे का!
€ होय. ग्रे
* नोकरी करण्याची इच्छा आहे ;
मुन्शी प्रेमचंद १२
£ घण मिळते आहे कुर्ठे नोकरी १
चौकशी करणाऱ्या ग्रह्त्थास एका सहकारी अध्यापकाची जरूरी होती.
ते एका लहान शाळेचे हेडमास्तर होते. दर महिन्यास अठरा रुपये पगार
मिळणार होता. मॉ. एकदम नोकरी स्वीकारली, माझ्या कल्पनारक््तींतील
सवोत उंच भरारीसुद्धां दरमहा अठरा रुपयांच्या मानानें ठेंगणी होती. सन
१८९९ ची गोष्ट आहे ही. ??
वकिली . करण्याची इच्छा धरणारे धनपतराय एका लहानश्या शाळेत शिक्षक
बनले. परंतु कल्पनासाम्राज्यांत रममाण होणाऱ्या या तरुण माणसाचे मन
शिक्षकाच्या वेश्यांत कर्से रमणार ? शिक्षणाची लालसा अर्धवट राहिलेली,
घरच्या दारिद्यार्ने मन पेटलेळं, अश्या विरोधी परिस्थितींत धनपतरायांनीं
शिक्षकाची नोकरी पत्करली, तींत त्यांना आत्मीयता अशी वाटलीच नाही.
“ होली की छुट्टी ? नांबाच्या कथेत जणुं त्यांनीं आत्मवृत्तव लिहिलें आहे
€: मंटिक्युळेशन झाल्यावर मला एका प्रायमरी शाळेंत शिक्षकाची जागा
मिळाली. ही शाळा माझ्या घरापासून अकरा मैल दूर होती. आमचे हेड-
मास्तर सुट्टींतहि विद्यार्थ्याना शिकवार्व, अशा मताचे होते. एप्रिळ माहिन्यांत
वार्षिक परीक्षा असे, यासाठी जानेवारीपासूनच अभ्यास उरकण्यार्चे तंग
वातावरण सुरू होई. सहकारी अध्यापक रात्री बोलावले जात नव्हते दे नशीब;
परंतु त्यांना सुट्टी कशी ती माहीत नव्हती, सोमवती आवस आली आणि
गेली, शिवरात्र आली आणि संपली. ..किऱ्येक महिन्यांत मला घरीं जाण्यास
सांपडळे नव्ह्ते. या होळीच्या सुट्टीत काय वाटेल तें होवो, घरीं जाण्याचा
निश्चय मीं केला होता. एक आठवडा सुट्टीस उरला तेव्हां मी हेडमास्तरांना
रीतसर सूचना दिली, “ २० मार्चला सुट्टी सुरू होत आहे, १९ मार्चलाच
मला जाण्याची जरूरी आहे. ? हेडमास्तरांनीं मला बोलावून घेतलें आगि ते
बोलले, “ अजून लहान आहांत तुम्ही, किती मुश्किलीने ही नोकरी तुम्हांस
मिळाली. .. एप्रिलमध्ये वार्षिक परीक्षा आहे, तीनचार दिवस तुम्ही रजा
घेतलीत तर सांगा किती मुलें पास होतील १ वषोची सारी मेहनत फुकट
जाईल ना. माझें ऐका तुम्ही. या सुरट्टींत जाऊ नका तुम्ही. पर्रीक्षा संपल्या-
नंतर खुशाळ आपल्या घरीं जा. इस्टरच्या सुद्टींत मी एक दिवसहि तुम्हांला
थांबविणार नाहीं, ' हेडमास्तरांचे बोलणे ऐकल्यावरहि मी माझ्या जागींच
१३ डेप्युटी इन्स्पेक्टर
स्थिर होतो. उपदेश किंबा धमकी यांचा पारिणाम माझ्यावर कांह्रींहि झाला
नाहीं. १९ जानेवारी रोजीं शाळा बंद झाली आणि हेडमात्तरांना न विचार-
तांच मी माझ्या निवासस्थानांतून बाहेर पडलॉ. त्यांना नमस्कार करण्याच्या!
भानगर्डीत पडतो तर एक ना दुसरी गोष्ट सांगून त्यांनीं मला अडविलें असतें.
रजिस्टरमध्ये फीच मांडून टाका, उपस्थितिपत्ररके भरलीत का, विद्यार्थ्यांचे
निबंध तपासलेत का, त्यांच्या चुका दुरुस्त झाल्या कीं नाहीं, अर्शी शेकडो
कार्म त्यांनीं मळा सांगितला असती. जणुं मी शेवटच्या महायात्रेला निघार्लो
होता ! सारी निरवानेरब त्यासाठींच होती... ?'
शिक्षकाच्या नोकरीत धनपतरायांना कितपत सुखसमाधान वाटत असार्वे
याचा अंदाज वरील उताऱ्यावरून येईल. चार भिंतींत स्वतःला कॉडून घेव-
बून वीस-पंचवीस मुलांच्यासमोर घसा कोरडा करीत बसण्याचे रुक्ष जीवन
या कल्पनाप्रवग माणसास रुचलं नाहीं. कांही तरी भव्य-दिव्य करून
दाखवावे, विशाळ अशा लोकजीवनाचा अभ्यास करावा, एम्. ए. ची ब
बकिलीची परीक्षा द्यावी, हाच एक ध्यास धनपतरायांना लागून राहिलेला होता.
अपयशाशीं टकरा देत देत यशस्वी व्हावयाचे, हॅंच त्यांच्या जीवनाचें सार दिसत
दोते. प्रायमरी स्कूलमध्ये अध्यापक असतांनाच दोन वेळां इंटरच्या परीक्षेस ते
बसले आणि दोनहि वेळां नापास झाळे. सन १९०२ मर्ध्ये आणखी एका
परीक्षेची तयारी धनपतरायांना करावी लागली, प्रायमरी झाळेंत दोन वर्षे
नोकरी झाल्यानंतर सरारतर्फे शिक्षकांना शिक्षण दिढें जात असे, या सुमा-
रास घनपतरायांची भरती अलाहाबादच्या ट्रेनिंग केलेजांत झाली, या ठिकार्णी'
मात्र त्यांच्या बुद्धिमत्तेची चमक दिसून आली, एक वर्षांचा शिक्षणक्रम होता.
ज्यूनियर छासच्या परीक्षेत धनपतरायांनीं अव्वल दर्जाचे यश मिळविले, कॅलेज-
चे प्रिन्सिपॉल त्यांच्यावर खूघ झाले, टोनिंग कॉलेजच्या मिडूल व्कूलवर
त्यांनी धनपतरायांची हेडमास्तर म्हणून नेमणूक केली. तरी गणित विषय
शिकषिण्याची पात्रता त्यांच्यांत केव्हांच येऊं शकली नाहीं. धनपतरायांची'
परीक्षा देण्याची चिकाटी मात्र विलक्षण होती. इंटर्च्या परीक्षेत कित्येक वेळां
अपयश आले तरी त्यांनीं आपला दीर्धोद्योग मात्र साडून दिला नाहीं, सन
१९१० सालीं गणितविषय ऐच्छिक झाला तेव्हां तो सोडून देऊन त्यांनी
इटरची परीक्षा दिली. इंग्रजी, फारसी, तत्त्वज्ञान आणि वर्तमानकाळचा इव़ि-
मुन्शी प्रेमचंद १४
हास असे विषय त्यांनीं या परीक्षेसाठी घेते हते. पुढें इंग्रजी, फारसी ब
इतिहास हेच विषय घेऊन ते त्रो, ए. ची परीक्षाह्रि दुसऱ्या श्रेणींतून उत्तीणे
-झाले, धनपतरायांनीं एवढ्या परीक्षा दिल्या, पण या परीक्षांच्यावरहि त्यांची
श्रद्धा नव्ह्ती. पाठ्यपुस्तकांत त्यांचें मन कर्धींच रमर्ठे नाही. जीवनांतील
विविध समरप्रसंग रंगविणाऱ्या आणि मानवी भावनांचे अद्भुत अर्से विश्व
चित्रित करणाऱ्या कथा-कादअऱ्यांची हौस त्यांना अवीट होती. जुन्यागोष्टी ब
कहाण्या यांबद्दल त्यांना फार प्रेम बाटे, त्यामुळें व्यवसाय शिक्षकाचा असला
तरी धनपतरायांची चित्तवृत्षि मात्र कथा-कादंबऱ्यांतच रॅगाळत राहिली.
धॅनपतरायांच्या लयनाचा उल्लेख मागे आढाच आहे. अजाणपणीं झालेले
लम्न त्यांना अथोतच पसंत पडलं नाहीं, ममतेचे असें काळजी वाहणारे
कोणीच नसल्यामुळें एका कुरूप व अर्धवट मुलीशी संसार करण्याचें दुभोग्य
घनपतरायांच्यावर येऊन ठेपले, पण त्यांनीं याहि संकटांतून मार्ग काढला.
सन १९०५ मध्ये धनपतरायांनीं दुसरं लयन केडे. या दुसऱ्या पत्नीचे नांव
शिवरानीदेवी. वस्नाच्या अकराव्या वर्षीच त्यांचे लम झालेलें होतें; पण विवाह
कसा, केव्हां झाला, पहिल्या पतीचा मृत्यु कोणत्या कारणामुळें झाला, व*ैरे
गोष्टींचा कोणताच अंदाज शिवरानीदेवींना नव्ह्ता. विवाह झाल्यावर तीन-
चार महिन्यांतच त्यांच्यावर वैधव्याचा आघात झाला, त्यांच्या वडिलांचे नांव
मुन्शी देवीप्रसाद असे होते. पोरीची ही दैन्यावत्था त्यांच्या मनांत एक-
सारखी खटकत होती. या अभागी मुलीला सुख कसें मिळेळ हीच एक चिंता
त्यांच्या मनास लागून राहिलेली होती. लेकीचे लम पुनः करण्याचा विचार
देवीप्रसाद यांनीं केढा, आणि याच वेळीं धनपतरायांचें पत्र त्यांच्या हातांत
आलें, “' मी विवाह करूं इच्छीत आहें. अर्से असें माझे शिक्षण व अशी
अशी माझी सांपत्तिक त्थिति आहें, ?' देवीप्रसादना हँ. व्थळ पसंत
पडलें आणि शिवरानीदेवींचा विवाह घनपतराय यांच्याशी झाला, शिवरानी-
देवी जणुं सोन्याच्या पावलांनींच धनपतरायांच्या घरांत आली. पहिले कांहीं
'दवेवस किरकोळ परिस्थितीमुळे वातावरण तंग राहिलें तरी धघनपतरायांच्या
साहित्यिक प्रबृत्तीस फुलविणारी अशी ही शिवरानीदेबी होती, विवाह झाल्याच्या
दुसऱ्याच महिन्यांत धनपतराय डेप्युटी इन्स्पेक्टर झाले; आणि १९०५ पासून
त्यांचें बास्तव्य कानपुरास होऊं लागले, धनपतरायांच्या वाडूमयीन जीवनाचा
५५ धनपतराय प्रेमचंद झाले
प्रारंम येथूनच खऱ्या अर्थानें झाला, त्यांच्या जीवनांत खराखुरा पणं आव-
इयक असा बदड येथूनच होऊं लागला, १९०५ हँ साळ आपल्या देशाच्या
राजकीय इतिहासांतहि महत्त्वाचें म्हणून गणळें जातें. इंग्रजांच्या साम्राज्यशाहीची
चढती कमान होती ब टिळक, लजपतराय, , जिपिनचंद्र पाल इत्यादि देश-
भक्तांच्या त्वदेशप्रीतीसहि मरती आलेली होती. देशभर नवचैतन्याचें वारे खेळ॑
लागलं होते. धनपतरायांसारखा भावनाप्रधान पण वृत्तीने कगखर असा
कल्पक मनुष्य या वावटळीत न सांपडेल तरच नवल !
शधनपतराय प्रेमचंद झाले १३
धनपतरायांना अद्भुतरम्य कथा-कादंबऱ्या वाचण्याचे वेड बालपणीच
-लागलें होते, तें मोठेपर्णीहि अर्थातच फारसें कमी झालें नाहीं, शुष्क व दरिद्री
अशा त्यांच्या जीवनांत जी कांहीं नवलाई निमीण झाली होती ती कादंबरीच्या
अपूव बिश्वामुळेंच, भोबतालच्या भल्याबुऱ्या समाजाचें निरीक्षण त्यांनी चाळूच
ठेवले होते, देशपरिष्थितीकडेहि डोळेझांक करणे धनपतरायांसारख्या भाविक
मनाच्या तरुणास तेव्हां अशक्य होऊन बसलें होतें. डोक्यांत विचारांचे काहूर
व मनांत अस्वस्थ हुरहूर यामुळें त्यांच्या संघर्षमय जीवनाची अमिव्यक्ष्त
हावयास फारसा वेळ लागला नाहीं, हजारो कथा-कादंबऱ्या वाचीत असतां-
नाच त्यांनी स्वतः लिहावयासहि प्रारंभ केळा, स्वतःच्या लेखनविषयक प्रगती-
संत्रंधी ते लिहितात ः '““ सन १९०७ च्या अगोदरच मीं कथा लिह्यावयास
प्रारम केला. डॉक्टर रवीन्द्रनाथांच्या कित्येक कादंबऱ्या मीं इंग्रजीतून वाचल्या
हीत्या. उदू पत्रिकांतूनहि त्यांचा अनुवाद प्रसिद्ध झाला होता. सन १९०१
मध्येच मीं कादंबरीलेखनास सुरुवात केली, माझी पहिली कादंबरी सन
-१९०२ मर्ध्वे, दुसरी सन १९०४ मध्ये प्रसिद्ध झाली, पण कथा मात्र सन
१९०७ च्या पूर्वी मीं एकहि लिहिली नव्हती. माझ्या पहिल्या कथेचें नांव
होतें “ संसार का सबसे अनमोल रत्न , सन १९०७ मध्ये ' जमाना ?
-मासिकांत उर्दू भाषेतून दवी कथा प्रसिद्ध झाली.
खली प्रेमचंद १६
याहि पूवी धनपतरायांच्या एकदोन कादंबऱ्या प्रासिद्ध झालेल्या होत्या.
१९०१ मर्ध्ये आणि १९०२ मध्ये * कृष्णा? व *' हम खुरमा और हम.
साब ? या त्या दोन कादंबऱ्या, याहिपूर्वी म्हणजे वयाच्या चोदाव्या वर्षी
थनपतरायांनीं एक *“ होनहार भिरवान के चिकने-चिकने पात ? नांबाच
एक नाटकहि लिहिलें होतें. प्रारामिक काळांत झालेल्या या प्रकारच्या ठिखाणांत
स्वाभाविकपर्णेच अद्भुत आणि आतिरांजेत अशा विषयांना प्राधान्य असे.
कल्पनांचे उड्डाण या वयांत विशेष असल्यामुळें घनपतरायांच्या पाहिल्या कथा-
कादंबऱ्या अद्भुतरम्य अश्याच आहेत. मानवी जीवनांतील संघर्ष व त्यांतील
पदोपदी अनुभवास येणारी कटुता यांचा अनुभव तर त्यांना सदोदित येत
होताच, पण जीवनाचे हॅ दर्शन त्यांच्या लेखनांतून साधेपणाच्या मार्गानें प्रकट
होण्यास अजून अवधि होता.
सन १९०५ मर्ध्ये डेप्युटी इन्स्पेक्टर म्हणून धनपतराय कानपुरास आले
आणि येथूनच त्यांच्या खऱ्या साहित्यिक जीवनास प्रारंम झाला, त्यांची
साहित्यसाधना याच कालापासून सुरू झाली. पहाटे चार बाजतां उठून
प्रातार्वाधि उरकून कायं असेल त्यावर सकाळची भूक भागवून धनपतराय
लिहावयास बसत. एखाद्या मजुराचें फावडे ज्या गतीने काम करीत असतें
त्याच गतीने धनपतरायांची लेखणीहि काम करी.. .. दोऱ्यावर असतांना सुद्धां
त्यांच्या लेखनव्यवसायांत कर्धी खंड पडत नसे. मुन्शी दयानारायण निगम
नांबाचे एक सज्जन ग्रंहृत्थ कानपूर येर्थे “ जमाना ' नांवाचें मासिक-पत्र
काढीत असत. त्यांची ब धनपतरायांची चांगलीच मैत्री जमली. कित्येक दिवस-
पर्येत दोघेहि एकाच घरांत राहत असत. ' जमाना च्या कार्यालयांत अनेक.
साहित्यिक नाना प्रकारचे वादविवाद करण्यासाठीं येत. त्यांच्या बैठकी साहित्य-
चर्चेने रंगत असत. धनपतरायांचें अध्ययन, चिंतन व मनन चालूच होतें.
मानवी नीवनाच्या हरएक अंगाचा परिचय करून घेण्यांत त्यांना धन्यता वाटे.
१९०८ च्या सुमारास कानपूरहून हमीरपुर जिल्ह्यांतील महोबा येर्थे.
धनपतरायांची बदली झाली, या ठिकाणीं जवळजवळ सहा वर्षे त्यांनीं वास्तव्य
केळे, तेथील वातावरणांत त्यांची देशप्रीतीची वृत्ति जाग्रत झाली, १९०४
पासूनच हिंदुस्थानांतील राजकीय वातावरण तंग बनलें होतें, इंग्रजांविरुद्ध तीत्न
असंतोष पसरविण्याचे प्रखर कार्य देशभर सुरू होते, बंगालच्या फाळणीच्या:
१७ घनपतराय प्रेमचंद झाले
भक्षामुळें सर्व देशमर आयग्रति निमोण झालेली होती. मधूनमधून होणाऱ्या
प्राणघातक बॉँबस्फोटांभुळे किंबा पिस्तुळाच्या घारांमुळें बंगाल व महाराष्ट्र दणाणून
मेला होता. स्वदेश व स्वातंत्र्य यांचा जयघोष सवे देद्यांत निनादत होता.
स्वराज्याची हांक त्या काळच्या तरुणाच्या कानांपर्यंत जाऊन मिडल्यामुळें तो
खडबडून जागा झाला होता. घनपतरायांसारख्या कल्पनासंपन्न तरुण डेखका-
च्या मनांत या वाबटळीमुळे चलबिचल झाढी, परी आणि राजकन्या यांच्या
अद्भुतरम्य कथांमध्ये रममाण होणारे त्यांचें भाविक मन देशप्रेमानें भारावून
निघाले, ऐतिहासिक काळांतील असे कित्येक धडाडीचे व शौर्याचे प्रसंग
आहेत कीं, जे अद्भुतरम्यह्रि आहेत व सत्यसृष्टींत घडलेले असल्यामुळ वास्तवहि
आहेत. तेव्हां अश्या प्रसंगांवर कांही लिहिळे तर जनताजाग्रतीरचें कर्तव्य पार पाडतां
येईल, या भावनेने धनपतरायांनीं ऐतिहासिक कथा लिहावयास प्रारंभ
केला. ' राजा हरदोल ', ' आव्हा, ' रानी सारंधा ', ' विक्रमादित्य का तेगा ?
इत्यादि ऐतिहासिक गोष्टी त्यांनीं याच काळांत ढिहून प्रसिद्ध केल्या. रजपुतांचें
शौर्य व त्यांचा त्याग या कथांतून प्रकट झालेला असल्यानें बाचकांनाहि एक-
प्रकारचें स्फुरण चढल्यासारखें झालें, बुंदेळखंडांतील शोयची व पराक्रमाची
स्तुति करणारी कादंभरी ' ख्ठी-रानी ? हीसुद्धा याच कालखंडांतील, धनपत-
रायांच्या या प्रकारच्या लिखाणामुळे जनतेच्या मनांत साइसप्रीति निर्माण
होऊन स्वाभिमानाचा स्फालिंग चेताबिळा गेला, भारताच्या गौरवशाली इति-
हासांत पराक्रमास व स्फूतीस चेतना देणाऱ्या अनेक प्रसंगांची मालिकाच
दिसून येते. लोकांच्या मनांत स्वदेशाभिमान निमाण करण्यासाठीं या अमोल
ठेव्याचा उपयोग करण्याचे काम धनपतरायांनीं केळे. ' संसार का सघ से अमूल्य
रत्न ) नांबाच्या कर्थेत त्यांनीं देशहितासाठी आर्पित झालेल्या रक्ताच्या थेंबास
अमूल्य रतन समजून देशभक्तीच्या भावनेचा गौरव केला आहे. याच काळांत
प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या ' वरदान ' कादंबरीची सुरुवातच अक्ली आहे:
“ देवीची पूजा आई नेहमींच करते. तिची पूजा-अर्चा पाहून देवी जेव्हां
नेव्हां प्रसन होते तेव्हां आईर्ने एक वर मागितला, ' देवी, मळा एक पुत्र दे. '
देवीर्ने विचारलें, ' कसा पुत्र पाहिजे ? धनवान् इबा ? बलवान् हवा १ जगांत
नांव कमावणारा हवा £ ' आईने उत्तर दिले, ' नको नको, आपल्या देक्यावर
अनंत उपकार करणारा पुत्र मला इवा, ”
२१७८०
१-४. १.५ ७.८ ५...» %..५” १ -/0७..५४के..४/ ७... ७.५ ४.५ ५” ५ /९७” ५५ ५४५ ७५४४५५ ७. ९.५ ६.४ ४५” १८७ १." ४ ३. ९५ ४४0 ४० ७” ७५ क. ४२.४ ३७५ २०४ ४७ 0 ७ ४४४१.” ७ ८» ४. ९.८ २.» ४.५, ४८.” ४. ४५. ४५.७ २७.७ ७८४ ७
देशभक्तीची ही तीज्ञ भावना घनपतरायांच्या या काळच्या सर्वच लेखांतून
प्रकट झालेली दिसून येते. ऐतिहासिक कथांचा एक संम्रह त्यांनी “ सोने वतन
नांवानें प्रासिद्ध केला होता. देशप्रेमाची भावना या संग्रहांतील पांचहि कथा
कोगत्या ना कोणत्या तरी मार्गार्ने प्रभावित करीत होत्या. इंग्रनी राजसत्ते-
विषुदध असंतोष पसरविण्याचे कार्य या संग्रहासुळे होत असल्याचा संराय
सरकारला लागलींच आला. सरकारचा पगार खाणारा ग्रहत्य सरकारच्याच
विरुद्ध लिहितो, याचा अर्थ काय १ इंग्रज्ञांचे स्नुतिपाठ गाण्याऐवर्जी रेति-
हासिक काळांतील स्मृति जाग्रत करून देशप्रेमाची भावना प्रज्वलित करणाऱ्या
यां ढेखकास शासन करण्याचा विचार इंग्रज अधिकाऱ्यांनी केला. ललितलेखन
करणाऱ्या लेखकावर हा पहिलाच प्रसंग असल्यामुळें, धनपतरायांच्या जीवनांत
“ सोजे वतन ? या छोट्या पुध्तकाच्या कर्तजगारीस फारच महत्त्व आहे. त्वतः
धनपतरायांनींच या प्रसंगाचे वर्णन केलें आहे :
६ त्या वेळीं मी शिक्षणखात्यांत हमीरपूर जिल्ह्यांत डेप्युटी इन्स्पेक्टर शेत.
पुस्तक छापून सहा महिने होऊन गेले होते. एके दिवशीं रात्री मी माझ्या
राहुटींत बसलो. असतांना एकदम कलेक्टराकडून तांतडीनें भेटण्यासंतंघींचा
हुकूम आला. थंडीचे दिवस होते. मीं लागलींच बैलगाडी तयार करण्यास
सांगितळें आगि रातोरात तीस-चाळीस मेळांचा प्रवास करून साहेजास जाऊन
मेटल. त्यांच्यासमोरच “ सोजे वतन ? ची एक प्रत पडलेळी होती. गुसत पोलीस
या पुस्तकाच्या लेखकाच्या मार्गावर आहेत, अशी कुणकुण मला लागली होती.
त्याच कामासाठी मला बोलावून घेतर्ळे असेल हे माझ्या चटकन् ध्यानांत आलें.
साहेबांने मला विचारलें, ' हे पुस्तक तुम्ही लिहिळें १ ? मी होय ? म्णून
सांगितलें, साहेबाने मला एकएका कथेचा आदाय विचारला आणि क्रोधार्यमान
होऊन शेवटीं तो बोलला, ' तुमच्या या कथांतून राजद्रोह भरंठेला आहे.
इंग्रजी राजवटींत आहांत हँ भाग्य समजा तुमर्चे | मोंगळांच्या काळांत असतां
तर दोनहि हात छाटले गेळे असते. तुमच्या कथा एकांगी 'आहेत. इंग्रज
सरकारचा तुम्ही अपमान केला आहे.' इ०
या प्रकरणाचा निकाल असा झाला कीं, “ सोजे. वतन ? च्या सवे प्रती मीं
सरकारच्या इवालीं कराव्यात ब पुनः साहेजाच्या परवानगीशिवाय एकत
ओळहि लिहू नभे, मी समनलो, योडक्यांत मिटळे, एक हनार प्रती छापल्या
९९ धनपतराय प्रेमचंद झाळे
ह्वोत्या. मोठ्या मिनतवारीनें आतांपर्यंत तीनशे प्रती खपल्या होत्या. उरलेल्या
.सहार्दो प्रती मी ' जमाना ? कायीलयाकडून मागविल्या व साहेबास अपण केल्या.
मी समजला की, संपली कटकट, पण एवढ्या साध्या प्रकाराने साहेबाची
तृतति झाली नाही. नंतर मळा समजले की, सुपरिटेडॅट, पोलीस, दोन डेप्युटी
-कलेक्टर आणि डेप्युटी इन्स्पेक्टर माझ्या कृत्याचा निकाळ लावण्यासाठी बसले.
एका कटेक्टरनें सिद्ध केलें कीं, प्रत्येक कथेत राजद्रोह प्रारंभापासून शेवटपर्यंत
भरलेला आहे; आणि हा राजद्रोहहि साधासुधा नाहीं; सांर्थांच्या रोगाप्रमाणें
कैलावत जाणारा आहे, पोलिसाने निश्चयाने सांगितरठे, “ अशा दुष्ट माणसास
चांगली शिक्षाच होणें जरूर आहे.” एक डेप्युटी इन्स्पेक्टर माझ्याशी बरे होते.
त्यांनीं प्र्ताव मांडला की, ' लेखकाची लेखणी थोडी कडक आहे इतकेंच. राज-
मौतिक आन्दोलनाशीं त्याचा कांहीं संबंध नाहीं. “ सोजे बतन *च्या प्रतींबर
मात्र सरकार पूर्णपर्णे संतस्त झालें होते. पुस्तकें जप्त करून साहेबाचे समाधान
'कर्से द्ोणार १ त्याच्या हातांत जेवढ्या प्रती ' सोजे वतन *च्या आल्या तेबढभा
सर्वच्या सर्व त्यानें जाळून टाकल्या, हिंदुस्थान देशांत निमाण होत राहिठेळी
डेशप्रीतीची भावनाहि त्यायोगे जळून खाक होईल, अशी त्या भोळ्या
साहेबाची कल्पना | ??
धनपतरायांच्या जीवनांत ' सोजे वतन * पुस्तकाला वरील कारणामुळे महत्त्व
आहिच; पण आणखी एका कारणामुळें ' सोजे वतन ? घनपतरायांच्या जीवनांत
'विशेष त्थान मिळवून राहिलें आहे. या काळापर्यंत धनपतरायांचें सर्व लिखाण
५ नबाबराय * नांवानें प्रासिद्ध होत असे. “सोजे वतन'*च्या प्रती आभिसात् झाल्या-
नंतर त्यांच्या मनास अतिशय वेदना झाल्या. सरकारची नोकरी पत्करली अस-
ल्यामुळे कप्तीअधिक कांहीं बोलतां येईना, लिहितां येईना. या पुत्तकांतील कथा
अंतःकरण ओतून लिहिलेल्या होत्या, त्यांत धनपतरायांनीं आपले सर्वेत्व ओत
होते. ऐतिहासिक कथांच्या साह्याने हेतुपूर्वक राष्ट्रजाग्राते करण्याच्या या
प्रयत्नास अद्या रीतीने सरकारी सुरंग लागल्यामुळे धनपतरायांच्या सिक्ीच
बेदना होत राहिल्या. या प्रखर धावामुळें त्यांचें हृद्य शतराः बिदीणी” होल
याहिळें. ' सोजे वतन * या विषारी पुस्तकाचा प्रचार इंग्रज सरकारने अति विश्चिप्त
तऱ्हेने थांबविठा; पण या गोष्टीचा परिणाम मात्र दूरगामी झाळा. ' सोजे
बतेन च्या ज्वाढांवून अनंत. ठिणग्या बाहेर निघाल्या आणि प्रत्येक . जळती
सुन्शी प्रेमखंद २०
ब००८/४.//५८/०.». >» » > *
*€१.””% “४१./*५-/६.»/१../४ “ ४.” ५९.५. ४०१९. ”/१-”५.४.”/%/४ “१.-१.“0 “7४- 0%-0 /*१- -“€४९-/"*-€*/” “ -<“ *-/१ ४१.” ५/” “”२/४*-/४-//%//१-/*
ठिणगी भोवतालचा प्रदेश प्रज्वलित करण्यास समर्थ ठरली. ' स्वतः घनपत-
रायांनीं आपल्या आयुष्याचे ध्येय निश्चित करण्यास प्रारंभ केला. मनास योग्य
व इष्ट वाटेल तै लिहितां येणार नाहीं तर तें जीवन कसले ? आणि मग ती
सरकारी नोकरी तरी कशास! हद्दी सोनेरी शुंखला ताडूकन तोडावी
ब मुक्त होऊन मनास येईल त्याप्रमाणे देशगौरव गावा, दलितांचा, पीडितांचा'
उद्धार कारावा, असे विचारप्रवाह घनपतरायांच्या मनांत निर्माण होऊं लागले..
अदभुतरम्य वातावरणांत रममाण होणारें त्यांचे मन आतां मानवाच्या
ब्यावहारिक जीवनाशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करूं लागलें. या सर्व
मानसिक आन्दोलनाचा परिणाम असा झाला कीं, हिन्दी साहित्यक्षेत्रांत
थनपतराय “ नवाबराय ' या नांवाखाली न लिहितां आतां 'प्रेमचंद ' या
नांवाने आपलें लिखाण करू लागले. ' प्रेमचंद ' या नांवाची जन्मकथा थोडक्यांत
ही अशी आहे. ' सोजे वतन मुळें घनपतरायांच्यावर आलेल्या आपत्तीमुळे.
त्यांच्या मित्रानाहि मनस्वी दुःख झाले. या प्रकाराबद्दल मुन्शी प्यारेलाल
श्ञाकिर भेरठी लिहितात : ““ ' सोजेवतन ' हँ एक छोटे पुस्तक होतें. त्यांत पांच
कथा होत्या व किंमतहि पांच आण्यांपेक्षां आधिक नव्हती. पण या छोट्या
पुस्तकाचे कतृत्व असे की, त्याने लेखकास ' प्रेमचंद ? बनविलं, पुस्तकाच्या नांवा-
वरूनच माहीत होईल कीं, त्यांतील कथा देशप्रेम आणि राष्ट्रीय भावना व्यक्त
करणाऱ्या होत्या. सर्वत्र या कथांची वाखाणणी झाली होती. मुन्शीसाहेबांचा
संबंध शिक्षणखात्या्शी होता. ' सोजे वतन! वरच सरकारची वक्रदृष्टि येऊन
मिडढी असें नव्हे तर लेखकाच्या नोकरीवरहि गदा आली होती; पण दादा-
बाचा करतां करतां प्रसंग टळला. पण यामुळें मुन्शीसाहेबांचा कायापालट
मात्र होऊन गेला. ??
या कायापालटाचें वर्णन “* जमाना *चे संपादक मुन्शी दयानारायण निगम
यांनीं उत्कृष्ट प्रकारे केळे आहे. ' सोज वतन च्या प्रतीवर मद्रकाचें नांव छापलेले
नव्हते म्हणून मुन्शी दयानारायण यांना पन्नास रुपयांचा दंड झाला होता. या
संपादकांनी एके ठिकार्णी लिहिलें आहे । “ प्रेमचंद प्रारभींच्या काळांत नवाब-
राय नांवाने लिहीत असत; आणि हँ नांव त्यांना फार प्रिय होतें, कारण
त्यांचे पिताजी मोठ्या प्रेमाने ' नवाब ? म्हणून त्यांना हंक मारीत असत. हिंदु-
मुसलमानांची सामाजिक एकता स्मरणांत राहण्यासाठी हँ नांव फारच महत्त्वार्चे
२१ धनपतराय प्रेमचंद झाळे
द्वोर्ते. पण ' सोजे वतन *च्या प्रती जस्त झाल्यानंतर अंधिकाऱ्यांनी लेखनास बंदी
'केल्यावर हॅ. नांव सोडून देणे त्यांना भाग पडलें. व्यथित हृदयाच्या आधि
काऱ्यांचें म्हणणें धनपतरायांनीं ऐकले असते तर आज हिंदुस्थानी साहित्यांत
प्रेमचंद हें नांवहि जन्मास आलें नसते. पण नदीचा प्रवाह. कोण अडवणार !
हवेचा संचार कोण बदलूं शकणार १ नवाबरायांच्या आत्म्याने ' प्रेमचंद चीं
वस्त्रे धारण करून अन्म घेतला... ”
सरकारनें ज्या पुस्तकांच्या प्रती जप्त केल्या त्याच नेमक्या जपून ठेवण्याची
प्रवृत्ति समाजांत वाढीस लागते हे एक क्रांतीच्या मागीतील सत्य आहे. आपस्या
मराठी साहित्यांतील स्वातंत्र्यवीर सावरकर व के. शि. म. परांजपे यांच्या जप्त
झालेल्या वाडूमयाच्या कथा अद्भुत अशाच आहेत. सरकारची करडी नजर या
साहितावर असल्यामुळें लोकांनीं त्याची जपणूक काळजीपूर्वक केली. गुप्त मागोनें
त्याच साहित्याचा प्रचार सतत होत राहिला, ' सोजे वतन च्या बाबतीत नेमके
हच घडलें मुन्शी दयानारायण निगम पुढें लिहितात : “ ' सोजे वतन? च्या
जेवढ्या प्रती लेखकाजवळ होत्या त्या सवे त्यांनी आधिकाऱ्यांजवळ देऊन
टाकल्या. पण माझ्याजवळ त्या प्रतींचा जो सांठा होता त्याची दाद कोणालाहि
नव्हती. हीं पुत्तके मात्र नष्ट झालीं नाहींत; आणि त्यांची विक्रीहि हळूहळू
होत होती. साहित्याच्या प्रभावी शक्तीचें महत्त्व याच वेळीं प्रेमचंद यांना तीन -
तेने समजून आलें. स्वातत्र्य-संग्रामास जोराची चालना देण्यासाठीं साहित्या-
खेरीज दुसर॑ साधन नाहीं, याची जाणीव धनपतरायांना या प्रकारामुळे
स्पष्ट तऱ्हेने झाली. सरकारच्या अवकृपेस बळी न पडतां आपल्याला हवा
तसा प्रचार कोणत्या मार्गाने करतां येईल याचा विचार तर प्रेमचंदांनी केलाच
पण वेळप्रसंग पडला तर नोकरी लाथाडून देण्याची मानसिक तयारीहि याच
काळांत त्यांनी केली, ??
याच समयास प्रेमचंदांच्या प्रकृतींत बिघाड झाला. इमीरपूरहून एखाद्या
शांगल्या ठिकाणी बदली व्हावी म्हणून त्यांनी अधिकाऱ्यांकडे अज केला तेव्हां
त्यांची बदली नेपाळच्या तराईत असणाऱ्या बस्ती जिल्ह्यांत झाली, दगदग
अधिकच वाढली. या दूर देशांत सुशिक्षित इष्टमित्रांची संगत तरी कोठून
मिळणार ! आजार वाढल्यामुळे एक महिन्याची रजा घेऊन प्रेमचंद बनारस
ऱयेथें आले ब एका इकिमार्चे औषध त्यांनीं खुरू केले, पण फारसा उपयोग
मुन्शी प्रेमचंद २
०९४६-४५-५७ ९ “४०४५ -. ह ड् ४७१ /% “५” ८ २ *८ २-५ *-/५-/%/१-४४-/४/५-
ज्ञाला नाहीं, घरच्या प्रापंचिक कटकटीहि वाढीस लागल्या, सन १९१५
मध्ये बस्ती येथेंच सरकारी शाळेत प्रेमचंद यांची दुय्यम शिक्षक म्हणून
नेमणूक झाली. थोडी स्वस्थता मिळाल्यामुळे साहित्यसेवेकडे पुनः त्यांना नीट
लक्ष देतां आठे. ' घोखा ', “ दो भाई, ' बेटी का घन, ' पंचपरमश्वर ),
: जुगनू की चमक?, ' शंखनाद ?, इत्यादि कथा त्यांनीं याच काळांत.
लिहिल्या, सन १९ १८ मध्ये गोरखपूर येथें आल्यानंतर त्यांच्या साहित्यसेवेस
गौरषाचें त्थान प्राप्त हाऊ लागलें. हिंदी साहित्यांतील बिख्यात कमैयोगी
देशभक्त महावीरप्रसाद पोद्दार यांच्याशी प्रेमचंदांचा परिचय झाला. उदू आणि
हिन्दी या दोनहि भाषांतून प्रेमचंदांचें सफाईदार लिखाण आतां लोक मनापासून
बार्चूं लागले होते. याच आधारावर प्रेमचंदांनी आपली पहिली मोठी कादूंनरी
: प्रेमाश्रम ' लिहावयास प्रारंभ केला, या कादंबरीतून प्रेमचंदांनी हिंदुस्थानच्या
दारेद्री व संकटग्रस्त शेतकऱ्याचे चित्र लोकांसमोर उभे केलें. या दलित खेडुतां-
साठी स्वराज्य व स्वातंत्र्य यांची आवरयकता आहि असें त्यांना मनापासून
बाटे, प्रेमचंदांची सहानुभूति आतां अधिक विस्तृत झाळी होती व तिला
संकटग्रस्त शेतकऱ्यांची चिंता वाटूं लागली होती. खेडेगांवच्या वातावरणाचा
प्रारिचय प्रेमचंद यांना जवळून झालेला होता. आपलें सव लेखनसामध्ये या
गरिबांच्या उद्घारासाठीं खर्च करण्याचा निश्चय त्यांनीं केला. कारण ऐंशी टक्क
असणारा ग्रामीण समाज हाच खरा हिंदुस्थान आहे ! या समाजाची उन्नति
म्हणजेच भारताची उन्नति, हॅ तत्त्व लोकांच्या गळीं उतरवून शेतकऱ्यांच्या
दास्याच्या नायनाट करावा हा एक प्रधान हेतु त्यांच्या येथून पुढल्या कथा-
कादनर््यांतून दिसून येतो.
दलित समाजाचें दुःख वेशीवर ठेखकाखेरीज कोण टांगणार १ प्रोफेसर,.
बकील, डॉक्टर इत्यादि प्रतिष्ठित वरिष्ठ लोक आपल्याच उच्च बातावरणांतील
कैेफांत दंग असतांना बहुजनसमाजाचीं दुःखें कोण समजावून घेणार ! सामान्य
माणसास कोणाचा आधार होता ! पैसा, अधिकार, विद्या इत्यादि गोष्टींना
बंचित झाली जनता प्रगातिपथावर येणार् तरी कशी £ या सबोची चिंता
प्रेमचंद यांना लागून राहिली. नोकरीनिमित्त प्रेमचुंदांनीं आर्धाच पुष्कळ
श्रमण केलें होते. नोकरी मिळाल्यानंतर शाळांच्या तपासणीसार्ठी त्यांना
पुष्कळच हिंडावे लागे. दौऱ्यावर असतांना प्रेमचंदांनी डोळे उघडे ठेवून
२३ धनपतराय प्रेमचंद शाले
समाजव्थितीचें निरीक्षण केलं, कोट-कचेऱ्या, सावकार, सरकारी अधिकारी,
जमीनदार, व्यापारी, कारखानदार, इत्यादि वरिष्ठ वग क्षेतकरी व मजूर यांना
कसा छळीत असतो याचा देखावा त्यांनी स्वतः पाहिला द्ोता. उन्ह्दीापावसांत
रात्रंदिवस श्रम करून नवें धन निर्मांग करणारा किसान उपासमारीनें हैराण
ज्ञालेला पाहून प्रेमचदांचे॑ अंतःकरण तिळतिळ तुटत राही. गांधीजींच्या
विश्वव्यापी चळवळीमुळे सववत्र जाण्ति होत होतीच; पण साहित्यसाधनेच्या
द्वारां प्रेमचंदांनी दलितोद्वारारचें कार्ये प्रामागिकप्णे बजांवण्यास प्रारंभ केला.
रशियाच्या महान् क्रांतीचा परिणामहि त्यांच्या मनावर खोलवर झाला, मजूर
ब शेतकरी यांच्यांत असणारी प्रचंड' शक्ति कार्यान्वित करण्याची प्रेरणा हिन्दी
साहित्यांत निर्माण करणारे एकमेव लेखक म्हणजे प्रेमचंद, अशी जी कीर्ति
पुढे त्यांना प्राप्त झाली तिची ही नुसती सुरुवात आहे.
महात्मा गांधींच्या तत्त्वञानाची छाप प्रेमचंदांच्या मनावर प्रारंभीच्या
काळांत तरी निश्चितपर्णे होती. सन १९१९-२०च्या सुमारास असहकाराच्या
चळवळीचा पूर्वरंग दिसू लागला, महात्मा गांधी गोरखपूर येथें आले होते.
त्यांच्या व्याख्यानास ब्रिटिश जुलमास कंटाळलेले आणि मार्गदरनाची इच्छा
धरणारे हजारो लोक जमा झाले होते. मुन्शी प्रेमचंद त्यांतील एक प्रमुख
होते. गांधीजींच्या प्रेरक वक्तव्याचा परिणाम इष्ट अप्ताच झाला, स्वतः प्रेम-
चंद यांनीं या घटनेचे वर्णन केळे आहे : “सन १९२० ची गोष्ट आहे.
असहकाराचें आंदोलन जोरांत सुरू होते. जालियनवाला बागेर्चे भीषण
हत्याकांड नुकर्तेच संपले होते. याच वेळी महात्मा गांधींचं आगमन गोरखपूर
येर्थे झालें. गाजीमिया मैदानांत व्यासपीठ तयार केठे होते. दोन लाखांच्या-
बर जनसमुदाय जमला होता. शहरांतून, खेडेगांवांतून सारी जनता दौडत
आली होती. असा समारंभ मी माझ्या आयुष्यांत कर्धी पाहिला नव्हता.
महात्माजींच्या दर्शनाचा प्रभाव हा कीं, माझ्यासारखा मेलेला मनुष्य जाग्रत
. होऊन उठला. यानंतर दोनचार दिवसांच्या अवर्धातच मीं आपल्या वीस
वर्षाच्या नोकरीचा राजिनामा दिला. ?” हातीं असलेल्या वीस वर्षीच्या नोकरी-
वर आपल्या हातानें पाणी सोडणे ही मोठीच घेयाची गोष्ट होती. घरची
सांपत्तिक त्थिति बेताचीच आणि चरिताथांचें दुसर साघधनहि नाहीं, अशा
बेळीं हातची नोकरी सोडणाऱ्या या ळेखकबह्वादुराची तारीफ करावी तरी
मुन्शी प्रेमचंद २४
किती ? नोकरीत करावी लागणारी खुश्यामत प्रेमचंदांच्या मानी स्वभावास काख
लाख दंग करीत असे. “ सोजे वतन *च्या प्रकारामुळे सरकारच्या द्वेषाची
ठिणगी आधींच फुड लागली होती. महात्माजींच्या स्फोटक व्याख्यानामुळे तिचा
भडका उडाला इतकेच.
प्रेमचंदांच्या जीवनांतील सर्वात महत्त्वाची घट्ना ही आहे. शिवरानीदेवीरनी
या प्रसंगाचे विस्ताराने पण मार्मिक रीतीने वर्णन केळे आहे : “ सन वीसची
बात आहे. असहयोगाचा जमाना होता. गांधीजी गोरखपूरला आढे शेते.
यांची प्रकृति नीट नव्हती, तरी सुद्धां मी, दोन मुलें व बाबूज्ञी असे सर्व जण
मीटिंगला गेला. महात्माजीचे भाषण ऐकून आम्ही दोघेहि प्रभावित झालो;
विवश झालो. सरकारी नोकरीसंबंधीांचा तिरस्कार याच वेळीं दृढ झाला...
एके दिवशी मला बोलल - ' तूं संमाते देशील तर मी सरकारी नोकरी
आत्तांच्या आत्तां सोडणार आहें. ) या प्रश्नावर विचार करण्यासाठीं मीं दोन-
चार दिवस मागून घेतले, त्यांच्याप्रमार्णेंच माझ्याहि मनाची तगमग झाढी
होती...त्या वेळीं यांना स्व मिळून महिना १२५ २. मिळंत असत. शाळा-
खात्यांतील नोकरी असल्यामुळे घर्री इतर उद्योग करण्यासहि मिळत नसे.
तेव्हां नोकरी सोडून दिल्यावर भागगार कसें, अशी चिंता माझ्या मनांत
निमाण झाली, एक मुलगा व मुलगी समोर होतीच. .. स्वतःची ( प्रेमचंदांची )
प्रकतीहि बरी नसे. ना घर, ना दार. या सर्व गोष्टी नजरेत आल्यावर बाटे,
नोकरी सोडून कसें चालेल £ चारपांच दिवसांनीं त्यांनीं पुनः निर्णयासंबंर्घी
विचारलें, ..मीं त्या वेळीं विचार केला - यांची प्रकृति बरी झाली म्हणने वाटेळ
ती नोकरी इतर ठिकाणची सुद्धां मिळेल, ईश्वर चांगळें करणारा असेल तर यांची
प्रकतीहि सुधारेल. . .जालियनवाला बार्गेत जे भीषण हत्याकांड झालें त्याच्या
ज्वाला सर्वोच्याच हृदयास जाऊन मिडलेल्या होत्या. माझ्याहि अंतःकरणास
इजा पोचली होती. .. दुसऱ्या दिवर्शी मीं त्यांना सांगितले, “ सोडून द्या
नोकरी, पंचवीस वर्षीची नोकरी सोडून देतांना यातना होतील; पण देशावर २
जो सध्यां अत्याचार चाळू आहे त्याच्या मानानें नोकरी सोडून देतांना होणाऱ्या
यातना कांहींच नव्हत. ' मीं नोकरी सोडा म्हणून सांगितल्यावर स्वारी हंसून
बोलली, ' दुसऱ्याच्या अन्तांत तुझाहि दहोवट आहे ध्यानांत आहे ना !
मंग मी म्हगालें, “ हो, बरोबर लक्षांत आहे. जेव्हां तुम्ही बरे घ्हाळ तेव्हां
२५ घनपतराय प्रेमचंद शाळे
१४.९ ४-५ ४४० ८-८ ४० ७५.४ ४-८ ऐ9 € णो£, "धिस ५० पेण “1४० 0 “४५-०८ ५८” ७०४५. ५.00.» ९.७ 0 ७ की क.
रानावनांत राहूनहि मी दिवस आनंदानें काढीन. माझा विश्वास आहे की
परमेश्वर भलें करणारा आहे,
आपण म्हणाले, “ नीट विचार कर. पुनः म्हणशील, दोघांनाहि त्रास झाळा
म्हणून, पुर्ढे अनेक संकटे उर्भाी आहेत. नीट खायलाप्यायला मिळाले तरी पुरे.
तुझा निश्चय झाला ?
मी बोलले, ' हो! ?
आपण बोलले, “ तर मग मी उद्यांच नोकरीचा राजीनामा देता. आणि
उद्यांच हँ सरकारी घरहि आपणांस सोडार्वे ढागेल, कोठें जावयाचे हॅ. तक्की
नाही. ?
झी म्हणाठे, ' गांवी नाऊं. !
आपण बोलले, ' गांवी तरी तुला तुझे घर कोठें आहे ! कारण आपल्या
जुन्या घरांत चाची ( सावत्र आई ) वगेरे लोक राइत!त. त्यांत तुला ध्यान
नाहीं... ? -
मी म्हणाले, “ मग काय घर त्यांचंच फक्त वाटते ? अर्धे ते घेतील, अर्थ
आपण घेऊं... )
पतिप्त्नींत बराचसा वादविवाद झाला, पण प्रेमचंदांनी नोकरीचा राजी-
नामा द्यावा याबद्दल मात्र दोघांत एकमत होर्ते. प्रेमचंदांनी राजीनामा देतांना
कोणते शाब्द वापरले असावेत हँ कळण्यास मार्ग नाही. पण सन १९२१ मध्ये
* ळाल फीता ”/ नांवाची एक कथा त्यांनी लिहिली, या कथेचा नायक हरि-
विलास आपल्या नोकरीचा राजीनामा देतांना लिहितो -
“ श्रीमानूजी, राजनैतिक व्यवत्था ही इंश्वराच्या इच्छेचे स्वरूप आहे असा
माझा विश्वास आहे. आणि त्याचे कायदेकानू सुद्धां दया, सत्य, आणि न्याय
ऱयांवर आघारलेडे असतात. मी पंधरा वर्षेपर्यत आपली सेवा माझ्या सामर्थ्यो-
प्रमाणे प्रामाणिकपणे केली, .. सरकारी नोकरीहि देदासेवेचें एक माथ्यम आहे
असें मी आजपर्यत समजत होतो. पण परिपत्रक क्र....मध्ये जो आदेदा दिळा
गेला आहे तो माझ्या आत्म्यास मारक आहे. त्याचे पालन करण्यास मी समर्थ
नाहीं, प्रजेचे स्वार्तंत्य व राजनैतिक जाग्रति यांचा घात करणारा असा तो
आदेश आहे, अशा परिस्थितींत सरकारशी संबंध ठेवर्णे म्हणजे देश व राष्ट्र
ऱयांची ह्याने करण्यासारखे आहे... ”
मुन्शी प्रेमचंद २९
२५0१०५०१०४.” 0९...” ४.” ४८/७७/७४७४ ४४,५0४” २.४ ४.५४... ५८/ १०४
'"“भन्टी
यावरून या वेळच्या प्रेमचंदांच्या मानसिक परिस्थितीची जाणीव होईल..
उत्कृष्ट शिक्षक म्हणून प्रेमचंदांचा लौकिक होता. विद्यार्थ्यांचा निरोप घेतांना
व्यथित होणाऱ्या आत्म्याचा परिचय त्यांच्या ' प्रेरणा ' कथेमध्ये होतो;
६८ विद्यार्थषानीं मला प्रेमाचा निरोप दिला आणि सर्वेच्या सर्व मला
स्टेशनवर पोंचविण्यास आले. त्या वेळीं सव मुलांचे डोळे पाण्यानें भरून आले.
होते. मीहि माझ्य़ा अश्रूंना थांबवू शकलो नाहीं. मंद गतीने गाडी चालूं झाली.
मुलें कित्येक पावळें गाडीबरोभर चालत होतीं. खिडकीबाहेर तोंड काढून मी
डमा होतों, कित्येक वेळपर्यंत मुलांचे हलणारे रुमाल मला स्पष्टपणें दिसत होते. ?"
७०७७
कमेयोगी संपादक १ ४
सरकारी नोकरी आपण सोडून दिली खरी पण आतां प्रपंच कसा चाल-
भार, ही एक मोठीच चिंता प्रेमचंदांना होती. घरीं सावत्र आई, तिची मुलें
आणि भावंर्डे असल्यामुळें तेहि प्रेमचंदांचें सुखार्न जमण्यासारखं नव्ह्ते.
महावीरप्रसाद पोद्दार यांच्या सहकायाने चरखे विकण्याचे एक दुकान काढ-
ष्यांत आळें. पण त्यांत कांहींच नफा होण्याचें चिन्ह दिसेना, तेव्हां प्रेमचंद
आपल्या गांवी गेले. तेथेंहरि घरच्या कटकटी वाढल्या होत्या. भातावर तूप
घेण्यासह्रि सवड नसल्यार्चे पाहून प्रेमचंद उद््विम्न झाले. या उदास मनःत्थि-
तींत त्यांनीं कानपूर येथे मारवाडी विद्यालयांत मुख्याध्यापकाची जागा पत्क-
रली. पण याहि ठिकाणी प्रेमचंदांचें पटळें नाहीं. त्यांच्या मानी स्वभावाला
आतां नोकरी, मग ती कोणतीहि असो, पटण्यासारखी नव्हती, चरितार्थांचें एकक
साधन आतां त्यांच्याजवळ उरलें होते, तै म्हणजे त्यांची लेखणी. प्रेमचंदां-
छवढा दुसरा प्रभावी लेखक हिन्दी भाषेंत नव्हता. पण कथाकादबऱ्या लिहून
पोटास मिळावे असा तो काळ नव्हता. कथा लोक छापीत असत, पण मोब-
दला मात्र देण्यास नाराज असत. कादंबरी प्रसिद्ध झाली तरी प्रती खपण्यासः
कितीतरी काळ लागे. “ बाजारे हुस्न ? म्हणजेच “ सेवासदन ' कादंजरी त्यांनी
प्रथम उदू्त लिहिली होती. पण कलकच्याच्या एका पुस्तकरकंपनीनें ती हिंदातून
२७ कर्मयोगी संपादक.
प्रसिद्ध केली आणि लेखकास पहिला हत्ता म्हणून चारशे रुपये दिळे, आपल्या
साहित्यिक जीवनांत प्रेमचंद यांना एवढी मोठी रक्कम प्रथमच मिळाली. त्या-
नंतर त्यांच्या 'प्रेमाश्रम? नांवाच्या सर्वश्रेष्ठ कादंबरीस तीन हजार रुपये मिळाले:
होते. पण या सर्वे प्रकारावर निश्चितपणे अवलंबून राहतां येणे कठिण होते..
बहुतेक प्रकाशक फसविणारे किंवा फुकट छापणारे निघाले. साहित्यावर जगणे
ही स्हेष्ट आपल्या देद्यांत तरी अजून कठीण अशीच आहे. प्रकाशक आणि
विक्रेते यांच्या हातांत न सांपडतो आपणच आपलें वाडमय स्वतंत्रपणे छापून
प्रसिद्ध करावे, असा बिचार प्रेमचंदांनी केला, मनास मानेल ते लिहार्वे व
अधिकाधिक लोकांना वाचतां येईल एवं सुलम करून विकार्वे हौ त्यांची
मनीषा होती. स्वतःचा छापखाना काढावा, स्वतःची प्रकाशनसंत्था' स्थापन
करावी, ही एक प्रेमचंद यांच्या कर्मयोगी मनाची भूक होती. पूवीपासूनच हे
विचार त्यांच्या मनांत तरळत होते. सन १९१३ मध्यें कानपूरच्या “ प्रताप ?
कार्योल्यांत त्यांची व श्री. गणेश शांकर विद्यार्थी यांची भेट झाली, छाप-
खान्यांतील सवे काम स्वतःच्या हातांनी गणेश शंकर करतात हें पाहून प्रेमचंद
स्वूुघ़ झाले, घर्री येऊन त्यांनीं शिवरानीदेबीजवळ गणेश ॒ शंकरांची खूप
तारीफ केली आणि नोकरी सोडून देऊन आपणहि असाच एक छापखाना
काढावा, अशी इच्छाहि त्यांनी त्याच वेळीं व्यक्त केली. गोरखपूर येर्थ अस-
तांना छापखाना काढण्यासाठी एंका मारवाड्या्शी त्यांनीं कांही व्यबहारहि
केला होता, पण प्रेमचंदांच तेथंहि जमण्यासारखें नव्हतें.
सवव आजूंनीं परिस्थिति चमत्कारिक बनली होती. छापखाना सुरू करण्यास
जवळ पुरेसे भांडवल नव्हतें. मारवाडी विद्यालयाचे व्यवस्थापक हुकूमशाही-
वृत्तीचे असल्यामुळें त्यांच्या कुटिल कारस्थानांत प्रेमचंदांचे निभण्यासारखें नव्ह्ते,
सन १९२२ मध्ये त्यांनीं त्याहि नोकरीचा राजीनामा दिला, बनारस येथ
शिवप्रसाद गुस ' मर्यादा ' नांबार्चे एक मासिक प्रसिद्ध करीत असत. या
मासिकाचे संपादक बाबू संपूर्णानंद असहकाराच्या चळवळींत तुरुगांत गेले,
तेव्हां त्यांच्या जार्गी प्रेमचंद संपादक झाले. पण दीड वर्षीतच संपूर्णानंद मुक्त
झाले तेव्हां अथोतच प्रेमचदांना तेकाम सोडार्वे लागळे, ' मर्यादा /
मासिकाचे संपादक म्हणून प्रेमचंद यांना महिना दीडशे रुपये मिळत होते.
यानंतर काशी विद्यापीठांत र. १३४५ वर अध्यापक म्हणून त्यांची नियुक्ति
. सुन्शी प्रेमचंद २८
झाली. राष्ट्रीय विद्यालय म्हणून या विश्वाविद्यालयाची ख्याति असळी तरी
प्रेमचंद यांना तेथील वातावरण मानवले नाही, एक वर्षांच्या आंतच त्यांनी
तीहि नोकरी सोडून दिली. जेथें स्वतःचे स्वातंत्र्य घोक्यांत आहे अशी जागा
कितीहि मानाची वा मोठी असली तरी ती प्रेमचंदांना पटली नाही, मन
मारून दास्य. करण्यास ह्या त्वतंत्र कलाकार तयार नव्हता. याबद्दलचे एक
उदाहरण देण्यासारखे आहे. सन १९२४ चें वर्ष होते. प्रेमचंद लखनौस
असतांना अलवार संस्थानच्या महाराजांकडून चिठ्ठी घेऊन पांचसहा माणसे
त्यांना भेटावयास आलीं, आपल्याजवळ राहण्यासाठी राजेसाहेबांनीं बोलावर्ढे
होतें. कथाकादंअऱ्यांचे शोकी असल्यामुळें महाराज प्रेमचंदांना महिना चारशे
रुपये रोख, दिमतीस एक मोटार, राहण्यास स्वतंत्र हवेशीर बंगला इत्यादि
सुखसोयी प्राप्त करून देणार होते. त्यांनी प्रेमचंदांना सहपारेवार आमंत्रण
दिलें. त्या राजेसाहेञांच्या निमत्रणास उत्तर देतांना प्रेमचंद लिहितात : “' मी
आपणांस निरमंत्रणाबद्दल धन्यवाद देतों. मी माझे जीवन साहित्यसेवेसाटीं
समर्पित केळे आहे. जे कांहीं लिहितो ते आपण मनापासून वाचीत असतां ह
वाचून आनंद वाटला, आपण मला जो तनखा देणार आहांत त्याला योग्य
असा मनुष्य मी नाहीं, लक्षपूर्वक माझें लिखाण आपण वाचाल तरीसुद्धा मी
स्वतःस धन्य समजेन. आपल्या दर्शनासहि एखाद्या वेळीं येऊन जाईन. - एक
- साहित्यसेवी, धनपतराय. ?' पार्या चाळून आलेली संपत्ति आणि मानसन्मान !
पण ज्या ठिकार्णी स्वतंत्रता नाही त्या ठिकाणचे वारहि प्रेमचंद यांची प्रकृति
खराब करणारे ठरे. राजेमहाराजे यांच्या घरी चाकरी करण्यांत केवटेंहि सुख
असलें तरी स्वतंत्र प्रकतीचा आत्मा तडफडत राहतो. या संदर्भात आपल्या
मराठी भाषेंतील एक सर्वप्रासेडडध उदाहरण दिल्यास अस्थानी होणार नाहीं.
गेल्या पिढींतील सवेश्रेष्ठ संतवाड्मयसवक ह. भ. प. लक्ष्मण रामचद्र
पांगारकर यांचा १९२०-२१ सालीं इंदोर राजघराण्याशी संजंध आला.
पांगारकरांनीं कांही दिवस तेथला थाटाचा पाहुणचार घेतलाहि. पण थोडक्याच
दिवसांत पांगारकर इंदूर सोडण्याचा विचार करूं लागले, एका अधिकाऱ्यास
“त्यांनीं सांगितळं, “ . .. माझ्या वाड्मयसेवेचें कार्य येर्थे राहून होणार नाहीं. तें
पुण्याच्या परिसरांत राहूनच होईल. दुसर असे कीं, माझ्या वृत्तीला एक
आणामुद्धां पराधीनता खपत नाहीं. पांगारकरसाहिजर येथे किती महिने राहिठे,
२९ कर्मयोगी संपादक.
*५४४.५१-/*१./*१./९१./९४५-५४.//१./९४५..”०”५४ “१”€४ “९.” .“ "७”८५.५९५००५९५/९५--५९०८//९% ५१५९६७४.» “१००८५५४ ४९...” ५.” »“५-/”५//*
कोणाच्या परवानगीर्ने ते जातात व येतात, पांचपांच महिने ते बाहेरगांवीं
जातात व स्वतंत्रपर्णे वागतात तेव्हां त्यांच्या तोंडास लगाम घातला पाहिजे
असे विचार कांहीं कारभाऱ्यांच्या मनांत घोळत आहेत. ..अध्यातमज्ञानाची महती
अगाध आहे. त्याचें मोल माहिने अन् तास यांनीं करूं पाहणें गैर आहे 1.
ज्ञान अमोल आहे. द्रव्याच्या राशींनीं त्याचा हिशेब करूं नये. * पांगारकरांनी
याच वेळीं आपल्या पत्नीसहि लिहिलें, ““ वर्षभर बंद ठेवलेला “ मुमुध्षु * पुन्हा
चालू करावा व ग्रंथलेखन सपाट्यानें पुनः सुरू करावें असें मनांत येत आहे.
मन उल्हासाने भरलें आहे. आपल्या आयुष्याचे मुख्य कर्तव्य ग्रंथरचना हे
आहि, तें येथें राहून साध्य होणें शक्य नाहीं,!?? (*चरित्रचंद्र' पृ. ३१२७-२८).
मुन्शी प्रेमचंदांची महती एवढ्यासाठी कीं, त्यांना पांगारकरांसारखा अनु-
भवहि घेण्याची जरूर नव्हती, अलवारच्या महाराजांजबळ आपली श्वतंत्र प्रतिभा
कोमेजून जाणार हँ त्यांनीं अगोदरच ओळखले होते, त्यांनीं तो सोन्यारुप्याने
मढवून काढलेला मार्ग मुळांतच पत्करला नार्ही. स्वतंत्र छापखाना काढून
स्वतःचे वाडमय स्वतः छापून प्रासेद्ध करावें ही प्रेमचंदांची सर्वात मोठी
महृत्त्वाकांक्षा होती. त्यासार्ठी त्यांनीं साडेचार हजार रुपये जमा केले व एक-
दोघांच्या सहकार्याने बनारस येथें सरस्वती प्रेसची स्थापना केली. या प्रेसमधून
फायदा होण्याऐवजी हळूहळू नुकसानच होऊं लागलें; तेव्हां भागीदार आपा -
पला हिस्सा घेऊन निघून गेले व प्रेसचा सर्व भार एकट्या प्रेमचंदांबर येऊन
पडला. कोणतेंहि काम अर्धबट सोडणे प्रेमचंदांच्या जिवावर येई. आपली सर्व
शक्ति त्यांनी छापखान्याच्या कायीत खच करण्याचें ठरविढें.रात्रभर जागून वाचन-
छेखन करावें आणि दिवसभर प्रेसमध्ये काम करावे हा त्यांचा क्रम चाळू
झाला. यामुळे प्रकतीवर अनिष्ट परिणाम होऊं ढागल्यामुळे शिवरानीदेबीनें
तक्रार केली. प्रेमचंदांनी हंसून उत्तर दिर्ले--
“८ तूच सांग मग काय करूं तें. सकाळीं फिरावयास जार्णे अगर्दी
आवश्यक म्हणून जातो. फिरून आल्यावर थोडे खाणें झालें म्हणज्ने खोलींत
काम करावयास बसतो. स्वतः लिहितो-बाचतांच, पण तुझ्या मुलांनाहि
लिहावयास-वाचावयास शिकवितो. त्यानंतर स्नान वंगेरे झाल्यावर प्रेसमध्ये
जातों, तेथून आल्यावर एक तासभर मुलांशी गप्पागोष्टी करण्यांत वेळ.
जातो. त्यांच्याशी बातचीत करण्याने सारे भ्रम दूर होतात. त्यानंतर प्रेसमधून.
सुन्शी प्रेमचंद २०
'कारकून येतो, त्याच्याजवळ कांह्ींना कांही तरी बोलणें करावें लागते. नऊ
चाजतां पुनः जेवण करतो; नंतर एक तास मिळतो त्यांत कांहीं वाचनळेखन
करावेंसें वाटते, पण तुमचा हुकूम होतो कीं, दह्या वाजतां झोपलेंच पाहिजे...
आतां तूंच सांग कीं, मला रिकामा वेळ असा कोठें सांपडतो ! एक एक क्षण
मी गुंतून राहिला आरडे. माझा ईश्वरावर विश्वास आहे आणि त्याला प्राथना
करीत असतो कीं, रात्र छोटी करून दिवस मोठा कर. ?
याप्रकारे प्रेमचंद यांनीं प्रेसमध्ये आपला आत्माच जणुं समपँण केढा
होता. स्वतःच्या प्रकृतीची पर्वा त्यांनीं कधींच केली नाहीं. एकदां प्रेमचंद
फारच अजारी झाले. या वेळीं शिवरानीदेवी परगांवीं होती. पण औषधपाण्यासाठी
जे पेसे ती पाठवून देई ते सर्व प्रेमचंद छापखान्याच्या कामासार्ठी खर्च
'करीत असत. दोन महिने असेच लोटल्यावर शिवरानीदेवीनें आपल्या गांबीं
"चलण्याचा आग्रह केला, तेब्हांचा त्यांचा. संवाद ऐकण्यासारखा आहे --
प्रेमचंदः--- मग प्रेसमधील काभ कोण करणार !
शिवरानी!---पण प्रकृति नीट नाही तर त्या कामास काय करावयाच !
प्रेमचंदः---वा ! मळा काम तर नेहर्मी केलेच पाहिजे.
शिवरानीः-<-राहूं द्या ते तुमर्चे काम, तीं कार्म कर्घीच संपावयारची नाहींत.
प्रेमचंदः--काय ! काम राहूं द्या, छे ! काम पूर्ण झाल्याखेरीज कोणतीच
मुट्ठी मला घेतां येणार नाही,
प्रेमचंद निष्ठावान् कर्मयोगी होते. स्बघमोप्रमाणे स्वतःच्या वांट्यास आलेळें
कतेव्य करण्यांत त्यांनीं केव्हांहि कुचराई केली नाहीं. *' कायाकल्प,
* कर्मभूमि ', ' गबन ?, “ गोदान ' या एकापेक्षां एक सरस अक्या
कादंबऱ्या त्यांनीं येथूनच प्रसिद्ध केल्या. “ मानसरोवर ? हे स्वतःच्या कथांचे
संग्रहहि प्रेमचंद यांनी सरस्वती प्रेसतफेच प्रसिद्ध केढें. पण हिन्दी साहित्यांत
मंदीची लाट मोठीच होती, पुस्तर्के विकली जात नव्हतीं. कथाकादबऱ्यांचे
ढीगच्या ढीग पडून होते व विक्रेत्यांकडून पेसे वसूल करणें अदाक्य झाळें
होते. छापलान्यास पूरक॑ काम व्हावें ब स्वतःची हौस भागावी म्हणून त्यांनी
* हस ? नांवाचे मासिक सुरू के. त्याच्याबरोबर “ जागरण ? नांवाचें
-साप्ताहिकहि भ्ेमचंद काह ळागले, पण या सर्व प्रकारांमुळे प्रेमचंदांना
मप्रेसकडून कोणताहि ढाम झाढा नाही. प्रतिकूल परित्यितीश्ीं सतत कुन
र कमयोगी संपादक
*““१-.८९./”४२-/
खेळतां खेळतां व अपयकश्षाशीं टक्कर देतां देतां त्यांचे शरीर जेर झालें.
पोटासाठी पुनः मधून मधून नोकरी करण्याचाहि प्रसंग त्यांच्यावर आला, इतर
मासिक पत्रांतूनहि ते कथात्मक वाडूमय लिहीत असत. काय वाटेल ते झाळे
तरी प्रेस बंद करूं नये, हा मात्र त्यांचा ठाम निश्चय होता. ' हस ? आणि
“न्नागरण? नियमित प्रासिद्ध करतां यावींत म्हणून: त्यांनीं अक्षरशः हाडाची काडे
केलीं. कमयोगी संपादक म्हणून प्रेमचंदांनी फार मोठें नांव कमावळें, संपादक
होण्याची इच्छा त्यांच्या मनांत पूर्वीपासूनच होती. सन १९०२ मध्ये
नवातराय नांवानें ते जेव्हां लिहीत असत तेव्हां अलाहाबादच्या इंडियन
प्रेसच्या संचालकांनी त्यांना एका मासिकाचे संपादक होण्यासाठी बोलावें
दोतें. पण त्या वेळीं तो योग जुळून आला नाहीं. त्यानंतर “जमाना ) ब
* आजाद * या पत्रांचे संपादक म्हणून प्रेमचंदांनी कांही दिबस काम केलेंच
होते. वकोलळ बनण्याची इच्छा त्यांच्या मनांत लहानपणापासून होती; पण
प्रेमचंद. संपादक बनले व त्यांनी दलित, पीडित आणि उपेक्षित जनतेची
वकिली चालू केली. देशांत जाग्रति निमीण व्हावी, दुर्बलांना होणारा जाच
थांबाबा, गरिबांची दाद लागाबी आणि शेतकरी-मजूर यांना सुख लाभार्वे,
म्हणून संपादकाने अहोरात्र कष्ट घेतले पाहिजेत असा त्यांचा कटाक्ष होता.
पेसे मिळविर्णे किंवा वेड्यावांकड्या बातम्या छापून लोकांची दिशाभूल करीत
राहणें हें संपादकीय पेशाला लांछनास्पद आहे, असा प्रेमचंदांचा विश्वास होता.
प्रेस काढण्याचा त्यांचा हेतु दुहेरी स्वरूपाचा होता, एक तर स्वतःस वाटेळ
तशीं पुस्तके छापून प्रासिद्ध करतां याबींत ब दुसरे म्हणजे. एखादे मासिक ब
एखादें नमुनेदार साप्ताहिकहि काढतां यावें. पण प्रेमचंदांचें हॅ स्वप्न मोठ्या
कष्टाने साकार होत होतें. प्रेसमध्ये होणारा तोटा भरून काढण्यासाठी त्यांना
दुसरे उद्योग करावे लागत असत. लखनौच्या गंगा पुस्तकमालेच्या कचेरीत
जाऊन शाळांच्यासाठीं क्रमिक पुस्तर्के तयार करण्यार्चे . नीरस कामहि
प्रेमचंदांना करावें लागले. सन १९२९ मेध्ये लखनोच्या नवंलकिशोर प्रेस-
तर्फे प्रसिद्ध होणाऱ्या “ माधुरी ' मासिकाचे संपादक म्हणूनहि त्यांनी
'काम पत्करले, व
पण या मासिकाच्या व्यवस्यापकांच्या निभनानंतर सर्व मानगडी कोटीत
गेल्या आणि प्रेमचंदांना संपादकत्य सोडावे ळागळे, सर्वे त्थिरस्मानर माल्या-
अुन्शी भेमरचंद | श्रे
बर “ माधुरी ' मासिक निघू. ळागरठे, पण प्रेमचंद संपादक असतांना जी ढोक-
प्रियता या मासिकास लाभली होती ती पुनः मिळाली नाहीं. सन १९३०
मध्यें प्रेमचंदांनी स्वतःचे ' हंस ' मासिक चालूं केळे, नव्या नव्या लेखकांना आत्म-
सात् करणें व त्यांच्यांत आत्मविश्वास निर्माण करणे हें संपादकार्चे कतव्य प्रेम-
चद यांनीं बरोबर हेरले होतें. नव्या लेखकाचा लेख आला कीं प्रेमचंद खुप
मेहनत घेऊन त्यांत सुधारणा करीत आणि कित्येक प्रसंगी लेखकाला सौम्य
शब्दांत तूचना देऊन प्रोत्साहनहरि देत असत. कोणी नवोदित लेखक आपली
कलाकृति दाखविण्यास आला कीं त्याला प्रथम विश्वासांत घेऊन प्रेमचंद योग्य
तें मार्गदर्शन मनापासून करीत असत. ' हंस ? टिकून रहावा म्हणून प्रेम-
चंदांनी अपार कष्ट केळे, सन १९३५ ची हकीगत आहि. बरेच दिवस प्रेम-
चेदांचीं प्रकृति ठीक नव्हती. खाणं दूरच पण दूध वगैरे पिर्णेहि बंद होते.
पद्ांटे चार वाजतां ताप उतरला तेव्हां नित्याप्रमाणे तोंड वगरे धऊन ' हस !-
साठी लेख लिहिण्यास प्रेमचंद बैठक मारून बसले. शिवरानीदेवी त्यांच्यावर
खूप रागावली. तेव्हां प्रेमचंद हंसून म्हणाले, “' लख लिहूं नको तर “हंस? छापला
कसा जाईल १ “हंस? वेळेवर निघाला नाहीं तर ग्राहक नाराज होतील ना!
त्यांना थोडेच माहीत आहे की, मी आजारी आढे म्हणून १ त्यांनीं वर्गणी
दिलेली आहे; वेळेवर “ हंस ? त्यांच्या हातांत पोंचलाच पाहिजे. ??
त्यावर शिवरानीदेवीरने सांगितर्ळे, “ आतां लिहावग्रास बसाल तर लेखणी
मोडून टाकीन, कागद फाडून टाकीन. ? असे हें प्रेमचंदांचं स्वकतेव्याबरील प्रेम,
६ मृत्यु के पीछे ? नांवाची त्यांची एक कथा संपादकार्चे आदर्श जीवन चित्रित
करणारी असल्यामुळें: प्रेमचंदांच्या तपत्येची खूण म्हणून तिचा उल्लेख करणें
अगत्याचें आहे. पण प्रेमचंदांच्या निःस्वार्थी सेवेला फारसे यश प्राप्त झालें
नाहीं. महिन्याला दोन-अडीचर्शे रुपये ' हस !पार्यी नुकसान होत होतें. आदश
संपादक कजेभाजारी होऊं लागला, लेखकांना मोबदला देणे कठीण झाल्यामुळें
तो वर्ग नाराज झाला, या कठीण परिस्थितीमुळे ' इंस 'च्या प्रकाशनाचे कार्य
हिंदी परिषदू करीत होती. प्रेमचंद संपादनाचे काम पाहत असत व पैसा
परिषद् खच करीत होती. एवढ्यानेंहि भागेना म्हणून “ हंस ' ची सवे व्यवत्था
परिषदेने घ्यावी असा विचार ठरला. या सवे प्रकारामुळे प्रेमचंद यांना मनस्वी
दुःख झालें, महात्मा गांधींच्या देखरेखीखालीं हिंदी परिषद् चालली होती.
३३ कमयोगी संपादक
४.०४.” /09 “0१५ “00२ “7४./११.”0१.//५.»-”९ १८४: -“* “४ ->"*--“"६-<४४८-/९४--१%- ४-2 -“५-€* “74“*--८४-<४-//४*-९ “४-८ -“-८ -< -<*-< *-4.**५/*.€६-« :--€१*-"*५--€५./ "५५४८४० ४ /४0/00-/“” ४-४”
<"*”
६ हस ? परिषदेने चालबाबा असा निर्णय वर्धा येथील एका बैठकींत कायम
झाला. प्रेमचंद त्या बैठकीस हजर होतेच. मुन्शी प्रेमचंदांना या प्रकाराने फारच
दुःख होत राहिले. सन १९३६ मध्ये सेठ गोबिंददास यांच्या एका लेखामुळे
: हूस वर सरकारची अबकृपा झाढी, फार मोठे डिपॉझिट ठेवर्णे अशक्य
असल्यामुळें ' हंस ? बंद करण्याची घोषणा परिषदेने केली. या वेळी प्रेमचंद मृत्यु-
शय्येवर होते. त्यांना या वार्तेमुळें मोठाच धक्का बसला. परिषदेचे हॅ कृत्य त्यांना
आवडले नाहीं. त्यांनी ताबडतोब रक्कम जमा केली व ती सरकारदरबारी
भरून “ हंस ? परत आपल्या ताब्यांत घेतला. यापूर्वीहि दोनतीन वेळां सरकारी
अवकृपेस “ हंस ? बळी पडला होता. पण प्रेमचंदांच्या निष्ठेमुळें त्याचें रक्षण
झाळें. * हंस ? ब ' जागरण ? जिवंत रह्दावींत म्हणून सबंध हयातभर प्रेमचंदांनी
आति कष्ट केले. जीविताच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना ' हंस *ची चिंता लागून
राहिली द्दोती. मोत्यांचा चारा खाणारा हंस; पण प्रेमचंदांच्या घरी चणे खाऊन
तो तग धरून होता. डोंगराएवढ्या आपात्ति याव्यात व त्यांस टक्कर देतां देतां
रक्तबंबाळ होऊन स्वतः समात्त व्हावें, हँ प्रेमचंदांच्या जीवनार्चे सार होतें. प्रेस
चालू रहावा, “ इंस ? टिकावा म्हणून पैसे मिळविण्यासाठी प्रेमचंदांनी नानाप्रकारचे
उद्योग करून पाहिले. त्यांतोल त्यांचा महत्त्वाचा उद्योग म्हणजे सिनेमा कंपनीशी
संधान बांधून आपल्या कथांचे चित्रपट तयार करावेत हा होय. फिल्मी दुनियेत
प्रेमचंदांना काय काय अनुभव आले याचा विचार आपण स्वतंत्रपणे करणार
आहोतच,
एक खंदा पण अपेशी संपादक म्हणून प्रेमचंदांचें वर्णन करतां येईल.
अपयश आलि खरें पण ते आर्थिक बाजूनें विचार करावा तेव्हां. साहित्याच्या
प्रान्तांत प्रेमचंदांची कीर्ति सदोदित वर्धमानच राहिली, या दरिद्री देशांतील
जनतेची सर्वागीण सुधारणा व्हावी, शेतकऱ्यांची ठूटमार थांबावी, म्हणून प्रेम-
चंदांनी आपल्या कथाकादंबऱ्यांची निर्मिति केली, सरकारी कृपेची वा अब-
कृपेची पर्वा त्यांना कधींच नव्हती. एका मोठ्या संस्थानिकाची नोकरी त्यांनी
लाथाडली, त्याचप्रमाणे सरकार पदवी देत असतांनाहि त्यांनीं तिचा अव्हेर
केला, तो काळच असा होता कीं, सरकारकडून मोठमोठ्या पदव्या घेण्यांत
लोकांना भूषण वाटे; पण प्रेमचंद यांना मात्र यांतील घोका स्पष्ट दिसत होता.
६ हूस ' वर जत्तीचा हुकूम काढगारें किंवा * सोजे वतन “च्या प्रती जाळून
ने
मुन्शी प्रेमचंद ३४
>“ .7४-८/४॥- १-€0१- २.५५.” »0५ .”१५ “0 “४*/ई४ “0५ “१५.५०. “00/४0/४0४४. ७४७७ ...५४७. ५”. ४९.४... ५१७ _ ४५.0७ ८.४.”
टाकणार सरकार प्रेमचंदांना पदवी देण्यास कसे उत्सुक होर्ते व प्रेमचंदांनी सर-
कारला काय उत्तर दिलें, याचा वृत्तान्त गिवरानीदेवीने लिहिलेला आहे : “ मी
त्या वेळीं लखनौस होतें, हेलीसाहेब गव्हर्नर म्हणून आला होता. त्यानें आपल्या
एका हिंदुस्थानी मित्रास सांगितठे, “ धनपतरायांना आपण एक पत्र लिहा.
मो त्यांना रावसाहेब हा किताब देऊं इच्छितो. कारण भारताचे सवीत मोठे
कथाकार आज प्रेमचंद आहेत. हा हिन्दुस्थानी भित्रद्रि प्रेमचंदांच्या वाडूम-
याचा मोठा भक्त होता. त्यानें आनंदाने पत्र ठिहिळे की, गव्हर्नरसाहेब आप-
णांस पद्बी देणार आहेत, त्यांना कृपा करून आपण भेटावे. हें पत्र घेऊन
ते आंत आले व मला म्हणाले, “ गव्हनरसाहेबांचें मला एक पल आठे आहे. ?
: काय लिहिलें आहि त्यांनी त्यांत ?
सहित्रबह्ादुर मला रावञहादुर पद्बी देणार आहेत
$ खुद्द त्यांचेंच पत्र आहे कीं कोणीं दुसऱ्याने लिहिलें आहे! ?
: हे, कोणीं दुसऱ्यानेंच लिहिलेलें दिसतें. १
: कोण हा महाशय १ ?
: आहे एक कोणीतरी, त्यालाहि सरकारकडून “ सर ? पदवी मिळाली
आहि. ?
६ घ्या मग रावसाहेभी किताम. .. ... नुसती पदवीच देणार की आणखी
कांही £
६ आणखीहि कांहीं अटी लादण्याचा इरादा दिसतोय.
मग मळींच स्वीकारू नका...फार महाग सौदा होईल.
मग त्यांना उत्तर काय देणार ?
त्यांना मी धन्यवाद देईन व लिहीन कीं, मी एक जनतेचा तुच्छ सेवक
आँ. जनतेकडून रावसाहेब पदवी मिळेळ तरच धन्य हाईन, सरकारकडून
अशी पदवी घेण्याची इच्छा बिलकुल नाहीं. माझ्य़ा वतीने गव्हनेरसाहेबांना
धन्यवाद द्या !? ??
प्रेमचंदांचे जिणे हॅ निःस्पह होतें. सोन्याचांदीची दुनिया पुष्कळांना भुरळ
पाडते, पण प्रेमचंदांची दृष्टि फार निराळी होती. सरकारदरबारी राहून ते
सांगतील तर्से लिहून मानसन्मान मिळाविण्यापेक्षां दीमदारिद्री जनतेची सेवा
करावी, त्यांच्या दुःखांना वाचा फोडावी, त्यांची कढ घेऊन सरकारी,
३५ फिल्मी दुनियेत प्रेमचंद
'पुंजीपर्तीशी[, जमीनदारांशीं भांडण करावें, दंच कतेव्य प्रेमचंदांना श्रेष्ठ प्रतीचे
वाटलें, ऐटबाज श्रीमंती व मदोन्मत्त भांडवलदार यांचें व प्रेमचंदांचें कर्घीच
जमळें नाहीं. संपादक या नात्यानें गरिबांशीं प्रामाणिक राहून त्यांनीं स्वतः
मजुराचे जिर्णे पत्करळें, शेतकऱ्याचें साधेभोळें जीवन ते जगळे व तोच जीवना-
चा आदर्श रद्दावा म्हणून त्यांनीं आपल्या कथांमधून प्रचारहि केला. त्यांना
“सरकारच्या सोनेरी बेड्या बद्ध कशा करणार १
०००७
फिल्मी दनिर्येत प्रेमचंद : ५
खोऱ्याने पैसा ओढावा आणि मन मानेल त्याप्रमाणे विलास भोगावे
-यासाठीं जे उद्योगधंदे प्रासिद्ध आहेत त्यांत चित्रपटनिर्मितीचा उद्योग प्रमुख
आहे. या धंद्यांत पैसे गमावणारे जसे आहेत तसे कमावणारेहि पुष्कळ
आहित, डोळे दिपवणाऱ्या या फिल्मी दुनिर्येत अनेक जण लक्षाधीश झाले.
नटनटींचे हृजारॉनीं मोजळे जाणारे पगार आणि चित्रपट चाळ झाला कीं
थिएटरच्या मालकापा्शी जमणारी पैशाची रास पाहिली कीं वाटतें, लक्ष्मीचे
खरे खेळ याच ठिकार्णी चाठू असतात, चित्रपटनिर्मितीच्या बाबर्तीत जगांत
आपल्या भारताचा अमेरिकेच्या खाडोखाल दुसरा क्रमांक लागतो अर्से म्हण-
तात. कोट्यवाधि रुपयांचे भांडवळ या धंद्यांत सदोदित गुंतलेले असते.
लक्ष्मीपुत्रांचे हे खेळ सर्वसामान्य जनांस चार आण्यांच्या पिटांत बसूनच
पाहावयास मिळत असलें तरी त्यांची भव्यता मात्र त्यांच्या डोळ्यांत भरून
गेलेडी असते.
मुन्शी प्रेमचंद यांना आपल्या कथाकादबऱ्यांचें चित्रीकरण करावें असे
चार्ट लागलं याचें कारण अमाप पैसा कमवावा किंबा बंगडे-मोटारींची प्राति
करून घ्यावी यांपैकी नव्ह्ते, या चारित्राच्या प्रारभींच दिल्याप्रमाणे शीतला-
दवेवीच्या यात्रेस पंधरा रुपये खर्च करू पाहणारे आणि त्यामुळें उपाशी राइ-
णारे दीन शोतकरो पाहून चित्रपटांची कल्पना प्रेमचंद यांच्या मनांत आली.
-अलाहाबाद स्टेशनवर गाडीत खूप गरदी झाली असतांना कांही भाजडे दोतकरी
मुन्शी प्रेमर्चद शद
इंटरच्या डब्यांत घुसले. त्यांची काळजी प्रेमचंद यांनीं किती घेतली हे.आपण
पाहिलेंच, शिवरानीदेवीने विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देतांना प्रेमचंद बोलले,
: तूं म्हणतेस ते खरेच. मी यांच्यासाठी पुष्कळ लिहिळें, पण यांना तें वाचतां
थोर्डेच येणार ! हां, माझ्या कार्दुबऱ्यांवर बोलपट तयार करून गांबोगांव
मोफत दाखविले तर हे लोक कदाचित् शहाणे होतील, ?' कथाकादंबऱ्यांवर
चित्रपट तयार करून खेडुतांना ते मोफत दाखविण्याची इच्छा करणाऱ्या या
माणसाचे मन केवढे असेल ! पैसा मिळवावा, धनवान व्हावे, स्वतःची चैन
वाढवावी, या कल्पनाच प्रेमचंद यांच्या मनास कधीं शिवल्या नाहींत, आपल्या
प्रातिभेचें सामथ्ये शाक्य तेवढें आपल्याच बांधवांच्या कल्याणासाठी खच व्हावे;
ही एकच इच्छा या श्रेष्ठ कलाकाराची होती. कथा-कादंबऱ्यांवर फिल्म तयार
करावी या विचारास आणखीहि एक कारण आहे. ' हस ' मासिक आणि
५ जागरण ? साप्ताहिक ही दोन्ही तोट्यांत चाळत होतीं. इतरत्र अनेक
ठिकार्णी नोकरी करून व भाडोत्री टेखन करूनहि पैसा पुरा पडणे शक्य
नव्हते. तेव्हां चित्रपट-सृष्टींत प्रवेश करावा व मिळेल त्या पैशाचा उपयोग
पुनः लोकसेवेसाठींच करावा, ह्वा प्रेमचंद यांचा पवित्र व शुद्ध द्दैतु
होता. त्याप्रमाणें सन १९३४ मध्ये मुंबईच्या अजण्टा सिनेटोन फिल्म
कंपनीने प्रेमचंद यांच्याशी बोलणे सुरू केलें. सांधे चांगली चालून आली आहे,.
असा विचार करून प्रेमचंदांनी आपलें मनोगत शिवरानीदेवीस सांगितलें.
पती-पत्नींचे मोठें मनोरंजक संभाषण झालें या वेळीं, जातांना भाडेखचास लाग-
णारे पैसे जमा करणेहि कठीण होऊन बसले. पण मुंबईस जाण्याचा निघार
करून प्रेमचंद आपल्या पत्नीस बोलले,
५ तूंहि चल मुंबईस. एक सफर करून येऊं, फिल्म कंपनीने मला
बोलावळ आहे. *
“ दिल्म कंपनीबाळे बोलावतात हँ ठीकच आहे. पण तेथील हृवापाणी
आपणांस मानवणार का ? आपली प्रकृतिहि कमजोर आहे. आपलें तेर्थे
निभणार तरी कसे £ ”
५६ मुंबईस लोक राहतातच की. ??
६ त्यांची गोष्ट निराळी आहे. आणि आपली निराळी, आपण पुंबईस.
नावें अर्से मला तरी वाटत नाही,
३9 फिल्मी दुनियेत प्रेमचंद
“ <*"६-€*.//१./४८-/५-/”५-/६//४५-४४-/४.४५१५//१६०४५/४४-५४/४४-४ ४०४ ४५०५-५५” ५-”१४
५६ तूं नीट विचार कर, त्याशिवाय कांहीं काम नीट होणारच नाहीं. येथे
जी कांहीं थोडी मिळकत आहि ती आपल्या प्रपंचालाच पुरेशी होत नार्ही.
हंस ?, ' जागरण ? कर्से चालणार १? ?
6६ तरीसुद्धा मुंबईस जार्णे ठीक नाहीं. ?
“' पण मग दारी हे दोन मोठे हत्ती बांधळे आहित त्यांना चारा कोण
देणार ! त्यांना जिवंत तरी ठेवळेंच पाहिजे ना? ?
44
££ आपण अं कांहीं कराल त्यांत स्वतःच्या जिवाची पर्वा थोडी तरी
असूं द्यावी कीं! *
“: ही तुझी रडकथा नेहमींचीच आहे. ... दुसरे असें पहा की, कथा-
कादंबऱ्या लिहून जेवढा उपयोग होणार नाहीं त्यापेक्षां जास्त उपयोग त्यांवर
चित्रपट तयार करून होईल. कथा-कादंबऱ्प्रा ज्यांना बाचतां येतें त्यांच्याचसारठी
“अहित. फिल्म तयार झाली तर हजारो लोकांना एकदम फायदा घेतां येईल ,”'
“६ होईल लोकांचा फायदा, माझें काय त्यांत बरें होणार १ ??
६ ही चूक आहे तुझी, लोकांनीं उलट माझें किंबा तुझें बरें करावें म्हणून
मी थोडेंच लिहितो ! मी माझ्या आत्म्याच्या शांतीसाठी लिहीत असतो,
तेव्हां तें लिहिणे जितक्या जास्त लोकांना समजेल, जितके लोक पाहूं शकतील,
वाचू शकतील, तितर्के जास्त समाधान मला मिळेळ, आणि दुसरा फायदा
असा कीं, “ हस ? व ' जागरण ? नीटपर्णे चालविण्यासाठी आपणांजवळ
पेसा जमा होईल. वर्षांचे नऊ हजार रुपये देण्याचा करार कंपनीवाले करणार
आहेत. मुंबईस वर्ष-दीड वषे राहिलें कीं मग मला येथूनहि कथा पाठवितां
येईल, नऊ-दहा हजार रुपये वर्षास घरबसल्या मिळतील, मग सांग, वषा-दीड
वषासाठी मुंबईस जाणें काय वाईट गोष्ट आहे ? ”
पतीचा अडचण पत्नीने जाणली, प्रेमचंदांच्या मनास कोणती भूक लागली
होती हेहि शिवरानीदेवीर्ने हेरळें आणि मुंबईस जाण्याची परवानगी दिली.
मुंबईच्या प्रवासाची तयारी सुरू झाली. प्रकृति नीट नसतांना एवढ्या लांब
प्रवास करणाऱ्या अस्वस्थ पतीची सर्वे तयारी शिवरानीदेबीने करून दिली.
इकडचे तिकडचे जमवून तिनें शमर रुपयांची तजबीजहि केली. त्यांपैकी
प्रारॉभिक तयारीसाठी बीस रुपये खर्च झाळे आणि ऐंशी रुपये बरोबर
श्ेऊन प्रेमचंद मुंबईस फिल्मी जगताच्या नव्या सृष्टींत प्रवेश करण्यासाठी
मुन्शी प्रेमचंद शट
4१ ५४-/*-//४५५//४/४/”४€५€*
*“२.//१./0५./४-०४४-//४५.”९.” ४-/४./१*/१४०/”१ ९...” ४.” १.” “१>९१-€ “- १--€ “५८-१५” << “>. -“
निघाले. त्या दिवशी प्रेमचंद रातभर जागून राहिले; कारण पहांटेची चार
बाजतांची गाडी पकडावयाची होती. दूरबरचा प्रवास असल्याकारणाने
दोबेहि व्यथित झाले होते. मुळांचा निराप घेऊन प्रेमचंद मुंबईस गेले. मुंबईस
जाण्यांत त्यांचा हेतु कोणता होता हे. आपण पाहिलेच आहे. प्रेमचंदांनी
आपल्या मित्रमंडळींनाहि आपला मनोदय कळविला होता. दि. १० जुळे १९३४
च्या पत्रांत प्रेमचंद “ जमाना ? च्या संपादकांना लिहितात,
६: मी एक जुलेला मुंबईस निघून आलो. येर्थे एका कंपनीशी करारनामा
केला आहे. वर्षांच्या सहा कथा त्यांना तयार करून द्यावयाच्या, तेथील
उद्योगांत एकसारखें नुकसान होत होतें. पुस्तकावक्रेत्यांकडून पैसे बसूल होत
नव्हते. कागदाच्या खर्चाचा बोजा वाढत होता. अगतिक होऊन मीं हा
करारनामा केला आहे. सहा कथा लिहिणे अबघड नाहीं. हो, दिग्दशकास
पसंत पडेल असें ळिहिर्ण अगत्याचे आहे. फिल्मच्या दृष्टीने काय उपयुक्त हॅ
तोच ठरवणार. .. ” प्रेमचंदांचे परम मित्र हिन्दींतील प्रख्यात लेखक जेनेन्द्र-
कुमार, त्यांनाहि एका पत्नांत प्रेमचंदांनी लिहिले, “' मुंबईच्या एका फिल्म
कंपनीने मला बोलावले. मासिक पगाराची बात नाहीं. करारपत्र आहे.
८००० रुपये वर्षाचे. मी अशा पारिस्थितींत येऊन पोचलो आहे कीं, या-
शिवाय दुसरा मार्ग माझ्याजवळ नाहीं.... चार-पांच हजार रुपये हार्ती आले
तरच त्यामुळें ' इस? व “ जागरण ? नीट चालतील; आर्थिक संकट तेवढ्यापुरतें
तरी दूर होईल. ?
प्रेमचंद कोणत्या परिस्थितींत सांपडले होते, ते आतां. ध्यानांत येईल.
मोठ्या कष्टाने आपल्या कथा दिग्दर्शकाच्या हातांत देण्यास किंवा कंपनी-
वाल्यांना विकण्यास प्रेमचंद तयार झाले होते. एरवी मुंबईस त्यांना कोठून चैन
पडणार ? गजबजलेल्या त्या मायानगरींत प्रेमचंद प्रारंभापासूनच कंटाळून गेल...
घरी लिहिलेल्या एका पत्रांत ते लिहितात, “' या वित्तीण मुंबई शहरांत मला'
तुमच्याशिवाय सुने सुने वाटतें. वारंवार मनांत येतें की, हें सर्व सोडावे आणि.
तिकडे पळून यावें, मीं अजून येथें जागा घेतली नाहों, तें एक बरेंच झालें.
नाहीं तर घर खायला उठले असते. तुमचें जेव्हां पत्र येते तेव्हांच घरी आल्या>
सारखें वाटतें. ?? मुंबईस माणसांचाहि अथांग सागर पसरलेला, पण प्रेम-
चंदांना तेथे एकटे एकटे वाटे. चित्रपटनिर्मितीच्या धंद्यांतहि त्यांना फारस7
२९ फिल्मी दुनिर्येत प्रेमचंद
२.
चांगला अनुभव आला नाहीं, प्रेमचंद यांच्या कथेवर एक पहिला चित्रपट
निघाला, त्याचें नांव ' मिल मजदूर '. या वेळीं सर्वत्र मंदीची लाट असून
बेकारी मात्र वाढत होती. गिरणी-मालक व मजूर यांच्या कटकटी वाढीस
लागल्या होत्या. मजुरांची अवस्था अति जिकट झाली होती. तिची चौकशी
सहृदय प्रेमचंदांखेरीज कोण करणार ? आपला संदेश मजुरांपर्यत पॉचता
करण्यासाठीं प्रेमचंदांनी ही कथा लिहिली.
बोलपट तयार होत असतांना मूळ कथाळेखकावर अन्याय झाल्याची
उदाहरणें अनेक सांपडतील, आपल्या अद्वितीय प्रतिभेने लेखक कथा कांहीं
एका विशिष्ट पद्धतीनें व हेतूनें निर्मीत असतो तर कंपनीवाले किंवा दिग्दर्शक
यांची आवड निराळीच असते. स्वतःच्या मनांतील कल्पनांची भरती केल्या-
खेरीज चित्रकथा पूर्ण झाली असें त्यांना वाटत नाहीं. त्यामुळें मूळ ळेखकाची
मूळ कथा व पडद्यावर बोलकी झालेली चित्रकथा यांत जमीन-अस्मानारचे अंतर
पडलेळें दिसून येतें. बिचारा लेखक गरजू असतो; दिरदर्शकाच्या श्रीमंती
ऐटीपुटें त्याळा कोण पुसणार ? पैसेवाल्यांजवळ सर्व गुणांचा आश्रय असतो.
जणुं मुन्शी प्रेमचंद यांच्या € मिळ मजदूर ? या कथेचेहि कसे धिंडवडे निघाले
तें पाहण्यासारखे आहे. प्रेमचंद यांच्याच शिफारशीवरून लडितकुमार
नांवाच्या ग्रहस्थाची नट म्हणून योजना झाली होती. प्रेमचंदांना चांगढेंच
जाणणाऱ्या या ग्रहस्थाने “* मिल मजदूर ' चित्रपट कसा तयार झाला, याची
ममोरंजक हृकीगत लिहिली आहे. त्यांत तो लिहितो, “' आपली कथा * मिल
मजदूर ' नांवाची समास्त करण्यांत प्रेमचंद त्या वेळीं व्यग्न झाले होते. कथा
समास झाल्याबरोबर त्यांना. तिचा उर्दू अनुवाद करणें भाग पडे. कारण
कीं, कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर, फिल्म डायरेक्टर मिस्टर भूतानी आणि
त्यांचे साथीदार मित्टर खलीळ आफताब हिंदी न जाणणारे होते. चित्र-
कथेच्या सोयीसाठी भूतानीसादिबांच्या संमतीने तींत अनेक प्रकारचे बदल
करण्यांत आले. कांदीं नवीन गोष्टी धुसडण्यांत आल्या. कांही रद्द करण्यांत
आल्या. ज्या गोष्टी प्रारंभी निश्चित झाल्या होत्या, त्या सव रद्द करून कथेस
एकदम नवें रूप देण्यांत आलें. त्यामुळे कथानकांत उणीब निर्माण झालीच पण
कांही ठिकाणी खऱ्या अथाचे व भाषेचे माधुर्य सुडां निघून गेठें. यानंतर
शूर्टिंग सुरू झालें. पुनः कित्येक प्रसंग बदलण्यांत आले आणि शेवटीं रात्रंदिवस
अप करून तीन महिन्यांत फिल्म तयार झाली,
मुन्शी प्रेमचंद ४०
(४७ ७ /* २.४७ ४८७ ७ .४€0४./४९०४४ 0६. /” ७० ४४...५४७७ ५” ७८८४७७१.» ७. ४७७४७ ,/७ /४ ४४... "७ ४४७.» (७. /९४१७./”७७४ ४ ,
**“या फिल्मबद्दल कंपनीर्ने मोठमोठ्या आद्या बाळगल्या होत्या. धनवान
मालक व गरीन मजूर यांच्यांतील झगडा या कर्थेत चित्रित केळेला असल्यामुळे
चित्रपटाचे यश हुकमी होतें. मालकाचा स्वार्थपूर्ण व्यवहार, अत्याचार, दडपण,
मनास येईल तसें वर्तन, मजुरांची दुर्दशा, त्यांच्या आयाबहिणींची दीन दशा
आणि या सवोचा वाईट पारिगामर्हे सर्व या चित्रपटांत स्पष्ट आणि योग्य रीतीनें
दाखविलें गेलें होतें...
या चित्रपटांत एक ग्रामपंचायती चेंहि दृश्य होते. पंचायतीचे मुख्य प्रधान
खुद्द प्रेमचंद होते. मिलमालक व मजूर यांच्या समन्वयाचे मार्ग हुडकून
काढून दोघांत एकोपा निर्माण होण्याची शक्यता येथे द्शविळी आहे, गांधी-
बादांत महृत्वाची गगलळो गेठेली समन्बयवादाची भूमिक्रा या ठिकार्णी प्रेम-
चंदांनी ध्वेतलेडी होती. मिलमालक व मजूर यांनीं पितापुत्रांप्रमाणे वागावें,
असा भावार्थ या कर्थेतून प्रकर होत होता. गांधीबादांत असणारी कमतरताहि
प्रेमचंद जाणून होते, फिश्मच्या या नावीन्यामुळें तीस यशा प्राप्त होईल अशी
आशा सर्वाना वाटत होती. पण नियंत्रण-मंडळानें फिल्मची छाटाछाट खूप
केली. फिल्मचे स्वरूप र्जे होते तेहि बिघडून गेलें. प्रभावशाली हृद्य होतीं
तींच नेमकी काटली केलीं. त्यामुळे फिल्मचा मूळ उद्देश नष्ट झाला आणि
चेहरा विकृत होऊन गेला. मुंबई सरकार भांडवलदारांच्या बाजूचे नेहर्मी असे.
त्याने फिल्म दाखविण्यास बंदी केली, मजूर-गिरणीमालक यांच्या झगड्यार्च
प्रदर्शन करून अद्यांतता निर्माण होऊं नये म्हणून या प्रकारची काळजी
घेतली गेली, एकदीड' वर्षांच्या प्रयत्नाने “ उसे गरीभ मजदूर ) या नांवार्ने
फिल्म दाखविण्याची परवानगी मिळाली,
या सर्वे घटनांमुळे प्रमचंद निराश झाले. भांडवलवाले श्रीमंत, दिग्दर्शक“
सरकार इत्यादि लोकांच्या ओढाताणींत प्रेमचंदांच्या स्वतंत्र प्रकतीचे अतोनात
हाल झाले. त्यांचा स्वाभिमान तर दुखावला गेडाच, परंतु धनवान
वर्गाबद्दलची त्यांच्या मनांतील , अढी अधिक हृढ झाली. सपत्ति धारण
करणाऱ्या माणसार्चे आणि प्रेमचंदांचें उभ्या जन्मांत जमलें नाहीं. ज्या इच्छा
घेऊन ते मुंबईस आले होते, त्या सर्वांचा अशा प्रकारें चक्काचूर झाला. त्यांनी
नवजीवन ? नांवाची आणखी एक चित्रकथा लिहिली, पण तींतहि त्यांना
म्हणावेसे यश प्रास झाले नाहीं. दिग्दर्शकांची मध्यस्ती त्यांना पदोपदी जाचक
३१. फिल्मी दुनियेत प्रेमचंद
ठरली. समन्मित्र जेनेद्रकुमार यांना प्रेमचंदांनी लिहिले, “' मी ज्या द्देतूर्नी
येथे आला होतो त्यांतील एकहि पुरा झाला नाहीं. हे निमाते ज्या ढंगाने
कथा तयार करतात त्यामध्ये थोडाहि फरक करण्यास ते राजी नसतात.
भडक अळीलतेला हे लोक देखाव्याचा प्राण समजतात. अद्भुत गोष्टींवर
यांचा भारी विश्वास, राजाराणी, त्यांच्या प्रधानांची कारस्थार्ने, नकली
लढाया इयादि प्रमुख साधने यांच्या हातांत असतात. मी कांहीं सामाजिक
कथा लिहिल्या आहेत, ज्या सुशिक्षित समाजारनेह्ि पाहाव्यात अश्ना आहेत;
पण त्यांवर फिल्म तयार केळी तर ती चालेल कीं नाहीं याबद्दल या
निमोत्यांना नेहमीं शंका वाटते. हे वध तर येथेच राहणें आहे. कर्जेज्ञाजारी
बनर्लों आहे. कर्जे फेड्डन टाकीन; पण लाभ होण्याची चिन्हें दिसत नाहींत,
“ गोदान ? कादंबरीची शेवटची पष्ठें लिहिणे आहे. येर्थे मन रमत नार्ही.
आपल्या जुन्या स्थानावर जाऊन बसाबे असें वाटतें. तेथें घन नसेल
पण संतोष मात्र भरपूर आहे. येर्थे तर कष्ट होतात. आयुष्य फुकट
जात आहे. ?
प्रेमचंदांच्या स्वतंत्र प्रकृतीचा कोंडमारा मुंबईच्या विलासी आणि वैभव-
संपन्न अशा वातावरणांत कसा होत राहिला, हँ यावरून ध्यानांत येण्यासारखे
आहि. दुसऱ्या एका पत्रांत ते लिहितात, ““ “ मजदूर * तुम्हांस पसंत पडला
नाहीं हें मीं जाणले. ते चित्र मार्च आहे असें मी म्हणतो. व म्हणू शकत-
हि नाहीं. त्यांत एक रोमान्स भरून राहिलेला आहे, तो मात्र मी लिहिळेला
नाहीं, ' मजदूर मध्ये मार्झे असें फारच थोडें उरलें आहे. खुद्द फिल्ममध्ये जे
कांहीं आहि तें स्वतः दिग्दर्शकांनी तयार केठेळें आहे. लेखक स्वतःस लेखणी-
बहादुर समजत असेल पण येर्थे मात्र डायरेक्टरचें साम्राज्य आहे. त्याच्या
राज्यांत लेखकाची हुकमत कशी चालणार ? त्याच्या हुकमर्ताखालींच लेखकाने
वागले पाहिजे. ' मी लोकांची रुचि आपल्यापेक्षां अधिक चांगल्या प्रकार
नाणूं शकतो ? असें म्हणण्याची लेखकाची छाती दिग्दर्शकापुर् होणार नाही,
तोच उलट ओरंडेळ, “ जनतेस काय हूर्वे हें मीच बरोबर जाणतो. आणि येर्थे
आम्हांस जनतेच्या पसंतीची पवी काय म्हणून असावी ! ह्या धंदा आहे. धन
मिळवर्णे हे आमचें ध्येय आहे. जनता जें मागेळ ते आम्ही तिला पुरवू, ?
या उद्दाम बोलण्याचे उत्तर असें की, ' अच्छा साहेब, आमचा सलाम घ्या
मुन्शी प्रेमचंद .._ डेर
“५-१... १०//-/”
नि आम्हांला घरी जाऊं द्या. ! आणि तेंच मी करणार आहे. फिल्ममध्ये
माझ्या मनास संतोष झाला नाहीं, म्हणून माघार घेत आहें. मी ध्येयवादाचा'
पुरस्कर्ता आहे पण त्यानें जनतेची खुली करमणूक कशी हाणार ! पण या!
गोष्टी मला परवडणार नाहींत. माझ्यारभावतीं माणसेहि अर्शी जमा झाली
आहेत कीं, त्यांना उदूहि समजत नाहो आणि हिन्दीहि कळत नाहीं. इंग्रजीत
अनुवाद करून सांगण्याचे काम करावें लागते. मळा आपली माझी जुनी कार्य-
व्यवस्थाच ठीक वाटते...
फिल्मी दुनियेस प्रेमचंद याप्रमा्गें पूर्ण विट्टून गेळे होते. धन कमविण्याची'
इच्छा त्यांना नव्हतीच. त्यामुळें लक्ष्मीपुत्रांशी त्यांचें जमळें नाहीं. शिवरानी-
देवीसहि त्यांनी लिहिले, “' येथे सर्व कांहीं सिनेमाच्या मालकाच्या हातांत
आहे. लेखकाला कोणीच पुसत नाहीं, पैसा मिळविणे हॅंच त्यांचें ध्येय असंत.)
प्रेमचंदांचे मनहि थोर्ड बालकासारखे होतें. श्रीमंती ऐटीत तें कधींच स्मर्ले
नाही. जमीनदार, कारखानदार, भांडवलबाले यांच्याशी त्यांची दोत्ती कर्धीच
नमली नाहीं. एवढी मुंबई करमणुकीच्या साधनांनी गजबजलेली, पण प्रेमचेद
मात्र सदा बेचेन झालेले, घरी लिहिलेल्या एका पत्रांत ते लिहितात, “ तुम्ही
मुलांबाळांसमवेत सुखरूप असाल. आणि इकडे मी मात्र विचार करीत
आहे कीं, हा दांड महिना कसा जाणार म्हणून. काम करून करून तरी किती
करणार ! वैळ तर नव्हे मी ! माणसाची करमणूक होण्यास कांहीं साधन तरी
असावे कीं नाहीं ? माझे मनोरजन घस्व्या मुलांबाळांतच सवबीत अधिक होर्ते.
मनोरंजनाचे याशिवाय दुसरें साघन माझ्या जीवनांत नाहीं, जेवावयास बसावे
तों बरें वाटत नाहीं. कारण येथे तर सर्वत्र साहेजी थाटमाट. आणि साहेब
म्हटल! कीं माझा जीव घाबरून जातो. ? प्रेमचंदांचा जीव एवढ्या अफाट
मुंबईत रमला नाहीं. फिल्मी दुनियेस कंटाळून प्रमचंद परत बनारसला आले.
: कशी काय मुंबई आहे? ? या पत्नीच्या प्रश्नास उत्तर देतांना प्रेमचंद
बोलळे, “' काय सांगूं फिल्मी जगतू हा एक नवाच संसार आहे. तिर्थे साहेबच
साहेब आहेत. माझ्याशी त्यांचा व्यवहार फार चांगला असे. मो एक घर
भाड्याने घेतें आहे. तूं येत असशीळ तर दाखवीन तुला. बनारसला
असतांना जसा मी घरून प्रेसमध्ये ब प्रेसमधून घरी जात-येत असे त्याच-
प्रमाणें तेथील स्टुडिओरचें काम चाळे. पण या ठिकाणीं तुम्हां सीच्या समवेत:
७३ भ्येयवादी साहित्यक
असल्यामुळें कसलीच चिंता नाहीं. येथें जीव घाबरत नाहीं. तेथें काय कामच
काम, ज्यांना नाटक-सेनेमाचा शोक आहि त्यांना मुंबई फार चांगली. मला
काय तिचा उपयोग ? मियाची दौड' मशिदीपर्यंत. तर्सेच मार्झेहि जाणें ह्दुडिओ-
पर्यंत. माझी प्रकृति तेर्थे बिघडत राहिली. ?
कांहीं दिवस प्रेमचंद सहकुटुंब मुंबईस येऊन राहिले होते. कामाचा ताण
फारच पडत होता. एका स्टुडिओवाल्यानें सांगितले, “' आमच्याबरोबर
तुम्ही इंग्लंडला चला. ?? यासंबधी शिवरानीदेवी सांगते, “ घर्री येऊन,
मला म्हणूं लागले, स्टुडिओतीळ लोक म्हणतात, इंग्लंडला चला. तेर्थे फिल्म
तयार करू, एक वर्ष राहून परत येऊ. एका वर्षांचे दहा हजार रुपये मला
मिळतील. पांच नित्रकथा मला लिहाव्या लागतील, ?” परंदेशच्या प्रवासांत
प्रकृति पूर्गपर्णे बिघडून जाईल या भीतीनें शिवरानीदेवीनें इंग्लंडला जाण्याची
परवानगी प्रेमचंदांना दिली नाहीं. प्रेमचंद चित्रपटांच्या बाबतींत आधिकच
उदास बनले. महालक्ष्मी सिंनेटोननें “ सेवासदन ' कादंबरीवर बोलपट तयार
केला, ती फिल्म पाहून प्रेमचंद आधिकच कष्टी झाले, मुंबईची हवा सवे
दृष्टींनी त्यांना मानवली नाहीं, बनारसला जाऊन राहण्याचा त्यांचा आग्रह सुरू.
झाला. फिल्मी जगतास रामराम ठोकून प्रेमचंदांनी त्या लक्ष्मीनगरीस कायमचा
नमस्कार केला. धन, वेभव, ऐश्वर्य, विलास या जगांतील मोहांस प्रेमचंद
विटून गेले. सरळ, साध्या जीवनाचा आदर्श हजारॉ लोकांपुर्दे ठेवण्याच्या
इराद्याने ते चित्रपट-व्यवसायांत पडले पण लागलीच त्यांच्या ध्यानांत आलें कीं,
येथ ध्येयवादास बिलकुल अवसर नाहीं. संपत्तीच्या उबेंत ध्येयवादाचीं राप.
नेहमीं कोमेजून जातात.
७ ७ &.
ध्येयवादी साहित्यिक १६
फिल्मी जगतांतून प्रेमचंद निराश झाले हें एक प्रकारे बरेंच झालें, साहि-
चिकाचे खरें कर्तव्य समाजनिरीक्षण करून आपल्या कलेच्या द्वारां त्यास.
सन्मागोवर लावणें हच असतें. प्रेमचंद निष्ठावान् साहित्यिक ह्वोते. त्यामुळे.
२.४ 7.५” %../४०५८४११ ४” ४ “४४%...” *..€*"२*-“€*%५..””€ *.. 7१% “ ६-४ १४. ७०५४0१. - “ “ ४४ ४७/४४/४१४५...” १५०४१०४५५४ ४४-११ “0” क १. ४७०१७. २ “” ४ १. “१-./ *८--€ ४-१
भांडवलदार, निमाता, नटनटी, दिग्दर्शक, संगीत-दिग्दर्शक इत्यादींच्या गड-
बडींत प्रेमचंदांसारख्या ध्येयवादी साहित्यकाराचें जमण्यासारखें नव्हतें, त्यामुळे
प्रेमचंदांनी तेथून निरोप घेतला ब बनारस येथें राहून पुनः त्यांनीं आपल्या
साहेत्याच्या उपासनेस आरंभ केला. प्रेमचंदांची कीर्ति आतां चोहो दिशांनी
वाढीस लागली होती. सेवासदन ( १८१६ ), प्रेमाश्रम (१९२२ ), रंग-
भूमि( १९२५ ), कायाकल्प ( १९२८), गमन (१९३१ ), कार्मभूमि
९ १९१३२ ) इत्यादि एकापेक्षा एक सरस अशा कादंबऱ्या लिहून प्रेमचंद
यांनी आपलें हिंदी साहित्यांतील स्थान निश्चित केळे होते. प्रेमचंद यांची कौर्ति
उभ्या हिंदुस्थानांत पसरली होती.
हिन्दी हीच राष्ट्रमाषा होण्यासारखी आहे अर्से समजून भारतांत सर्वत्र
हिंदीचा प्रसार ब प्रचार सुरू झाला होता. हिंदी भाषेच्या स्वरूपाबद्दल प्रेम-
चैदांसारख्या मुरूनी साहित्यिकाकडून कांहीं मार्गदर्शन झालें तर त्याचा मोठा
उपयोग होईल म्हणून प्रेमचंद यांना “ दक्षिण भारत हिन्दी प्रचारसभा? या
संत्थेकडून वार्षिक पदवीदान-समारंभास आमंत्रण देण्यांत आलें, प्रेमचंद यांनी
तें आमंत्रण मोठ्या आनंदार्ने स्वीकारले. १९२४ साली शिवरानीदेवी, प्रेम-
चंद व नाथराम प्रेमी असे तिघे जग मद्रास येर्थे जाण्यास निघाळे. मद्रासच्या
हिन्दीप्रेमी लोकांनी प्रेमचंदांचें मनापासून स्वागत केलें. स्टेशनवर हारतुरे घेऊन
तीनशे स्त्रीपुरुष प्रेमचंदांचा सत्कार करण्यासाठी उपत्थित होते. भाषेचा अभ्यास
कसून करण्यांत मद्रासी लोक कोणास हार जाणार नाहोंत. शिवरानीदेवीस
प्रेमचंद त्या वेळीं बोळे, “' पहा, या प्रांतांत हिन्दीचा प्रचार किती जोरदार
आहे. महात्मा गांधींच्या तपस्येचें हे॑सवे फळ आहे. जें कार्य ते हातांत घेतील
तें सफल करून दाखवतील. इंग्रजी भाषा याच लोकांनीं प्रथम उत्तम प्रकारे
आत्मसात केडी. मोठमोठ्या अधिकारांवर असणारे फर्डे इंग्रजी बोलणारे लोक
याच प्रन्तांतीळ आहेत. आज हिन्दीची उपासना येथील लोक क लागले
आहेत. या ठिकाणा हिन्दीचे मविष्य उज्ज्वल आहे. ' मद्रासच्या हिंदीप्रेमी मंडळीत
प्रेमचंदांनी नवजीवन निर्माण केलें. पांच-सहा दिवस त्यांचें वाव्तव्य मद्रास
येथें होतें. तेथून म्हैसूर, बंगळोर इत्यादि ठिकाणींहरि प्रेमचंदांचा आदरसत्कार
चांगल्या प्रकारे झाला,
प्रेमचंदांच्या या दक्षिण भारताच्या दौऱपरासंभं्धी मद्रासचे हिन्दी-प्रचारक
५ थ्येयवादी साहित्यिक:
*<“"--४० ५०-४०” 0४५” 1४०४0 ०५४१-१४. » २.” १२.५४.” ४-- ४-५ ४५.५७ 0-५ 7: ४४- "५ *--५०९५.. "५... 0४५५८” ४५०४५20
“०7"५/४७- ५ ८” गी फक ४.” गोष फ9.”0- ४ ४५.४. “० फककर्ट ग
श्री. त्रजनंदन शार्मा यांनी लिहिळे आहे, “' आम्हीं प्रचारकांनीं त्यांना
मधमाशांप्रमाणे घेरे होते. पुष्कळ हिंदीप्रेमी व विद्यार्थी दहा-दहा रुपये खर्चे
करून प्रेमचंदांचें दर्शन घेण्यासाठीं आलि होते. शिवरानीदेवीसुद्धां त्यांच्या-
बरोबर होती. प्रेमचंद दक्षिण भारतांतील सर्व हिन्दी प्रचार केंद्रांना भेट देणार
आहित, असें समजल्याबरोबर द्राविड भाषा बोलणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर एक.
आनंदाची चमक उठून दिसली. जवाहरलाल नेहरू किंवा रजिन्द्रप्रसाद यांच्या
दौऱ्यापेक्षां प्रेमचंदांचा दोरा कोणत्याहि बाबतींत कमी नव्हता. प्रेमचंद राष्ट्र-
भाषेचें गौरवस्थान होतें. हिन्दी साहित्याचे दारिद्य प्रेमचंदांनींच दूर केले.
प्राचीन साहित्यांत तुलसीदास व आधुनिक साहित्यांत प्रेमचंद यांच्याच नांवां-
वर दक्षिण भारतांत सुद्धां आमचे मस्तक उंच झाळें आहे. वाचकांना आश्चर्य
वाटेल, प्रेमचंद यांना उत्तरेपेक्षां दक्षिणतच अधिक मान होता. कारण येथील
लोकांनीं त्यांच्याकडे कलाकार व ध्येयवादी लेखक या दृष्टींनी पाहिले होते.
मद्रास प्रान्तांतील हिंदी विद्यार्थी समाज, प्रेमचंदांच्या नांवाबरोबर हर्षित होऊन
गेला आहे. चांगले चांगळे शिकलेले लोक तर प्रेमचंदांना टोल्स्टॉय म्हणून.
संबोधतात.
हिन्दी भाषेच्या प्रचारकांनाच प्रेमचंद मार्गदर्शन करीत, असें नव्हे. संपादक
म्हणून कित्येक नव्या लेखकांना प्रेमाच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. अनेक
ठिकाणीं भाषणं देऊन साहित्यिकाच्या कर्तेव्यासंबंधी त्यांनी जाणीव करून
दिलेली आहे. वाड्मयीन कार्य करणाऱ्या कांहीं संस्था स्थापन कराव्यात व
एकत्रित येऊन साहित्यचचा व्हावी, यासाठीहि प्रेमचंद त्यांचे प्रयत्न चाळू
असत. मुन्शी दयानारायण निगम व प्रेमचंद यांच्या साह्याने १९२३-२४
सालीं “ हिंदुस्तानी एकडेमी ? नांबाची संत्थाहि चाळू झाली होती. सदर
संस्थेच्या बेठकीस प्रेमचंद उपस्थित असत, या संस्थेच्या कारभारांत इतर
लोकांचाहि भरणा झाल्याकारणाने कार्य करणाऱ्या साहित्यिकांना वाब राहिला
नाहीं. त्यामुळें प्रमचंद निराश॒& झाल्यासारखे होत, या संस्थेसंअंधीं त्यांनी
उद्गार काढले आहेत, “' या ठिकाणीं कार्य करण्यास भरपूर वाव नाहीं.
हिंदुस्थानांतील हरएक भाषेचा एक एक लेखक या कामिटींत असावा.
एखाद्या विषयावरील नर्वे पुस्क निघाले कीं त्यात्या सभासदास ते
दाखविलें जावें. यामुळें पुस्तकांच्या निकृष्ट निर्मितीस आळा बसेल; लेखकांच्या
मुन्शी प्रेमचंद ४दे
गुणांचा विकास होण्यास मदत होत राहील; साहित्याची उन्नाति ढेखकांच्य़ा
शुणविकासाबरोबरच होत राहील. नव्या लेखकांच्या गुणदोषांची चर्चा कोण
'करणार ! नुस्ते “* ठीक आहे ? म्हणून शेरा माररग न्यायाचे नाहीं, नव्या
लोकांना मार्गदर्शन करणे हॅ विद्वान् लेखकांचे एक कर्तव्य आहे. ......
'पोटभऱ्या प्रकाशकांची आज आवश्यकता नाही. लेखकालाहि थोडा द्रव्यलाभ
झाला पाहिजे, एकॅडेमी व ठेखक यांच्यांत स्नेहाचा कोडुंबिक संबंध स्थापन
'व्हावयास पाहिजे. ... साहित्याची अभिवृद्धि व्हावयास पाहिजे. ज्या भाषेचं
साहित्य उत्तम तिचा समाजहि प्रगतिपथावर आहे अर्से समजाव. समाजाच्या
प्रगतीबरोबर त्याची राजनीतिहि चांगर्ळे रूप घारण करणारी असते. .... .
मोठमोठ्या लोकांर्चे लक्ष गारेमांच्या प्रश्नांकडे केव्हां वळणार !. ..*? प्रेमचंदांच्या
मनांत या प्रकारचे विचार सदेव घोळत असत. लेखकांची चिंता तर त्यांना
-रात्रांदिवस वाटत होती. सत्यजीवन वमी यांच्या मदतीने प्रेमचंदांनी ' लेखक
संघ ? नांबाची एक संत्थाहि स्थापन केळी होती. हिर्चे रूपांतर पुढे
६ प्रगतिशील लेखक संघ? या संस्थेत होऊन या संस्थेच्या पहिल्या अधिवेशनाचे
अध्यक्ष मुन्शी प्रेमचंद झाले. या घ्थानावरून मुन्शी प्रेमचंदांनी जे भाषण
केळे ते॑ भारतीय साहित्याच्या इतिहासांत अजरामर होऊन राहण्यासारखें
आहि. त्या भाषणाने अनेक भाषांतील साहित्यकारांना स्फूर्ति व मार्गदर्शन
बमिळाळें आहे. लखनो येर्थ सन १९३६ मध्ये झालेल्या या महत्त्वाच्या
-भाषणाचा कांहीं भाग येथे दृर्णे आवरयक आहे-
“८: भाषा साधन आहे, साध्य नाहीं. आतां आपल्या भाषिनें अर्से रूप
धारण केळे आहे कीं, केवळ भाषेपेक्षा तिच्यांतील भावाकडे अधिक लक्ष
देण्याची बेळ आलेली आहे. ज्या भार्षेत प्रारंभी “ बागो बहार ?, ' बैताळ
पचीसी ' आदि रचना झाली त्याच भार्षेत आतां शास्त्र आणि विज्ञान यांची
चचा व्हावयास पाहिजे...जें कांही लिहिळे जातें तें साहित्य अर्से मुळींच
नाहीं, ज्यांतून सत्यदरेन होर्ते, ज्याची भाषा प्रोढ व डौलदार आहे आणि
समृद्ध असे अनुभव ज्यांतून प्रकट होतात त्यास साहित्य म्हणार्वे, अदभुतरम्य
'परीकथा, भूतपिशाचांच्या गोष्टी, प्रेमवियोगाची आख्याने यांना कांदीं एका
'काळी फार महत्त्व होतें ही गोष्ट खरीच, पण आज आपणांस त्यांत खर
स्वारस्य वाटत नाही... ..माझ्या पर्त ' जीवनाची आलोचना ' हीच साहित्याची
सवोत्तम व्याख्या भाहे.
७७ भ्येयवादी साहित्यिक
£ , ,, आपल्या अनुभूतीची तीव्रता वाढविणे हैँंच काव्य व साहित्य यांचें
डादेष्ट आहे. स्त्री-पुरुषांचे प्रेम हेंच केवळ माणसाचे जीवन नाहीं. शृंगारिक
मनोभाव मानवी जीवनाचा एक अंशमात्र आहे.. .. आज साहित्याने केवळ
मनोरजन करून चालणार नाहीं, नायकनायिकांचे संयोगवियोग वर्णन करर्णे
एवढेच साहित्यिकार्चे कर्तव्य नसून जीवनांतील इतर अनेक प्रश्नांचा विचार
त्यानें केला पाहिजे.
£ __,नीतिश्यात्ञ व साहित्यशास्त्र यांचें ध्येय एकच आहे. उपदेश कर-
'ग्याच्या पद्धतीमध्ये मात्र थोडा फरक आहे. नीतिशास्र तर्क व उपदेश यांच्या
मदतीनें बुद्धि व मन यांच्यावर प्रभाव दाखविते, तर साहित्य मानसिक
अवस्था व नाना प्रकारचे भाव यांचें वर्णन करीत असते. मानवी जीवनांत
आपण अ ज॑ पाहतो, ज्या ज्या आपात्ति आपल्यावर येतात, त्या त्या गोष्टींतून
साहित्याची निर्मिति होत असते. ज्या साहित्यामुळे आपली अभिरुचि जागत
होणार नाहीं, आध्यात्मिक आगि मानसिक तृप्ति होणार नाहीं, आपलें सोंदर्य-
'ग्रेम जागत होणार नाहीं, सत्यसंकल्यांचा जन्म ज्यामुळे होणार नाहीं, अनेक
संकटांत घेथानें तोंड' देण्याची दृढता ज्यामुळे उत्पन्न होणार नाईहीं, त्याला
साहित्य हँ नांव देखील शोभणार नार्दी....
६ , ,,पूर्वीच्या जमान्यांत समाजाचा लगाम धर्माच्या हातीं होता, मनुष्याची
आध्यात्मिक आणि भौतिक सुध'रणा धर्माच्या आदेशाने होत असे; आज
साहित्याने हँ काम आपल्या शिरावर घेतलेआहे. सोंदर्य-प्रेम या साधनाने
साहित्य हँ कार्य करणार आहे. ज्याच्यांत सौंदथप्रेम नाही, असा मनुष्य सहसा
सांपडणार नाहीं, साहित्यकारांत ही वृत्ति जितकी अधिक जाग्रत व सक्रिय
राहते तितक्या प्रमाणांत त्यांच्या कलाकृतीत अधिक प्रभाव निर्माण होतो.
सृष्टीचे निरीक्षण आणि स्वतःची तीन्न अनुभूति यांच्या साह्याने त्याच्या सोंदर्य-
बोधशक्तींत इतकी तीनता उत्पन्न होते की, न॑असुंदर आहे, अभद्र आहे,
माणुसकीस सोडून आहे, त्याचा त्याला तिटकारा वाटूं लागतो, जो दलित आहे,
पीडित आहे, वंचित आहे, मग ती व्यक्ति असो किंवा समाज असो, त्याची
तरफदारी व वकिली करणे हच साहित्यिकाचें परम कर्तव्य आहे. ..
“८ , , आपल्या सर्वे कमजोरीरचे कारण आपल्यांत निमाण झालेठी हीन
-भमिरुचि व प्रेममावाचा अभाव हॅ आहे. नेभे खरे सोंदयम्रेम आहे, गेभें
मुन्शा प्रेमचंद 8८
प्रेम अमयोद आहे, तेर्थे कमजोरी कोठून राहणार ! प्रेम हॅच आत्म्याचे मोजन
. आहि. हे भोजन मिळालें नाहीं किंबा दूषित झालेळें मिळालें तर साऱ्या आपत्ति
एकदम निर्माण होतील, कलाकार सोंदर्याची अनुभूति निमीण करून प्रेमाची
उष्णता उत्पन्न करतो. त्याचें एक वाक्य, एक शब्द, एक संकेत, अशा प्रकारे
आपल्या अंतःकरणांत घुसतो कीं, सार चित्त एकदम प्रकाशित होऊन जातें. . .
पण सोंदर्य म्हणजे तरी काय ? सूर्यादय आणि सूर्यात्त आपण पाहिले आहेत.
उषा आणि संध्या यांची लाली आपण पाहिली आहे. सुगंधाने परिपूर्ण भरलेले
सुंदर फूल आपण पाहिले आहे. चिवचिव असे गोड शब्द बोलणाऱ्या चिमण्या
आपल्या परिचयाच्या आहेत. खळखळ आवाज करून वाहणाऱ्या नद्या आपण
पाहिल्या आहेत. नाचणारे झरे आपण पाहिळे आहेत. .. सौंदर्य सौंदर्य म्हणून
म्हणतात तें दंच, ही सव दर्ये पाहिल्याबरोबर आपलें अंतःकरण कां जाणत
होतें ! कारण यांच्यांत रंग आणि ध्वनि यांचा सुंदर मिलाफ झालेला असतो.
पेटीच्या स्वरसाम्यांतील मेळ हीच संगीतांतील मोहकता आहे. आपली साहि-
त्यिक रचनाहि अनेक तत्त्वांच्या रमणीय संत्रोगाने बनलेली आहे. ..
“६ ,,, साहित्यिक किंवा कळाकार स्वभावतःच प्रगतिशील असतो...
जगताच्या नश्वरतेब्रद्दळ काथ्याकूट करणारी कविता निरथंक आहे. आज
मासिकांची पानेच्या पाने प्रेमकथांनीं भरठेली दिसतात तीहि आपल्या दृष्टीनं
निर्थक आहेत. दोन प्रेमी जीवांबह्दळ आपण फक्त अश्र ढाळले तर आपल्या
सौंदर्याच्या रुचींत गति कशी निर्माण होईल ! कर्तव्याचा संदेश देणारी कला
आज आपणांस पाहिजे, हजरत इक्बालच्याबरोबर आज आपणहि म्हणूं शकतो
कीं 4 जीवनाच्या रहृस्याच्या शोधांत तुम्ही असाल तर संघर्ष हाच तुमचा
पथदर्शक आहे. सागरांत जाऊन विश्रांति घेग नदीला लज्जात्पद वाटं
पाहिजे, आनंद मिळविण्यासाठी घरट्यांत बसून कसे भागेल £ फुढांनीं युक्त
अशा फांद्यांवर ।केंबा नदीच्या तीरांवरच आपणांस आलें पाहिजे, ..
£ ,, आनंद ही एक उपयोगी वत्तुच आहे. उपयोगाच्या दृष्टीने
पाहिल्यास एकच गोष्ट सुखहि देऊं शकते, दुःखहि देऊं शकते. आकाशांत
निर्माण होणारी मधुर लाली निःसंशय सुंदर असते. पण आषाढाच्या महि-
न्यांत ही लाली आपणांस दिसेळ तर ती प्रसन्नता आणणार नाहीं. त्या वेळीं
आकाह्यांत काळे काळे ढगच आपणांस आनंदित करताता. फुलला पाहून.
३९ व्येयवबादी साहित्यिक
.““
"*््“
खापणांस यासाठी आनंद होतो कीं, त्यापासून फळाची निर्मिति होणारं असते
खृष्टी्शी आपल्या जीवनाचा सूर मिळवून राहगण्यांत आध्यात्मिक सुख
एवढ्यासाठी मिळत असतें कीं, त्यामुळें आपलें जीवन विकासत आणि पुष्ट
होते. वृद्धि आणि विकास हाच सृष्टांचा नियम आहे
५६, सोंद्यांची कसोटीहि आपण आतां बदलली पाहिजे. पूर्वी अमीर-
उमराबांच्या विलासांत आपण सोंदर्य पाहिलें. त्यांच्या सुखदुःखाच्या भावना
आशानिराशा, यांचेंच वर्णन होत असे. कलाकाराची दृष्टि त्याचे बंगले
व अंतःपुर यांच्याकडेच गुंतून राहिळेळी असे. गरिभाची झोपडी त्यांच्य
नजरेत कोठून थेगार £! माणुसकीपासून वंचित झालेला मनुष्य त्याच्या थट्टेचाच
विषय होता. तोहि मनुष्य आहे, त्याला पण हृदय आहे, त्याच्याहि कांही
आह्याआकांक्षा आहेत -या गोष्टी कलाकाराच्या कल्पनेंतहि येत नसत.
जीवनसंप्रामांतील सौंदर्य त्याला कसें दिसणार ! उपासमार आणि नग्नता
यांमधील सौंदये त्याच्या दृष्टीस कसें पडणार ! सुंदर स्त्रॉंतच सौंदर्य हुडक-
णाऱ्या कलावंतास रूपविहीन मुलांबाळांच्या आईत सोंदर्य कर्से दिसणार १
शेतांत घाम गाळीत काम करणाऱ्या स्त्रीकडे त्याचें लक्ष तरी कसे जाणार ?
रंगलेळे ओठ, गाल आणि भुंवया यांतच सौंदर्याचा निवास आहे अशी
ज्याची खात्री, त्यास जटा झालेल्या केसांत, सुरकुत्या पडलेल्या ओठांत
आणि खड्डे पडलेल्या गालांत सौंदर्य दिसणार तरी कसे £ पण त्या कला-
काराची दृष्टि साफ झाली तर त्याला दिसून येईल कीं, त्या रंगलेल्या ओठांत
आणि गालांत रूपाचा गर्व आणि निष्ठुरता दडलेली आहे..आणि या सुरकत-
ढेल्या ओठांत आणि गालांवरील अश्रूंत त्याग, श्रद्धा आणि क्-सहिष्णुता
आहे. होय, त्याच्यांत नाजुकपणा नाहीं, देखावा नाहीं, सुकुमारता नाहीं.. ..
५८ , ,, तारुण्यांतील प्रेमगान करण्यांतच आपली कळा रममाण झालेली
आहे. पण छातीवर हात ठेवून कविता गाण्यांत किंवा नायिकेच्या विरद-
गीतांतच कला नार्ही. ध्येयवाद, हिम्मत, धैर्य, आत्मत्याग यांचेच नांव जवानी-
तारुण्य-आहि
,«.साहितयकारार्चे ध्येय केवळ सभा गाजवि्णे किंवा मनोरंजन करणें
एवढेच नाहीं. देशभक्ति व राजनीति यांच्यामागून चालणारी सत्यता म्हणजेहि
४, ..
सुन्शी प्रेमचंद ५५७
९,
साहित्याचे कार्य नव्हे; पण या स्वोच्या पुढें मशालीच्या रूपांत राहून मार्ग
दाखविणे हेंच साहित्यकाराचें कर्तव्य आहे, .. . ..
६ ,,... ज्यांना धनवैभवाची आसाक्ते आहे, त्यांना साहित्यमंदिरांत
स्थान नाहीं, निःसीम उपासकांची येर्थ आवश्यकता आहि. सेवा हॅच जीवनाचे
सार ज्यांनीं मानळें आहे, ज्यांच्या चित्तांत दुःखाच्या वेदना आहेत, प्रेमाची
प्रेणा आहे, तेच खरे साहित्यिक. सेर्वेतेचे खरा आध्यात्मिक आनंद
आहे.,.....,...समाजाचा झेंडा खाद्यावर घेऊन जाणारे शिपाई आपण
साहित्यिक आहोंत. साध्या जीवनांतून उंच ध्येय गांठण्यावर आमचे चित्त
पाहिओे...... ?
प्रेमचंदांनी आजवर जीं जीं स्वर्भे पाहिलीं ती ती साकार करण्याचा
प्रयत्न त्यांनी या भाषणांत केळेडा आह. प्रगतिशीळ लेखक संघाच्या अध्यक्षीय
भाषणाचा शेवट करतांना त्यांनी म्हटले, “' ज्यांत उच्च प्रकारचें चिंतन आहे,
स्वाधीनतेचा भाव आहे, सोंदर्याचे सार आहे, निर्थितीची प्रेरणा आहे, जीवनां-
तील सत्याचा प्रकार आहे, जे आमच्यांत गाति आणि संघर्ष निर्माण करील,
बेचेनी पैदा करील, तेंच साहित्य खऱ्या कसोटीस उतरेल, कारण आतां जात्त
वेळ निद्रा घेर्णे हें मृत्यूचे लक्षण आहे. ?
७७७
किसान-मित्र प्रेमचंद १ ७
भारताच्या सर्वांगीण उन्नतीची भाषा जेव्हां जेव्दां बोलली जाते, लिहिली
जाते, तेव्हां तेव्हां या देशांतील शेतकऱ्यांची त्थिति सुधारली पाहिजे, या एका
मुद्दयास फारच महत्त्व देण्यांत येतें, या अवाढव्य देशांत शेंकडा ८० टक्के ढोक
शेतीवर उपजीवैका करतात तेव्हां देशाचा उद्घार म्हणजे शेतकऱ्यांचा-किसा-
नांचा उद्घार होय, या तत्त्वास चांगलीच चलती मिळून अनेक चळवळींचा व
राजकीय पंथांचाहि उद्य या एकाच महत्कायासाठीं झाला, ढेखक आपली
लेखणी या ग्रामीण समाजाकडे' वळवू लागळे आणि जानपद साहित्याला एक
भ्रकारचें वैशिष्ट्य प्रातत झाळें. शेतकऱ्यांची सुखदुःखे, त्यांच्या आद्यानिराद्या,
१०५१ किसान-मित्र प्रेमचंद
'त्यांच्या मनांतील लालसा, त्यांच्या सामाजिक चालीरीती इत्यादींचा पडसाद
भारतीय देशी भाषांतून उमटू लागला, ग्रामीण प्रश्नावरच ललितकथा लिहा-
बयाच्या, ही एक पुढें टूमच बनल्यामुळे कित्येक प्रसंगीं त्यांत निर्जीवता व
कृत्रिमता येत राहिली हीहि गोष्ट खरीच, पण यामुळें शेतकऱ्यांच्या जीवनावरील
श्रेष्ठ ढाळेतकृतींचा महिमा कमी थोडाच होणार ! ग्रामीण प्रश्नांचा विशाल
सहानुभूतीने ब आपल्या सामथ्येवान् लेखणीच्या जादूने सर्वागीण विचार
' करणारा मुन्शी प्रेमचंदांएवढा साहित्यिक भारतांत दुसरा झाला नाहीं,
दालित, पीडित, पतित यांचीं मानसिक आन्दोलनें तपासणारा भ्रेष्ठ कलाकार
म्हणून शरच्चंद्र चट्टोगाध्याय यांची महती मान्य करूनहि हेंच म्हणावेसे वाटतें
'कीं, भारतीय किसानांचा एकमेव साहित्यिक मित्र म्हणञ मुन्शी प्रेमचंद,
मुन्शी प्रेमचंद यांनीं आपल्या ललितकृतीतून सर्वे प्रकास्व्या लोकांना
स्थान दिळें आहे; पण भारतीय शेतकऱ्यांचा प्रश्न निघाला, खेडेगांवच्या
'बिकट समस्यांची चचा निघाली कीं प्रेमचंदांच्या लेखणीस तेज प्रात्त होई.
सजीव होऊन ती सहस्त्र मुखांनी दीनदुःखी शेतकऱ्यांची करुण कहाणी सांगू
लागत असे. प्रेमचंदांचा जन्मच खडेगांबीं झाला आणि त्यांचें बालपणहि
शेतकरी लोकांतच गेले, मध्यमवर्गीय परिस्थितींत गरिबीचे जे चटके भोगावे
लागतात, त्या सवे अवस्थांतून प्रेमचंदांना जन्मभर जार्वे लागलें होते, दारिद्या-
-मुळें मानवी भावना कशा तुडावेल्या जातात, आशा-आकांक्षा कशा धुळीस
मिळतात, या सर्व गोष्टी प्रेमचंदांच्या अनुभबांतील होत्या. शाळेंतील मास्तर
असतांना वा शिक्षणखात्यांत इन्स्पेक्टर असतांना दौऱ्यावर निघते वेळी
.त्यांदी अनेक खेड्यांना भेटी दिल्या आणि भारतीय शेतकऱ्यांचं जीवन
जवळून निरखून पाहिले-अनुभवलें. त्यांच्या कथा-कादंजऱ्यांतून भारतीय
कृषकवर्गाचे एवर्ढे जिवेत चित्र आपणांस पहावयास मिळतें तें त्यांच्या
धबिस्तृत व दयापूर्ण अंतःकरणांतील सहानुभूतीमुळें. त्यांनीं सुमारे तीनशे कथा
लिहिल्या. त्यांतील निम्म्याआधिक कथांतून भारतीय शेतकऱ्यांची कैफियत
अत्यंत आपुलकोर्ने मांडलेली आपणांस दिसेळ, या झुंझार कलावंताची दृष्टि
भारतीय किसानांच्या दुःखद यातना पाहून नेहमी पाणाबलेली दिसून येते.
-खेडेगांवच्या संत्कृतीवर प्रेमचंदांचें विलक्षण प्रेम ह्दोर्ते. सरळ, प्रामाणिक,
-सइज, सार्धेसुधे, निर्मळ म्हणून ग्रामीण जीवनाचे अतिरिक्त गोडवे या भेट
मुन्शी प्रेमचंद ५२
कथाकारानें गरायिळे नाहींत, तर त्यांतील दोषांचे, विकृतीचे हि दिग्दर्शन
अति हळुवार पद्धतीनें प्रेमचंदांनी केलें आहे. भारतीय किसानाची परिस्थिति
सुधारावी, त्याची दुःखं कमी व्हावीत, तो शहाणा व्हावा, या एकाच हेतूनें
प्रेरित होऊन प्रेमचंदांनी आपल्या कथासाहत्याची उभारणी केली आहे..
कलेसाठी कला किंबा आतिरिक््त सेदर्यांचे वा भोगलालसेचें वेड यांनीं त्यांच्या
साहित्यिक मनाला पछाडलेले नव्हते, प्रेमचंद अव्वल दर्जाचे कलावंत होतेच,
परंतु त्यांच्या सवे कळाकृति दलितांच्या अश्वथिदूनीं पावन झाल्या आहेत. जो
दलित आहे, पीडित आहि, वंचित आहे, मग ती व्यक्ति असो वा समाज
असो, त्याची सवा करणें, त्याची वकिली करणें, हेंच साहित्यिकाचें कर्तव्य
म्हणून प्रेमचंद आग्रहाने सांगतात. सन १९३६ सालीं अखिल भारतीय'
प्रगातेशाल टेखक संघाच्या टखनोच्या पाहिल्या अधिवेशनाच्या वेळीं प्रेम-
चंदांनीं अध्यक्षपदावरून जे भाषण केळे आहे ते॑ सर्व तथाकथित साहित्य-
कारांनी मनन करण्यासारखे आहे. त्यांच्या मते, “' साहित्यकारका ल्क्ष्य
केवल माहेफळ सजाना और मनोरुजनका सामान जुटाना नही है --
उसका दर्जा इतना न गिराइये । बह देरार्भाक्त ओर राजनीतिके पीछे
चलनेवाली संचाई भी नहीं, बल्कि उनके आगे मशाल दिखाती हुआ चलने-
वाली सचाई हे । ?? आणि या आदर्शानुसार प्रेमचंदांच्या ढलितकृतांची'
निर्मिति झालली दिसून येते, श्रमिक शेतकऱ्यांचे आयुष्य प्रेमचंदांच्या डोळ्या-
समोर होते. स्वतः प्रेमचंद आठ-आठ दहा दहा तास श्रमत असत. ऐपत
अखूनहि त्यांनीं चैनीस बा विलासास आपल्या जीवनांत कधीहि स्थान दिलें
नाहीं. घरी स्वतःचे काम-खोली झाडण्यापासूनर्चॅ-स्वतः करीत असत. सेवा-
धर्म तर त्यांच्या व्यक्तित्वाचा एक विशेष पैलू होता. प्रेसमधील कामगारांवर
त्यांची दृष्टि वात्सल्याने पूर्ण भरलेली होती. अनेक दीन-दुःखितांना त्यांनीं
आसरा दिला, अनेकांच्या यातना त्यांनीं दूर केल्या, प्रेमचंद स्वतःस तर
मजूर समजत असत. या मजूर साहित्यिकाच्या जीबनांत विलासास कोढून
स्थान मिळणार ? प्रेमचंदांनीं निक्षून सांगितलें आहे, “' जिन्हे धनवेभव
प्यारा है, साहित्यमंदिरर्मे उनके लिय स्थान नहीं है । यहा तो उन उपास-
कोंकी आवरपकता है, जिन्हांने सेवा ही अपने नीवनकी सार्थकता मान ली'
हो, जिनके दिल्म द्दे की तडप हो ओर मुदृब्बत का जोश हो । ” आगि
च्ज्े किसान-मित्र प्रेमचंद
०९७४०४९११७ ४५१६९७०”
२८५४७४१ ४ ४४ ४८४ २८४१ > भा “४७४ ४- ५४८
प्रेमचंदांच्या कथासाहित्यांतून हीच अनुभूति प्रकट झालेली दिसून येते. दळि-
तांची केफियत मांडण्याचे ठरल्यावर या देशांत शेतकरी मजूर यांच्याइतके
दुःखी कोगी नाही व याच दीन-दुनळ्यांनीं देश भरून गेला आहि. यांच्या
उद्डाराखेरीज देशाचा उद्धार कसा ! ही विचारसरणी प्रेमचंदांनी बरोबर
हेरळी आणि तिळा अनुसरून त्यांची साहित्यसृश्रि आकारास आली. प्रेम-
चंदांच्या साहित्यांत ठार्यी ठावी प्रेमचंदांचें जीवन प्रकट झालेळें दिसते. या
महान् आत्म्याचा साक्षात्कार पदोपदी वाचकास घडून येतो. प्रेमचंदांच्या
'पत्नीने-श्रीमती शिवरानीदेवीजींनी-' प्रेमवंद घरम ' नांवाचे एक अत्यंत
रमगीय पुस्तक लिहिळें आहे; त्यांत प्रेमचंदांचें मूल्यमापन करतांना त्या
लिहितात, “ वह बहुत ऊंचे हृदयके आदमी थे । यही तक कि उन मजदूररॉ
को भी वे अपने समान ही समझते थे । सत्की तकलीरफोका ध्यान रखते
थे । वे अक्सर अपने को मजदूर कहते । ... मेरे दिलमे बारवार यही
ठठता है कि वे कोई सन्त थे |! ”' आयुष्पमर सहृचारिंगी म्हणून भाग्य
लाभलेल्या देवीजींच्या या उद्गारांत खचित सत्यदर्शन आहे. रंजल्या-गांजळे-
'ल्यांची पिता करणाऱ्या प्रगट्म मानवासच आपण संत समजतो नाही १
या रंजढेल्या व गांजलेल्या समाजाची सेवा प्रेमचंदांच्या हातून घडलेली
आहि. खेडेगांवच्या शेतकऱ्यांवर त्यांचें प्रेम आहे तें यासार्ठी, अंधश्रद्धा, खोटी
मर्यादा, अज्ञान, वेडगळ समजुती, डोईजड कजे या ओझ्याखाली भारतीय
किसान कसा दडपलेला आहे, हँ त्यांनीं डोळंती पाहिडे होते. या सर्वे
आपत्तीतून भारताचा हा भूमिपति मुक्त झाल्याखेरीज देश स्उतंत्र झाला अर्से
कसे म्हणतां येईल १ ' पंच-परमेश्वर? “बेटी का धन?, “ नमक का दारोगा?
इत्यादि कथांतून खेडगावच्या चित्रणाचा जिवंत नपुना आपणांस दिसेल,
* रंगभूमि?, 'कर्मभूमे ', ' प्रेमाश्रम ?, “ गोदान ? इत्यादि कादंऱ्यांतून
शेतंकरी-मजूरवगाची दुःखे कोणती व त्यांवरील नेमके उपाय कोणते याची
चर्चा आपगांस वाचावयास मिळेल. भारतासारख्या कृषिप्रधान देशांत देशी
मालास उत्तेजन देऊन खेडेगांवन्या शेतकऱ्यांस दारिद्यापासून बांववार्वे हा
वतर त्यांच्या ' प्रेमाश्रम ? कादंबरीचा विषय. जमीनदारांनी ब सावकारांनी शेत-
कऱ्यांना कर्से छळळें याचाहि तपशील प्रेमचंदांच्या कथांतून वाचावयास मिळतो.
आपल्या महाराष्ट्रांत हे सर्व प्रश्न कांदींते जुने झाल्यासारखे वाटतात; पण सवे
मुन्शी प्रेमचंद ण्
मारतवर्षांचा विचार करतांना शेतकऱ्यांची दहृलाखीची स्थिति आज कांदरी
सुघारळेली आहे असें म्हणतां येणार नाहीं.
प्रेमचंदांच्या कथा-कादजऱ्यांतून खेडेगांवरचे निसर्गसौद्यवणन तर जागो-
बनार्गी सांपडेल; पण पाऊस आल्यावर शेतकऱ्यास केवढा आनंद होतो,
पिकांच्या पेरणीस प्रारंम कसा करतात, हंगामाच्या वेळीं पिकांची जपणूक.
कशी करतात, भोळ्याभाळ्या किसानबंधुंच्या विचित्र समजुती कणा असतात
इत्यादि गोष्टींची मार्मिक चिकित्साहि प्रेमचंद करीत असतांना दिसतील,
भारतीय रोतकऱ्याचें जीवन सजीवतेने आकारास आलिळे दिसते तें प्रेमचंद
यांच्या साहित्यांत, वेळच्या वेळीं पाऊस आला नाहीं तर काय होतें पहा--
“ सावबनका महीना आ गया था और बगूळे उठ रहे थे । कुओंका पानी
भी सूरव गया था और रुख तापसे जली जाती थी । नदी से थोडा थोडा
पानी मिलता था पर उसके पीछे आये दिन लाटियॉ. चलती थी । यह तक
कि नदीने भी जवाज दे दिया, जगह जगह चोरिया होने लगी, डाके
पडने लगे । सारे प्रान्तस॑ हाहाकार मच गया । ” आणि अशा ताण-
लेल्या पारोश्थतींत मेघराजानें कृपा केली तर £ “' बारे कुशल हुओ कि.
भादोमे वर्षा हो गयी ओर किसानोके प्राण हरे हुए । कितना उछाहू था
डस दिन । प्यासी पृथ्वी असे अघाती ही न थी और प्यासे किसान जैसे
उछल रहे थे, मार्नो पानी नहीं अशर्फियॉ. ( सुवर्णमोहरा ) बरस रही हँ ।.
बटोर लो जितना बटोंरते बने । खेतोमें जौ बगूळे उठते थे बही हृळल चलने
ळगे । बालवृन्द निकल निकलकर तालारजो और पोखरो और गडडदियोका
मुआयना कर रहे थे । ' ओ हो तालाबा तो आधा भर गया? झर वहा
से गडहियाकी तरफ भागो । ? ( गोदान ) अशीं जिवंत शाब्दाचित्रे प्रेमचंद
यांच्या कथासाहित्यांत अनेक ठिक'णी मिळतील,
मुन्शी प्रेमचंद यांची ' गोदान * कादंबरी त्यांच्या कीर्तिशिखरावरील कळस
म्हणून मानली ज्ञाते. भारतीय शेतकऱ्याचे एवढे नितांतरम्य वित्र अन्यत्र
सांपडरणे करीण आहि. या कादंघरींत कोणताहि प्रचार नाहीं, विचारांचा वा
तत्त्वांचा अट्टाहास नाहीं. येथें सर्वसामान्य अशा एका दोतकऱ्याची करुण
कहाणी आहे. एकामागून एक अशा येणाऱ्या सर्व आपत्तींना हसत हसत
य्कर देणाऱ्या ब त्यांतच अंत होत असतांना साथक मानणाऱ्या एका कर्मवीर
२१० किसान-मित्र प्रेमचंद
“९९०९ ८“ ७”९९ ९७०९०४९ »””९७०/ ९७०५ ०९८५११०५४१ ९. ७५०९७७” २७”
शेतकऱ्याची ही कथा आहि. “ गोदान 'मधील होरीराम भारतीय शेतकऱ्परांचा
एकमेव प्रतिनिधि आहे. हिंदी साहित्यांतील ही एक अमर व्यक्तिरेखा सदैव
सजीव अशी बनलेली आहे. भारताचा प्राण म्हणजे शेतकरी आणि शेत-
कऱ्याचा प्राण !- त्याची जमीन, पण भारतीय शेतकऱ्यास आणखी एक वस्तु
प्राणाप्रेॉ अशी वाटते आणि ती म्हणजे गाय. “ गोदान ? कादंबरीच्या
प्रारभांच होरीरामाच्या मनांत हृ विचार येत आहेत, एक गाय ध्यावी, तिची
खूप सेवा करावी, पोराबाळांना दूध पाजावे, रोज सकाळीं तिर्चे द्दीन घेऊन
स्वतः पावन व्हावे, हीच एक इच्छा दोरीची असते. होरीरामाच्या जीवितांतील
हँ एकमेव स्वमझ होतें. या ठिकाणीं प्रेमचंदांची मिदिकल लेखणी बालते,
६ बैकेकडटून येणाऱ्या व्याजावर चेन करावी अथवा मोठी इस्टेट खरेदी
करावी, या मोठ्या आकांक्षा होरीरामाच्या छोट्या दिलांत कशा मावणार ? *
---आणि मोठ्या प्रयासाने ऐंशी रुपयांचा वायदा करून होरीर्ने घरी गाय
आणली. रात्रभर होरीराम विचार करीत होता, गाईस बांधार्वे कोठें! ती
त्याची सपत्ति होती. तिच्या प्रासतीनें तो ऐश्वर्यसंपन्न झाला होता. साक्षात्
देवीने त्याच्या घरी पाऊल टाकलें होतें. गायीवर त्याची केवळ श्रद्धा वा भक्ति
नव्हती, ती त्याचें एक सजीव वैभव होतें. आपल्या दाराची व॒आंगणाची
शोभा वाढविणाऱ्या या रतनाला आपण दारांतच बांधावे असें त्या भोळ्या
जिवास वाटलें. कोणींहि येणाऱ्या-जाणाऱ्यांनीं विचारावे -कोणाचे ईं घर १
मग लोक म्हणतील होरीराम पाटलाचे !-- ही होरीची इच्छा; पण त्याची
बायको धनिया आधिक ठप्रवहारचतुर होती, गाय दृष्टावेल ही तिच्या मनांत
भीति -- तिनें गाय आंतल्या पडवींतच बांधण्याचा आग्रह धरला. - होरीराम
आणि धघनिया हीं साधींसुर्घी माणसे प्रेमचंदांच्या कलापूर्ण सृष्टींत अजरामर
होऊन गेलीं अहित. त्यांचें एकमेकांवरील प्रेम व त्यांच्यामध्ये वारवार होणारा
झगडा वाचून प्रत्येकास आपल्या परिचयाचा शेतकरी आठवावा, होरीरामाचे
दुर्दैव की, त्याच्याच एका आप्ताकडून या गाईस विषप्रयोग झाला, होरी-
रामाच्या घरांत गडबड उडून गेली. दिवा पेटवून मंडळी गोठ्यांत आली.
पाहतात तो ' सुंदारिया 'च्या मुखांतून फेस बाहेर येत होता, डोळे निर्विकार
होत होते, पोट फुगत चाललें असून चारी पाय ताणले जात होते. धनियानें
डोकें बडवून घेण्यास सुरुवात केली. तिची एकमेव संपत्ति तिच्या डोळ्यादेखत
नष्ट होत होती !
सुन्शी प्रेमचंद ट्
होरीच्या भावाने विषप्रयोग केल्याचे सिद्ध झाले. धनिया दुसऱ्या दिवशी
क्रोधाने लालीलाल होऊन शिव्यांचा वषाव करूं लागली, तेव्हां होरीरामार्ने
भावाची कड घेतली, तो तिला निर्दयपणे मारूं लागला, गांवचे लोक जमा
झळि. घनियाची सोडवणूक झाली, मारामुळें घनियाचं अंग विलक्षण ठणकत
होतें - कित्येक दिवसपर्यंत होरीराम वब धनिया यांच्यांतील बोलणे बंद होते.
मानिनी धनिया या अत्याचारी नवऱ्याशी बोलण्यास राजी नव्ह्ती - पण मध्यं-
तर्री होरीरामास ताप येऊं लागळा, एक महेनामर तो खाटेवरच पडून हाता.
या वेळीं धनियारने विचार केडा, पति मरण्याच्या पंथास आहे, आतां त्याच्याशी
वैर काय कामाचे ! अशा अवष्येंत वैऱ्य़ाशींहि दावा साधूं नये. तो तर
आपला पति आहे, असेळ वाईट; पण त्याच्याचचरोबर पंचवीस वर्षे आपण
संसार केला ना ? सुख त्याच्याबरोबरच भोगळें आणि दुःखहि त्याच्याच
संगतीत सहन केळे ! आतां तो बरा असो वाईट असो, आपला आहे ही गोष्ट
खरी, साऱ्या गांवाच्या देखत त्यानें आपणांस बेदम मार दिडा, पण त्या वेळ-
पासून किती शरमिंदा झाला आहे |! भाकरी खायडा बसतो तें मान खाली घाळून.
आपण कांदी बोठू की काय या विचाराने निवारा हशरभिंदा होऊन गला
आहे |-घनियानें मनोभावे होरीरामाची सेवा केली आणि त्याचा ताप दूर
झाला, पतिपत्नींमधीळ वादळ - थांबे. एके दिवशीं घनियानें विचारलें,
£ एबढा राग केठून आला तुम्हांला ! त्या भरांत मी मरतच होर्ते, ” त्यावर
होरी बोलला, “' आतां ती गोष्ट नको काढूस धनिया |! माझ्या अंगांत भूत
संवारळे होते, तूं मेली असतीस तर मी जिता कसा राहिला असतो ? तुझ्याच
संगती वितेवर आलो असतो ना.
असा हा दोतकऱ्याच्या जीवनांतील झगडा व प्रेमप्रसंग, प्रेमचंदांच्या
कडापूर्ग लेखगीनें त्यांत सरे चैतन्य ओतून दिलें अहे. हृंरीरामाची घनिया
तर शेतकरी स्त्रीचा अर्क आहे. जितकी भांडखोर तितकी प्रेमळ, अन्याय
तिळा सहन होत नाहीं, सददसा ती बोलणार नाहीं, पण बे ळू लागडी कीं मा्गे-
पुर्र पाहर्गे कसर्चे सुवगार तिळा ! मी मी म्हणणाऱ्या मर्दानाहि जिने
लाजविडं होतें. पोडीस पाहिला की शेतकरी मिऊन जातो; आणि याच
प्रसंगी घनिपा चंडिका बनर्ये,. गायीस विष कोणीं दिलें, गुन्हेगारास काय
शेक्षा व्हावी, म्हणून गांबपाटील, पंच, पोलीस यांची बैठक बसली आहे.
७ [किसान-मित्र प्रेम्चेद
'पैसे चारून आपल्या भावास बांचाविणाऱ्या नवर्याची धानियानें निैत्संना
केळी. पोलीसपाटीळ चपापला; पण थट्टेच्या लहृरींत बोलला, ““ मळा तर
असें बाटतें की, याच अवदसेनें दिरावर आळ आणण्यासाठी स्वतः जनावरास
'विष घातलें -- ?”?
घनिया एकदम गर्जुत उठळी, आपले दोनहि हात अधिक्राऱ्यापुढे करून
- ती बोळू लागली, “ हो. हो. मी दिर्ळे विष, गाय माझो होती. मीं मारली.
मग £ कोणाचें दुसऱ्प्राचें जनावर तर नाहीं मारे £! तुमच्या तपासांत हच
निघत असेल तर असेंच लिहा. घाला माझ्या हातांत बेड्या. तुमचा न्याय
आणि तुमच्या अकठेची दौड तरी मला पाहूं द्या.--- ?” सारीसभाया
चंडिकेच्या अवतारापुर्टे चकित झाली, फिकी पडली, असा हा शेतकऱ्याच्या
पत्नीचा राग. पण या धनियेच्या पोटांत दयेचा ब मायेवा अक्षय झरा
निरंतर वाहत असलेला दिसून येईळ, स्वतःचा मुलगा गोव्घंन कणा एका
लरुण विधवेच्या मायाजालांत सांपडला. धघनिया हॅ. सर्व जाणून होती.
होरीरामळा वारंवार लक्ष देण्यास बजावीत होतो. पण आपत्तीत गडलेल्या
होरीला या गोष्टीकडे ध्यान देण्यास सवड' नव्ह्ती. शेवटीं व्हायचे तेव झालें
नको त्या आपत्तीत सांपडून झुनिया - गोवर्धेनची प्रेयसी - धनियाच्या आश्रयास
निवाली ! आणि धनित्रा तर संतापून ब्रिथरळी होती. त्या काळतोंडी
रांडेळा घरांत एक क्षगभरहि राहूं न देण्याचा तिनें निश्चप्र केडा. रात्रीच्या
बेळ' हरीरामाम बर झुनियप्रा घरी आडी. धनिपा कय बोलते यांची पिता
होरीरामास, ब संतापी होरी पेरीला काय करतो याची फिकीर धनिय्रास त्यांना
दाराशी पाहतांव धनिया बोलली, “ पहा बरं, शपष आहि माझी. पोरीच्या
अंगाला हात लावूं नका. आपलो आपणच रडते आहे मिचारी. खोट्या देवाची
नसती तर हा दिवस आला नसता -- ?
होरीरामावे डोळे पागाबळे. घनियाच्य। यां मावृत्नेद्'मुळें या अंधाऱ्या
रात्रींहि त्याच्या डोळ्यासमोर प्रकाशरेखा चमकून गेडी, घरांत आल्यावर
दयाद्रे अंतःकरणाने पोरीच्या पाठीवरून हात फिरवीत होरी म्हणाला, “ मिऊ
नकोस बेटा. घर तुझें आहे. आम्ही तुझेच आहोंत. आरामांत रद्दा. ?? घनि-
याहि पोरीची दयनीय अवल्था पाहून विरघळून गेली. थोड्या वेळापूर्वी
रंजिला धनियाने कुलटा व कडंकिनी म्हट तिलाच या वेळीं तिर्ने वात्सल्याने
मुल्शी प्रेमचंद ष्ट
पोटाशी धरलें, होेरीखेरीज कोणाहि पुरुष'कडे' न पाहणाऱ्या या साध्बीनें-
घनियानें - पापिष्टा झुनियेला जवळ घेतर्ले, तिचे डोळे पुसले, तिनें तिचे सांत्वन
केळे, जणुं पक्षिणीच्य़ा पंखाखाली पांखरानें आसरा घेतला. अक्ली ही
धनिया आणि असा हा तिचा नवरा होरीराम !
ग्रामीण जीवनार्चे ब भारतीय शेतकऱ्याचे यथार्थ चित्रण आपणांस
ग्रमचंदांच्या * गोदान ' कादंभरींत पहाबयास मिळेल. गरीनज शेतकऱ्याची
एकमेव इच्छा गाय पाळण्याची-पण ती पुरी होत नाहीं. आपत्तींनीं, कर्जाच्या
बोजानें, कट्टांनीं होरीराम खचला जातो. पण त्याचे कर्तेुव्यकर्म सुटत नाहीं.
टकरा देतां देतां मरण्यांतील सुख तो चाखणार होता. हाच मानवी जीवनां-
तील मथितार्थ असाच जणुं त्याचा संदेश होता. नबी गाय घेण्याची लालसा
त्याच्या मनांतच राहून गेळो. त्याचें नातवंड' दुवाबांचून उपाशी होतें, त्याचा
आयुष्यसू्ये कळला होता. पण गाय घेण्याची इच्छा मात्र त्याला अस्वस्थ
करीत होती, जीवनांतील सारी संकर्र, साऱ्या निराशा आतां त्याच्या परिचयां>
तील होत्या. जीवनसंग्रामांत होरी पराभूत झाला अर्से कोण म्हृगेल ! झुंजतां
झुंजतां होरीच्या अंगावर ज्या जखमा झाल्या होत्या तोंच त्याची विजयचिह होत.
देद्यांत ताकद नसतांना तो शेतावर काम करण्यास गेला. पाय भरून येत होते.
चालतांना तोल जात होता. होरी आंतेम क्षणाची बाटचाल करीत होता. घेरी
येऊन होरीराम बेचेन झाला. सारा आयुष्यक्रम त्याच्या डोळ्यासमोर आला;
. आणि सरते शेवटीं एक कामधेनु त्याच्या दृष्टीसमोर उभी राहिली. ही एक
लालसा अपुरी राहिली. घरून धनिया दोडत होरीरामापाशीं आली. जीवना-
चा आधार सुटत चालल्याचे तिर्ने हेरळें. डडबल्य़ा डोळ्यांनी तिने
आपल्या जीणे साथीदाराकडे पाहिलें व म्हटठे, “' माझ्याकडे पहा ना. मी
आहें. मला ओळखले नाहीं? *
पत्नीच्या मृदु व सदय स्पर्शाने होरी क्षणभर शुद्धीवर आला. दीन मद्रेने
त्यानें धनियाकडे पाहिडे, डोळ्यांतून ओघळणाऱ्या अश्रूंना सावरीत सावरीत
तो जोलला,--“ माझे बरेवाईट बोलणें माफ कर घनिया ! आतां जातो. गायीची
इच्छा मनांतच राहिली. उरलेले रुपये क्रियाकर्मासच लागतील***रडूं नकोस
धानिया |! किती दिवस मला जगवशील ? सारी दुर्दशा झाली आहे. आतां
मरूं दे. ” होरीरामाची जीवितयात्रा संपत असल्याचे पाहून कोणी बोलले,
4 बाई, मन घट्ट करा आतां, गोदान करा. होरीराम चालला *"* ?
"५९ मी तर मजूर आहें.
घनिया यंत्राप्रमाणें उठळी, घरांत बीस आगे शिल़क होते ते होरीरामाच्या
थैड होणाऱ्या हातांत ठेवून बोलली, “' घरांत गाय नाहीं, वासरू नाहीं, पैसा
नाही. हा सव्वा रुपया हच गोदान. *
आणि धनिया मू्छित होऊन पडली !
' हा भारतीय किसानाचा मृत्यु |! सर्वत्र दुःख, दैना, उपासमार, निराशा--
पण वृत्ति झुंजाराची, कर्मवीराची. प्रेमचंदांनी भारतीय शेतकऱ्याचे हॅंच वैभव
ओळखले व त्यास आपल्या कथा-कादंभऱ्यांतून अमर केलें. “गोदान ' है
मारतीय शेतकऱ्याच्या जीवनावरील एक रमणीय असें महाकाव्य आहे.
७ ७ &.
“ मी तर मजूर आहें.... ” औट
कोणत्याहि लेखकाचे मोठेपण केवळ त्यानें निमोण केलेल्या बऱ्यावाईट
साहित्यावरच अजलंबून असते असें नव्हे. तर्से असतें तर आजकाल शेतकरी-
कामकरी यांच्या जीवनावर लिहिणारे अनेक ठेखक आहेत. दीनदलितांच्या
उद्घाराची भाषा बोलावयाची व ग्रामीण भार्षेत कथा सांगण्याची ऐट आणा-
वयाची, यापलीकडे' या लेखकांची मजल गेलेली नसते. प्रत्यक्ष व्यवहारांत ते
सामान्य जनतेमासून शेकडो मेळ दूर असतात. दलितांचे जीवन त्यांनी दुरून
पाहिळेळें असतें, त्यामुळें त्यांनीं निर्माण केलेल्या साहित्यांत एक प्रकारची कृत्रि-
मता आलेली असते. केवळ एक फॅशन म्हणून कथाकादंबऱ्यांत वा चित्रपटांत
गरिबांना सहानुभूति द्शीविर्णे किंवा किसान-मजुरांचें वर्णन करणें यांत काय
महृत्त्व ! प्रेमचंदांची दृष्टि याहून फार निराळी होती. त्यांच्या सहानुभूतीला
कोणती हि मर्यादा नव्हती. स्वतः गरिबीत दिवस काढल्याभुळें त्यांना त्या वर्गो-
. तील दुःखाची जवळून नीट कल्पना होती. नोकरीनिमित्त हिंडावे लागल्या-.
मुळें शेतकऱ्यांची स्थिति त्यांनी नीट तपासून पाहिडी होती. ऐपत असतांना
सुद्धां खाजगी जीवनांत ते कमाठीच्या साधेपणाने वागत. गरिबीचे जीवन ते
बगले, मजुराप्रमा्णे ते राबत असत. अपार शरारकष्ट करण्यांत त्यांना मनस्वी
आनंद वाटे. शारीरिक श्रमांची किंमत त्यांनीं बरोबर ओळखली होती. ते
स्वतःस मजूरच समजत असत.
पुन्शी प्रेमचंद ६०
सन १९२८ मध्यें प्रेमचंद लखनौस होते त्या वेळची गोष्ट, कालाकॉकरचे
राजे अवघेदासिंहू घरी आले होते. त्यांच्याबरोबर आणखीहि बडी बडी मंडळी
होती. बराच वेळ गप्पागोष्टी झाल्या. चहापाणी झालें आगि मंडळी निघून
-गेळी, शिवरानीदेवीनें प्रेमचंदांना विचारळे, “' कोण होते हे लोक? ?”
प्रेमचंदांनी उत्तर दि,“ खुद्द महाराजसाहेभ आले हेति. *?
६६ त्यांना कोठें बसवले होते १ ”
£ जेथ मो बसा होतो तेय, ??
:६ ह कांदीं ठीक नाहीं. मीं शंभर वेळां आपणांस सांगितलें की, चारपांच
खुच्यी घरांत आणून टाका. ते लोक मनांत काय म्हणाले असतील ? आणि
आपणगांला तरी बरे वार्ट्ळे का! ?'
प्रेमचंद मनसोक्तपर्णे हंसळे व बोलले,
६६ ह्रो काय राजेमहाराजे यांच्या व्यवस्थेसाठी थोडाच आहें ! मी तर
बोळूनचालन मजूर. जे कांहीं जाडेभरडे मिळते तें पांघरतो. जमीन दीच माझी
गादी आहे. आतां त्या लोकांना हें ठीक बाटले नसेळ तर मी काय करू १...
प्रत्यक्रानें टेबल-खुर्चीचे ढोंग कां म्हणून करावें £ हॅ हिंदुस्थान आहे राना,
येथें सामान्य माणसाची रोजची कमाई सहा पैसे आहे. पुष्कळांना पोटभर
भःकरीहि क्षी मिळत नाहीं, आणि तूं म्हणतेस, टेग्रलें-खुच्या घेऊन थाटमाट
करा, द्वा संप्रह काय क'माचा £ गरिबांची ही केवळ लूट आहे. ?' यानंतर प्रेम-
रानी जगतांतील विषमतेवर एक व्यख्पानच दिलें. लोक भुकेने पिडलेळे
असतांना आपण विलास करावेत हँ प्रेमचेदांना कधींच पटण्यासारखें नव्ह्त.
एकीकडे उपासमार होत असतांना दुसरीकडे चेन चालली आहे, असें दिस-
तांच ते विव्हळ होऊन उठत. गरडिखांच्या श्रमानें निर्माण झालिली संपत्ति ऐदी
लोक आळशीयणानें उघळीत राहिलेले पाहतांच त्यांना मनस्वी खेद होई.
त्याच वर्षींची गोष्ट, नोव्हेंबर महिन्यांत व्हाइसरॉयसाहेबांची खारी लखनौस
'येगार होती. प्रेमचंद कचेरीतून घर्रा आले व म्हणाले, “' आज शहरांत
४०,००० रुपयांचो रोषगाई होणार आहि. दारूकामहि फार सुंदर होणार.
तू. असा सोहळा कर्धी जन्मांत पाहिला नसगार.
५ कोंगाजजळ असा रिकामा पैसा आहि कीं, दारूकामांत आणि विजेच्या
ऱरोषणाइत खर्च व्हावा १...
६१ मी तर मजूर आहे.
॥__.2__._._._._.7..7.::---:::::-::::--:-८-८--८८४५४४४४४
६ कोणाचा म्हणून काय पुसतेस ? चळ तर पहावयास, मुळांना घेऊन
येशील £
६: आपण याल तर. ..?
८ हो-हो. कां नाहीं येणार £ ग/रबांच्या घराची राख झालेली पाहण्यास.
कां नाहीं येणार १! एक आतरात्राजीची कथा, आज येथे व्हाइसरॉय येणार
आहे. हिंदुस्थानांतील राजेमहाराजे आणि युवराज य़ा ठिकार्णी येऊन त्यांचें
दंगी स्वागत करणार आहित. जेथें कमतरता पडेल त्या ठिकाणी गरिबांकडून
वसूल झालेला पैसा आहेच. गरिजांच्या श्रमाचा पैसा आतशाबाजीमध्यें फुंकून
टाकण्यास काय हरकत आहे ! ज्या देशांतील सामान्य माणसार्चे उत्पन्न रोजीं
सहा पैशांपेक्षा जात्त नाहीं तेथील लोकांना एके दिवशी चाळीस हृजार रुपये!
रोषणाई आणि आतदशभाजी यांत खच करण्याचा काय अधिकार आहे १.
अंगावर बीतभर कपडाहि नाहीं; दोन वेळ रोटी मिळण्याची पंचाईत, त्याच
देशांत हा पैसा भेछुटपर्णे असा उघळला जाणार आणि कशासाठी तर
व्हाइसरॉय खूब व्हावा म्हणून-त्याच्याकडून घडे बडे किताब मिळावेत म्हणून .?>
गोरगरिबांच्या पैशाची होणारी ही ढूटमार प्रेमचंदांना उघड्या डोळ्यांनी
पह्ावेना. शिवरानीदेवीने प्रेमचंदांच्या मनर्चे दुःख ओळखले. ती म्हणाली,
£ कधीं काळीं स्वराज्य येईल, पारोस्थाति पालटेल, आपण त्या वेळी नेमके काय
कराल ! > प्रेमचंदांनी ताडकन् उत्तर दिलें, ““ मी किसान-मजुरांच्या बाजूचा
होईन. त्यांच्यासाठी लढेन. मी संबोना सांगेन कॉ, मी तर मजूरच आहें. तुम्ही
फावडे चालवितां, मी कलम चालवितो. आपण दोघेहि समानच आहेत. ”
मजुरांबद्दलची प्रेमचंदांची ही भाषा केवळ बोलण्यांतली किंबा कथाकारदं-
बर््यांतील नकली पात्रांच्या तोंडांतळीच नव्हती. ते स्वतः तसलें जीवन जगत
तर होतेच, पण गरिजांची दुःखें दूर करण्यासाठीं ते स्वतः नित्य झटत असत.
कारखानदार आणि मजूर यांच्यांतील झगडा स वैत्र आहे. खुद्द प्रेमचंद
यांच्याच छापखान्यांत कांढीं तेढ माजली व कामगार संपावर निघाले. प्रेमचंद
उदास होऊन घरीं आले, त्या वेळचा शिषरानी व प्रेमचंद यांचा संवाद.
ऐकण्यासारखा आहे. ।
५ काय, तब्बेत बरी दिसत नाहीं ! ”
५ कार छान आहे प्रकृति, ? .
-मुन्शी प्रेमचंद ष्र
“ मग उदास कां म्हणून ! ”
£ या प्रेसच्यामुळे मळा फार यातना होतात. *”
६: काय झालें ? सांगा ना. ?
£ काय सांगू ! प्रेसचा मॅनेजर आणि मजूर यांचे पटत नाही. ”
४ कामगारच काम करीत नसतील, निचारा मॅनेजर काय करणार ! ?
“ तो स्वतःस तर परमेश्वराचा बाप समजतोय, कोणाला धमकी देतो,
कोणाचे पैसे काटतो. ?१
६६ पण त्यांत त्याचा काय दोष? ?'
“ होय, मॅनेजरचीच सारी दुष्टता आहे. मीं त्याला एकांतांत खूप समजावून
पाहिळे, छापखान्यास दर माहिना तूट येत आहे. गरीज मजुरांच्या वेतनांतून
का ती भरून निघणार आहे ? आपणांसारख्यांना जास्त पैसे मिळतात,
पण ते आपणांस पुरतात का १ मग त्या गारिबांचे कर्से निभणार १ आम्ही
शिकले-सवरलेळे लोकहि किती ठिकार्णी चुका करीत असतो. मग त्या
बिचाऱ्या अशिक्षित कामगारांचे काय १ **'* त्यांच्याशी लहून काय होणार! ??
प्रेसमधीळ कामगारांच्या बाजूनें प्रेमचंद कसे लढत असत हें ध्यानांत
येईल, गरीब-श्रीमंत, सेव्य-सेवक यांतील झगडा प्रेमचंद यांना नेहमी
अत्वत्थ करून सोडी, स्वतःच्या छापखान्यांत ते स्वतः मजुरांच्या बरोबरीने
वाटेल ते काम करण्यास तयार असत. मी प्रतिष्ठित, शिकठेला, असा भावहि
त्यांच्या मनांत निर्माण होत नसे. थंडीच्या दिवसांत काम करतांना कष्ट होत
असत. अंगावर सुती कपडे होते पण तेहि फाटलेले, तेव्हां रिवरानीदेवीनें
दोन वेळां गरम कपडे करण्यासाठी चाळीस-चाळीस रुपये प्रेमचंदांच्या
स्वाधीन केळे. पण प्रेमचंद स्वतःस लोकपचे कपडे कोठून शिवणार £ दोनहि
वेळां घरीं आल्यावर पत्नीजवळ ते ब्रोलले, “ मी गरम कपडे कसे शिवू १
सर्व पैसे प्रेसमधील कामगारांना वांटून टाकले. त्यांना सांधे कपडेहि पुरेसे नव्हते.
आणि मीं का उंची कपडे' घालावेत !
असा महात्मा लेखक किती ठिकाणीं सांपडेल १ व्यावहारिक जगतांत
आकार धारण करणारी एवढी विशाल सहानुभूति इतरत्र सांपडणें कठीण
आहे. प्रेमचंदांच्या अतयारमी ही दयेवी वृत्ति लहानपणापासूनच होती.
भ्रमचंद लहान असतांना त्यांना सांमाळणारा, शाळेत नेऊन पोंचविणारा एक
"दशे मी तर मजूर आहे
-“*-८४-/४//४%-४१-./५-०/0५-/ ४.” ४. ४. ४.५” ४०४ ४०४४-१८ ४-” ४-९
ऱगडी होता. त्याचा विशेष लळा लहानग्या घनपतरायास लागलेला होता.
त्याच्या खांद्यावर बसून लह्ानपणीं प्रेमचंद अनेक ठिकार्णी हिंडले होते. तो
सुद्धां या लहान पोरास ऊंस, पेरू, गाजर वगेरे देऊन खूष ठेवीत असे. ..
'पण एके दिवशीं प्रेमचंदांच्या वडिलांनी त्याला हाकलून दिलें. दुसऱ्या दिवर्शी
तो जेव्हां दिसला नाहीं तेव्दां त्यांनी त्याची चौकशी केली. तेव्हां उत्तर मिळालें,
६ वाजी होता, दिलें हाकळून . ! प्रेमचंदांनी लिहिळे आहे : “' मला रात्रभर झोप
आली नाहीं. किती चांगला मनुष्य होता भिचारा ! मी मोठा होईन तेव्हां
अशाच माणसास जवळ करीन, दुसऱ्या दिवशी सकाळ होतांच मी त्याला
हुडकून घरी घेऊन आलो. घर्री चोरून चोरून पीठ, डाळ, तांदूळ वगैरे
पदार्थ मी त्याला देऊन टाकले. मी तेव्हां आठव्या यरत्तेत शिकत होतो. ??
हीच प्रेमचंदांच्या स्वभावातील वृत्ति मोठेपणींहि कायम राहिली होती.
दुःखितांचें दुःख पाहून प्रेमचंद हैराण होऊन जात. होईल तेवढी मदत
करून त्या यातना दूर झाल्या तर पाहण्यासाठी ते नेटाने प्रयत्न करीत, बना-
रस येर्थे त्यांच्या घर्री एक मोलकरीण होती. तिचा छोटा मुलगा आगीने
भाजला, त्याच्या सर्व तोंडावर मळम फासर्के होते आणि कपडेंसुद्धां खराब
.दोऊन गेले होते. प्रेमचंदांच्या छोट्या मुलाने त्याला आपल्या घरी आणलें
आणि आईस तो म्हणाला, “' अम्मा, याला कांही खायला दे. या पोराचे
तोंड पाहून माझ्या पोटांत कसेंसें होत आहे. ?' शिवरानीदेबीला भीति
वाटली कीं, न जाणो पोरगा त्याला शिवेल आणि त्याच्या हाताला सर्वे घाण
लागेल. पण प्रेमचंदांचे डोळे मात्र भरून आले आणि ते झटकन् म्हणाले,
८६ देना लोकर याला कांही खावयास. ..हा पोरगा मोठा दयावान् दिसतो.
तुला-मलासुद्धां त्याच्याकड पाहवेना, पण बन्नूर्ते त्याला घरांत आणलें. ?
नोकरमाणसाकडे' व त्यांच्या मुलांभाळांकड' आपुलकीने पाहणारे किती
महात्मे आपणांस या जगांत दिसतील £! पण प्रेमचंदांच्या प्रीतीची व सहानु-
भूतीची जातच निराळी होती.
त्यांच्या घरांत एक म्हातारी मोलकरीण होती, रात्रंदिवस ती त्यांच्याच
खरी राही व पडेल तें काम करी, तिला एक मुलगी व चार जवान मुलगे
-होते, पण त्यांचा उपयोग मात्र कांहीं नव्हता, महिल्याकांठचे पैसे म्हातारीच्या
“ आले की कोणता तरी पोरगा येई, धाक दाखबी व म्हातारीकडून पैसे
सुन्शी प्रेमचंद द्
छुवाडून नेई, प्रेमचंदांना या पारित्थितीची ज्ञाणीव झाल्याबरोबर आति दुःख.
झले, त्यांनीं उद्गार क'ढले, “या म्हातारीचो मुलें माणसें आहेत कीं सैतान !
माझ्या ध्यानांत येत नाहीं की, या बूढीर्न क'म करावें मरमरेपर्यंत आणि वयांत
आलिल्या पोरट्यांनीं ते पैसे उघळावेत ! !? आणि मग प्रेमचंदांनी एकंदर परि-
त्थिदीवर एक व्याख्यान तयार केलें, “' हीच परिस्थिति आजकाल इंग्रजी
शिक्षणामुळे चांगल्या चांगल्या लोकांतद्वि निमोण झाठी आहे. पहिल्याने आपल्या
आरडेनद्दल मुलांना केवढा आदर वाटे. आतां मात्र सर्व उलटे होऊन गेळें आहे.
त्या मिचारीला भाकरी घालणारे कोणीहि नाहीं. आणि हे नवजवान बेटे
लह्वानपर्णा आईचे दूध जर्से शोषून घेत तसेंच आतांही पैसा ओढून घेतात.
यांच्यांत आणि पश्मूंत काय फरक ! कुत्रीसमोर रोटी टाकली कीं तिची पिले
नाहीं का ते तुकडे पळवून नेतात !-तशीच ही अवत्था, त्यांना हें समजत
नाहीं की, आपली आई भुकेलेली आहे. तर्सेच हे म्हातारीचे बेटे. सगळीकडे स्वार्थ
मात्र बाढलेला दिसतो.,.. काय करावें त्या भिचारीर्न ! तिला मोठी बादली
पाण्यानं भरठेली उचलत नाहीं. हातपाय कांपूं लागतात; तेव्हां मीच म!झ्या
हातांनी पाणी घेऊन स्नान करतों. मला त्या म्हातारीची फारच दया येते.
असें हँ प्रेमचंदांचें दयापूर्ण अंतःकरण, त्यांनीं सर्वीची काळजी बाहिली.
सवाची चिंता केली. दयाभाव हा प्रेमचंदांच्या स्वभावाचा त्थायीमभाव द्दोता..
व्यावद्वारिक जीवनांतील कांहीं प्रसंगांवरून आपण त्याचा परिचय थोडक्यांत
करून घेवलाच, पण या देशांतील कित्येक राजकीय व सामाजिक प्रश्नांचा
विचार त्यांनीं याच प्रकारच्या दयेच्या भूमिकेवरून केलेला दिसून येतो. या
आपल्या विस्तीर्ण देशाची भाषा - राष्ट्रमाषा -कोणती असावी म्हणून केवढा'
वाद माजला होता ! हिंदु-मुसलमान यांची एकी व्हावी म्हणून केवढाले.
प्रयत्न या देशांत थोरामोठ्यांनीं केले, पण लढाईनें हे प्रश्न सुटणारे नव्हते.
एकमेकांची अंतःकरणे शुद्ध असतील तरच आपल्या देशाच्या या प्रमुख
प्रश्नाचा निकाळ समाधानकारक रीतीनें लागेल, असे प्रेमचंद यांना वाटे,
प्रेमचंद यांना स्वतःचे ' नवाबराय ? नांव प्रिय बाटे तें दोन कारणांसाठी,
पिताजींनीं ते ठेवळें असल्यामुळें त्यांना आवडे; दुसरें असें कीं, या नांबामुळे-
हिंदु व मुसलमान या दोन संस्कृतींचा मिलाफ झाल्यासारखा त्यांना वाटे..
थंघराव्या शतकांत कनीर महात्मा ज्याप्रमार्णे हिंदु-मुसलमानांना सारखाच
शष मी तर मजूर आहे
वाटणारा होऊन गेला, त्याचप्रमाणे प्रेमचंदांनाहि दोन घम, दोन जमाती
वेगळ्या वाटत नसत. प्रेमचंदांची भाषा उदूमिश्रित हिन्दी म्हणजे हिंदुस्तानी
आहे. पण याहि भाषेची पूर्वपीठिका ऐकण्यासारखी आहे. तिथ्याहि
पाठीमार्गे एक विशिष्ट तत्त्वज्ञान आहे. महात्मा गा्धीशीं बातचीत करून
प्रेमचंद वर्घ्याहून घरी आले हाते. भाषेसंबंधीं चर्चा निघाली तेव्हां प्रेमचंद
म्हणाले, “' गांधीजी हिंदु-मुसलमानांची एकत। व्हाबी म्हणून म्हणतात; मीहि
हिंदी व उर्दू यांच्या मिश्रणाने हिंदुस्तानी तयार करीन, ?
शिवरानी:---आपण कशी बनवाल हिंदुस्तानी ?
प्रेमचंदः-- र्जे कार्ही लिहीन तें हिंदुस्तानीतच लिहीन.
शिवरानीः---मग तुमच्या एकऱय्याच्या लिहिण्यानें हिंदुस्तानी होईल !
प्रेमचंदः---हो. जिला हिंदु-मुसलमान दोघेहि मानतील, जिला सर्वे जनता
समजूं शकेल ती हिंदुस्तानी, आणि माझा विश्वास आहे कीं, जेव्हां केव्हां राष्ट-
भाषा निर्माण होईल तेव्हां हिंदी-उदूं यांच्या मिश्रणानेंच ती बनेल.
शिवरानीः--पण हा तर हिंदुस्थान आहे. येथील भाषा केवळ हिंदीच
ब्हावयास पाहिजे.
प्रेमचंदः--हँ हिंदुस्तान नांव कसे पडलें आहे ठाऊक ! जेव्हां येथे मुसलमान
येऊन स्थायिक झाले तेव्हांच हॅ नांव पडलें. हिंदु-मुसलमान जेव्हां एकदिलाने
राहतील तेव्हांच या देशांत खरी शांतता निर्माण होईल.
शिवरानी;---मग काय करणार १ हिंदीत फारसी शब्द घुसडून देणार कीं
उर्दूत संस्कृत शब्द मिसळणार !
प्रेमचंदः --असें कांदींहि करण्याची जरूरी नाहीं. स्व जनतेची भाषा आहे.
हिन्दींत फारसी शब्द येवोत बा उददूंत संत्कृत शब्द येबोत, त्याबद्दल मला कांहींहि
बाटणार नाहीं. जेव्हां देशांत दुसरी जमात येऊन त्थिर होते तेव्हां देशसुद्धां
शुद्ध स्वरूपांत राहत नाहीं, मग भाषेची शुद्धता घेऊन कर्से चालेल १
हिंदु-मुसलमान यांच्या संबंधाबद्दल प्रेमचंद यांची दृष्टि फारच उदार होती.
राम, रहीम, बुद्ध, येश्टू या सर्वांना सारखाच मान देणारे ते होते, “ मी एक
मनुष्य आहें. माणुसकी हा माझा खरा धर्म आहे. हिंदु-मुसलमान माझे मित्र
सारख्याच प्रमाणांत आहेत, ”
५.००
५ /**/*- “0१.४” ४/५ “€ 7 ४.” १५४ /१ “ ७0१४” १८
/ * /'*./"५.”९४./” ॥.४7५-/%//%७७%०”0१ “९४५.” ““* “€४.४.” *//१ ””%. ४५ 10०९ ४७ २.५७” ४८५ ४६- "€ > :< -* *“€* १४.” * “५ ५-/४-/१४-/५/”१/
मुसलमान गोवध करतात म्हणून शेकडो हिंदूंना दुःख होतें. पण या
प्रश्नाकडे पाहण्याची प्रेमचंद यांची एक निराळीच दृष्टि झाहे. ते म्हणत,
“ शोबध होऊं लागल्याबरोबर दोन जमातींत फार मोठा झगडा होतो ही
गोष्ट खरी आहे. पण मग इंग्रजांच्यासा्ठी शेकर्डो गायी ब वासरे मार्डी
जातात तेव्हां हिंदूर्चे रक्त उसळून कां जात नाईी £ गायीसाठींच झगडा होता
तर तो सर्वत्र व्हावयास पाहिजे. आणि हिंदूंच्या मंदिरांत तरी काय दिसतें
शेकर्डो बकऱ्यांचे व कोंबड्यांचे जीव नाहीं का त्या देवाच्या पायाशीं नात १
बकऱ्यांना काय जीव नसतो ! बकऱ्यांर्चे मांस मोठ्या चवीने हिंदु खातात हा
कोठला धर्म !... ... स्त्रिपांच्यावर सरवात जास्त जळूम हिंदुच करतात. जरा
कांहीं चूक झाली की घराबाहेर दिली ढकलून ! मग ती भिचारी कोर्ठे
जाणार £ ... ?' प्रेमचंदांच्या या विचारसरणींत कांहींच तथ्य नाहीं अर्से
कोण म्हणेल ! आपल्या कथाकादंभर््यांतून प्रेमचंदांनी गोवघाचे प्रसंग वर्णन
करून दोन्ही समाजांतील सलोख्याचा मार्ग दर्शविला आहे. हिंदु-मुसलमान
यांच्या एकतेवरच आधारलेली त्यांची ' पंच परमेश्वर ) कथा हिन्दी साहित्यांत
अमर झाली आहे. त्यांतील जुम्ममशेख व अलगू चोघरी ही जोडी या
नम!तींच्या एकतेचें प्रतीक मानलें नाते.
हिन्दु की. मुसलमान हा प्रश्न प्रेमचंद यांना नव्हता. जो दुःखी आहे,
कष्टी आहे त्याला सहानुभूति दाखवून जवळ करणें एवढेच त्यांना माहीत
होतें. त्यामुळें हिंदु तेवढा चांगला व पुसलमान तेवढा दुष्ट, असें नेइमा मांडळे
न्नाणारें समीकरण प्रेमचंद यांना कसे पटणार £ दृष्टता किंवा सुष्टता दोन्ही
समाजांत सारख्याच प्रमाणांत असणार, यासाठी हिंदु व मुसलमान यांची
तुलना करून एकमेकांत झगडा माजविण्यांत काय अर्थ १
याच हिन्दु-मुसलमानांच्या प्रश्नावरील प्रेमचंद यांच्या एका लेस्वाबद्दळ
गंभीर प्रसंग निमाण झाला होता. काशी येथील “ आज ? वृत्तपत्रांत
ग्रेमचंदांचा खळबळजनक लेख प्रासिद्ध झाला होता, त्याबद्दल सवे काह्यी-
निवासी हिंदु क्षून्य झाले होते. त्यांपैर्की कोणीतरी प्रेमचंदांकडे आले आधि
म्हणाले, “ आपण जो लेख लिहिला आहे त्यामुळें काशीचे हिंदु फारच नाराज
झाले आहेत. ?' प्रेमचंद शांतपणे घरांत आले तेव्हां शिवरानीदेबीनें पुसे,
८ ह होक मारण्याची धमकी कां देतात ! होकांचें चत्ुत्व मिळविण्यासाठी क्रा
ऱये७ मी तर मजूर आईई
-“"*-५/"- “7-0 “ ४५. "४- “४ “४ “70 . ._»/ ४..४९४_, ४१५ _ /0_ /४४५_ “४७._./”/०७_ “00 “॥७ प
आपण असले लेख लिहितां ! कर्धी सरकारची अवकृपा, कर्धी ननतेची. क्षी
“कोणीतरी हत आहेच.?? यावर प्रेमचंदांनी उत्तर दिल,
£: जनता किंवा सरकार लेखकास आपला गुलाम समजते. पग ठेखक हा
'कोणी एक विदोष प्राणी आहे हॅ त्यांना कळूं द्यात ना. सबोची मजी
“सांभाळून लिहिणारा तो लेखक कसला ! ' सरकार तुरुंगांत टाकील आणि
समाज मारण्याची धमकी देईल म्हणून ठेखकाने आपलें लिहिणे बंद करावें की
'काय !
६ मुळींच नाहीं. लेखन करारबेंच; पण आपल्या प्राणांची कांही चिंता !
रोज रोज झगडा ! ?!
“६ ही दुनियाच संग्रामाची आहे. येथन पळून जाऊन कर्से चालिळ १!
'मैदानांत खर्डे राहिळे पाहिजे. प्रत्येकाचे म्हणणें लेखकास कर्से ऐकू जाईल
'ही ' जी-हुजुरी ' लेखकाच्या हातून होणार नाहीं. ईश्वराच्या मनांत आलें तरच
&ै हिंदु-मुसलमानांतील झगडे' बंद होतील. आणि त्याच वेळीं खरं स्वराज्य
अवतरेल, अञ्या ठिकार्णी दोहरींच्यांत लढत आहे तें स्वराज्य कसले ! गांधी या
युगांतील सर्वांत मोठा पंडित आहे. त्यांच्या मनांत दोहोंच्याबद्दल सारखीच
-सहानुभूति आहे. माणुसर्कास पहिल्याने ते मान देतात. पण मनुष्य हा
मनुष्यच जर राहिला नाहीं तर धम कशासाठी व कुगासारठी १
£ घण गांधी तर सवोना प्रिय वाटतात. ?
६ तुल्य माहीत नाहीं. त्यांना शिव्या देणारेहि लोक आहित. खुद्द गांधींचा
मुलगा मुसलमान झाला आणि कत्तुरभानें रडून आकांत केला, पण गांधीनी
समजावून सांगितर्ळे की, धम बदलला तरी तुझ्या मुलांत कोणता फरक
'पडला १... ”
६: मग काय, तुम्हीहि गांधी बनूं पाहतां ? ?
५: ग्ांधीसुद्धां मनुष्यच आहे. प्रयत्न करतील तर सर्व जण गांधी झोेऊं
शकतील, त्यांच्यांत एकप्रकारची आत्मिक शक्ति आहे. पहिल्यानें ते आपस्या-
सारखेच साघे मनुष्य द्दोते; पण यत्नपू्वक ध्यास घेतल्यामुळे ते महात्मा बनले.
न्ल्यांना कोणीं तसे बनविले नाहीं....
प्रेमचंदांच्या जीवनांतील असे कितीतरी प्रसंग सांगतां येतील कीं, न्यांतून
दया, सद्दानुभूति, अनुकंपा यांचे झरेच्या झरे पाझरतांना दिसतीळ, प्रेम-
मुन्शी प्रेमचंद दट
५९००४ २-€५./”%-४ ./*%४४ ८४.४४” -” २../%./४५//४./४./” ४९० ४.५४ ०४ ७४ २.५४.” २.४७ ७.” के.४ . 0.७७ ४४४७०” >” “८ “०४४ “७7 क्ट
२6 ४०५४
चुदांच्या घरी एकदां चोरी झाली, एक हजार रुपये रोख आणि दीड हजा-
रांचे दागिने चोरीस गेठे. चोराचा पत्ता लागला नाहीं. पण कोण्या स्वयं-
पाक्यार्ने चोरी केली असावी. कांहींच तपास लागत नाहीसे पाहून प्रेमचंद
शिवरानीदेवबीस बोलले, “' दागिन्यांचा शोक तूं करू नकोस. तुझ्या पेटीतच
ते पडून होते. त्याची बायको तरी अंगावर घाळून खूष होईल. होय, रुपये.
गेले याचे दुःख तर आहेच. प्रेसमधील कामगारांचे वेतन द्यावयाचें राहिलें.
होते. पण तेंहि राहूं दे. कोठून ना कोठून तरी त्यांचे पैसेहि दिळे जातील, ??
५६ माझे दीड हजार रुपय गेळे आणि आपणांस थट्टा करावीशी वाटते.
“६ तूं कां दीड हजाराची चिंता करतेस £ माणसाचे जीवन एके दिवशी
केव्हां तरी संपणार आहे.... समज, तीन महिने मी मजुरीच केली नाही.
ही प्रेमचंदांची शिकवण सवंत्र दिसून येते. घनवैभवाचा लोभ कसा तो त्यांना
माहीत नार्ही.
नोकरमाणसाकडून प्रेमचंदांनी कर्धी काम करून घेतलें नाहीं. स्वतःची कामे
स्वतः करण्यांतील आनंद त्यांनीं ओळखला होता. बघ्तती येथे असतांना एका
नोकराजद्दलची हकीगत. तो नोकर आपला बसून राही. कांही काम म्हणून कराव-
याचा नाहीं. शिवरानीदेवी विचारी, हा नोकर कशासाठी ठेवला आहे ! त्याबर
प्रेमचंद उत्तर देत, ““ आपल्या गरजा आपणच पूर्ण केल्या पाहिजेत, आज
नोकर घरी आहे; पण नोकर ठेवण्याची ऐपत नसण्याची पाळी आली म्हणजे !
मग मीच स्वतः नोकर नाहीं का???
अशा प्रकारे नोकर, कामगार, शेतकरी, मुसलमान इत्यादि लोकांकडे
प्रेमचंद सहानुभूतीने पाहत. दीन दुःखितांचा कैवार स्वतः घेत. अधिकारी,
धनलोभी, सत्ताधारी यांची पर्वा त्यांनीं कधींच ठेवली नाहीं. लाचारी तर
त्यांना ठाऊकच नव्हती. प्रेमचंद शिक्षक असतांनाची गोष्ट, शाळेची तपासणी
करण्यासाठीं इन्स्पेक्टर आले होते, छाळेची सवे व्यवस्था त्यांना दाखविण्यांत
आली. आणि शाळेतील मुलें चेंडू खेळण्यासाठी निघून गेल्यावर प्रेमचंद घरी
आले आणि आरामखुर्चीवर पडून बाचचूं लागले. इतक्यांत दारावरून इन्स्पे-
क््टरसाहेजांची मोटार गेली, त्यांनीं अपेक्षा व्यक्त केली की, प्रेमचंद उठून नुसता
नमस्कार तरी करतील पण-प्रेमचंद उठले सुद्धां नाहींत. इन्स्पेक्टरसाहेब गरम
झाले, गाडी थांबवून त्यांनीं चपरासी पाठवला, त्याच्या बोलावण्यावरून प्रेमचंद
२९ घरगुती वातावरणांत प्रेमचैद
॥४४-५४४//१% ८१% “7५ » //७ “0 ४४% शाक ४५ *४०* /४%€ “४0१५ 9/ ७./७.७. ५१४७ “१ “७. ४, ४७.४0 ४ 0 ४४ “९.//४ 7.५ /७./ »५.५/%-/”५ “-८१४*/* 77% /€ वि लि डी
भन
भेटण्यास गेले, इन्स्पेक्टर बोलले, “ तुम्ही फार मगरूर झालांत. अधिकारी
ारावरून गेला असतां उठून सलाम नाहीं केलात ! *' प्रेमचंदांनी ताडकन्
उत्तर दिले, “' मी जॉपयेत शाळेंत होर्तो तोपर्यंत नोकर. त्यानंतर मी माझ्या
घरचा बादशहा आई. ”
घरगुती वातावरणांत प्रेमचंद : ९
मुन्शी प्रेमचंद यांना बालपणापासून घरचे सुख कितीसे होतें ते॑ मधून
मधून आपण पाहिलेच आहे. सावत्र आई. असल्यामुळें प्रेमाचे चार शब्दश
लहानपणी प्रेमचंद यांना कोणीं दिले नाहींत. स्नेहहीन जीवनाचा मार्गच
प्रारंभी तरी त्यांना चालावा लागळा. बालपणींच पहिले लयन झालें तें दुर्देवाने
दोघांनाहि मानवले नाही. प्रेमचंदांनी दुसर लम्न केळे. पत्नी शिवरानीदेवी
हिने मात्र पतीच्या कायोत सवेतोपरी मदत केली. सावत्र आईचा त्वमाव
मोठा विचित्र असल्यामुळें पाहिली -कांहीं वर्षे थोडा त्रास झालाच. परंतु कांहीं
दिवसांनी म्हणजे नोकरी लागल्यानंतर मात्र प्रेमचंदांना स्वतः रचे॑असें घर
लाभले, दगडाविटारनी निमाण केळेली अवाढव्य जागा म्हणजे घर नने.
प्रेमबंदांनीं “ कमभूमि ? कादंबरीत घराची व्याख्या केली आहे; “ जेर्थे
स्वतःच्या विचारांचं राज्य ते आपर्ळ घर. जे आपल्या विचारांना मान देतात
ते आपले नातेबाईक. ?? याप्रमाणे शिवरानीदेवी व मुलें यांच्या सहवासांत
प्रेमचंद रमून जात. मुलांबाळांच्या सहवासांत त्यांना फारच सुख होत असे.
त्यांच्या मुलीचं नांव कमला, सन १९ १८ मध्ये बत्ती येर्थ असतांना प्रेमचंद
यांना पहिला मुलगा झाला, त्यार्चे नांव धुनू ( श्रीपतराय ). मधला मुलगा
मन्नू नांवाचा होता. तो बालळ्पर्णीच निवर्तला, सन १९२२ मध्ये जो मुलगा
झाला त्याचें नांव बनू ( अमृतराय ). या मुलांच्यावर प्रेमचंद यांचे भारी प्रेम
होते. धुनू-भन्नू हा पुकारा नेहर्मी त्यांच्या तोंडी असावयाचा, कचेरीवून आल्या-
वर तास-दीड तास मुलांच्यांत रमल्याखेरीज त्यांना चेन पडत नसे. यायोर्गे
त्यांचे श्रम दूर होत असत. गांबांत कांहीं उत्सवसमारंभ किंबा' खेळ वगैरे
मुन्शी प्रेमचंद ७०
-“*<“€४५€१-.ई४५-/४-०८५-५६-€४५--/५-४५-/४%४४-०४ ४०४४-०० ४.४४ ४-४” ४-” 2.0 “7 ८ -शी” “र "टा ४*५५४८९४-०/४५/१"-/१४/
७७./४४./”१% ”%/* “४५४१७.” ७५४१५ ६-/" ४ “7९.१ /१* /* “7
असले कीं प्रेमचंद मुलांना घेऊन पहावयास जात. स्वतः मुलांना लिहावयास-
बांचावयास शिकविण्यांत त्यांना मोठा आनंद वाटे.
एके दिवशींची गोष्ट, शिवरानीदेवी स्वर्यपाकांत गुंतली होती. तिच्याजवळ
छोटा बच्चा बन्नू रडत होता. लहान मुलीने समजावण्यासाठी त्याला उचलून
घेतळे, तों दोघेहि जमिनीवर पडले, मुलाच्या डोक्यास जखम झाली. चार
दिवसपर्यंत तो पडून हता. शिवरानीदेवीस त्याच्याजवळ बसून रहार्वे लागत
होते. त्यामुळें स्वयंपाकाचे काम स्वतः प्रेमचंद करीत. पहांटे साडेचार वाजतां
ते उठत, कांहीं लिहि्णे-बाचणें करीत, धुन्नूला शिकवीत व मग इकडचे
तिकडचे करून शाळेत जात. मुलांच्या आजारांत कित्येक वेळां प्रेमचंद स्वतः
सेवा करीत बसत. त्यांच्या औओषधपाण्याची व्यवस्था ते र्वतः पाहत. सेवाघम
हा प्रेमचंद यांच्या जीवनाचा मूलमंत्र होता. बन्नूवर त्यांचें जिवापाड प्रेत
होते. १९२४ मर्ध्ये तो साडेतीन वष'चा झाला. प्रेमचंद एके दिवर्शी बाजारांत
एक खाट आणण्यासाठी निघाले. बरोबर बॅन्नू-धुन्यू होतेच, गर्दीत छोटा
नन्नू हरवला, प्रेमचंद गडञअडून गेळे, प्रत्यक माणसाजवळ छोट्या मुलाबद्दल
विचारपूस करू लागले. घाबरून धुन्नूस बोलले, “' जा बेटा, घरी जाऊन
पहा. आईला सांग. “ धुन्नूहि रडूं लागला आणि घरीं निघून गेला.
थोडया वेळाने बन्नूला घेऊन स्वारी घरी आली. पत्नीने विचारले, “' कोठे
हरवला होता ? *
६ घोरगा सांपडला नसता तर मी कसचा जिवंत राहता. ? आम्हीं
दुकानांत चढला तो ह्या (हेंडत हिंडत दुकानाच्या मागच्या बाजूस गेला; आणि
तेथे रडून रडून आकांत करीत होता. इकडे मी तर हवालदील होऊन गेलो,
तुळा तोंड कर्से दाखवूं असे झाले. आज जर हा न मिळता तर घरी मी
न येता. !?
“६ मृग सांपडला कसा ! ”
“६ मी चारहि दिशांना पाहत होतों तों कोदून तरी रडण्याचा आवाज'
थेत होता. तेथें मी चटकन् गेलो. आणि त्याला उचलून घेतलें. चित्तांतील:
अशांति त्या वेळीं मिटली,
यानंतर लहान मुलांना घेऊन प्रेमचंद बाजारांत सहसा गेले नाहीत.
मुकांच्यावर कर्षी कर्घी प्रेमचंद रागादतहि असत. धुनू ल्हान असतांनाची
७१ घरगुती वातावरणांत प्रेमचंद
मोष्ठ, एक लेख पूर्ण करून प्रेमचंद यांनीं टेबलावर ठेवला होता. कोठून तरी
वुक्षू आला आणि तो लेख त्याने टरकावून टाकला. दौत टाक घेऊन त्यानें
स्वतः त्या कागदावर लेखन सुरू केलें. प्रेमचंदांनी खोलींत प्रवेश केला तो
स्वारीचे कृत्य त्यांच्या ध्यानांत आलें. रागाने त्याला एक चापटी मारून
त्याच्या अंगावर ओरडले, “' चल नीघ येथन. नाहीं तर मारीन आणखी. '?
धुन्नषची किंकाळी शिवरानीदेवीच्या कानावर आली. तिनें प्रेमचंदांच्या बहिणीला
काय झालें हॅ पाहण्यास सांगितर्ठे, तिनें पाहिळें तो प्रेमचंद रागांतच होते
बुजूला मांडीवर घेत ती बोलढी, “ कां पोराला मारले १ ) प्रेमचंदांनी उत्तर
दिले, “' पहा तर, माझा लेख बेट्यानें फाडून टाकला. आज मला हा
पाठवावयाचा होता. दुष्ट पोराने तो फाडून टाकला. मी काय आतां
कृपाळ पाठवूं ! !
“ मूळच आहे. समजून थोडेंच फाडळें ! तूं पण कांहीं कमी सैतान
नव्हतास,
५६ पी लेख थोडेच फाडीत होतो १ ”'
६ ळेख लिहिणारा होता कोण? पण रामूचा कान तूं कापला होतास.
आठवर्ते का ? लेख फाडण्यापेक्षांहि हें काम भयंकर होतें. '' भेमचंदांना
बहिणीच्या माऱ्यापुर्ढे गप्प बसावें लागले
मुलांना नीट वळण लागावे म्हणून प्रेमचंद अतिशय जपत असत. १९३५
सालची गोष्ट आहे. दोनहि मुलें प्रयाग येथें शिकण्यासाठी निघालीं होतीं
प्रमचंद, शिवरानीदेवी व इतर कांदहो. माणसे पोंचविण्यासाठीं दारांत उभी
होतीं. बनूनें सवीना नमस्कार केला आणि धुनुर्ने मात्र तसेच गाडीत बसण्याचे
थाडस केलें. मुलें निघून गेलीं तेव्हां प्रेमचंद उदास होऊन बोलले, “ धुनू फार
शिष्ट झाला. त्याला ना कोणाचं प्रेम ना लोम! !'
६ कय झालें ? '? शिवरानीनें विचारल.
“ तूं पाहिळें नाहींस ! आपल्याला नमस्कार सुद्धा केळा नाहीं. जसें कांदीं
त्वाचे-आपले नातंच नाहीं.
£< कुलिजमर्ध्ये शिकतो ना ! ''
6 म्हणून काय झालं ! इंग्रजी शिकल्यावर एवढी ऐट नको यावयास.
कोणी इंग्रय मुलगा घरून निघता तर असे थोर्डेंच वागता. सर्वांवर त्याचे
मुन्शी प्रेमचंद 9२
मनापावून प्रेम अस्ते. बापाचे चुंबन घेणें त्यांच्यांत फार शिष्टपणार्चें समजर्ळ
जातें. त्यांना आपण हृदयहन समजता, पण वस्तुतः तशी पारोह्यिति नाही, ”
:£६ अतूं द्या, मूलच आहे. ”
: जाऊं द्या, हें मला नाही पटायचे, मला वाईट वाटते की, माणसाढा!
आपल्या कर्तव्याचा विसर कां पडावा १? आमच्या मनांतील प्रेमास त्यानें
ठोकर दिली आहि. त्नेहाला धक्का दिला आहे.”
याप्रमाणे मुन्शी प्रेमचंद स्वतःच्याच मुलाची एवढी [विता करीत असत
असें नव्हे. लखनौस असतांना रात्रींची स्वथंपाकीणबाई आली नाहीं. सकाळीं
आली तेव्हां तिळा विचारल्यावर तिर्ने सांगितळे, “' कालपासून माझा मुलगा
हरवला आहे. साऱ्प़ा शहरांत धुंडून आलें पण तपास नाहीं लागत, कोणी
सांगतात कीं, पळून गेला आहे. प्रेमर्चंद यांच्या कानावर ही गोष्ट गेल्यावर ते
रागावतच बाहेर आले अणि म्हणाले,
६ अशा नादान मुठाची एवढी चिंता कशाला ! आपडी विघधबा आई
आपल्यासाठी कशी मरत असते हेंहि त्या बदमाशाला समजू नये ! तूं कशाळा
चौकशी करतेस ! कमव, खा, आणि स्वस्थ पडून रहा. तुळा ता कर्धीच सुख
देणार नाहीं. त्रास देण्यासाठींच ता जन्मास आला आहे.??
£ सरकार, आईची कळकळ अ'हे, कांदी मानीत नाही. काळ रात्रीपासून
तोंडांत पाणी सुद्धां नही, क'ही खाण्याची इच्छा होत नहीं.
६ अर्से कां कातेस ! तो स्वतःच्या खुशीने गेला आहे. विनाकारण तूं
त्रास भोगतेस !
५ आई आहे ही. मुलांची काळजी वाटणारच तिला, ?' शिवरानी बोलली.
यानंतर पतिपत्नींत कांहीं बातचीत झाली, आईच्या प्रेमावर थोडा वाद
झाळा. स्वयंपार्क णबराईर्चे काम थोडे वेगळेंव होते. तिला माहीत होते की,
बाबूजींच्य़ा कवेरीत ज्योतिष जाणणारा कोणी एक भला मनुष्य आहे. मुळा-
संर्ी त्याला विचारावे, असें म्हातार्रांच्या मतांत आलें, प्रमचंदांनी आईचं
हृदय पुरेपूर ओळखळें होते. देवालाहि न मानणारे प्रेमचंद त्या वृद्धेस घेऊन
ज्योतिषाच्या घरी गडे, पंडिताळा सत्र गोष्टी समजावून सांगितल्या. ज्योतिषी-
बोवाचीा खूप तारीफ सुद्धा त्यांनीं केली . ञ्योतिषार्ने सांगितर्ठे, दोनतीन दिवसांत
मुलगा येईल. प्रेमचेदांनीं त्याच्यापु्टे दोन आगे ठेवले ब ते घरी येण्यास
99३ घरगुती वातावरणांत प्रेमचंद
ह
न“ ७७7००” १०५०७”... बये 009७७ ककल ककल ट्क -“**%%-> 0-.
“कक कळला, "४४७ 00५७७५॥/ कक शा आशि. कळ
निघाले, तिसऱ्या दिवर्शी मुलगा घरी आल्यावर म्हातारांचा आनंद जगांत
मावेना,
प्रेमचंद यांच्या प्रतिभेने मानवी प्रेमाचे सर्व प्रकार हेरले होते व कांडींचा
अनुमव स्वतः घेतला होता. मातृूप्रमाचा दीर्ध अनुभव त्यांना स्वतःला नव्हता
तरी या प्रेमाची अदूभुत शक्ति मात्र त्यांनी ओळखली होती, कोणीं एका
त्यांच्या मित्राने म्हटलें होतें कीं, प्रेमचंदांची शोवटची कादंभरी जर कोणती असेळ
तर ती गॉकीप्रमार्णे ' आई ' हीच असणार ! प्रेमचंदांचे परममित्र व हिन्दी-
तील विख्यात लेखक जैनेन्द्रकुमार यांच्या आईच्या निधनाची वार्ता आल्या-
जरोजर प्रेमचंद एकदम उदास बनले. त्यांचे डोळे सजल झाले व त्यांच्या
तोंडून उद्गार निघाळे, ““ आज जैनेन्द्र एकटा झाला. त्याची आई मरण
यावली. .. आई त्याचें सर्वस्व होतें. जेनेन्द्राला तीहि प्राणापलीकडे जपत असे.
ती सभ्य आणि दिलदार होती. जेनेन्द्र एवढा मोठा झाला याचें सारें श्रेय
त्या निचारीस द्यावयास पाहिजे, ...अजून वयहि झालें नव्ह्ते. . . म्हणून
माझा इश्वरावर विश्वास बसत नार्ही. खराखुरा ईश्वर जगांत असेल तर तो
दुःखितांनाच दुःख कां देईल £ आणि तरीहि लोक त्याला दयाळू पिता
म्हणतात, त्याला दया कोठून येणार ! चांगले लोक रडूं लागले की त्याला
आनंद होत असला पाहिजे. आपल्याच आधश्रितांना दुःख देणारा ईश्वर
कसा १, ..?? प्रेमचंदांच्या मनांतील खळबळ सहज ध्यानांत येण्यासारखी आहे.
शिवरानीदेवीचा उल्लेख मार्गे अनेक वेळां आला आहि. प्रेमचंद यांना
सव दृष्टींनी शोभून दिसेल अशी ही पत्नी होती, सामाजिक, राजकीय,
घामिक, साहित्यिक वगैरे स4॑ विषयांवर ती चर्चा करीत असे. प्रेमचंदांच्या
इरएक कामांत तिर्चे साह्य असे. तिनें कांहीं कथाहि लिहिल्या आहेत. तिची
पहिली कथा ' साहस ? या नांवाची प्रासेद्ध झाली, तो अंक व संपादकांर्चे
उत्तजनपर पत्र स्वतः प्रेमचंद धेऊन आले व त्यांनीं शिवरानीस खूप चिडविळे,
“६ आतां तूं लेखिकाहि बनलीस तर. पहा या ' चॉद ? मासिकांत तुझी कथा
छापून आली आहे. पुरुषांच्यावर फारच कडक टीका केली आहेस तूं. ”
आानंतर शिवबरानीदेवीर्ने अनेक उत्तम उत्तम कथा हिन्दी भाषत लिहिल्या
आहेत.
शिवरानी राजकारणांतह्रि स्वतः भाग घेत असे. प्रेमर्चद ज्या कार्यांचा पुर-
खुनशी प्रेमचंद ७७
“0-० ४४५४ ४ १५७७०५ ००८००” ७ कणी > ब.) ऱ च्ट | व ४-४ क कट ३. 0८८७४ ०७.” ७७४ कळ
स्कार करीत तें ती स्वतः आचरून दाखवीत असे. कॉंग्रेसमध्ये अनेक प्रकारची
कार्गे शिवरानीदेवी करी, नवऱ्याच्या अगोदर आपण कांहीं काय करावे
न॒ तुरुंगांत नावे, ही तिची इच्छा असल्यामुळें ती आपल्या कामाची फारशी
बाच्यता घरी करीत नसे. दिवसांतून दोनतीन सभांना ती उपस्थित राहून.
लोकांना उत्तेजन देत असे. सन १९ ३ ० सालांतील प्रर्सग. मिठाचा कायदा
मोडण्यासाठी महा'मा गांवी दांडी-यात्रेस निघाले होते. प्रेमचंद या वेळी
ढस्वनौस होते. सबंघ शहरांत गडबड उडून गेली. प्रेमचंदांच्या घरासमोरच
अमीनुहोला पार्क होती. तेथ स्वयंसवक येऊन बेकायदा मीठ बनवीत असत'
आणि त्यांना पोलीस पकड्टन नेत असत. शिवरानी त्या स्वयंसेवकांचे कोतुक.
करी. त्यांच्या गळ्यांत हार अपण करी. स्वयंसेवक जेव्हां त्या माउडीच्या
पायाशी लागत तेव्हां तिचे डोळे भरून येत. ती त्यांना आशीरवीद देत असे.
२० जुले रोजी त्वरूपरानी नेहरू लखनौस आली. जवाहरलाल तुरुगांतच
गेले होते. त्यांची आई स्वरूपरानी. हिच्या माषणांतील तेज कय वर्णन करावें £
मुडदय़ांत सुद्धां प्राण निर्माण होऊन तो लढायला सिद्ध व्हावा ! स्वरूपरानी:
नेहरू सांगतील त्याप्रमाणे कांही स्त्रियांनी वागण्याचे ठरविले. शिवरानीर्ने पण
आपलें नांब त्या यादींत दिले. आणि काम सुरू झाले. सन १९३१ मधील:
नोव्हेभरची ११ तारीख होती. प्रेमचंद तीन दिवसांपूर्वीच बनारस येथे गेले होते.
सकाळीं आठ वाजतां कॉंग्रेस कचेरीतून शिवरानीस बोलावर्णे आलें. विदेशी
कापडाविरुद्ध उघड प्रचार करण्यासाठी आठ-दहा स्त्रियाच्याबरोबर जाण्याचे
काम होतें. शिवरानीदेवीनें ते पत्करले व पिकेटिंगला प्रारम झाला. पंघरा-
बीस मिनिटांत पोलीस आले. त्यांनीं सर्वांना अटक केली. महात्मा गांर्घाच्या
खयजयकारात शिवरानीदेवी पोलिसांच्या स्वाधीन झाली. साऱ्या जणी मोठ्या
आवाजांत राष्ट्रगीत म्हणत होत्या. शिवरानीदेवीच्या मोटारींत जो शिपाई
होता त्याच्या डोळ्यांतून अश्न ओघळत होते. त्याला या प्रकाराबद्दल फार
बुभःख झालें होते. तो बोलला, ““ माताजी, मला येथे महिन्यास बावीस रुपये
मिळतात. दुसरीकडे कोणी दहा जरी दिलें तरी मी ही पापाची नोकरी सोडून
देईन. !' त्यावर शिवरानीनें त्याची समजूत घातली. कर्तव्यपालन करून
बेंदिवानांना प्रेमार्ने वागविण्यास तिनें सांगितलें. शिवरानीदेवी तुरंगांत थोडी
विव्हळ होऊन गेठी, मुर्े घरी एकर्टी आहेत. प्रेमचंदजी बनारसला, मुळें
७१५ घरगुती वातावरणांत प्रेमचंद
८१/४४/१५५४” ४७४१५” “€ ४१-४0 च ७. £- ४ ॥ 4 ४. "६ *-/४-९४--४-/%४-८ ४. २८-००” ५. ६८४.” ९५/१६/"९.” -/..€४.”९ “>” ४.५ ४०” 0५ "४४४५४४ ७.० ४.०४ ४७४ ४८४०१.१५./४४ ४४.४४.” »“१- “0
रात्रीं कुणाच्या तोंडाकडे पाइतील ! त्यांच्या जेवण्याखाण्याचे काय होणार !
पण त्या वीरमतीने आपलें मन सावरले
दुसऱ्या दिवशीं प्रेमचंद घरी आले, पत्नी तुर॑ंगांत गेल्यार्चे ब्यांना आधींच
समजलें होते. तुरुंगांत भेटण्यासाठी गेले तो. शिवरानीस पाहतांच त्यांना मड-
भहून आलें. सजल नेत्रांनी तिच्याकडे पाहत ते उद्गारले, “ अच्छा, तूं
बिंकलेंस तर ! ?
: हे, मी येथें आलें. आपण सवे ठीकना ! ?'
एकमेकांनी एकमेकांची विचारपूस केली. कथाकादंबऱ्यांतून ज्या एका
तत्त्वाचा प्रसार प्रेमचंद करीत होते तेव तत्त्व पत्नीने आचरणांत आणून
दाखविलेळें पाहून प्रेमचंदांना धन्यता वाटली. मुदतीच्या आधीच एक दिवस
शिवरानीदेवीची सुटका झाली. दौडत ती घरी आल्यावर तिनें पतीच्या पायांना
स्पर्श करून प्रणाम केला. शिवरानीची प्रकृति खराब झाली होती. सात पॉड
बजन कमी झाल्याकारणाने शिवरानी कृश दिसत होती.
दुसऱ्या दिवर्शींची गोष्ट, प्रेमचंद यांच्या खोलींत शिवरानी गेली तौ
स्वतःच्या फोटोस एक उत्तमपैकी हार घातलेला तिला दिसला. तिनें विचारलें,
येथें माझा फोटो कशासाठी £ लोक थेतात जातात, त्यांच्यासमोर. ..काढून
टाका या ठिकाणाहून... ?
“ काढून टाकण्यासाठी का लावला आहे इर्थ ! ?
६ पण इर्थ बरा नाहीं दिसत. कोणीं पाहिळें तर !
:: पाहिळें तर पाहिलें. तो कांहीं दडवून ठेवण्यासाठी नाहीं लावला !
याच विषयावर पतिपत्नींच्यामर्ध्ये पुष्कळ वेळ चर्चा झाली. प्रेमचंद
पत्नीच्या मनास अतिशय जपत, त्याप्रमार्णे शिवरानीदेबीहि पतीची काळजी
मनापासून घेत असे. त्यांच्या तब्येतीकडे ती जाणीवपूर्वक लक्ष देई. प्रेमचंद फार
काप करूं लागले कीं तिळा काळजी वाटे. १९३५ चा सुमार, प्रेमचंद यांच्या
अंगांत बराच ताप होता. त्यांच्या पोटांत दूध सुद्धां गेळें नव्हते. पण अशाहि
अवर्श्थेत प्रेमचंद लिहावयास बसले, पत्नीने विचारलें, “' काय, करतां हँ ! !"
“९ ६ हूस !सार्ठी लेख लिहितोय्. कालच जावयास पाहिजे होता. ?
“ दा | काम फार पडलें म्हणून आपणांस ताप आला. आज खार्गेपिर्णे
खदधां नाहीं. पुरें झां डिहिणे
मुन्शी प्रेमचंद ७६
“६ थोडा वेळच लिहितो, ..जुळारी आले आहेत प्रेसमधून, ?
“ मी एक सेकंदह्दि लिहूं देगार नाहीं, कलम मोडून टाकीन. उठा पाहूं. ?'
£ अग पण, ' हंस ? छापला कसा जाईल मग ! ??
स्वतःच्या आजारपणांतहि प्रेमचंदांना ' हंस ' आणि * जागरण ? यांची
चिंता लागून राहिलेली असे. ' हंस ' साठीं त्यांनी फार कष्ट घेतले. रागावले म्हणजे
ते शिवरानीस म्हणत, “' व्यर्थ संतापतेस माझ्या * इंस ? ब * जागरण वर !
सावत्र आई आहेस का त्यांची १ ?
प्रमचंद यांनी. निर्मिलेल्या साहित्याची किंमत शिवरानीदेबीस नाँटिपर्णे
समजली होती. प्रपंचाचे भागवून तिर्न अनेक वेळां त्यांच्या लेखनास आर्थिक
साह्मह्रि केलें. प्रेमचंद यांच्या लिखाणावर ती कर्धी क्षी चर्चाहि करी.
शुणग्राहकतेचा मोठा गुण तिच्या अंगी वसत होता, “गोदान? ही
प्रेमचंदांची सर्वोत्तम कादंबरी छापून झाल्यावर पहेली प्रत घरी आली.
शिवरानी पुनः ती वाचीत होती. प्रेमचंद आपल्या खोलींत एकटेच होते.
होरीरामाच्या दुःखद मृत्यूची हकीगत वाचतांना शिवरानीस रड्टूं कोसळले.
शेजारच्या खोलीतून चकित होऊन प्रेमचंद काय झालें म्हणून पाहण्यासाठी
आलि. ' गोदान 'चा शेवटचा भाग शिवरानीसमोर पडलेला होता. ती हातांत
घेऊन प्रेमचंद बोलले,
“ किती वेडी अ'हेस तूं. कल्यत गोष्टी बाचून रडतेस तूं! ”
“£ आयग मिचाऱ्या होरीला कां मारळें ! त्या बिचाऱ्या झुनियेढा विधवा
बनवर्ठेत, ?)
भोळ्या शिवरानीची समजूत करतां करतां प्रेमचंदांना पुरेवाट झाढी,
प्रेमचंद यांच्या कुटुंमास पेसा कधींच पुरा पडला नाहीं. याला जीं अनेक
- कारणे आहेत त्यांतील मुख्य कारण म्हणजे प्रेमचंद यांचा भोळसर स्वभाव,
अनाठायी दया'हि त्यांच्या हातून क्षी दाखविढठी जात अते. कोणी गरजू येत
असे. आपली अडचण प्रेमचंदांना समजावून सांगे आणि तें सव प्रेमचंदांना
खरें वाटे, शिवरानीदेवीस आग्रहाने पैसे देण्यास सांगत, असे कितीतरी
वैसे प्रेमचंद-कुटुबांतून लोकांनीं नेळे असावेत, कानपुरास असतांनाची गो.
एक मदाय प्रेमचंद यांच्या घरी आठे व बोलले, “' रेल्वेत माझा कोट
चोरीस गेला. त्यामध्ये माझे सवे पैसे होते. बायकोमुलांना आणण्यासाठी
७७ घरगुती वातावरणांत प्रेमचंद
७, "७.४४ ..४ ७ ८४४९... /”४ 0.” ७७४२.»
सासुएबाडीस जात होतो. मला कांदी रुगये दयाल का !' आयण मदत
कराल का १ ??
प्रेमचंदांनी शिवरानीदेवीस रुपये देण्यास सांगितळें, नाहीं नाहीं म्हणतच
तिनें त्याला कते तरी पंधरा रुपये दिले, पांच-सहा दिवसांदी हे सद्गहस्य
आपल्या बायकोमुलांसह प्रेमचंद यांच्या घरी येऊन उतरले. भल्या माणसाचा
पाहुणचार त्यांना घ्यावयाचा होता. वास रुपयांची नवी मागणीहि त्यांनीं केली .
पुन्हा पंधरा रुपये त्यांना देण्यांत आले. पैसे परत येण्याची चिन्हें कांहींच
नव्हतीं, शेवटी शिवरानीदेबी बोलली, “' आज प्रतिज्ञा करते कीं, कोणास
उधार-उसने पैसे म्हणन देणार नाहीं. !? पण देणारानें ती प्रतिज्ञा पाळली
पाहिजेना ! प्रेमचंदांना सवीच्या अडचणी खऱ्या वाटत
ग्वाल्हेरहून एक पत्र आलें. शेभर रुपये आयण पाठविले तर दरमहा श॑ भर
रूपयांची नोकरी मळा मिळणार आहे. मला रक्कम अगोदर द्यावयाची आहे.
प्रेमचंदांचा आग्रह पडला कीं, बिचाऱ्यास पैसे द्यावत. पन्नास-पन्नासच्या
इप्त्यांनीं तो सहज रकम फेडील अशी त्यांची कल्पना, दुसऱ्या दिवर्शी शंभर
रूपये पाठवून देण्यांत आले. कांही दिवसांनीं पैसे मागणारे ग्रहस्थ त्वतः
प्रेमचंदांच्या घर्त आले आगि बोलले, “' रजा घेऊन मुद्दाम आपल्या दरनास-
आर्लो आहे. लहानपर्णी आई वारली, वडिलांनी दुसर लयन केळे आणि
मग माझे हाल सुरू झाले, मी आतां हेच आपले घर समजतो. *' प्रेम-
चैदांना या अनाथाची दया आली, स्वतः याच आपत्तीतून ते गेले होते. कांही
दिवसांनीं स्वारी आणखी पन्नास रुपये घेऊन निघून गेली, कांहीं दिवसांनी
या ग्रहूस्थानें लग्नाचा थाट सांडला, प्रेमचंदांना बोलावणे आलं, आपल्या नव्या
सुनेसाठीं सोन्याच्या चार बांगड्या, गळ्यांतील साखळी, कर्णफूळ आणि
दोन-तीन रेशमी साड्या व बरोबर शभर रुपये घेऊन प्रेमचंद स्वतः पाट-
ण्यास गेले. त्याचें लम झाल्यानंतर त्याच्या शोधास पोलीस आले, हा फरारी
झालेला मनुष्य होता. असा हा प्रेमचंदांचा व्यवहार !
शिवरानी तुरुंगांत असतांना बॅंकेतून प्रेमचंदांनी दोनशे रुपये असेच एका
महाशयास देऊन टाकळे. तुरुंगांतून सुटून आल्यावर शिवरानीनें जाब विचा-
रला, प्रेमचंद बोलले, “' एक सज्जन आले होते. देऊन टाकले, '? अशा
कित्येक सज्जनांनीं प्रेमचंदांना ठबाडले असेल,
मुन्शी प्रेमचंद ऊ्ट
>“"४/€"४४” >“ “१ “1६.” १" “' “ -** -*-./ ५//४८”/ “ १. <“€*१-//५६५*१*/%-/४०//*-४४४७/१५/९६-”€ -“€६/४१.”९६./५.९.»”४.//४// ५५/१५/९४९० 7४.५८” <»५-४-//४-/0
प्रेमचंदांच्या स्वमावाचे अनेक पैलू त्यांच्या व्यावह्मरिक जीवनांत आपण
पाहिले, घरगुती वातावरणांत प्रेमचंद ही व्यक्ति कशी होती याची यथाथ
-कल्पना आतां. आली असेल, मुलांशी, नोकरमाणसांशीं, घायकोशीं त्यांचा
व्यवहार कसा असे हेहि नीट ध्यानांत येण्यास हरकत नसावी. आयण कोणी
शिकलेले, प्रतिष्ठित, मोठें आहोंत हा वृथाभाव प्रेमचंद यांच्या मनांत कधीच
निमोण झाला नाहीं. आपल्या खेडेगांबी असतांना तर ते इतके साधे वागत
की, खडुतांना वाटे, हा आपल्यापैकींच एक. दरबाजापुदढचें झाडून काढण्यास
काम स्वतः प्रेमचंद करीत. दाराशी छोट्या लोकांना 'गोळा करून माती
जमवीत, पार्ने गोळा करीत आणि चिखल करून पोरांना खेळ शिकवीत.
दुपारी चारनंतर गांबांतील शेतकरी त्यांच्यामोंवती जमत तेव्हां त्यांच्यायी
प्रेमचंद मनसोक्तपर्णे गप्पागोष्टी करीत असत. नवे नवे कायदे त्यांना समजा-
वून सांगत, त्यांचीं भांडणे मिटवीत., सर्वोच्यामरोवर ते स्वतःच किसान
बनून जात. त्यांची दुःखे पाहून प्रेमचंद नेहमी विव्हळ होळ असत. दोत-
कऱ्यांच्या सवे प्रश्नांचा विचार ते स्वतः करीत.
प्रेमचंदांच्या जीवनांत शिवरानीदेवीस मोठेच त्यान आहे. यर-अपयरा,
सुख-दुःख, या सर्वात तिनें सद्दमाग घेऊन दिवस काढले. एखाद्या लहान
मुलाला सांभाळावे तशी तिनें प्रेमचंदांची जमणूक केली. स्वतःस लोकरी कपडे
शिवण्यासाठीं दिलेले पैसे जेव्हां प्रेमचंदांनी प्रेसमधील कामगारांना वांटून टाकळे
तेव्हां शिवरानींदेवी नाराज झाली, पण प्रेमचंदांनी समजूत केळी, “' रानी, दिवस-
भर जे प्रेसमध्ये राबून मेदनत करतात आणि भुकेले राहतात त्यांना सोडून
मो गरम बूट वापरू ! ?' शिवरानी चिडून बोलली, “' तुमच्या प्रेतमधील
कामगारांचा पत्कर मी नाहीं घेतला.?? त्यावर प्रेमचंद संथपणानें बोलले, '““ पण
तूं माझा तर पत्कर घेतला आहेस ना ! माझें तर सर्व तुझेच आहे. तूं-मी
एकाच नावेंतील यात्रेकरू आहोंत, दिवरानी स्तव्ध राहिली. दोवटीं प्रेमचंद
यांच्या कपड्यांकडे तिने स्वतः लक्ष दिलें व त्यांच्या भावाकडून कपड्यांची
व्यवस्था केली. मोठ्या मुश््किळीने प्रेमचंदांनी सूट अंगावर घातला आणि
शशिवरानीदेबांपाशीं ते आले व बोलले, “' मी तुला सलाम करतों. र्मी. तुझा
हुकूम आज मानला आहे.?? शिवरानीदेवी थट्टेमुळे गोंधळली पण आशीवाद
'देत बोलली, “' इधर तुम्हांठा सुखी ठेवो आणि दरवर्षी नवे कपडे मिळोत.
9९९ ८६ शै लट गयी 3१9?
-“ ६” / ९
27२” १*/« क ही क २ >-*<८ -: “४६ ४१ 7९.८ * 2९. ४. १.४९” ४१...” ४.» ४.” ४५५९४ ४४४५४४.” ४.४४ ४४७ ४७४ ३४४४४७४
,««पण आपण मला सलाम कां केलांत ! वय, बुद्दि, नाते, पदवी या सर्ब
बाबतीत मी लहान, मग आपण असे कां केलें ! त्यावर प्रेमचंदांनी उत्तर दिळें
“६ बय, विद्वत्ता, पदवी या गोष्टींना महत्त्व न देतां मी फक्त हृदयाकडे पाहतो.
तुझे हृदय आईचे आहे. ज्याप्रमार्ण आई. आपल्या मुलांना खाऊपेऊं घाढून
खूष करते त्याप्रमार्णे तूंहि माझी निगा राखतेस, यासाठी मीं तुला प्रणाम केळा ! २?
असे ह प्रेमचंदांचें आनंदी, मोकळें, सार्धे घरगुती जीवन. जाड्याभरड्या
कपड्यांत व ओबडधोबड शरीरांत अत्यंत प्रगत झाळेला आत्मा निवास करीत
होता. मुलांबाळांनीं गजबजलेल्या घरांत प्रेमचंदांना स्वर्ग वाटे, या सुखथमम
वातावरणांत त्यांनी सेवाभाव पत्करून सर्वोना सुखविलें. शरीराचे चोचळे तर
त्यांनी केव्हांच केले नाहींत. टेखक ? नांवाच्या कथेत ते लिहितात, “' साहित्य-
सेवा आगि स्थूलता यांत विरोध आहे. कोणी साहित्यसवक जाडाजुडा
मनुष्य दिसला की समजावे, त्याच्यांत माधुये नाहीं, कोवळीक नाहीं, हृदय
नाहीं. दिव्याचे काम जळत राहूर्ण हँ आहे. दिवा परिपूर्ण भरलेला आहे याचा
अर्थ असा कीं, तो जळलेला नाहीं, २ प्रेमचंद तर नित्य दुसऱ्यासाठी, पीडितां-
साठीं तिळतिळ जळत होते. प्रसन्न अश्या घरगुती वातावरणांत प्रेमचद
यांना हा सेवाभाव साथे करून दाखवितां आला. म्हणून एके ठिकाणी
ग्रमचंद यांनी लिहिले आहे, '' घर ही वस्तु किती पवित्र, कोमल आणि
मनोहर स्मृति जाग्रत करीत असते. घर प्रीतीचे क्रीडाकुंज आहे. प्रेमानें
दीघ तपश्चर्या करून घर हे वरदान प्रास करून घेतले आहे. ”
% ७ ७
“में लुट गयी ! ” : १५
कादंबरी-लेखनांत आतां प्रेमचंद यांचा दात धरणारा दुसरा ग्रहस्थ कोणी
-नव्हता. प्रगातिद्यील लेखक संघाच्या अध्यक्षीय भाषणाने आणि * गोदान
कादंभरीनें त्यांना विपुल कीर्ति प्राप्त करून दिली. उर्दू आणि हिंदी भाषांतीछ
सर्वश्रेष्ठ कळाकार म्हणून त्यांची गणना सर्वत्र होऊ ढागळी होती. उदू भाषेवर
'* फितरत निगार ? आगि हिन्दी मार्घेत ' उपन्यास-सम्राट ? बा पदव्या त्यांना
मुन्शी प्रेमचंद ८ळ
प्रास झाल्या. त्यांच्या कथांचे अनुवाद गुजराथी, बंगाली, मराठी इत्यादि
देशी भाषांतून होऊ लागले, इंग्रजी आगि जपानी भाषांतहि कांहीं कथाचे
अनुवाद झालेळे होते. प्रेमचंदांच्या साहित्यास आज रशियांतहि फार मोठा
मान आहे. ' प्रेमाश्रम ' आदि कादंबऱ्या रारीयत भार्षेतहि अग्रगण्य ठरल्या
आहेत. या प्रकारे मुन्शी प्रेमचंद यांना त्यांच्या आयुष्यांतच कोर्वि प्राप्त
ज्ञाठेली होती. परंतु कीर्तीच्या पाठीमागें ते कधींच नव्हते. प्रतिकूल
परिस्थितीशी झुंज खेळत खेळत प्रेमचंद आपला रस्ता सुधारत होते आणि
कीर्ति त्यांच्यापाठोपाठ 'घांवत येत होती. लेखकाचे कर्तव्य सांगतांन! प्रेमचंद.
यांनी लिहिळें आहे कीं, “' सच्च्या दिलाने आपण समाजाची सेवा करूं तर
मान, प्रतिष्ठा, आगि प्रसिद्धि आपल्या पायाशीं लोळण घेत येईल. पण:
मान-प्रातिष्ठा योची फिकीर आपण कां करावी ! त्यांची प्रात्ते जर झाली
नाहीं तर आपण निराश तरी कां व्हाबें १ सेवेंत जा आत्मिक आनंद आहे
तोच आपला सवोत्तम पुरस्कार आहे. ?'
अनेक आपत्तीशीं तॉड' देत देत प्रेमचंद यांनीं जीवनसंग्राम कसा जिंकला
हॅ आपण पाहिठेंच आहे. या संग्रामांतील आतां शेवटची लढाई चाढू होती.
मुंबईहून आल्य्रापातून प्रमचंद यांची प्रकृति ढांसळली ती पुनः सुधारलीच
नाहीं. सन १९३६ मधील जूतच्या २५ व्या तारखेस त्यांना मध्यरा्त्रीस
रक्ताची उलटी झाली. तेव्हांपासून झोप कशी ती प्रेमचंद यांना माहीत नाहीं.
पित्ताच्या खराब्रीमुळें त्रास होतो, असा डॉक्टरांचा अभिप्राय पडला. असे.
कित्येक रोगी मीं बरे केडे अहित, अर्से आश्वासनहि त्यांनीं दिलें. पण प्रेमचंद
यांची प्रकृति दिवसेंदिवस निघडतच चालली. सरस्त्यांतून चालतांना पाय
थरथरू लागत आणि डोळ्यांना अंधारी येई. पतीची ही द्या पाहून
शिवरानीदेवी घाबरून गेली. पोटांतून कळाहि येत असत, पण या दर्शेतहि
काम करण्याची केवढी हौस प्रेमचंद यांना वाटे. रात्रीं दिवा लावून त्यांचें
वाचणे-लिहिर्णे चाळूच असे. ' मंगल्सूत्र ' ही आपली अखेरची कादंबरी
त्यांनी लिहावयास घेतली होती. अधिक ओजस्वी भाषेतून ती आकारास येत
होती. या समयास प्रेमचंदांची प्रतिभा प्रोढ आणि परिणत प्रेते पुट
शालेली होती. शिवरानीदेवी “ लिहू नका ? म्हणून सांगत असे आणि इकडे
प्रेमचंद यांना तर आवेग अनावर होऊन जात असे.
८१ : ग्रे लट गयी! :!
>“०"४-५४०->/१७/”४--५११७- ” ४५.४ ४,४१७.” ७५..५.०४४0-४५€%४- ४. ४४-४४ ४.४७...” “॥५-/१००-/ ०५८ ४- ५>८ ४-४ १५११०
रोग वाढत होता आणि मृत्यूची ब टचाल जलद होत होती, पोटांतील
रोग फार जुना होता. जवळ-जबळ पंचबीस बेधेपनत प्रेमचंद त्याच्याशी लढत'
होते. आतां थोडीच भीति बाटणार त्याची त्यांना ! आपले काम नेटान
करीत प्रेमचंदांनी अनेकांना उदाहरण घाढून दिले होते. त्यांच्या ' लेखक
नावाच्या कर्थेत याच प्रकारचा संदेश आहे; ““ आपला घम काम करणे हाच
आहि, आपण तनमनधनायातून कान करावे आणि इतकें करूनहि उगस पडले
तर दोष आपला नाहीं, मरून तर जाऊंच. आपल्याप्रमार्णेच मरणार्री लो
मार्णसे आहेत. मरण ही मिण्याची वस्तु नाहीं. मी तर त्याला कधींच भीत
नाहीं, ?' आणि याच श्रद्धेवर प्रेमचंद यांची नित्यकर्मे नियमितपणे सुरू होती.
रशियाचा प्रसिद्ध कथाकार मॅक्झिम गॉर्की याचे निधन झाल्याची वाता ऐकून
प्रेमर्चद यांना फार दुःख झालें. दोघेहि समानधर्मी हेते. दलितांचा, पीडितांचा
कैबार घेऊन दोघांनीहि आपलें कथाक्षेत्र नटविलें होते. किसान-मजुरांच्या
जीविताची पाहणी दोघांनीहि मनापासून केळी होती. तो समानधर्मा गॉर्की
मरण पावल्याची बातमी ऐकतांच प्रेमचंद विव्हळ होऊन उठले.
बनारस येथील “ आज ? वृत्तपत्राच्या कायीलयांत ऑगस्टमध्ये ग्रॉकॉंच्या
मृत्यूबद्दल दुखवट्याची सभा होती. प्रेमचंद यांना रात्रभर झोप येईना, तेव्हां
समत करावयाच्या भाषणाची तयारी त्यांनीं चालविडी. कागद-पेन्सील घेऊन ते
भरामर लिहूं लागळे, शिणून गेठेळी श्मिवरानी नुकतीच झोपली होती; पण
मर्ध्येच दचकून जागी होते तों स्वारी जामिनीवर बसून लिहिण्यांत दंग झालेली !
५६ काय करतां हे आपण १ ?? शिवरानीनें विचारलें,
“६ कांही नाही, ?'
६ नाहीं कर्से ? कांहींतरी लिहितां तुम्ही, *?
“ उद्यां “ आज ? च्या कचेरीत गॉकींच्या मृत्यूबद्दल सभा आहे.
५६६ कृसली सभा १? प्रकृति नीट नाहीं आणि भाषण लिहीत बसलांत !
माहीत आहि £ दोन वाजलेत. ”
६६ झोप येत नाहीं तर काय करूं ? भाषण तर लिहिठेंच पाहिजे. ??
५६६: चण तब्येत बरी नाहीं तर भाषण लिहिणार तरी कसे ;
“« लिहीन तसेच, जरूरी आहे ना ! लिहिल्याशिवाय कर्से चालेल १
आपल्या खुषीर्ने काम चाळू असलें म्हणजे आराम किंबा तकलीफ यांचा प्रश्न
६.०५
मुन्शी प्रेमचंद ८२
निमाण होत नाहीं. ज्याला आपण कर्तव्य म्हणून म्हणतो ते॑करण्यांत त्रास
कसला ! मोठ्या तन्मयतेने कर्तव्य पार पाडलेंच पाहिजे माणसार्ने. ??
:£६ आहे तरी कसली ही समा ? ”
“: शोकसभा आहे.
“६: कोण आपल्याच देशचा माणूस होता का १
६६ इश्रेंच तर आमच्या लोकांचे चुकत, गॉकी एवढा मोठा लेखक होता
कीं, त्याच्याबद्दल कोणत्या देशचा हा प्रश्नच निमोण होऊं शकत नाहीं, इिंदु-
स्थानी की युरोपीय हा प्रश्नच चुकीचा आहे. त्यानें जें लिहिलें त्यामुळे
सवबीनाच लाम झाला आहि. ?१
६ कां | त्यानें द्विंदुस्थानबद्दलह्ि कांद्दी लिहिलें आहे १ ?
“ रानी, तूं चूक करते आहेस, लेखकाबद्दल असें म्हणतां येणार नार्ही.
ज॑ त्याच्याजवळ असेल ते तो सर्वांना देऊन टाकतो. सर्वानाच त्याच्यापासून
लाभ होत असतो. ?
५६ शांबांत किती लोकांना तुमच्या गॉकींचे नांव माहीत आहे ! ”
“६ या गांवचे काय पुसतेस ?! येथीळ लोक स्वतःलाहि जाणत नाहींत. ?
६६ कां जाणत नाहींत £ तुलसी, तूर, कब्रीर यांना कोण जाणत नाहीं £
“६ यांनाहि खरे जाणून घेणारे गांवांत थोडेच आहेत. आणि याचें खरे
कारण आहि शिक्षणाचा अभाव. .. जेव्हां घरोघर शिक्षणाचा प्रसार होईल
तेव्हां गॉकीर्चे नांवह्ि घरोघर ऐकूं येईल. सूर-तुलसीच्याप्रमार्णे त्याचीहि सर्वत्र
पूजा होईल व
अशा प्रकारच्या गोष्टी चार वाजिपर्येत चालल्या होत्या. दुसऱ्या दिवर्शी
दुर्दम्य उत्साहाने प्रेमचंद शोकसभेस उपस्थित झाले. आजारामुळे दुर्बलता
मात्र वाढली हाती. व्यासपीठाची शिडो चढतां चढतां त्यांची द्मछाट झाली.
भाषण करण्यास उभें राहवेना. तोंडांतून शब्द देखील बाहेर येईना. दुसऱ्या
एका माणसानेच भाषण वाचून दाखविळे. घरीं परत आले तों पाय लट-
पटत होते. चालणे मुरकील होऊन बसले होतें.
सप्टेंबर महिन्यांत प्रकृति अधिकच बिघडून गेली. परलोकची' चिंता
प्रेमचंद यांना मुळींच नव्हती, याच लोकांत सवंत्र सुखसमाधान कर्से नांदेल,
याची काळनी मृत्युशय्येवरहि त्यांना लागून राहिली होती. गरिबांच्या दुनियंत
८३ “ अ लुट गयी!”
सुंदरता कशी निर्माण होईल हाच एक ध्यास त्यांना ळागडा होता. प्रेमचंद
यांची शेवटची कथा * दो बहन ' ही ऑक्टोबर महिन्यांत “ इस्मत मध्ये
प्रसिद्ध झाली, या कथेतील एक पात्र बोलते, “' जेवढे धनवान् लोक आहेत
तेवढे सवे लुटारू आहेत. पक्के ठुटारू- डाकू ! उद्यां माझ्यापाशी रुपये यावेत-
मी एक धमेशाळा बांधीन; मग माझी किती तरी वाहवा होईल ! पण ही
दौलत कोठून आली हें कोण विचारणार १
प्रेमचंद यांच्या मनास गॉकींच्या मृत्यूची मोठीच जखम झाली होती.
कित्येक दिवस त्याच्यासंभर्घीच गोष्टी ते बोढत असत; आगि दर वेळीं
त्यामुळें त्यांच्या हृदयांत वेदनांची ऊर्मि उठून राही, गॉकींवर त्यांची अटळ
श्रद्धा होती. प्रेमचंदांची प्रकृति झपाट्याने खालावत होती. सवे नातेवाईक
मंडळी जमा झाली. मुन्शी दयानारायण निगम, जैनेन्द्रकुमार इत्यादि मित्र-
मंडळीहि बनारसला आली, शेवटीं रामनाम म्हटल्याने मुक्ति मिळते अशी
आपडी समजुत. प्रेमचंद यांच्या तोंडून ईश्वराचे नांव बाहेर पडावे म्हणून
'लोकांची खटपट सुरू झाली, पण प्रेमचंदांची दृष्टि याहि वेळीं गरीब जनतेच्या
दुःखांत व्यग्न झालेली होती. “ बासी भात में खुदा का साझा ? या कर्थेत
प्रमचंदांनीं म्हटळें आहे, “ प्रेम हेंच आपल्या जीवनाचे सत्य आहे. पण
तुमचा इश्वर मात्र दण्डभयानें सृष्टीचे राज्य करीत असतो. मग त्याच्यांत
आणि मनुष्यांत फरक काय £ अश्या परमेश्वराची उपसना मी कशी करूं १
जे मोठे आहेत त्यांच्यावर इश्वर दया करणार; कारण ते दुनियेची लूट
करतात. .. जोपर्यंत जगांत ही अशीच पारोत्थिति आहे तोपर्यंत त्या इश्वरावर
माझा विश्वास बसणार नाहीं...” हाच भाव शेबटीं-शेवटींहि प्रेमचंद यांच्या
जोलण्यांतून व्यक्त होत होता. मृत्युराय्येबर असतांनाहि ' हंस ? कसा जगेल हीच
पिंता प्रेमचंद यांना होती. सन्मित्र जैनेंद्रकुमार यांना प्रेमचंद मृऱ्यूच्या
आधल्या दिवशीं म्हणाले,
६६ ज्ञनेन्द्र, या वेळीं परमेश्वराची आठवण करावी असे तुम्ही सर्व जण
म्हणतां, पण आत्तांपर्यंत ईश्वराला कष्ट द्यावेत असें मला बाटत नाहीं. ?? एखाद्या
नास्तिक तत्त्ववेत्या प्रमाणे प्रेमचंद बोलत होते. जेनेन्द्रांच्या समार आपला उजवा
हात करून प्रेमचंद म्हणाळे, “ दाब हा हात. !? कृश झालेला, पिवळा-पांढरा
पडलेला हात जैनेन्द्रांनीं दाबला. प्रेमचंद कांहीं बोलले नाहींत. डोळे मिटून
मुन्शी प्रेमचंद ८
स्वत्थ पडून होते, “ इंस ' कसा टिकून राहील याची चिंता त्यांच्या चेहऱ्यावर
स्पष्टपणे दिसत होती.
१९३६ च्या ऑक्टोभर ७ रोजी थोडी बेशड्धि दूर झाली. प्रेमचंद
श्िवरानीदेवीस बोलले, “' शिवप्रसादजी गुप्तनें एक मातूमंदिर बनविले.
आहे. महात्मा गांधींच्या हस्ते उद्घाटन होईल. लाखों लोक त्या ठिकार्णी;
जमतील, ??
५: आपली प्रकृति चांगली होईल तर मीहि आपल्याबरोबर येईन. ??
६ रानी, या जर्न्मी तुझी इच्छा सफल होईल कीं नाहीं कोण जाणे,
:£: आपण कां आश्या सोडतां ! आपण कोणाचे काय नुकसान केलें आहे !
भगवान् आपली इच्छा पुरी करीलच. ?
6: रानी, माझ्यापासून दूर जाऊं नकोस. तूं जवळ असलीस म्हणने माझे
धैय खचत नाहीं... *'
शिवरान देवीच्या डोळ्यांतून टपूटप् अश्रूंचे थेंब ओघळू लागठे, पतीच्या
देखत डोळ्यांत पाणी येऊ नये म्हणून तिर्ने आत्तांपर्थत जपले होते. पण
पतीला धीर देणाऱ्या शिवरानीरवंच घेथ या वेळेस खचून गेलें होतें.
दुसऱ्या दिवशीं प्रेमचंदांना पुनः बेशुदध आली. जोराचा एक जुलाब,
झाला. साफ करण्यासाठीं शिवरानीदेवी पुर्दे झाली तो तिच्या भावार्ने
म्हटले, “' बहून, आतां ते नाहींत. कोठे जातेस ? ”?
शिवरानीने हंभवरडा फोडला. दि. ८ ऑक्टोबर १९३६ या दिवशी हिन्दी
भार्वेतील उपन्यास-सम्राटु, महान् कलाकार, गरिबांचा बाली, दलितांचा कैवारी
मुन्शी प्रेमचंद यांचा आत्मा नश्वर कुडी सोडून मॉकेझम गोॉकांच्या भेटीस
निघून गेला.
५ //*/१-”/*१ // ४
शहि शी श्र
मे १९३७ मर्ध्ये * इंस ' मासिकाचा ' प्रेमचंद स्मारकांक ? प्रसिद्ध झाला.
त्यांत पहिलाच लेख शिवरानीदेवीचा आहे. “ मै लुट गयी ! !? या शीषंका-
खाठी त्यांनीं आपल्या पतीस श्रद्धांजळि समर्पण केली आहे. शोकम्रस्ता
शिवरानीदेवीनें प्रेमचंदांचे' आयुष्य जवळून निरखले असल्यामुळें या
«खास फार महत्त्व आहे. त्यांत त्या डिहितात --
२५ जूनच्या रात्री दीड' बाजतां--
<५ “६ अ लुट गयी! !'
"२५८५५ "४/४ ५.५१ ४५” "क १७७५४” 0४.” ७४७१०” ७/ २४
: ब्रेटा धुत्रू, जरा पंखा चालू कर पाहू, फार उकडतें आहे. '-हे त्यांचे
-गाब्द होते. थोड्या वेळांत धुनू दौडत माझ्यापाशी आला व बोलला, “ आई,
'जाबूजींना उलटी झाली आहे. ' आशंका, भय आणि दुःख यांर्नी मी फुलून
-निवाळें, झटकन् मी तेथें येऊन पोचले. रक्ताची उलटी पाहून त्तब्ध झाले.
जणुं कोणीं विजेचा प्रहार मार्ययावर केला होता. थोड्या वेळानंतर त्यांनी
उद्गार काढले, “ रानी, आतां मी चाललो, ? येणाऱ्या दुःखाच्या वावटळीस
थोपवून धैर्य व साहस यांचा उसना आव आणून पी म्हटळें--- “ गप्प रहा
आपण, आपण मला सोडून कसे जाणार |! ? त्या वेळीं रक्ताच्या पाटाकडे
'बौट दाखवून बोलळे, ' ज्याच्या तोंडून हा रक्ताचा प्रवाह वाहिला, त्याचीच
का तू आतां आशा करतेस !£ २१,..त्या दिवसानंतर मला नीट झोप आली
नाहीं, रात्री दिव्याच्या प्रकाशांत त्यांचे लेखन याहि वेळीं चालू असे, “ मंगल-
-सूत्र र? या कादंबरीची वीस पृ त्यांनी याच अवस्थेंत लिहिलीं, ..कर्षी कर्घी
रात्रभर त्यांना झोप येत नसे; त्या वेळीं मी त्यांना वाचावयास पुत्तके देत असें.
त्यांच्यासमोर खूष राहण्याचाहि प्रयत्न मी करीत असें.
एका रात्री--
“८ माझ्या स्वार्मीच्या पोटांत वेदना सुरू झाल्या. मी त्यांच्या उश्यार्शी
यसून होते. दुःख थोडें कमी झाल्यावर ते बोळडे, “ रानी, मला तुझी
व बन्नूची मोठीच चिंता वाटते. धुन्नू आतां मोठा झाला आहे; मुलीचेंहि
वयन झाले; ती सुखी आहे. पण तुझी ब बन्नूची दशा काय होणार ! ?
त्य़ा बळी माझ्या घेयाचे, संयमाचे ब विश्वासाचे बांध फुटले गेले, जीवनांत
पहिल्यानेंच मो रडू लागलें, पण मा माझ्या अश्रूंना लपविले, ते बोलूं लागले,
« रानी, पूर्वजन्मी तूं माझी आई होतीस व या जन्मी देवी होऊन आली
अहेस,. ..तूं माझी आदिशक्ति आहेस... ' मी ऐकून घेत होते. त्यांचा
वरद्दृत्त माझ्या डोक्यावर होता,
:६ ,,आज मार्झे सर्वस्व हिरावले गे्ढे आहे, माझा सर्वे निघि आज रिता
पडलेला आहे. आज माझें मठाच दुःख होत आहे कीं, मी किती अभागी
आहे ! माझे सर्व विचार आणि विश्वास उखडून निघाले आहेत. ईश्वराच्या
न्यायीपणावरहि माझी श्रद्धा ठरत नाहीं. माझ्या जीवनाची अमावस्या सुरू
आहे, वारंवार माझ्या मनांत येतें कीं, ते किती महान् होते, देव होते आणि
सन्शी प्रेमचंद ८६
7“ २५*../५.€ “ /“-“५/४%-”"५< ६ - -““*-“* “५-४ २-४२/0 -“४२./ ४./”४ / १.” ५१" /7५८/ -““€ “शा: ८ >“ ६ अ जे टु शी “ ०९ कमा
मी तर त्यांच्यावर आधिकार गाजवूं पाहत असें. माझ्या निकटवती असूनहि
६ त्यांच देवत्व नीट ओळखलं नाहीं. तर्से पाहिळ तर मजजवळ काय होतं ९
तरीसुद्धा त्यांनीं माझा उद्धार केला, प्रेम केलें, सन्मानासहित मला आपल्या
अंतःकरणाच्या उच्च आसनावर बसविलें, त्या काळीं मला किती अभिमान
होता-मी रानी होते. ते उपन्यास-सम्राट् लोकांच्या दृष्टीनें-पण माझे स्वामी
असूनहि ते माझे विनीत मित्र होते. त्या वेळीं माझ्याजबळ सव विश्वाचे सुखः
सांठवलेलें ह्वोर्ते. पण आज मी एकटी आहे. आज माझें समस्त जीवन उद्ध्वस्त
होऊन गेलें आहे. माझी लेखणी चाळू दशोकत नाही, घरकाम मला
सुचत नार्ही.
५: आज घरांत तें सरळ हास्य नाहीं. त्यांची संपादकीय खोली रिकामी'
आहे, आज माझे ईश्वर नाहींत. . .. त्यांची स्माति ' हंस? आज जिवंत आहे.
पण त्या ' हंसा चा मोती को आहे !...
७ ७ &,
प्रेमचंद कोण होते ? :११
प्रेमचंद कोण होते !- हा प्रश्न चमत्कारिक तर खराच, पण तो तितकाच
महत्त्वाचाहि आहे. आतांपर्यंत त्यांची जी चरित्रकथा आपण पाहिली तीवरून
बव पुर्ढे त्यांच्या साहित्याचे विवेचन आपण करणार आहोंत त्यावरून प्रेमचंद
कोण होते, याचा उलगडा आपणांस थोड्याफार प्रमाणांत होईल. तत्पूवी
त्यांच्या मित्रपरिवारानें व टीकाकारवर्गोर्ने प्रेमचंद यांच्या व्यक्तिमत्त्वाचे
व साहित्याचे मोजमाप कसें केलें आहे हँ पाहूणे उपयुक्त ठरणार आहे. असें
सांगतात कीं, प्रेमचंद यांच्या साहित्याचा गौरव हिंदी भांषेखेरीज इतर
भाषीय लोकांनींच मनापावून केला, प्रमचंद हयात असेपर्यंत त्यांचा व
त्यांच्या साहित्याचा सन्मान जसा करावयास पाहिजे होता तसा हिंदी भाषीय
लोकांनीं केला नाहीं. जगांतील भ्रेष्ठ कथाकारांच्या पंक्तींत बसाणारा एक
लेखक या हिंदी भाषेस मिळाला, पण त्याची योग्य ती दखलगिरी समकालीन
साहित्यिकांच्या मेळाव्यांत घेतली गेली नाहीं. रवींद्रनाथ, शरद्बाबू, कन्हय्यालाल'
८७ | प्रेमचंद कोण होते ?
मुन्शी, आपले हरिभाऊ आपटे या सवोच्याहून प्रेमचंद यांची कला थोड्या
वेगळ्या स्वरूपाची होती. त्यांच्या “ गोदान ' कादंबरीसारखें शेतकऱ्याच्या
जीवनावरील महाकाव्य इतरत्र सांपडरणे दुर्मिळ आहे. इतर भाषियांच्या
तोडीस तोड' म्हणून एकच कथाकार हिंदीस लाभला आणि तो म्हणजे मुन्शी
प्रेमचंद, पण असे असतांना प्रेमचंद यांच्या हयातींत त्यांना मिळावयास हृवा
तसा मानसन्मान प्रात्त झाला नाहीं.
हे मत खर कीं खोटें याची चचा आपणांस करावयाची नाहीं. उपन्यास-
सम्राट ही त्यांची पदवी कोणीहि हिरावून घेऊं शकणार नाहीं, प्रेमचंद हयात
असतांना व त्यांच्या पश्चातहि त्यांच्या साहित्याचे गुणग्रह्णय करणारी अनक
पुत्तके झालीं. प्रेमचंद यांचा मित्रपारिवारहि मोठा होता. त्यांतील कांदी
विख्यात साहित्यिकांनी प्रेमचंद यांच्याबद्दल गौरबात्मक लिहिलें आहे. त्यांपैकी
कांहींच्या मतांचा सूर वर दर्शविलेल्याप्रमार्णे प्रेमचंद यांच्या उपेक्षेसंत्रंधीं आहे.
एवढा मोठा साहित्यसम्राट पण हिन्दी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान
त्यास कां लाभूं नये! 'मंगलाप्रसाद? हे सवोचच पदक त्यांच्या 'गोदाम' कादंबरीस
कां मिळूं नये ! असे अनेक प्रश्न प्रेमचंद यांच्या मित्रांच्या मनांत निर्माण
होतात, प्रेमचंदांच्या शेकडो चाहृत्यांनाहि हे प्रश्न मधून मधून सतावत असत.
पण याहि ठिकाणीं महत्त्वाची गोष्ट अशी कीं, प्रेमचंद ज्या वगासाठी लिहीत
होते तो वर्ग मात्र त्यांना पूर्णपर्णे मानतो. जनतेने त्यांना उपन्याससम्राट् है पद
केव्हांच बहाल केलें होतें. जनतेकडून मिळालेल्या या श्रेष्ठतम पदवीबद्दल प्रेमचंद
स्वतःच खूष होऊन गेळे असतील. मी जनतेचा एक तुच्छ सेवक आहे, जनतेकडून
रायसाहेथी मिळाली म्हणजे सव पावले, अशा आशयाची वचने प्रेमचंद यांच्या
तोंडून निघालीं आहेत. अर्थात् प्रेमचंद यांचा हा वैयक्तिक दृष्टिकोन झाला,
प्रेमचंद कथाकार, कादंबरीकार, म्हणून प्रासिद्ध होते. पण सर्वाआधीं ते
मनुष्य होते ही गोष्ट महत्त्वाची आहे, मानवी गुणावगुणांवर त्यांची निस्सीम
श्रद्धा होती. आणि या श्रडडेंतून त्यांच्या कथासंसाराची उभारणी झाली आहे.
त्यांच्या कथाविश्वावर बेहद्दपर्णे खूष होऊन जाणारे लोक त्यांचा गौरव कसा
करतात, हँ पाहण्यापूर्वी प्रेमचंद स्वतःविषयोंच नेमके काय म्हणतात हेंदि
पाहणें उपयुक्त होईल.
मुन्शी प्रेमचंद ट्ट
-०१५>/२०//९.
डॉ. इन्द्रनाथ मदन यांना ७॥९)३५ रोजी लिहिलेल्या एका पत्रांत
मुन्शी प्रेमचेद म्हणतात,
£६ माझ्या लहानपणी माझ्या घरचा जो प्रभाव माझ्या मनावर पडला तो
अगदी सामान्य द्ोता. त्याला चांगळे म्हणतां येणार नाहीं. आणि बाईटहि
समजतां येणार नाही. मी आठ वर्षांचा असतांना माझी आई दिवंगत
झाली, त्याआर्धीची आठवण पुसट पुसट अशी आहे. केवळ एवढेंच स्मरते
कों, माझी दुर्बल माता कर्धी अत्यंत ममतामयी वाटे तर वेळ पडल्यास कर्घी
कर्धी कठोरहिि होत असे... .. पहिल्यानें मीं उदू साप्ताहिकांत व नंतर
मासिकांतून लिहावयास प्रारंम केला, .. लिहिणे हेंच मार्झे व्यसन होतें, पण
शेवटपर्यंत मी लिहितच राहीन असे कर्षधी वाटलं नव्हते. मी सरकारी
नोकरीत होतो आणि वेळ मिळाला कीं लिहीत होतो... .. माझा पहिला लेख
१९०१ मध्यें छापला गेळा आणि पाहिलें पुस्तक १९०३ मध्ये प्रसिद्ध झाळें,
या रचनेने आत्मतुष्टीखेरीज दुसरा कोणताहि लाभ मला झाला नाहीं, सन
१ ९ ०७ सालापातून मीं कथा लिहिण्यास आरंभ केला; आणि यदा मिळत
आहिसें पाहून लिहिणे चालू ठेवलें. सन १९१४ मध्यें माझ्या कथा हिंदीतून
प्रसिद्ध होऊं लागल्या. त्या वेळेपासून मी हिंदी भाषेतूनच “सरस्वती? मासिकांत
ळेखन करूं लागला. त्यानंतर म]झी “ सेवासदन ' कादूंबरी प्रसिद्ध झाली
आगि मी नोकरी सोडून त्वतत्रपर्णे लेखन करूं लागलो.
माझ्या जोबनांत काणताहि प्रेमप्रसंग निमाण झाला नादी, ज॑बन इतर्के
कठीण होतें आणि जीवनोपार्जनासाठी इतके कष्ट करावे लागले की, त्यांत
रोमान्सला अवकाशचच उरला नाही. कांही सर्वसाधारण घटना आहेत, पण
त्यांना प्रेमप्रसंग म्हणतां येणार नाहीं.
आविरत कार्य हॅच माझे जीवन बनले आहे. जेव्हां मी सरकारी नोकर
होतो तेव्हांहि साहित्यसेवेंतच मी माझा वेळ खच करीत असें. मी क'म करण्यां-
तच आनंद मानीत आला. आहे. कधी कर्धी निराशेच्या क्षणी आर्थिक
करांचेहि अनुभव येत असत. याखेरीज मी आपल्या भाग्यावर संतुष्ट आहे;
न्याणि मला माझ्या अपेक्षेपेक्षा आधिक यशा प्राप्त झाळें आहे. आर्थिक दृष्टीनें
मात्रे मी अयशस्वी आहे...मी कर्धी पत्रकार नव्हतो, परतु परिस्थितीमुळे मी
अगातेक होऊन, साहित्यनिर्मितीमुळें जे कमावले ते सर्व पत्रव्यवसायांत मी खर्च
नेलें,
८९ प्रेमचंद कोण होते ?
मानवी चरित्रांत नें कांहीं सुंदर ब मानबोचित आहे त्यार्चे उद्घाटन
करण्याच्या दृष्टीने मीं आपलीं कथानर्के निवडली आहेत. हें कार्ये फार गूढ
आहि. .. माझ्या कथांचा आधार मनोविश!नच ठेवण्याचा प्रयत्न मी केलेला
आहे. . . रोमौरोलॉप्रमाणे नियमित कार्य करण्यावर माझा पूर्ण विश्वास आहे... ?
दि. २६९1१२१९३४ रोजीं लिहिलेल्या आणखी एका पत्रांत मुन्शी
प्रेमचंद म्हणतात, “' होय. मी टॉल्स्टॉय, व्हिक्टर श्ूयो आणि रामी रोल
यांच्या साहित्याने प्रमाबित क्षालीं आई, कथांच्या संबंर्धीं बोलावयाचे झाल्यास
डॉक्टर रवींद्रनाथ ठाकूर यांच्याकडून मीं प्रेरणा घेतली आहे. दौलीचा विकास
मात्र माझा मींच स्वतः केला आहे. . .सिनेमांत साहित्यिक व्यक्तीला स्थान
नाहीं, आर्थिक दृष्टीने स्वावलंबी होतां आळे तर पहार्बे म्हणून मी येथे
मुंबईस ) आलों होतो. पण माझा हा भ्रम होता. आतां मी परत साहिष्यांत
येत आहे...मी कर्धी तुदंगांत गेलो नाहीं. मी क्रियात्मक व्यक्षिति नाहीं...
जनमत तयार करणे ह्या आपला उद्देदा असल्यामुळे सामाजिक विकासावर
माझा पूर्ग विश्वास आहे. प्रत्येकास सारखी संधि मिळणें द्या माझा आदर्श
आहि. प्रारर्भी प्रारभा चिन्तनाचा परिणाम म्हणून नव्हे तर परंपरागत श्रद्धे-
मुळें मी एका महान् दैवी शक्तीवर विश्वास ठेवीत होतों, विश्वाच्या बुडाशी
ईश्वरीय शक्ति असली तरी मानवी जीवनाशी तिचे कांहीं देणे-घेणे असल
अर्स मला वाटत नाही, ?)
मुन्शी प्रेमचंद यांच्या संक्षिप्त आत्मनिवेदनावरून त्यांच्या कार्यासंजंधी
कांहीं कल्पना करतां येण्यासारखी आहे. प्रेमचंद यांच्या निधनानंतर“ इंस *चा
एक विशेषांक प्रसिद्ध झाला. त्यांत प्रेमचंदांच्या मित्रांनी ब चाहत्यांनी त्यांच्या -
संबंधी कांद्रीं माहिती व कांही आठवणी दिल्या आहेत. त्यांतील कांही महत्त्वाच्या
भागाचा परिचय करून घेण्यासारखा आहे. प्रेमचंद कोण होते £-या प्रश्नाचे
उत्तर कदाचित् त्यानंतर मिळण्यासारखें आहे.
:६ प्रेमचंद यांच्या मृत्यूमुळे हिंदी भाषेचा एक स्तंभ तुटला गेला आहे.
हिन्दीचा सर्वश्रेष्ठ कथाकार निघून गेला, आज आपल्या उपन्यास-सम्राटार्चे
देहावसान झालें, पण त्यांच्या अमर कीर्तीची ध्वजा सर्वत्र फैलावत राहील. मी
आज निःसंकोच भावनेने म्हणु शकतो कीं, प्रेमचंदखेरीज हिन्दी भाषेस एवढा
मुन्ली प्रेमचंद र्
मोठा ळेखक लाभला नाहीं, भाषा प्रेमचंदांची दासी बनून गेली होती, माझा
विश्वास आहे कीं, त्यांच्या साहित्यांत अमरत्वाची सामग्री भरपूर आहे. ?”
श्री. अवध उपाध्याय.
६६: सन १९२७ मध्य प्रेमचंदजी “ माधुरी ? मासिकार्चे संपादन करीत
असत. त्या वेळीं लखनौ येथें पहिल्याप्रथम मीं त्यांची भेट घेतलीं. त्यांच्या
दर्शानानेंच मी थोडासा संकोचल्यासारखा झालों. त्यांचे चमकणारे विस्तृत
ललाट, अन्तभेदी आणि सुगंभीर शांत डोळे, मोठ्या भुवया आणि मोठ्या
मिशा या सबोच्या एकीकरणामुळें त्यांच्यांत अर्से एक व्यक्तिमत्त्व निमोण झालें
ह्वांत की, ते संपूर्ण भारतीय असूनहि आपल्या भावलेीकाच्या वैशिष्ट्यामुळे
त्यांच्यांत एक निराळीच विशेषता निर्माण झाली होती. मळा असे स्मरते
कीं, रवीन्द्रनाथांनी ईश्वरचंद विद्यासागर यांच्या बाबतींत असे म्हटलें आहे.
कीं, ते आपल्या आलपणीं पूर्ण बंगाली हाते आणि बंगाली लोकांच्याबद्दळ
त्यांच्या मनांत पूणे आदर वसत होता. तथापि ते अन्त्जीवनांत एकदम
अ-बंगाली होते. आपल्या सतेज व्यक्तिमत्त्वाने ते आपल्या समाजापासून वेगळे.
दिसत. प्रेमचंद यांना पाहतांच माझ्या मनांत तीच धारणा निर्माण झाली.. ..
केवळ जाह्य साम्यतेवरच नाही. तर आंतील व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने पाहिल्यास
प्रेमचंद व गॉर्की यांच्यांत समानता दिसून येते. ज्या प्रकार गॉर्करनि दाटित
माणसांच्या सुखदुःखांचा वास्तविक अनुभव प्रास करून खऱ्या सहृदयतेन
आणि समवेदनामूलक अनुभूतीने आपल्या रचर्भत अत्यंत सुंदर रूपांत घ्याचा
आविष्कार केला, त्याचप्रमाणे प्रेमचंद यांनीहि भारताच्या पौडित अन् उपेक्षित
ग्रामीण जनतेच्या आत्म्याचे यथाथ चित्रण केळे आहे.
६६ _.,.. प्रेमचंद यांना उच्च दर्जाचा कलाकार म्हणून जनता मानते.
याहिखेरीज त्यांच्यांत जी माणुसकी होती तिचा परिचय फार थोड्या
लोकांना आहे. आपल्या साहित्यांत त्यांनी ड्या दलित आत्म्यांचा निर्देश केला
आहि त्यांच्याबद्दल त्यांना केवळ वरवरची सहानुभूति होती असें नव्हे तर
वास्तविक जीवनांतहि त्या अनुभूतीने व्यवद्वारिक रूप प्रकट करून आमच्या
कलाकारांना एक महान् आदरशे त्यांनीं निमाण करून ठेवला आहे. ... ..
त्यांनीं आपल्या जीवनांत जे कष्टदायक अनुभव घेतले त्यामुळें दुसऱ्या पीडितांचे
दुःख ते वर्णन करूं दाकले. ... ?'
र शभ्री. इळाचन्द जोखी.
९१ प्रेमचंद कोण होते ?
:६ मी गुजराथ, काठेवाड आणि दक्षिण भारत या देशांत दोन-तीन
वेळां जाऊन आलो आहें. प्रत्येक वेळीं नव्या नव्या साहित्यप्रेमींना भेटण्याची
संधिहि मला प्राप्त झालेली आहे. प्रेमचंदांचें प्रेम मला सवंत्र दिसून
आले. आहिन्दी प्रान्तांत प्रेमचंदांचेंच नांव सवीत प्रसिद्धीस पावले आहे.
,*-... त्यांचें अंतिम दर्शन मीं त्यांच्या रुग्णशय्येवरच घेतलें. मला पाहून
ते हूसळे आणि बोलळे, ' किनाऱ्यावर तर आला आहें. नाव केव्हां सुटेल
कोणास ठाऊक ! ? असें म्हणून त्यांनीं एक पद्यचरण म्हटलें. त्यांच्या मृत्यूने
आपल्या साहित्याकाशामधील एक मोर्ठे नक्षत्र निखळून गेळें आहे. हिन्दीच्या
नंदनवनांतील एक सुंगघी फूल अकालींच सुकून गेले. आमच्या साहित्यिक
जीवनांतील एक झरा झुकून गेला. गरिबांच्यासाठी तडफडणारें हृदय एकदम
बंद पडलं | ??
--“ श्री. रामनरे्य त्रिपाठी.
“६ ,, त्या दोनतीन दिवसांत मीं प्रेमचंद यांना जवळून पाहिलें, त्यांच्या
मुक्तपणे हसण्याच्या संवयीचा परिचय मला पहिल्यानच झाला होता. पण
त्याच्य़ा सुहास्यापाठीमार्गे त्यांच्या पवित्र आणि सरळ आत्म्याचा परिचय
त्यांच्या निकट राहूनच मला झाला, त्यांच्या सहानुभूतिपूर्ण हृदयांत सांसारिक,
राजनौतिक किंवा सामाजिक ख्टींबद्दल मोह असलेला मला दिसला नाहीं.
धर्म, जाति किंवा देश यांच्या सीमा तोडून तो महान् कलाकार सर्व अवस्थांत
अत्यंत उदार व अनुभूतिपूर्ण अश्या स्वरूपांत बनून राहिला होता. ....... ..
फ्रेंच साहित्यांत सर्वश्रेष्ठ नाटककार म्हणून मोलियरचें नांव घेतलें जाते. पण
मोलियरच्या हयातींत त्याला ही प्रतिष्ठा मिळूं शकली नाही; कारण तो स्वतः
आपल्या नाटकांतून भूमिका करीत असे; आणि त्या काळांत तर नाटकांत
काम करणे ह कुलीनतेचे लक्षण समजळें जात नसे. त्यामुळें त्याची अवहेलना
एवढी झाली कीं, फ्रान्सच्या सवेश्रेष्ठ साहित्यसंस्थेत-फ्रेंच अंकेडेमींत-त्याला
सभासद होतां आलें नाहीं. मोलियरच्या मृत्यूनंतर फ्रेंच अंकेडेमीनें आपली
चूक सुधारली आणि या. चुकीचें प्रायश्चित्त या प्रकारें घेण्यांत आले-फ्रेंच
अँकेडेमींत एकूण शंभर सभासद होते. एखाद्या सदस्याचा मृत्यु झाला की
त्याच्या स्थानीं दुसऱ्याची नेमणूक होत असे. मोलियरच्या निधनानंतर जेव्हां
दुसऱ्या एका समासदाच्या मृत्यूमुळे एक त्यान रिकार्मे झालें तेव्हां त्या.
मुन्शी प्रेमचंद ९२
*“'*-“ ८२.९१.” >“ >“ -““”" “ -<*../"६-/५-€४५.”८४/ ४५-४०” ५४४.” ७-५ ५.०० ४-१ ४५. ४-९ ५-४. ४-०” €0६// १-४, ४-४ ५.०४. ४५४ १०८१४ १०” ४७४ ४८७ २७४
*>/१४०//”
रिकाम्या जागेवर मोलियरची निवड झाली |! जिवंत असणारी माणसॅच
सभासद असत, मृत्यूनंतर अथोतच सदस्यत्व रद्द होई. पण निघनानंतर जो
सभासद झांला त्याचे समासदत्ब रद्द कर्से होणार ? फ्रेंच अकेडेमींत आजहि
. दौभर सदस्य आहेत. एक के. मोठियर आणि इतर नव्याण्णव, जिवंत सद्य
बदलले जातात, पण मोलियरचें त्यान अबाधित आहे. ... याचप्रमाणे या
वषार्चे साहित्याचे “ मंगलाप्रसाद पारितोषिक ? ' गोदान ? ला देऊन हिन्दी
साहित्य संमेलन स्वतःचा गोरब करून घेऊं शकणार नाहीं काय £ --- ?
-ण श्री. चन्द्रगुप्त विद्यालंकार
£६ औओपन्यासिक सम्राट श्री. प्रेमचंद यांच्याबद्दल जेवढे लिहार्वे तेवर्दे
थोडेंच होणार आहे. हिन्दुस्तानी लिहिणारांत त्यांना तुलना नव्हती. राष्ट्रभाषा-
प्रचारासाठी त्यांचा आत्मा व्याकूळ होत असे. साहित्यसेवेच्या द्वारां त्यांनी
राष्ट्रीयतेची जोपासना के$ी व संस्कृतीस उजळा दिला. ग्रामवासीयांमद्दल त्यांना
कमालीची आत्मीयता वाटे, ?
--_-सेठ जमनालालजी बजान.
६: शेलीकार या दृष्टीनें प्रेमचंद यांचें स्थान हिन्दी साहित्यांत असाधारण
आहे. सरळ, सुचोष, सालंकृत आणि सजीव गद्याचा अभ्यास त्यांनीं पहिल्या-
नेच केडा होता, ..कोणत्याहि लेखकाच्या किंबा कवीच्या प्रभावाची साक्ष हद्दी
को, जाणूनभुजून किंवा अजाणत। त्याचे टीकाकारच त्याचें अनुकरण करू
लागतात. या दृष्टर्ने प्रेमचंद हे आधुनिक्र हिन्दी साहित्याच्या आपल्या
विभागांत सर्वश्रष्ठ प्रातानाधि तथा प्रपुख लेखक होत. आणि मला संदेह
नाहीं कीं, हिन्दीतीळ इतर वत्रिभागांत सुद्धां त्यांच्यापु्टे जाणारा दुसरा कोण-
ताहि प्रतिनिधि अजून निर्मांग झालेला नाहीं. ज्याप्रमाणे हारिश्वंद्र एका-
गिसाठ्या शतकाच्या उत्तराधात चमकून गेले, त्याच प्रमार्गे विसाव्या शतकाच्या
पूवाधात प्रेमपंद चमकले. दोघेहि हिन्दी स!हित्याचे अमर चंद्र अहेत. ?
--श्री. धीरेन्द्र बमा.
६ प्रेमचंदांची सवीत महत्त्वपूर्ण विशेषता ही कीं, ते भारतीय संस्कृतीचे
प्रातिपादन करीत. त्याचबरोबर मर्यीदा आणि आदर्शवाद स्थापित होण्यासाठींहि
ते प्रयत्न करीत असत, कारण त्यांचा असा अढळ विश्वास होता कीं, समाज
व राष्ट्र यांची उन्नति आपली संप््कृति, सदाचार आणि आदर्श यांच्यावरच
९ प्रेमचंद कोण होते ?
४९४६-७०” ८७/०५/९१११ “९७ 40.७७, ७७१७ ७७ 0१९ ७५५९७ ७७४७”, ४०७७0१ ४
अवलंबून आहे. प्रेमचंद यांचा विश्वास असा होता की, आपली अवनतति
आपल्यांतील स्वाभिमान नष्ट झाल्यामुळे झाळी आहे. आपल्या विभूति आणि
त्यांचें मोठेपण यांची उपेक्षा करून दुसऱ्यांचे कांचेचे तुकडे घेऊन आपले.
हिरे फेकून दिल्यामुळे ही परिस्थिति आपणांस प्राप्त झाली आहे. त्यांनी
स्पष्ट शब्दांत सांगितलें आहे कीं, “ युरोप व भारतवर्ष यांच्या आत्म्यांत फार
अंतर आहे. युरोपची दृष्टि सुंदरतेवर अवून भारताची सत्यावर आहे. संपन्न
युरोपर्ने मनोरजनासाठीं कथा लिहिल्या, तर भारताने नीति आणि धर्म यांना
प्राण समजून रचना केली. आम्ही परत असलो तरी आमची सुधारणा
पाश्चात्यांपेक्षां उच प्रकारची आहे. . .साहित्यांत आम्ही आमच्या आत्म्याचे
जतेन करावयास पाहिजे. आपण कादंबरी व कथा यांचें वरवरचे शरीर जरी
युरोपकडून घेतलें असळें तरी त्यांतील आत्मा मात्र भारतीय असल्याची
आपण खबरदारी घेतली पाहिजे. मी एवं म्हणूं शकतो कीं, या नवीन कले-
वरांत भारतीय आत्मा मीं सुरक्षितपर्णे जतन केला आहे- ? हा प्रेमचंद
यांच्या साहित्यनिभितीचा मूलमंत्र आहे; आणि याच विचारांच्या पायावर
त्यांच्या कथाकादंभऱ्यांचा इमला खडा आहे.
--“श्री, जगन्नाथप्रसाद शमा..
६६ ग्रेमचंद आपल्या साहित्यांतील गॉर्की होते. गॉकींप्रमा्णेंचे बालपणा-
पासूनच त्यांनी दुःखाचे अनेक आघात सहन केले होते. पण त्यांचें दुःखच
त्यांना अमुृतदायी बनलें. या अमृताच्या मदतीनेच ज्याप्रमाणे गॉकीने लेनिन-
प्रणीत युगाची वाटचाल केली, त्याप्रमाणे प्रेमचंदांनी गांधीयुगाचा पुरस्कार
केळा. जगतांत दोन प्रकारचीं माणसं असतात : दुःख सहन करून करून
पाषाणाप्रमार्णे निर्दय व कठोर होणारी आणि विपत्तींच्या फत्तरांशीं टकरा देत
देत नदीप्रमाणें संतप्त पृथ्वीला शांत करणारी. गॉकीं आणि प्रेमचंद या दुसऱ्या
प्रकारांतील श्रेष्ठ कलाकार होते. दोघांनींहि कथासाहत्याच्या साधनाने आपापल्या
युगांत माणुसर्कांचा पुरस्कार केला. त्यांच्या लेखणीतून झरणाऱ्या शाईत
अत्याचार करणाऱ्यांचा काळिमा आगि पीडितांचे अश्रु दिसून येतात.
मनुष्यता जोपर्यंत दानवतेचा पराभव करीत राहील तोंपर्यंत गरॉ्की व प्रेमचंद
अजरामर राहतील. प्रेमचंद साहित्यांतील शिव होते. त्यांनी भवसागरांतील-
विष पिऊन आपल्या ललाटावर प्रेमाचा चंद्र आणि मत्तकावर देशभक्तीची,
मुन्शी प्रेमचंद ९७
*“ ५..€*९...४९-/९४-०/*४..»५./” ४...» १५००” ४५.५ ७-० १४५॥-€ १-८
०-१" *--€**-५५%-०/४%..»* "४. “00५५४५०” ४ .५४१५..»”-०५५५-.”/१-/0५-४५--/ ४-५ ५-/0१-”.” २ च
'गंगा धारण केली होती. मुसलमानांचा चांद आणि हिंदूची गंगा यांचें
सामंजस्य प्रेमचंदसारखा कलावंतच धारण करूं शकतो. ??
--““- श्री, शान्तिप्रिय द्विवेदी.
५६६ _, शेवर्टी १९२५ मध्ये जेव्हां आर्य समाजाच्या वार्षिक उत्सवासाठी
मी जावयाचे ठरविलें तेव्हां प्रेमचंद यांना भेटण्याचा मीं निश्चय केला. उत्सद
समास झाल्याजरोबर मी बनारसला पोचलो व तेथून प्रेमचंद यांच्या गांवची
चाट घरढी., वाटचाल करीत असतांना मनांत कोणकोणते विचार येत होते,
हँ कांहीं सांगतां येत नाहीं, पण तेर्थे पोचतांच मी निराश होऊन गेला.
प्रेमचंद घरी नव्हते, एक चिठ्ठी लिहून मी उदास होऊन परत फिरलो.
दुसऱ्या दिवशीं गंगास्नान करून होटिलपाशी येतो. तों माझ्या खोलीच्या
दाराशी एक ग्रहृस्थ बसले होते, कोगाची तरी वाट पाहत असणाऱ्या त्या
'गरहुत्थाने हंसून मला म्हटले, ' नमत्ते,
मीं विचारळे, ' आपग कोणास भेटावयास आलां आहांत? ?
६ महाशय सुदर्शन यांना. मी प्रेमचंद. !
लागलीच मीं त्यांच्या पायांवर मस्तक ठेवलें, त्यांनींहि माझ्या गळ्यांत गळा
'घाळून स्वागत केळे व बोलळे, “ काल आपणांस विनाकारण हेलपाटा पडला या-
बह्दळ मला फार दुःख झालें, पण भाईसाहेञ, ध्यानांत असूं द्या. त्याची शिक्षा
“भाज मला मिळाली बरं का ! दोन तास येथें बसावे लागळें ? प्रेमचंद यांच्या
शब्दांनी मी मोहित होऊन गेलो, कित्येक वर्षाचे आम्ही दोस्त असल्याप्रमाणे
आमच्या गप्पा झाल्या,
मीं विचारळे, ' आपण नवाजराय नांव कां सोडून दिलें! ?
प्रेमचंद हंसून म्हणाले, ' नवाब त्याला म्हणतात कीं, ञ्याच्यापार्शी जमीन-
जुमला खूप आहे, कांहीं मुलूख आहे. माझ्या पद्रीं मुलूख कोठला £
: मुलूख नसला तरी नवाब असतात ना. ?
: हे कथेचे नांब मात्र शोभून दिसेल, पण मला ह नांव घर्मेडखोर वाटलें.
चार पैसे जवळ नाहींत आणि नांव काय तर नवावराय ! या नवानापेक्षां
“ प्रेम बरें वाटलें, त्यांत सुख-संतीष तरी आहे.
असें म्हणून त्यांनीं एक हास्याची लकेर सोडून दिढी, तें त्यांचें खुलं
२५ प्रेमचंद कोण होते?
आणि दिलदार हात्य आजहि मला स्मरत आहे. आणि हृदयांत सुरीप्रमाणे
शिरून घुसर्ते आहे. ते दिवस गेले आतां ! ”?
-णाश्री. सुदर्शन,
6 विशेषतः हिन्दी साहित्यांत उपनाम धारण करण्याची एक प्रथाच
निमाण झालेली दिसते. पण कांही दिवसांपूर्वी जेव्हां घनपतरायजीने आपलें
नर्वे साहित्यिक नांव धारण केळे तेव्हां जणुं नव्या युगाच्या अस्तित्वास आरंभ
झाला. त्यांनीं आपली लेखणी प्रेमाच्या सेवेसाठींच जणुं अर्पण केली, तें केवळ
मानवी प्रेम नव्हते कीं लोको तर म्हणून समजलें जाणारे इशवरीयहि नव्हतें. तर
ते असे सत्यस्वरूपाचें होतं कीं, त्यामुळें मनुष्याच्या भोंबवतीची परिस्थिति बद-
ळून जाऊन आवदयक अशी क्रांति निर्माण व्हावी, ..त्यांच्या ' गोदान ? कादं-
बर्रींत भारतीय शेतकऱ्याची हृद्यविदारक कथा आपणांस वाचावयास मिळते.
ज्यांच्या सर्वस्वार्चे अनेक मार्गानी अपहरण झाळें आहे, मिथ्या विश्वास ब
सोटा घम यांबरच ज्यांचे लालनपालन झालं आहे व ज्यांना नेहर्मींच दारिद्रय
व क्रग यांच्याशी तांड' द्यावें लागते, अशा भारतीय शेतकऱ्यांचे चित्र या कथेत
आहे. ग्रामीण जीवनांतील सव गोष्टी यात तपद्लीलवार आल्या आहेत. खेडे-
गांबांत जी दुष्टता आणि कुटिलता आहे, जे सोंदर्य ब मठेपण आहे, जॅ
सुख-दुःख आहे, ज्या अद्भुत परिध्व्याति निर्माण होतात, त्या सवाचे उत्कृष्ट
दिग्दर्शन या कादंबरींत आठे आहि. .. प्रेमचंद केवळ साहित्यिक कलाकारच
नव्हते, त्यांनीं आपळी कला व आपले मानवजार्तासंबंधींचें ज्ञान यांचा
उपयोग देशसेवेसाठी केला. त्यांनीं केवळ प्रचाराच्या दृष्टीनंच विचार प्रकट
केळे असें नव्हे तर महात्मा गांधींच्या आदर्शनुसार त्यांनीं शेतकऱ्यांच्या हृद-
यांत शिरण्याचा प्रयत्न केला, ?
-णा श्री, प्रियरंजन सेन.
५६ प्रेमचंदजी साम्यवादी होतेच; परंतु वर्तमानकाळची सव समाजव्यवस्था
एकदम उखडून टाकून त्या जागी सीमान्तस्थानीं असणारा साम्यवाद प्रस्थापित
करणाऱ्या उग्र ब कट्टर साम्यवाद्यांपैकी ते नव्हते. ते भावपूर्ण साम्यवादी असून
-साम्यावादाची बरींच तत्त्वे त्यांना पूर्णपर्णे परिचित होती. दीन-दुःखी व गरीब
यांच्याबद्दल त्यांना नेहर्मी करूणा वाटे, साम्यवादांतील सर्वच गोष्टी चांगल्या
-आहेत. असे ते मानीत नसल्यामुळें त्यांना समजूतदार साम्यवादी म्हणणे युक्त
मुन्शी प्रेमचंद र्ट
होईल. त्यांना हें पण मान्य ह्वोर्त की, आज समाज ज्या वाईट त्थितीपर्यंत जाऊन
पोंचला आहे, त्यांतून मुक्तता द्वोण्यासाठी साम्यवादारचे कोणतेंहि रूप येथे
आणार्वे, आपल्या येथील जमीनदार ब भांडबलदार आपल्या खोट्या ताकदी-
मुळें अंधळे झाळे आहेत. यामुळें कोणत्या ना कोणत्या तरी रूपाचा साम्यवाद
या देशांत यावा असें त्यांना वाटे. ... सवोत महत्त्वाची गोष्ट ही कीं, प्रेम-
चंद् हवे थोर देशभक्त होते. सामाजिक व धार्मिक झगड्यांपासून आल्िप्त राहून
ते पहिल्यापासूनच पूण भारतवासी बनले होते. ते स्वतः कोणत्याहि एका
घमाचे, पंथाचे, समाजाचे नव्हते, तर ते स्वतःस फक्त हिंदुस्थानी समजत. !?
--- प्रो, अशफाक हुसेन.
५८ आज प्रेमचंद यांच्या निधनाने बहून शिवरानीदेवींच विधवा झाली
असें नव्हे तर राष्ट्रवाणीहि कांहीं काळपर्यंत विधवा झाली आहे. शिवरानी-
देवी आपल्या मुलांच्या तोंडाकडे पाहून तरी समाधान मानून घेईल, मित्रांच्या
सहानुभूतीवर धीर धरील, पण बिचाऱ्या हिन्दीनें आतां कोणाच्या आधारावर
बगून रहावे £! आतां प्रेमचंद भनण्याचा उत्साह कोणास येणार! ......
प्रेमचंदर्जींचा शेवटचा नायक होरी जणु प्रेमचंदांचें ह्वतःचंच चित्र आहे.
आमरग भांडबलदारांची शिकार होणें, प्राप्तीचा महत्वाचा भाग साहित्य-
सेवेसाठी खर्चे करणे, शेवटीं आपली मनःकामना पूर्ण होण्याच्या आधीच
परिश्रमाने विदीर्ण होऊन अकाल-काल-कवलित होऊन जाणें-हँ. प्रेमचंदार्चे
संक्षित जीवन आहे. आणि हच होरीचे चरित्र आहे. ”
--- श्री. त्रजनन्दन शर्मा.
“£ राष्ट्रमाषेसंबंधीं प्रेमचंदांचे विचार असे होते कीं, राष्ट्भाषेस हिंदी
म्हणा, उदू म्हणा, हिंदुस्तानी म्हणा, वस्तु एकच आहि. नांवा्शी आपला वाद
नसावा. जिवंत भाषा ही नेहर्मी जिवंत देहाप्रमा्णंच असते. ' झुद्ध हिन्दी *
हे निरर्थक शब्द आहेत. भारत जर शुद्ध हिन्दु असता तर त्याची भाषा
शुद्ध हिन्दी राहिली असती. येथे तर मुसलमान, खिस्ती, पारशी, अफगाणी
इत्यादि सर्व जाती आहेत. आपली भाषा या दृष्टीनें व्यापक रहावी. . ..
भाषासुंदरीस कोठडीत बंद करून आपण तिच्या सतीत्वाचें रक्षण कराल पण
त्याच वेळीं तिची प्रकृति मात्र बिघडून गेळेली असेल. तिचा आत्मा एवढा
बलवान् व्हावा कीं, तिचें सतीत्व व स्वात्थ्य दोहॉरचेंद्रि रक्षण व्हावे, आमच्या-
९७ ' प्रेमचंद कोण होते ?
* »€९.»€४ ४ ४.५/%,४ ७.५” ४-५ ४.४७. ४.४ २.»”६..५ ४.० ७०” ४९...” ४ ४.५४ ४.५४ ७..० ४१-०० १.५९ .»€' »/१.** .“* ९००” .” >€* »/”४-४४-/४-//१ “६.१ .»//१६.०/0%-/”
समोर झादर्श असा असावा कीं, आमची भाषा जास्तींत जास्त लकांना
समजावी.
-णा श्री. का, श्री, श्रीनिवासाचाय,
५६ मुन्शी प्रेमचंद हिन्दीचे सच्चे सेवक आणि तिर्चे मुख उज्ज्बल करणाऱ्यां-
पैकीं एक होते. योग्य सुपुत्र मिळवून हिन्दी गौरवास्वित व धन्य झाली आहि.
कांहीं लोकांचें म्हणणे आहे कों, हिन्दी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद देऊन
त्यांचा यथार्थ सन्मान केला गेला नाहीं. मो तर असें म्हणेन कीं, जो
खरोखरीच देशरत्न आहें, महान् पुरुष आहि, ज्याच्यांत सर्वोत श्रेष्ठ प्रतीचे
गुण आहेत, तो व्वतःच आदररूप आहे; त्याचा आदर कोण कसा करणार १
लोकमान्य टिळक काँग्रेसचे अधिपति झाले नाहींत म्हणून त्यांची यथार्थ पूजा
सर्व देश्यांत होत नाहीं असे आहे का ! याच प्रकारें प्रेमचंद संमेलनाचे अध्यक्ष
झाळे असते तर संमेलनाचाच गौरव झाला असता; प्रेमचंदांचा त्यांत
विशेषसा आदर कोणता ! प्रेमचंद यांच्या मृत्यूनंतर समस्त भारतवासीयांनीं
जो सच्चा व हार्दिक शोक प्रकट केला तो थोड्याच साहित्यिकांच्या व राष्ट्र-
पुरुषांच्या वांट्यास येण्यासारखा आहे. प्रेमचंद मिळून-मिसळून वागणारे
होते, नम्र होते, मधुरमाषी होते, सच्चे व सरळ होते.
“ण श्री. भगवानदास हालना.
५६ प्रेमचंद यांचें घर सुव्यवस्थित नव्हते. आंगणांत पाणीच पाणी पसरून
गेलें होर्ते. वस्तु नीटनेटक्या स्थानांवर नव्हत्या... सर्व काम सोडून प्रेमचंद
माइपाशीं गप्पा मारीत बसठे, सात बाजळे, साडेसात वाजले, आठ वाजण्यास
आले, गप्पांचा रंग चढत चालला, मी कितीतरी गोष्टी विसरून गेला. मी
प्रेमचंदांशी-हिंदीच्य़ा साहित्यसम्राटांशीं-जोळत आहे हॅहि मी विसरून गेलॉ.
मीं विचारलें :- बंगाली साहित्य हृदयास स्पर्श करणारे आहि नाहीं ?
प्रेमचंद :- होय. त्यांत स््री-मावना आधिक आहे. माझ्यांत तर ती
बेताचीच.
मी :- स्त्रीत्व आहे, म्हणून तें हृदयत्पी आहे
प्रेमचंद :- द्दो तर, जागजागी ते॑स्मरणशीलळ आ;हे, स्मृतीत भावनेची
तरलता अधिक असते, संकल्पांत भावनेची कठिणता असते.
७, ..
मुन्शी प्रेमर्चद ९८
पाहतां पाहतां प्रेमचंद यांचे डोळे बिचारपूर्ण झालि. दूरवर दष्टि टाकून ते
पाहं लागले. कोणते तरी एक स्वम़ जणुं ते पाहत होते. त्यांच्या वार्णीत थोडी
कातरता निर्माण झाली होती. त्यांचे उच्छ्वास जणुं सांगत होते, ' मी काय सांगत
होता तेंहि मळा समजत नाही. * प्रेमचंदांनी तरी बोलावयास आरंभ केला,
« जेनेन्द, मळा नीट समजत नाहीं. मी बंगाळी नाहीं, ते मोठे भावुक लोक
आहेत. भावुकतेमुळें जे जाणतां येतें तेथे मी पोंचं शकत नाहीं. मला ती
देणगी कोठून प्राप्त होणार १ ज्ञानाने जेथे पॉचतां येत नाहीं तेथें भावना पोचू
शकते. पण जैनेन्द्र, मी असें सांगतो. कों, काठिण्य सुद्धां हवे... ' हॅ म्हणत
असतांना प्रेमचंद एखाद्या मुलीप्रमाणे लज्जित झाले. त्यांच्या मिशा घनदाट
होत्या. त्यांतून कांहीं पांढरे केसहि डोकावत होते. तरी सुद्धां मी म्हणतो को,
ते एखाद्या मुलीप्रमाणे लानेनें चर झाळे आणि बोलले, ' ञेनेन्द्र, रवीन्द्र ब
दारद् दोघेहि महान् आहेत. पण हिन्दीसाठी काय तोच आदर्श असावा !
नाहीं, हिन्दी राष्ट्रभाषा आहे, माझ्यासाठी तर तो निश्चितपणे नाहीं.
श्र शः ग्र
६ जञेनेन्दर, चला कचेरीत जाऊं, ''' जवणखाण झाल्यावर प्रेमचंद बोलले.
निघण्याला मी उत्सुक होतोंच., ज्या ढंगाने त्यांनीं गाडीबाल्यास बोलावले,
ठरवले, त्याचें क्षमकुराळ विचारळें, त्याचा माझ्या मनावर विलक्षण प्रकारचा
ठसा उमटला, रस्त्यांत त्यांनीं मला विचारले,
£: काय जैनेंद्र, सामुद्रिक शास्त्रासंबंधीं काय मत आहे तुमचे ! ?
“६: आपला आहे विश्वास £ ?
“ काय सांगू १! पण कचेरीत एक दोस्त आहे, हात चांगला पाइतो
त्याने सांगितलेल्या कित्येक गोष्टी खऱ्या ठरलेल्या पाहून, हें शास्र पाखंड आहे
अर्से नाहीं वाटत. ?
:£: आपला विश्वास दिसतोय. मी कधींच नाहीं, .,आपला तर परमेश्वरा-
वरहि विश्वास नाहीं,
प्रेमचंद गंभीर होऊन बोलले -
५६ अनेन्द्र, मीं मघांच सांगितळे, मी परमेश्वराचा विचार करू शकत
नाहीं. माझा विश्वास बसत नाहीं. कसा बसणार ? पोरं भुकेने रडताहेत, रोगी
तडफडत आहे, ठिकठिकार्णी भूक, केश, ताप मला स्पष्टपणें दिसतो. ज्या
“२९ प्रेमचंद कोण होते ?
ःजगतांत या गोष्टींचे साम्राज्य आहे तेर्थे परमेश्वर कसा बसत असेल १? मला
तर दिसत नाहीं; यांत माझा काय दोष ! आणि कठिण गोष्ट अशी कीं, ईश्वर
झानळा तर त्यास दयाळू म्हणावयास इवें. मला तर त्याचे दयालुत्व कोर्ठेहि
दिसत नाहीं. मग त्या दयासागरावर माझा विश्वास कसा बसणार ! ?)
क शे शि
“६ ..« मरणाच्या आदल्या रात्रीं मी प्रेमचंद यांच्या खांटेशेजारी बसलो
'डोतो, सकाळीं सात वाजल्यापासून आमचें बोलणें चाढू हीते. चहूं दिशांस
शांतता पसरली होती. खोली ल्हान आणि अंधाराची होती. सर्वे जण अधवट
झोपेत होते. त्यांच्या भुखांतून अत्पष्ट-अस्पष्टसे शब्द बाहेर पडत होते. कानां-
पेक्षां मनानंच ते ऐकावे लागत होते. .. रात्रीं बारा वाजेपर्यंत “ हंस 'विषर्यी
चचा चाळू होती. आपल्या आहा, आपल्या आभिलाषा कर्धी त्रोटक राब्दांनीं,
तर कर्धी डोळ्यांनी ते मजजवळ प्रकट करीत होते. “हंस? व साहित्य
यांची चिंता त्यांना त्याहि वेळीं व्यथित करीत होती. ..इतक्यांत प्रेमचंद
खोलले. .. जेनेन्द्र ! ' एवर्देच बोळून ते गप्प राहिळे. मीं पुनः त्यांचा हात
हातांत घेतला आणि त्यांना सांगितळें, ' बाबूजी, आपण कोणतीच काळजी
नका करू, सर्व कांहीं ठीक होईल.
ते माझ्याकडे पाहूतच राहिळे ब पुनः म्हणाले, “ आदर्श काम
होईल का!
£ आदर्श १... * माझ्या मनांत विचार आला.
त्यावर * वादविवाद नको * म्हणून त्यांनी कूस बदलली व डोळे बंद करून
घेतले. त्यानंतर माझ्या मनावर जणुं व्यथेची धोंड पडल्यासारखे झालें. नाना
प्रकार्या चिन्तांनीं प्रेमवंदांवे प्राण अबघडळे होते. ' इंस साठी
जगण्याची इच्छा त्यांना होती; “ हंस ' बंद पडेल तर जगर्गे असह्य झाले
असतें त्यांना. ..मी त्या साहित्यसम्राटाला काहीहि आश्वासन देऊं शकला नाहीं.
थोड्या वेळांत ते बोलळे, “ तगमग फार होत आहे, पंखा वाळू करा, ?
पंखा चाळू केडा, त्यांना झोप कशी ती नव्हतीच. तकडीफ फारच होत
होती. गुपचूप डोळे बंद करून ते स्वस्थ होते.
दद्वा-पंघरा मिनिटांनी ते जोळले, ' जैनेंद्र, जा, झोप ध्या थोडी. !
मुन्शी प्रेमचंद १००
"४-०". -“५./”*%-€४-/४./१"५-/४-/४.” “५.४६... १५-”९४-१..४४-४१.०१ “* ५-“४./११-८-८-/४>€१-/* “४-५ ४-८१४-/0१४१- -/१-€ ४-४”
“५ ४४ “४६... ४.०४ ४५७४१ -“४-५४१५-”४१-४ १४८
आतां थोडाच वेळ राहिला आहे हँ मला काय माहीत ? मी झोपी गेलो
आणि सकाळ होतांच त्यांना अशी मूच्छो आली कीं, पुनः तीतून ते जागे
झाले नाहींत. ”
-- जेनेन्द्रकुमार
७ ७ &.
प्रेमचंदांची साहित्यस्वष्टि १ १२९
दविन्दी दी आपली राष्ट्रभाषा, चंदबरदाई, कनीर, तुलसीदास, मीराबाई, .
बिहारी, देव, भूषण, केशबदास वगैरे साहित्यिकांनी व संतांनी आपल्या
उपंदेदापर व भाक्तेपर वाणीने पावन केठेली अशी ही भाषा. मुन्शी प्रेमचंद
यांचा उदय होण्यापूर्वी या भाषेत कथासाहित्य कोणत्या प्रकारचें होते हें आपण
थोडक्यांत पाहूं, म्हणजे प्रेमचंद यांचें त्यान आपल्या ध्यानांत येण्यास अडचणं
पडणार नाहीं,
ज्या वेळेस माणसास भाषा हें साधन विचार व्यक्त करण्यासाठी सांपडलें
त्या वेळपासून मनुष्य हा गोष्टीवेल्हाळ प्राणी म्हणून प्रसिद्धीस आला आहे.
गोष्टी सांगणं आणि ऐकर्णे याची त्याला मनस्वी होस आहे. आपल्या प्राचीन
साहित्यांत वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत वगेरे ग्रंथांतून कथा ब उप-
कथा यांचाच भरणा विशेष आहे. एखादें अमूर्त तत्त्वज्ञान समजावून सांग-
ण्यास चारित्रकथेसारखें दुसरे साधन नाहीं, कित्येक वेळां या कथा कल्पितांतून
निर्माण झालेल्या असतात; आणि बहुतेक जुन्या वाड्मयांतीळ कथा या पद्यां-
तूनच होत्या, गद्य अगदींच नव्ह्ते असें नव्हे; पण प्रथा मात्र पद्यांत लिहिण्याची
असे. या जुन्या कथांची रुचि आजहि आपणांस वाटते. हिन्दींतील आधुनिक
काळांतील विख्यात साहित्यिक राधेश्याम कथावाचक, बदरीनाथ भट्ट, माघव
शकु, मेथलीशरण गुप्त, माखनलाल चतुर्वेदी, बिश्वंमरनाथ कौदिक, सुदश न,
जयशंकर प्रसाद इत्यादे आपल्या कथाकाव्यांसाठी कथानकेंहरि जुन्या वाडूमयां-
तून निवडतांना दिसतील.
आधुनिक काळांत गद्याचा प्रसार होण्यास कारणीभूत झालेली परिष्थातिः
२१०१ प्रेमचंदांची साहित्यख्टि
“0 *-0-॥ ४- 2४० 000४0४०. क ळे
हध्शा
७-४” ४८ ४-४४१-९ ४८ ५६४ १-४ ७ क्ट ण्स्ट
म्हणजे मुद्रणकलेचा शोध ही होय, छापण्याची यंत निघाल्यामुळे पुस्तके भरा-
भर निर्माण होऊं लागलीं. त्यामुळे मुखोद्गत करण्याची प्रवृत्ति सपत येऊन
'पाठान्तराच महृत्त्तु कमी झाले. आणि पाठान्तराची आवश्यकता न उरल्यामुळ
'पद्याची मातब्बरी हि त्या प्रमाणांत कमी झाली, सरळ ऐसपेस गद्यांत माणसे
लिहूं लागळीं, बाणाची कादवरी, आधुनिक गद्यांतीळ कथात्मक वाडूमयाची
गंगोत्री म्हणावयास हरकत नाहीं. पण हेहि ध्यानांत ठेवावयास पाहिजे कीं,
आधुनिक काळांतील कथा आणि कादंपरी यांचं स्वरूप इग्रजी कथासाहित्या-
वरून ठरत गेळें आहे. सतराव्या, अठराव्या, एकोणिसाव्या आणि विसाव्या
शतकांत इंग्रजी संस्कृतीशी जो आपला दीघ परिचय झाला, त्यामुळें ज्या ज्या
नव्या गोष्टी आपण स्वीकारल्या त्यांत कथासाहित्याचें स्वरूप ही महत्त्वाची भाज
होय. कथासाहित्यांतील वास्तवता म्हणजे जसे घडते तर्से लिहिण्याची प्रवात्ते
आगि पात्रांच्या मनांतील विकारांचे व विचारांचे चलनवलन मनोविज्ञानाच्या
आधाराने वगेन करण्याची पद्धति. आपल्य़ा कथासाहित्यांत ही पाश्चात्यांकडूने
घेतलेली आहे. अतिरंनिताकडून वास्तवाकडे, अद्भुताकडून यथार्थाकडे आपण
वळला आहोंत, ते इंग्रजी साहित्याच्या परिचयामुळे
असें सांगतात कीं, पाश्चिमात्य संस्कृतीचा पहिला प्रमाब बंगाली वाडूमया-
वर झाला, राजा राममोहन राय (१७७२-१८३३ ) हे बंगालचे आद्य
'गद्यठेखक मानले जातात, पण त्यांच्याहि पूर्वी रामवसु नांवाच्या लेखकाचं
६ प्रतापादित्य चरित्र ' बंगाली गद्यांत १८० १ मध्ये प्रासिद्द झालेल आहे.
त्यानंतर राममोहन राय यांच्या गग्यलेखनास सुरुवात झाली आहे, त्यांनीं कथा-
साहित्य जरी लिहिलें नसळें तरी कथासाहित्य निर्माग होईल अशा गद्याची
मात्र जोपासना केली. त्यानंतर ईश्वरचंद विद्यासागर (१८२०-१९०१)
या समाजसुधारानेंहि बंगाली गद्याच्या बाढीस चांगलाच हातभार लावलेला
आहे. यानंतरच्या काळांत बंकिमचंद्र चट्टोपाध्याय (१८३८-१८९४),
रबीन्द्रनाथ ठाकूर ( १८६१-१९४१ ), शरच्चंद्र चट्टोपाच्याय ( १८७६-
१९३८ ) वगैरे एकापेक्षां एक वरचढ असे कथासम्राट् बंगाली भाषेस
'लाभळे आणि त्यांच्या कथासाहित्याची थोरबी एवढी मोठी कीं, प्रारंभीच्या
'काळांत हिंदी, मराठी, गुजराथी यांसारख्या पूर्वपरपरासंपन्न अश्या भाषांतहि
बंगाली कथांच्या भाषांतराचा म्हणून त्या युगाचा एक विशेष बनून गेला,
मुन्शी प्रेमचंद १०२
हिन्दीच्या गद्य साहित्याची परंपरा जुनी असली तरी १८६० च्या आसपास
मुन्शी सदासुखलाल, इंशाअल्ला, सदलमिश्र, इत्यादि लेखकांना हिन्दी कथांचं
निर्मीते म्हणून मान द्यावयास पाहिजे. मुसलमानी संस्कृतीचा संत्रंध या
देशाशीं कित्येक दतर्के एकसारखा येत राहिल्याने उदू साहित्याचा परिणामहि
हिंदी साहित्यावर होणें अपरिहार्य होते. अलीफ लैला किंवा तिलस्म होशरुमा
वंगेरे फारसी कथा हिन्दीला निकटच्या वाटतात, मसनवीच्या दंगावर हिन्दु
कथानक सांगणारा मलिक महंमद जायसी (-म. १५४३ ) याचीं
: वद्मावत ? ही अदूभुत कथा एका वेगळ्याच कथापरंपरेस जन्म देणारी
ठरली आहे. मोखिक स्वरूपांत रूढ असणाऱ्या परीकथा, भूतकथा, तोता-
मैनांच्या कथा यांची वाढहि लोकसाहित्याच्या दृष्टीनें झाली असली पाहिजे.
तरी नांव घेण्यासारखा हिन्दींतील पहिला गद्यांतील कथालेखक म्हणजे इंशा-
अल्ला खॉ. यानें लिहिलेली “ रानी केतकी की कहानी ? ही उपन्यासवजा कथा
आजहि भाषा ब वातावरण या दृष्टीने वाचण्यासारखी आहे. सदलमिश्रार्चे
६ नासिकेतोपाख्यान हि कादंबरीच्याच धर्तीवर हिंदु पुराणाच्या आधारें
निमोण झालें आहे.
यानंतरचे युग भारतेन्दु हरिश्रंद्र (११८५० - ८४) यांनीं प्रवर्तित
केलेलें. हिन्दी भाषेचे रूप संस्कृतानेष्ठ असार्वे की उ्दनिष्ठ असावें,
असा वाद अजूनहि चालतो. त्या वादाचा निर्णय मात्र या श्रेष्ठ साहि-
त्यिकानें पूवीच घेतलेला आहे. उर्दू किंबा संस्कृत यांचीं रूपें हिन्दीला
देण्याऐवजी दोहोंच्यामधील सखतःचें असें एक स्वतंत्र रूप हिंदीचे असावें असा.
सार्थ आग्रह धरणारा हा पट्टीचा लेखक होता. भारतेन्दु हरिश्चंद्र यांनी
हिन्दींत जवळजवळ शांभर लद्दानमोर्ठी पुस्तर्के लिहिलीं. त्यांमर्धीळ नाटकें
विशेष लोकप्रिय अशीं आहेत. भारतेन्दु हरिश्चंद्र यांच्यानंतर हिन्दींत एक
मोठी परंपरा निर्माण झाली, पंडित बालकृष्ण भट्ट (१८४४- १९१४ )
यांच्या ' नूतन त्रह्मचारी ?, “ सौ अजान एक सुजान ' वगेरे कथा प्रसिद्ध
आहित. श्रीनिवासदास ( १८५ १-१८८७ ) यांनीं हिन्दी भार्षेतील नांव
घेण्यासारखी ' परीक्षागुरु ? ही पाहिली कादंबरी लिहिण्याचे श्रेय पटकावले.
यांच वेळीं राधाकृष्णदास यांची * निःसहाय हिंदु * नांवाची सामाजिक कादंबरी
प्रासेद्ध झाली, राधाचरण गोस्वामी यांची “ विरजा ' आणि किशोरीलाल
१०३ प्रेमचंदांची साहित्यसाष्रे
गोस्वामी यांची ' कुसुमकुमारी ' या कथांचाहि उळेख या ठिकार्गी करा-
बयास पाहिजे. किंशोरीलाल गोस्वामी यांनीं जवळजवळ साठ छोट्या-मोठ्या
कथा लिहिल्या आणि त्या फारच लोकाप्रेय झाल्या होत्या, यानंतरचा प्रमुख
कादंबरीकार म्हणजे देवकीनंदन खत्री. हिन्दी साहित्यांत प्रेमचंद यांच्या-
अगोदर यांच्याखेरीज दुसरा लोकाप्रिय कथाकार झाला नाहीं. अद्भुत घटना
व कुतूहलप्रधान मनोरंजक कथानक या दृष्टीनें देवकीनंदन खत्री यांच्या
८ चन्द्रकान्ता ? आणि '* चन्द्रकान्ता सन्ताति या. कथांनी लोक वेडावून
गेले होते.
यानंतरच्या काळांत महाबीरप्रसाद द्विवदी (१८७०-१९३७) या
एका प्रख्यात युगप्रबतकाचा उल्लेख करावयास पाहिजे. त्यांनीं ' सरस्वती *
नांवाची मासिक-पत्रिका काढून हिन्दी कथासाहित्यास एक नवें क्षेत्र प्राप्त
करून दिलें. ' इंदु ', ' ग्रहूलक्ष्मी ' वगेरे मासिके पुढें कथासा हित्यामुळेंच
लोकप्रिय बनून गेलीं. यानतर हिन्दीच्या कथासाहित्यास नवा बहर येत राहिला.
पं. विश्वमरनाथ शर्मा कोशिक, पं. चंद्रधर शर्मा गुळेरी, पं. ज्वालादत्त शमा,
श्री, चतुरसेन शास्त्री, पं. जयशंकर प्रसाद आदि एकापेक्षा एक सरस आणि
बरचढ असे कथालेखक हिन्दी भाषेस लाभम&; आणि याच काळांत हिन्दी
कथाविश्वांत एक तारा चमकून गेला, प्रथम प्रथम कोणाचेंहि लक्ष या नक्षत्रा-
कडे' गेलें नसले तरी आपल्या तेजाने त्यानें सर्बाोर्चे चित्त आपणांकडे ओढून
घेतले ब इतरांना अनेक प्रकारे मार्ग दर्शविण्याचें सामथ्ये स्वतःमध्ये असल्याचे
त्यानें सिद्ध केलें. या प्रकाशमान ताऱ्याचे नांव मुन्शी प्रेमचंद !
प्रेमचंद यांच्या कथा-साहित्यावर व विरोषतः भाषेवर उदुंची छाप बरीच
आहे. प्रेमचंद यांचें प्रारांभिक शिक्षणह्दि उदूंमधूनच झालें असल्यामुळें उदू भार्षे-
तील कथा वाचण्याचें वेड त्यांना लागलें होतं, त्यामुळें उदू कथासाहित्याचाहि येथें
थोडक्यांत निदेश केला पाहिजे, एकोणिसाव्या शतकाच्या पहिल्या अधोत सैयद
हैदर बख्शा हैदरीनें अमीर खुशरो याच्या मसनवीचें “ कित्सा लेला मजनू * नांवार्ने
भाषांतर केले. “ तोता कहानी ' हॅ एका संस्कृत कथेचें रूपांतरह्वि त्यानें उर्दू
भाषेत केलें होते. याशिवाय हतीमताइंच्या कथेचा अनुवाद “ आरायशे मह-
फिल? म्हणून त्यानें केला आहे. काजीम अली याचा कालिदासाच्या “ शाकुंतल
नाटकाचा अनुवाद व निह्ालचद लाहोरी याची ' किप्सा गुलजकावली ! ही
मुन्शी प्रेमचंद १०४
कथा यांचाहि उल्लेख प्रामुख्याने करावयास पाहिजे, मतहरअलीर्ने संस्कृत-
मधील 'वेतालपंचविशी'चा उद् अनुबाद केलेला होता. उदूमधील प्रसिद्द कथा-
लेखक म्हणजे मिझी रजजअली, त्याची “ फिसाने अजायन ? ही प्रासिद्ठ प्रम-
कथा सवोच्या चित्तास भुरळ पाडगारी ठरली, नजीर अहमद हे उदंतील
पहिले कादञरीकार मानळे जातात. प्रेमचदांच्यावर सवीत मोठा प्रमाव
पाडणारा उर्दू कथाकार म्हणजे रतनलाल सरशार, याच्या एका उदू कादंबरीच्या
अनुबादानॅच प्रेमचंद यांची साहित्यसेवा सुरू झाली
याशिवाय शरर, मुहृमद हादी रुसवा इत्यादि उर्दू कादंभरीकारांच्या
कथाहि प्रेमचंद यांच्या वाचण्यांत आल्या होत्या. प्रेमचंद यांचें प्रारंभीचे
लिखाण बहुतांशी उर्दूतच असे, याचें कारणहि आतां ध्यानांत येण्यास अडचण
नसावी. इंग्रजी, उदू, बंगाली इत्यादि भाषांतील कथासाहित्याचें अध्ययन
प्रेमचंद यांनीं केळ असले तरी त्यांची कथारसष्टि अगदीं स्वतत्र ब वेगळी
अशी आहे. श्रेष्ठ कलाकाराचें भ्रष्ठत्वहि याच स्वतंत्र स्वरूपांत असतें.
या पाश्वेभूमीवर प्रेमचंद यांच्या कथासृष्टींची उभारणी झालेली आहे.
हिन्दी भाषेस पुवेपरंपरा पद्याच्या दृष्टीने फार मोठी असली तरी आधुनिक
काळांत मात्र बाहेरच्या प्रान्तीय भाषांच्या कथाकारांना तोंड देणारा पहिला
कादंबरीकार म्हणजे मुन्शी प्रेमचंद होय. तोपर्यंतच्या काळांत उदू-बंगाली
यांच्या भाषांतराचे तरी काम चाले किंवा त्यांच्याच धर्तीवर अदभुत अशा
कल्पनारंजित वबातावरणांतील कथा लिहिल्या जात असत. त्यांचे त्वरूप. कशा
प्रकारचें होतें तें वर केलेल्या संक्षितत वर्णनावरून ध्यानांत येण्यासारखे आहेच.
मनोरंजनाखेरीज दुसरा हेतुच त्या कथाठेखनांत नव्हता. देशकालपरिषस्थिती-
ची जाणीवहि फारच थोड्या ठिकाणा दिसून येई. मुन्शी प्रेमचंद यांची
महत्ता एवढ्याचसार्ठी की, त्यांच्या कथाकादंबऱ्यांतील अप्रातेम वास्तववादी
कथानक, तृक्ष्म स्वमावचित्रण, खटकेबाज पण सजीव संवाद, मनोविज्ञानाचा
सखोल अभ्यास आणि देशकालपरिस्थितीचा गंभीर दृष्टीनें केलेला विचार
इत्यादि गोष्टींना त्यांनी त्थान दिलेलें आहे. त्यामुळे या साहित्याच्या वाचनार्न
ब!चकाचें मनोरंजन तर होतेंच पण त्याच्या मनोदृत्तिहे सट्भाबनांनी उजळून
निघतात, देशांत चाळू असणाऱ्या राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक
चळवळींत भाग घेणारीं पात्रे कथाकादंबरीत असल्याकारणाने प्रेमचंद यांचे
१०५ प्रेमचंदांची साहित्यस्दष्टि
साहित्य खऱ्या अ्थोर्न राष्ट्रीय धन म्हणार्वे लागेळ, शिवाय अनेकवार
सांगितलेली महत्त्वाची गोष्ट अश्शी की, नने दलित आहेत, पीडित आहेत,
अशांच्या दुःखाचे व्गन तन्मयतेने व कळकळीने हिन्दी भाषेतच काय पण
भारतीय भाषांतहि करणारे पहिले लेखक म्हणजे मुन्शी प्रेमचंदच. प्रथम यांच्या
'साहित्यसष्टीवरून एक ओझरती नजर टाकू ब मंग वबिचारदर्शनाचा पारिचय
करून घेऊं.
मुन्शी प्रेमचंद यांचें साहित्य विपुल व विविध प्रकारचें आहे. कांही प्रपुर
कादंबऱ्यांचाच परिचय आपण करून घेणार असलां तरी त्यांच्या साहित्याच्या
व्यापाची कल्पना यावी म्हणून एक आराखडा खाली दिला आहे --
कादंबऱ्या ।-- १ सख्टी रानी, २ वरदान (१९०२), २ प्रेमा अथबा
प्रतिज्ञा (१९०६ ), ४ सेवासदन (१९१६ ), ५ प्रेमाश्रम( १९२२ ),,
६ रंगभूमि( १९२५ ), ७ निर्मला( १९२३ ), ८ कायाकल्प(१९२८),
९ गमन (१९३१), १० कर्मभूमि (१९१२ ), ११ गोदान (१९३६),
९२ मंगल्सूच ( अपूर्ण ),
कथा :--- सोजे वतन, सप्तसरोज, नवनिधि, प्रेमपूर्णिमा, प्रेमपचीसी,
प्रेमतीथ, प्रेमद्वादशी, प्रेमप्रसून, प्रेरणा, पांच फूल, ग्राम्यजोवन की कहानिया,
नारी, नारीजीवन की कह्यानैयॉ, समरयात्रा, मानसरोवर ( ४ भाग ), अमि-
समाधि, कफन इ०
नाटके :-- प्रेम की वेदी, कविता, संग्राम,
अनुवाद :-- सृष्टि का आरंभ, फिसाने आझाद, सुखदास, अहंकार,
इंडताल, चांदी की डिनियॉ, न्याय,
बालोपयोगी :--- मनमोदक, कुत्ते की कहानी, जंगल की कहानिया,
टॉल्स्टाय की कहानिया, दुर्गादास, रामचर्चा,
निर्बध :-- कुछ विचार, कडम, तेलवार और त्याग, मौ. शेख सादी.
पश्न £4-- हस, जागरण.
विसाव्या शतकांत हिन्दी भार्षेत महावीरप्रसाद द्िंवेदी यांच्याखेरीज
इतक्या विस्ताराचे व महत्त्वाचें वाडूमय कोणीहि निमोण केलें नाहीं, तरी
प्रेमचंद यांच्या उदू साहित्याचा हिशोभ य ठिकाणी फारसा विचारांत घेतला
नाहींच, शिवाय १९०६ पासून ' जमाना ? पत्नांत व पुढें इतरत्रहि अनेक
मुन्शी प्रेमचंद १०६
“७
४-८.
ळेख त्यांनीं लिहिले, प्रेमचंद यांनी जवळजवळ दहा हजार पृष्ठाचे उत्कृष्ट
साहित्य निमोण केलें.
प्रेमचंद यांच्या साहित्याचा पारेचय करून घेतांना एक गोष्ट ध्यानांत
ठेवली पाहिञे कीं, त्यांनीं आपे मन सतत प्रगतिशील ठेवलें, देशांत होणाऱ्या
सामाजिक व राजकीय क्रांतीकडे त्यांचें जाणीवपूर्वक लक्ष होते. सन १९०८-०९
मध्ये ज्या वेळी त्यांनीं * जमाना * मध्ये लिहिण्यास प्रारंभ केला तेव्हां आर्य-
समाजाचे आन्दोलन जोरांत होते. हिन्दु समाजाच्या मध्यमवर्गाने त्यांत भाग
घेऊन संमाज सुधारण्याचा प्रयत्न चालविला होता. प्राचीन परंपरागत रूढि
आणि नवविचार यांव दंद्रयुद्ध सुरू झालें होतें. जुन्या विचारांची थट्टा
नवीन लोक करीत असत. नव्या-जुन्याचा संघर्ष ब सुधारणावाद यांचा
परिचय कथाकार प्रेमचंद यांना निश्चितपर्णे होता. विधवाविवाह, बालविवाह,
हुंडापद्धाति इत्यादि अनेक निकट प्रश्न त्या वेळीं समाजसुधारकांसमोर होते.
कॉग्रेसचे राजकारणदि सुरू झालें होतें. १९१४ मध्ये महायुद्वास प्रारंभ
झाल्यामुळे राजकीय प्रभास चांगलीच धार प्राप्त झाली होती. महायुद्धाच्या
समास्तीनंतर इंग्रज सरकारनें “ रोलट अँक्ट ' पास केला. त्यांतून मिळालेले
इक पुढाऱ्यांना मान्य नव्हते. सन १९१९ मध्यें महात्मा गांधींची राज-
कारणांत प्रवेश करण्याची तयारी चाळू होती. शत्रिटिश सरकारच्या विरुद्ध
असंतोषाचा फैलाव सर्व देशभर झालेला होता. विदेशी वस्तूंवर बहिष्कार,
राष्ट्रीय संस्थांची स्थापना, खादीचा प्रचार, इत्यादि राष्ट्रीय कार्यक्रमांना
चांगळीच गति मिळाली होती.
सन १९१९ च्या आरंभीच पंजाबांत. जालियनवाला बार्गेतील प्रसिद्ध
भीषण असें हत्याकांड झालें, त्यामुळें राजकीय चळवळीस जोराची चालना
मिळाली, १९२०-२१ मर्ध्ये महात्मार्जीची असहकाराची चळवळ सुरू
होऊन सञंध हिंदुस्थान खडबडून जागा झाला, आठ वर्षांतच सन १९२३२०
मध्ये महात्मा गांधीचे दुसर॑ आन्दोलन सुरू झालें. सन १९३५ भधील
मिठाचा सत्याग्रह्हि उग्र प्रमाणांत राजकीय स्वरूप धारण करणारा होता. या
सव जाग्रतीमुळें हिन्दुत्थयानांत एक प्रकारचें नवचैतन्य निर्माण होण्याच्या
वेळींच मुन्शी प्रेमचंद यांची बहुप्रसवा व सामर्थ्येवान् लेखणी पुढें सरसावली
व मध्यमवर्गापासून खेडेगांवांतील शेतकरीवगापर्यंतर्चे भारतीय लोकजीवन तिर्ने
१०७ प्रेमचंदांची साहित्य खाणे
*.५४४./४१७०/१४/५१५//४४ -“४८/४-” ४५.-//५-९५-/५//४/€४-//५/८४.” ४८१०-९५-९५.” ६- ४.» ४९..»”९..५/४५.५८४...//४./५४१,”१_ ५४” २.//४../”२..८”९०/९..” ४०७”
४२.८ “प्न
प्रमाबीपणे चित्रित करून दाखविलें. प्रेमचंद यांच्या कलाकृतींतून तत्कार्लान
समाजांतील राजकीय-सामाजिक संत्रषष कोणत्या प्रकारचा होता हॅ तर स्पष्टपणे
दिसून येतेच; परंतु हिंदुस्थानचा वीस वर्षांचा राजकीय इतिह्ासहि प्रेमचंद-साहित्य
स्थूलरूपार्ने वाचकांपुढे ठेवण्यास समर्थ असें आहे. आर्य समाजाची चळवळ,
समाजसुधारकांचे विचार, गांधींचा सत्याग्रह व असहकार आणि साम्यवाद
या चार प्रमुख आन्दोलनांचा परिणाम प्रेमचंद यांच्या साहित्यावर पडलेला
दिवून येतो. प्रेमचंदांच्या लोकप्रियतेची कारणेहरि यामुळे ध्यानांत येण्यासारखी
आहेत. सामाजिक किंवा राजकीय प्रश्न हातीं घेऊन त्याभोवती कथानक.
गुंफण्याची हातोटी प्रेमचंद यांना उत्तम प्रकारे साधली होती, अत्यंत रोचक,
मनोरंजक व गतिपूर्ण कथानक त्यांच्या कादंबऱ्यांतून असे. व्यक्ति, वर्ग किंवा
समाज यांच्या मानासिक हालचालीचा बारकावा त्यांच्या कथासाहित्यांत दिसून
येत असल्याकारणानें वाचकांना तेथें सजीवतेचा साक्षात्कार द्वोई. प्रेमचंद
मुख्यतः कलावंत होते, पण त्यांच्या कलेने देशकालपरिस्थितीकडे डोळेझांक.
केली नाहीं. देशांतील कित्येक समत्यांची चचा त्यांच्या कादंबऱ्यांतून झालेली
दिसून येईल.
प्रेमचंद यांच्या प्रत्येक कादंबरीचा थोडक्यांत परिचय करून घेतल्यास
किती विस्तृतपर्णे त्यांनी आपली कष्ठात्मक दृष्टि देशासाठी वापरलेली आहि है
घ्यानांत येईल. देशांतील घटनांची वाडू्मयांत दखल घेणारा प्रेमचंद यांच्या-
एवढा कथाकार आपल्या देशांत झालेला नाहीं. रवीन्द्रनाथ किंबा शरदूघाबू
यांचे साहित्य कांहीं अपबाद सोडून बहुधा देशकालपरिष्थिति यांचा विचार
करणारें दिसत नाहीं. प्रेमचंद-सादित्यांत मात्र पदोपर्दी भोवतांच्या समस्यांचा
विचार झालेला दिसून येतो. आणि महत्त्वाची गोष्ट अशी कीं, त्यामुळें त्यांच्या
कथांना क्षणभंगुरता मात्र आलेली नाहीं. बहुधा असे होतें कीं, कोणत्या तरी
एखाद्या राजकीय किंवा सामाजिक प्रश्नावर कादंभरी लिहिली कीं कांही काळ-
पर्यंत तिचा बोलबाला राहतो; पण तो सामाजिक वा राजकीय प्रश्न संपत
आला कीं, त्या कादंबरीचे महत्त्वह्रि संपून जाते. प्रेमचंद यांच्या कोणत्याहि
कार्दैबरीचें स्वरूप असे नाहीं. याचे कारण अर्से कीं, त्यांच्या कादंबऱ्यांची कथा-
नकॅहि मनोविश्ञानाच्या आधारावर मोठ्या कलात्मक रीतीनें गुंफलेली असतात...
त्यामुळें त्यांतील सजीवता अमर होऊन राहिलेली आहि.
५.”९१./४.”१४५.” »“-//४*-/६.४>५.”९१ »“१//%--५-<-./-<€*-*५-<*.*.
- मुन्शी प्रेमचंद १०८
( १) रूठी रानी:---ज्या प्रकारे प्रेमचंद यांनीं प्रारभींच्या काळांत
ऐतिहासिक कथा लिहिल्या त्याचप्रमार्ण त्यांनीं ही एक छोटीशी ऐतिहासिक
कादंगरी लिहिली, भारतवषांच्या इतिहासांत पठाण आणि मांगल यांची राज-
सत्ता स्थापन करण्यासाठी जी स्पधा सुरू होती तिच्यासंबंधींची ही कथा
आहे. रजपूत वीरांच्यांतहे आपापसांत भांडणे होत असत; त्यामुळें त्यांच्याहि
पराक्रमास फारशी किंमत राहिलेली नव्हती. या कादंबरीची नायिका जेसल-
मेरचा राजा मोनकिरण याची मुलगी उमादेबी ही आहे. या रावळचें मार-
वाड' देशाचा राजा मालदेव याच्याशी शत्रुत्व होत. उमादेवीच्या सौंदर्याची
सर्वत्र चचो होत असे. मारवाड' देशाच्या राजाने तिला मागणी घातली.
रावळनें ही तूचना पर्संत असल्याचा देखावा दाखवून मालदेवच्या हत्येचा
कट उभारला, पण राबळची राणी व उमादेबी यांनीं कटाची ज्रातमी आर्थीच
मालदेवास दिलेली होती. पुर्ढ मालदेव व उमादेबी यांचा विबाह होतो पण
कांहीं कारणावरून उमादेवी रुष्ट झालेली असते. राजाची उच्छृंखलता, सवबती-
चै कारस्थान, उमादेवीचा स्वाभिमान इत्यादि कारणांमुळे राजा-राणी
यांच्यांत सख्य निर्माण झालें नाही. याच समयास शोरशहानें हुमायुनास
दिल्लीच्या गादीवरून हाकलून दिलें व आपलें राज्य चाळू करून मारवाड
देशावर आक्रमण केडें, मालदेवार्ने हें आक्रमग परतवून लावलें, पण त्याची
तरुण राणी उमादेबी मात्र जन्ममर रुष्ट झाळेडीच होती. राजा मालदेवच्या
निधनानंतर ती त्याच रागावलेल्या मनःस्थितीत सती गेली.
प्रेमचंद यांनीं या कर्थेत नेहमीच्याच सामग्रीवर कथेची उभारणी केलेली
आहे. रजपुतांची देशभक्ति व त्यांचा पराक्रम वाखाणण्यासारखा असला
तरी आपापसांतील फूटहि अर्ती देशाला विघातकच ठरते, हें तत्त्व प्रेमचंद
यांनी या कादंबरीत तचित केळे आहे. याशिवाय बहुपत्नीत्वामुळें निमाण
होणारे पेचप्रसंग, राजमवनांतील कारस्थाने, ग्रहकलह इत्यादींचे वाईट परि-
णामहि या कर्थेत वाचावयास मिळतात. रजपूत जातीत त्या काळीं असणारी
स््त्रिपांची परिस्थिति लिहितांना प्रेमचंद सांगतात, “' वयांत आलेली मुलगी
. ही बिनर्शिंगांची गाय आहे. मातापिता तिचें रक्षण करतात व मनास येईछ
श्याच्पा दावणीस बांधून देतात. ?
१०९ प्रेमचंदांची साहित्यसाष्टि
“*-.-€% “४-५ ४.” "४-./ “”-€* /*९
_»"१ »* /४ /४./../ १..८ “* > *-“///१ **.»€४ /€९५ ५८-0५.” १-४” १.” १. ४७. *-* -“0४// "१५५ ४१४० ४-४ ४. ५.४ "२..””१.४५./४७.४./७ ७.०४
(२) वरदान :-- सन १९०५-६ सालीं प्रेमचंद यांनीं ही कादंबरी
लिहिली. जगांत या वेळीं आर्थिक दृष्ट्या मोठंच संकट निमोण झालेलें होतें.
जपाननें रशियाचा पराभव केला असल्यामुळें पूर्वेकडे एक नवें तेज उदयास
आल्याचा साक्षात्कार पश्चिमेकडील राष्ट्रांना झाला होता. आशियांतील राष्ट्रांत
देवप्रेमाची भावना उदित होऊन परकीय सत्तेविरुद्ध असंतोष निर्माण
झालेला होता. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक तर हिंदी राजकीय असंतोषाचे
जनक म्हणून ओळखले जाऊं लागले होते. प्रेमचंद यांच्या या कादंबरीचा
विषयहि या काळांत उदित झालेल्या देशभक्तीचाच आहे. भारताची सुशील
नारी सुवामा हिचें पवित्र दर्शन पाहिल्यानेंच प्रेमचंद यांनीं घडावेले आहे. ही
सुवामा देवीची उपासना करते व देशाचा उद्धार करणारा पुत्र दे, अशी
प्राथना करते. देवीच्या प्रसादामुळे सुवामास पुत्र होतो. त्याचें नांव प्रताप.
या प्रतापची ब विरजन ( त्रजरानी ) यांची ही प्रेमकथा आहे. कथानकांत
अनेक गुंतागुंती व जटिलता आहे. प्रेमभंगामुळे प्रतापर्चे संन्यासग्रहृण आणि
त्याची देशकार्यमझता यामुळें कादंबरीस देशभक्तीचा साज चढल्यासारखा
दिसतो. कादंबरी पहिल्यानें उदू भाषेंत लिहिलेली होती; आणि तिचें नांव
६ जलबाए इसार? ( त्याग का दिग्दर्शन ) असें होतें. प्रेमभंगामुळे आत्महत्याच
करण्याची प्रश्नरति बंगाली कथाकारांच्या साहित्यांत दिसून थेते. प्रेमचंद यांनी
या प्रेमवेड्यांना दुसरा एक अधिक सकस व चांगला मार्ग सुचविला आहे,
तो म्हणजे देशभक्तीचा,
प्रेमचंद यांच्या या प्रारंभीच्या कादंबरीत आदशीवादास प्राधान्य देण्यांत
आलें असलें तरी त्यामुळें पात्रांच्या स्वमावरचर्नेते अनेक दोष निर्माण झाले
आहित. तंत्ररृष्टयाहि अनेक दोष या कादंबरीत आहेत. कित्येक ठिकाणीं
आतिशयोक्ति तर किऱेक ठिकार्गी चुकीची माहितीहि या कादंबरींत आढळते.
अर्से असलें तरी कादंबरीचा विषय नव्या दृष्टीने हाताळलेला असल्यामुळे एक.
नवा लेखक हिन्दींत उदयास आल्यार्चे या कादंबरीने जाहीर झालें. प्रेमचंद
यांच्या पुढील कादंबऱ्यांकडे लोकांचें लक्ष वेघलें गेलें.
(३) प्रेमा अथवा प्रतिज्ञा $-- दी कथा सुद्धां पहिल्याने उदू भाषेत
८ हूम खुमी ब हम कत्नाब ? या नांवाने प्रसिद्ध झाली होती. सन १९०५.
च्या सुमारास प्रासिद्ध झालेल्या या कादंबरींत प्रेमचंद यांनी सामाजिक प्रश्नांचा
विचार केला आहि. स्वातंन्याच्या चळवळीबरोबरच समाजसुधारणेचे आन्दो-
'मुन्शी प्रेमचंद ११०
लनहि या देशांत त्या वेळीं चाळू होत, आर्थ समाजाच्या चळवळीस महत्त्व
प्रात झाळ॑ असल्यामुळें प्रेमचंद यांच्या या कादंनरींत त्याच चळवळीच्या
'पार्थ्भूमीवर कथानकाची उभारणी झालेली आहे. अस्पृश्योद्धार आणि विधवा-
विवाह ही समाजसुधारणेर्ची दोन महत्त्वाची अँर्गे असून ' प्रतिज्ञा ? कादंबरीत
मुख्यतः विधवांच्या करुण परिस्थितीची चर्चा आलेली आहे. कथानक प्रेमा-
संघंधीर्चे असलें तरी त्याबरोजर विधवांच्या दुःखद अवस्थेचं विवेवन आलें
आहि. मुन्शी प्रेमचंद यांच्या वैवाहिक जवनाचा परिचय ज्यांना आहे त्यांना
या कादंबरीचे मर्म चटकन् समजेल. लहानपणीच प्रेमचंद यांचें लम एका कुरूप
ब अडाणी स्त्रीशी झालें असल्यामुळें प्रेमचंद संदैव उद्बिम्न असत. ते या
संबंधास “ विवाहू ? म्हणावयास तयार नव्हते. वैवाहिक आयुष्याची ही विटंभना
प्रेमचंद यांनी स्वतः भोगली होती आणि कांहीं काळाने त्यांनीं एका विधवेशीं
'छम़ करून दुसऱ्या एका प्रश्नाचीहि अनुभूति घेतली होती. अशा प्रकार
विवाहाचे स्वरूप व विधवाविवाह हा या कादंबरीचा विषय प्रेमचंद यांच्या
चरित्रांतहि अस्फुट का होईना पण दिसून येतो.
मानवी मनाच्या हालचालीचेंहि सूक्ष्म चित्रण या कादंबरीत वाचावयास
मिळतें. ' पूर्गा? हिच्या जीवनांतील प्रश्न मोठा महत्त्वाचा आहे. उत्पन्नाचे
साधन कारही नाहीं, घरची इस्टेटहि नाही, अश्या अवत्थेत समाजाच्या चमत्कारिक
रचनेंत विधवा स्त्रीने काय करावें १ त्यांचा प्रश्न केवळ आध्यात्मिक वा नैतिकच
नाहीं तर मीठभाकरी तरी त्यांना सुखार्ने कशी मिळेल हा आहे. प्रेमचंदांनी
तिला वनिताश्रमाची वाट दाखविली आहे तीहि कितपत योग्य आहे, याचा
विचार करणें अगत्याचे आहे. या कादंबरीतील पूर्णी त्या आश्रमांत झाडलोट
करून झोपडी उभारते व कृष्णाच्या मूर्ति स्थापन करून त्याच्या पूजनांत
रममाण होते, असे दर्शविळे आहे.
(४) सेवासदन : -- प्रेमचंद यांची गाजलेली अशी ही पहिली
कादंबरी, हिन्दी वाचकांनी हिचें मनापासून स्वागत केळे, या यशामुळे प्रेमचंद
उदू भाषिकडून हिन्दी भाषेकडे वळले, समाजांत वेदय़ाव्यवसायास कितपत
स्थान आहे ! वेद्याद्राते बंद होईल काय £ कोणत्या सामाजिक परिस्थितीमुळे
'घरांतील कुलीन स्त्रियाहि या वाममा्गास लागतात ! वेद्यावृत्ति समाजास
कलंक चढविणारी असल्यामुळे तिचा अंत व्हावा, म्हणून प्रेमचंद बांचा हा
११९ प्रेमचंदांची साहित्यख्टि
प्रयत्न होता. वेऱ्यांसार्ठी “ सेवाश्रम ' सारखी संत्या निमोण करण्याचा मार्ग
त्यांनीं दर्शविला असला तरी हेहि प्पष्ट केळें आहे कीं, निष्ठुर असलेला समाजहि
या हीन प्रवृत्तीस कारणीभूत आहे,
६ सेबासदन *चा प्रारंभ दुसऱ्याच एक प्रश्नाने झाल्यासारखा दिसतो. त्रिटिश
पोळीसपद्धति किती नादान व अत्याचारी होत राहिली आहे, याचें दर्शन
प्रारंभी होते. समाजरक्षण व जनसेवा हीं दोन प्रमुख क्तेव्यें सोडून लांच-
छुचपत, भ्रष्टाचार, बेइमानी करण्यास चांगली माणसेंहि कशीं प्रदत्त होतात,
हे कृष्णचंद्र याच्या उदाहरणावरून प्रेमचंद यांनीं दर्शित केलें अहे.
कथेची नायिका सुमन मानिनी व दृद्टी मुलगी आहे. सुख व आरामांत
जीवन व्यतीत करून ती एका मधुर अशा स्वप्नांत दंग होती. पण लग्नानंतर
तिला सुख मिळालें नाहीं, कडु व कठोर अनुभव प्राप्त झाल्यामुळें तिला
'छंकंद्र या समाजाबद्दलच घुगा निर्माण झाली. समाजांत सतीत्ब राखणाऱ्या
स्त्रिप्रांचा मान न राहून जाजारअसव्यांचा मात्र सन्मान होतो अर्से तिला
'दिसल्याबरून ती अतिशय उद्बिझ़ बनली. समाजांतीळ ढोंग व दांभिकता
यांसहि ती पूणपणे विटून गेली होती. घरच्या सवे कष्टांना तिने तोंड दिले
आसते; पण घाणेरड' आरोप ठेवन नवऱ्याने घराबाहेर हाकून दिल्यानंतर ती
जाणार तरी कोठें १ नाइलाजाने ब फसगतीनें तिनं वेद्यावृत्ति स्वीकारली
यामध्यें दोष तिचा, तिच्या नवऱ्याचा, की समान्नाचा £
याच कादंबरीत प्रेमचंद यांची प्रसन भाषारौली ब निवेदनपद्धति यांचा
अनुभव हिन्दी वाचकांना आला. हिन्दु नारी कुमार्गापासून वांचावी म्हणून
प्रेमचंद यांनी ' सेवासदन 'चा मार्ग दाखविला, पण तोहि कितपत
ग्य आहे १
( ५) प्रेमाश्रम !--प्रेमचंद यांच्या या कादंबरीने एका नव्या युगास प्रारंभ
केळा असें मानलें जातें. हिन्दी भाषेतील पहिळी राजकीय कादंबरी म्हणून
६ घ्रेमाश्रम !चा उललिख केला जातो. गरिखांची दुःखद अवस्था, रोतकऱ्यांची
अनुकंपनीय स्थिति, हिंदु-मुसलमान यांची एकी, नागरिक व ग्रामीण जीवन,
अंघाविश्वास, धमाचे अवडंबर इत्यादि अनेक विषय या कादंबरीत आलिळे
आहित. जमीनदार, त्यांचे साथीदार, पोलीस व त्यांची शासनपद्धाते, साव-
कार ब त्यांनी चालवलेली पिळवणूक यांमुळे भारतीय किसान कसा
मुन्शी प्रेमचंद ११२
नाडला जातो, याचें चित्रण या कार्दबरींत प्रेमचंद यांनी केळे आहे. किसानांचॅ
शोषण करणाऱ्या जमीनदारी पद्धतीचे संवधन इंग्रजांनीं या देशांत केळे
आणि आपल्या राज्यास त्यायोगें मजबुती आणली. याच जमीनदारी पद्धती-
मुळे किसानांचे कसे हाल होत राहिले आहेत याचे यथार्थ चित्रण येर्थे
आहे. या कादंबरींत नायक प्रेमशंकर जणुं प्रमचंदांचेच विचार बोढून दाख-
वितो, या देशांतील जनतेनं भोळी धर्मश्रद्धा व अंधविश्वास सोडून देऊन
नव्या विचारांचे शिक्षण घ्याव, देश समृद्ध करावा, अशी त्याची शिकवण आहे.
गरीब व पीडित शेतकऱ्यांना सहानुभूति दाखवून तो ज्वालासिंहाला म्हणतो,
८६६ जो कसेल त्याची जमीन हॅच बरोबर ! ?? पण यासाठी किसानांनी धाक
दाखवावा, बंड करावे, अर्से त्याला वाटत नाहीं. गांधींच्या चळवळीचे ते
दिवस असल्यामुळें प्रेमचंद यांचा मानसपुत्र प्रेमशाकर किसानांचें अहिंसात्मक
मार्गाने हृदयपारवर्तन व्हावें असा प्रयत्न करणारा आहे. म्हणून क्रान्तीचा
मार्ग सोडून “ प्रेमाश्रम ? स्थापन करून त्याच्याद्वारा किसानांची सेवा कर-
ण्याचा निर्धार त्यानें केळेला असतो. या कादंबरीतील दुसरे एक पात्र बलराज
रशियन राज्यक्रांतीर्ने प्रमावित झालेळें आहि. किसान-मजर यांचें राज्य स्थापन
झाल्याची स्वर्पने तो पाहत आहे; सरकारच्या विरुद्ध किसान-कामगारांचा
पक्ष घेऊन तो लढत असतो. अन्याय व अत्याचार यांच्याविरुद्ध जोराचा
सामना देण्याची त्याची तयारी असते. त्याची आई विलासी ही सुद्धां
पराक्रमी स्त्री आहि.
या कादंबरींत किसानांच्या जीवनाचे मार्मिक वर्णन आलें आहे. त्यांची
बोलण्याची भाषाहि लेखकार्ने या कादंबरीत वापरली आहे. कथा सांगण्याची
पद्धति पण अतिशय मनोवेधक अक्ी आहे. गरिबांची बाज घेऊन उमन्मत्तां्शी
झगडणारा एक तरी लेखक भारतांत प्रामागिकपर्णे लिद्दीत आहे, याची
जाणीव ' प्रेमाश्रम ? मुळें निर्माण झाली
(९६) रंगभामेः-- प्रेमचंद यांची सवोत मोठी अशी ही कादंबरी
जवळजवळ हजार प्रष्ठांची असून जगाच्या रंगभूमीवर येणाऱ्या सर्व प्रपुख
व्यक्तींचा समावेश या कादबरींत झालेला आहे. प्रसंग आणि पार्त्रे यांची रेल-
चेल येथें असून उपकथानर्केंहि भरपूर अहित. तरीसुद्धा कादंबरीचे कथानक
बांधेसूद आणि मनोरंजक झालें आहे. काशी, पांडेपूर आणि जसवन्तनगर
११३ प्रेमचंदांची साहित्यखाष्टि
१". “४ “*- “१. /"*. » 0 “ -“*१ “५ ५५.७. 2. “00. “९. १४ 270 ० 400: _/“/१५ “9७ *५ “0 -.“2_ ,२..५९ .. “७: “५, -“€* १५ “१ /९ ..»€१._»”/५-_»€१ ५१५ »“९ «११० »८४., “0०. “?*.,
या ठिकार्णी मुख्य घटना घडत आल्या आहेत. कादनरीचा मुख्य उद्देश यंत्र-
बुगांतील अपरिहाय भौषणता हा आहे. कारखानदारीमुळें छोटे छाटे धंदे तर
नाहीसे होतातच पण त्या धंद्यांतून प्राप्त होणाऱ्या सुखालाहि मनुष्य मुकतो.
यैत्राच्या प्रचंड' शक्तीमुळे उत्पादन भरपूर वाढलें तरी ब्रेकारी त्यामुळें अधिक
निर्माण होते. माणसाचे जीवनच निर्जीव होऊन बसते, यंत्रयुगाची ही
भयानकता मुन्शी प्रेमचंदांनी या कादभरीत वर्णन केढी आहे.
सन १९२१ च्या सुमारास या कादभरीचें टेखनसुरू होऊन ती १९२४
पर्यैत प्रकाशित झाली आहे. याच काळांत महात्मा गांधींची चळवळ उदयास
आली. असहकाराचें आन्दोलन प्रेमचंद यांनीं प्रत्यक्ष पाहिलें होते आणि
कांहीं मर्यादेपर्यंत अनुभविलेंहि होते. आपल्या नोकरीचा राजीनामा प्रेमचंद
यांनीं याच वेळीं दिला. महात्मा गांधींच्या व्याख्यानार्ने ते प्रभावित झालेल
असत. पण असहकाराचें आन्दोलन अपयशदायी ठरलें, द्दीहि गोष्ट प्रेमचद
यांच्या दृष्टीआड' नव्हती. या आन्दोलनारचे स्पष्ट चित्र या कादबरींत नसले
तरी त्याच्यापाठीमार्गे असणारे गांधीवादी तत्त्वज्ञान मात्र प्रेमचंद यांच्या
मनांत निःसंराय होते आहिंसा, अस्तेय, कष्ट सहन करण्याची तयारी, अपरि-
ग्रह, सत्य, आत्मत्याग इत्यादि गांधीप्रणीत मार्गाचे श्रेष्ठत्व प्रेमचंद यांना
मान्य होते; व व्यावहारिक जगांतील त्याची उपयुक्तताहि त्यांच्या डोळ्याआड
नव्हती. कादंबरीचा नायक मिकारी आणि आंघळा सूरदास ही हिन्दी वाड-
प्रयांतील एक अविस्मरणीय व्यक्तिरेखा आहे. प्रमचंदांनीं आपली सर्व
कलात्मक शाक्ते या सूरदासच्या निर्मितींत खर्च क्रेढी आहे असें वाटतें.
गांधीवादी जीवनाचे प्रतीक म्हणजे सूरदास, असा निष्क्ष प्रेमचंदांच्या टीका-
कारांनी काढलेला आहे.
सूरदास हा काशी शेजारच्या पांडेपूर गांवचा राहणारा एक गरीब भिकारी.
गांवाच्या बाहेर त्याची दहा बिघे जमीन असते. तींत गांवची गुरें चरण्यास
मोकळीक होती. भीक मागूनच सूरदासनें आपल्याजवळ ५०० रुपयांपर्यंतची
कमाई करून ठेवली होती. एक दिवशी ऐका खिश्चन भांडवलदारानें
सिगरेटचा कारखाना काढण्यासार्ठी सूरदासच्या जमिनीचा सौदा ठरविण्यास
आरंभ केला. चांगला पैसा येणार असूनहि सूरदास जमीन विकण्यास तयार
नसतो. सूरदासच्या मनांत येते, जमीन गेल्यावर या गांवची गुरें चरणार
&..>
मुन्शी प्रेमचंद ११४
कोठे १ कारखाना निघाल्यावर सर्वत्र अनाचार पसरेल, ही एक भीति त्याच्या
मनांत निर्माण झाटेली असते. कारखाना काढणाऱ्या जानसेवकाची मुळगी
सोफिया ध्येयवादी असते. ती सूरदासच्या बाजूने प्रचार करू लागते.
भांडबलवाल्या कारखानदारानें या भूमींत कारखाना काढल्यानंतर काय भीषण
परिस्थिति निर्माण होईल याचें सूरदासनें काढलेळें चित्र पहा --
६६ साहेब भोळून चाढून खित्ती आहे. तंबाखूची गोदामे भरली जातील,
मंदिरांत कारखान्यांतील मजूर झोपतील, विदहिरीवर खिस्ती मजुरांचा अड्डा
होईल. मुलीबाळी त्या ठिकार्गी पाणी कशा भरणार १. ..ताडीदारूचा प्रचार
जोरांत चाळू होईल. कसबगिणींचा थयथयाट होईल. परदेशी माणसे आपल्या
स्रियांना घेरूं लागंतीळ, किती अधम होईल |! खेडगांवचा शेतकरी आपलें
काम सोडून मजुरी करण्याच्या लालसत राहील. त्या ठिकाणीं त्याला नाना
प्रकारचीं व्यसर्ने लागतील; आणि त्याच्या बाईट वर्तनाचा प्रसार सर्व गांबांत
होईळ, खेडेगांवच्या बायकामुलीहि या कारखान्यांत पैसा मिळवण्याच्या इराद्यार्न
येतील आणि मग सवंत्र अनर्थ होईल. ?
गांधीवादाच्या आदीचा हा एक नमुना आहे. पण प्रेमचंद यांचें कसंज
कर्से आहे तेंहि पाहा. गांधीवादाचे प्रतीक म्हणून त्यांनीं ज॑ निर्माण केळे तो
सूरदास आंघळा आहे. वस्तुत्थितीकडे न पाहतां डोळे बंद करून लढत
राहणारा गांधीवाद आहे, असे का प्रेमचंद यांना सुचवावयाचें आहे ! प्रेमचंद
वास्तववादी असल्याकारणानें डोळे बंद करून त्यांचें चालण्यासारखे नव्हतें.
त्यामुळेंच कदाचित् या कादंबरीत त्यांनी आदर्शवादाविरुद्ध यथाथेवाद किंवा
वास्तववादाचाच विजय झालिळा दाखविला आहे, तूरदासाचा कड'वा विरोध
असतांना देखील त्याच्या जमिनींत कारखाना उभारला गेला, त्यांत सूरदासची
झोपडीहि वांचली नाहीं. गांववाले परागंदा झाले. यंत्रयुगाचें भयानक चित्र
तर हें आहेच, पण त्याची अपरिहार्यताहि स्पष्टपणें सूचित झालेली आहे.
प्रेमचंदांची ही. कादंबरी कथोपकथनाच्या दृष्टीनेंहि सवोगसुंदर म्हणून
गणली जाते. हजार प्रष्ठांच्या या कादंबरीत शेकडो पार्त्रे व शेकडॉ प्रसंग
येऊन जातात, कथा भिन्न भिन्न असल्या तरी त्यांची गुंफण एकमेकांद्ी
कडात्मक रीतीने करण्यांत प्रेमचंद यद्चत्वी झाळे आहेत.
११५ प्रेमचंदांची साहित्यसाटि
"२-८०*./€१%*-”€ ४.५” १५”. .५/७ ४0 २.” 0४५...” २७..७४0 ५” ७४.” २.५ २८.४ 0४७... २.५” ७.४ ४. .४१७..५ ४७.०” ४.०४ ७.» २०५४ ४०४१७५१७०४ ७५४१७०४१०५ ७४७०४0०७५० ..७*
( ७ ) कायाकल्प: --प्रेमचंद यांची ही पांचवी कादंबरी. या कथेत
-म्रमचंदांनीं एक अदभुत कथानक मिसळून दिलें आहे. एकीकडे सामाजिक
प्रश्नांची चचा आहे तर दुसरीकडे जन्मान्तरानन्तरहि अविचल राहणाऱ्या
प्रेमाची महती आहे. घटनांची संख्याहि मोठी आहे. हिंदु-मुसलमानांचा दंगा,
-गोवध, तुदंगांतील झगडा, इत्यादि अनेक प्रसंग विस्ताराने या कादंअरीत
वर्णन केळे आहेत. चक्रधर आणि मनोरमा यांच्या प्रेमप्रसंगाचा एक कथा-
भाग कादंबरीत विस्ताराने आला असून दुसऱ्या कथाभागांत जगदीश पूरची
रागी “ देवप्रिया ? राज्य सोडून तीर्थयात्रेला निघाली आहे व ठाकूर विशाळ-
ख्रिंड् तिच्या राज्यावर बसून राजा बनला आहे. आणि याहि ठिकाणीं मनो-
रमेच्या प्रेमाचा प्रकार वर्णन केडळेला आहे. * कायाकल्प ? या अद्भुतरम्य
कादंबरीची मुख्य पात्रे आहेत--- देवप्रित्रा, महेन्द्रसिंह, ह्षपूरचा राजकुमार,
कमला, शेखधर ! पण खरी म्हणजे दोनच पार्ते-देवप्रिया आणि महेन्द्रसिंह.
कमला ' देवाप्रिया ?च असते. त्याचप्रमाणे दृर्षंपूरचा राजकुमार आणि शंखधर
महेन्द्रसिहाचेचे अवतार आहेत. जन्मजन्मान्तरांतेन चाळू असणारी ही
अद्भुत कहाणी प्रेमचंद यांनीं हेतुपरःसर निमाण केली असावी, सर्वे कादंबरॉत
रस आणि नाना प्रकारचे भाव यांचा नित्य प्रवाह चाळू असलेला दिसतो.
प्रेममूलक महाकाव्यच आपण वाचता. आहो, असा भास वाचकास पदोपदी
होत असतो. प्रेमचंदांच्या इतर कादंअऱ्यांप्रमाणें टीकाकारांनी या कादंबरीस
मनापासून मान्पता दिलेली नाहीं, “' कायाकल्पांतील रचना सर्वत्र शिथिळ
झाली आहे. अद्भुतरम्य घटनांमुळें हिला ' भानुमतीची पेटी ? असेंच नांब
दारवे,? असा अभिप्राय टीकाकार व्यक्त करतात,
(८) गबन :-- या कादंबरीचा विषय मध्यमवगोतील पांढरपेक्षा
समाजाचा आहे. “ दागदागिन्यांची हौस व तिचे दुष्परिणाम ? अर्से थोडक्यांत
या कादंबरीचे सूत्र सांगतां येईल, जालपा आणि रमानाथ यांच्या लमनांत स्व
दागिने अंगावर चढविण्यांत आठे; पग एक दंद्रहार नव्हता. जालपाच्या
मनांत तर लहानपणापासून चंद्रहाराची इच्छा, आणि दागिन्यांच्या अतावर
हौसेमुळें कुटुंबावर आघात कसकसे आले त्याचें चित्र या ठिकाणी रंगविले
-गेळें आहे. मध्यमवर्गीय कुटुंत्रांत खोटा दिमाख व पोकळ प्रतिष्ठा बऱ्याच
- प्रमाणांत असते. श्रीमंतीचा विनाकारण देखावा करावासा वाटतो. रमानाथ
मुन्शी प्रेमचंद ११६
हा एक असाच भ्रमांत राहणारा ग्रह्त्थ आहे. खरी परिस्थिति तो आपल्या
बायकोजवळद्वि सांगत नाहीं. जालपा ही आदर्श म.हेला आहे, पण सामंत.
घराण्यांत वाढली गेढी असल्यामुळें व शिक्षण फारसें झालेलें नसल्यामुळें.
समजूत तिला कमी आहे.
कादबरीच्या पहिल्या वीस अध्यायांत कथानकार्चे केंद्र प्रयाग हे झाहे.
इतर सर्व घटना कलकत्त्यार्शी संबंधित आहेत. “ गन *ची समस्या मुख्यतः
मनोवैज्ञानिक आहे. आपल्या या मध्यमवर्गीय समाजरचनेत स्त्री ही पुरुषाने
कमावलेल्या संपत्तीची अधिकारी होण्याची इच्छा घरीत असते. संपत्तीची
किंवा दागदागिन्यांची ही लालसा एक प्रकारची तीत्न मनोवृत्ति बनून गेलेली
दिसते. “ गनन मध्ये स्रीमनांतील या प्रबळ मनोविकाराचा इतिहास आहे..
आभूषणाप्रेयता हा कथेचा मुख्य आघार असला तरी नायक-नायिकांच्या
चरेत्राचेत्रणाच्या दृष्टीनें ही कादंबरी उल्लेखनीय आहे, रमानाथ हा एक
दुबलतेस वश होणारा यथार्थबादी नायक आहे. प्रेमचंद यांनीं सामाजिक.
प्रश्न घेऊन ज्या कादंबऱ्या लिहिल्या आहित त्यांत कला वब दृष्टिकोनाची
परिपक्कता यांच्या दृष्टीनें ' गन ची श्रेष्ठता सर्वेमान्य आहे. घराण्याची प्रतिष्ठा
दागदागिन्यांच्या सांठ्यांत आहे, या उराशी बाळगलेल्या कल्पनेमधून कथा-
नकाचा विकास होत राहिला आहे. आपली समाजरचनाच अथव्यवत्थेवर
अवलंबून असल्यामुळें, म्हणजे ज्याच्याजवळ धन तो श्रेष्ठ अशी समजूत
असल्यामुळे, सर्व प्रश्न उपस्थित झाळे आहेत. घरांत असणारी संपत्ति प्रदर्श-
नांत मांडून ठेवण्यासाठी सोयिस्कर ज्ञागा म्हणजे स्रीदेह अशीहि समजूत
कित्येक ठिकाणी असते, सोन्याचांदीच्या मापाने मोजली जाणारी प्रतिष्ठा ही
अन्ती घातकारीच ठरते, हा सिद्धान्त या कादंबरींत मांडला आहे,
( ९ ) निर्मला :-- याहि सामाजिक कादंबरीत प्रेमचंदांनी हुंड्याची अनिष्ठ
प्रथा व बिजवराचे लम या रूढींवर प्रकाश टाकण्यासाठी कथानक निर्माण
केळें झाहे. उदयभानूळाल आपल्या मुलीच![-निर्मलेचा-विवाह खूप थाटामाटांत
उच्च कुलवंताश्ी करू पाहत होते. पण त्यांच्या अकालीं मृत्यूमुळे निमेटेचें
लझ वकील तोताराम यांच्याशी होते. तोताराम वृद्ध असून त्यांना मंश्याराम,,
नियाराम आणि सियाराम अशीं तीन पहिली मुलेंहि अहित, वयस्कर अक्या
बिजवराशी निमलेनें विवाह केल्यामुळे होणाऱ्या अनर्थांची परंपरा या
२१७ प्रेमचंदांची साहित्या
कादंभरींत ळेखकार्ने वर्णन केळी आहे. विजोड विवाह, वृथा संशय,
नणंद-मावजयी यांचा झगडा यामुळें एका सुखी ग्रहत्थाच्या घरांत कसा
घखेडा माजतो, हें या कादंभरीनें वाचकांसमोर नीटपर्णे मांडळे आहे. परंपरागत
चालत आलेली सामाजिक 5पवव्थाहि आज बदलावयास पाहिजे व निष्प्राण
दोत चालडेली कुटुंअ-व्यवघ्थाहि सुधारावयास पाहिजे, असा प्रेमचंद यांचा आग्रह
या ठिकाणीं दिपततो. विवाहू या पवित्र वस्तूचे विडंभन होत असलेलें पाहून
प्रेमचंद यांचे मन अनेक वेळां संत्रस्त झाळें आहे. कथानकाच्या गुंफणीच्या
दृष्टीनंहि प्रेमचंद यांची ही छोटी कादंबरी वरच्या दर्जाची आहे. नारी-
मनांतील दडपल्या जाणाऱ्या अनेक भावनांचा सुंदर आविष्कार या कर्भैत
झालेला आहे.
(१०) कमंभूमि:-- १९३२ सालीं प्रसिद्ध झालेल्या या कादंबरीने
प्रेमचंद यांना “ रंगभूमि ' एवढी कीर्ति मिळवून दिली. ' कतभूर्मी ?त नांवा-
प्रमाणेच क्रियावान् जीवनाचे चित्रण आहे. कर्मे हेच जीवनार्चे सार असन
अमरकान्त हा नायक कमोरचे प्रतीक आहे. महात्मा गांधींच्या सत्याग्रह-
चळवळीची पाश्वभूमि या. कादंबरीस घेतली असून धनवान मनुष्यच या
जगतांत हरएक प्रकारची गुलामगिरी कायम ठेवतो, या निष्कषीवर या
कथेची उभारणी आहे. कादंभरीचा नायक अमरकान्त आपल्या वडिलांना
म्हणती --
६ दादा, आपल्या घरांत माझें जीवन नष्ट होत चाललें आहे. आतां
“अधिक नष्ट होण्याची बाट मी पाहणार नाहीं. केवळ खाणें, पिर्णे व मजा
मारणे यासाठींच का माणसार्चे जीवन अस्ते ! धनसंचय करीत राहर्ण हाच
'का त्याच्या जीवनाचा हेतु १... मी एका नवजीवनाचा सूत्रपात करण्याचा
निश्चय करणार आहे. ” अर्से म्हणून अमरकान्त घराबाहेर पडला आहे.
'अमरकान्त निघून गेल्यावर त्याची पत्नी सुखदा हिचे डोळे उघडतात; आणि
तीहि जनसेवेस सुरुवात करते. शहरांतील मंदिर अस्पतर््यांना खुलें व्हावे
म्हणून ती डॉक्टर द्यांतिकुमार यांच्यावरोशर चळवळ करते. तिकडे अमरकान्तहे
ओतकप्रांची बाजू घेऊन लढा चाळू करीत असतो, या प्रकारे कादंबरीत राजकीय
चळवळीरसहि स्थान देण्यांत आळे आहे. भरमसाट व्याज घेऊन फसवणारे
सावकार, चोरीच्या मालाचे व्यापार, पिता-पुत्र वा पति-पत्नी यांच्यांतीळ
मुन्शी प्रेमचंद ११८
५.४ ४८४ ४०५४ ४७४७४ १०७४ ० ४०४
२.५१ ४. ४७५ ४» ४७५११४ ४.५४ “१-५ ४०७ ५./५.५१५.” >“ -“ १-१. -“€*/“६/ *“ नन -“. -“->< ह: -*€*<“€ >“
दास्यत्व, कुचकामी शिक्षणपद्धति, शिकलेल्या लोकांच्या वृर्तीतील स्वार्थ,
सरकारची कर उकळण्याची प्रवात्ते वगेरे गोष्टींवर चांगलाच प्रकाश या कादंबरीत
पाडलेला आहे.
कादंबरीचे * कमभूमि ? हँ. नांब मोठें सार्थ आहे. विरुद्ध परिस्थितीशी
टकरा देत देत माणसार्ने नित्यकम करीत राहिले पाहिज, हा संदेश या.
कादंबरीने दिलेला आहे. तप, साधना आणि ज्ञान यांशिवाय अविरत कर्म
हाहि एक मनोविकासाचा मार्ग आहे आणि साधारण जनांसाठी हाच मार्ग
योग्य आहे. संसारांत राहावे, निरंतर होणाऱ्या संघर्षा्शीं टकरा द्याव्यात ब
शेवर्टी कमे करीत असतांनाच मनःशांति मिळवावी, हँ या कादुबरीचें थोड-
क््यांत उद्दिष्ट म्हणून सांगतां येईल.
( ११ ) गोंदानः- प्रेमचंद यांच्या कीर्तिशिखरावर मुक्रुटमाणि चढाविला
तो या कादंबरीने. पूर्ण झालेली त्यांची ही अखेरची कादंभरी, चरित्रकथा सांगत
असतांना कित्येक वेळां या कादंबरीचा उल्लेख आला आहेच. या ठिकाणीं
संक्षेपाने कांहीं मुख्य गोष्टींचाच उल्लेख करू, सन १९३६ मध्यें प्रासेद्ध
झालेल्या या कादंबरीत नेहमींप्रमाणेंच दोन मुख्य कथानके प्रेमचंद यांनीं तयार
केळीं आहेत. एक नायक होरीरामाची कथा वब दुसरी रायसाहेञज व त्यांच्या
मित्रांची कथा. एकांत ग्रामीण जीवनाचे यथाथे चित्र रंगविण्यांत आढें आहे,
तर दुसऱ्यांत नागरी जीवनांतील रेखाचित्र पाहावयास सांपडतें.
होरी निहारीगांवचा एक शेतकरी आहि. चार-पांच बिघे स्वतःची
म्हणून असणारी जमीन कष्टाने खपवून आपली प्रतिष्ठा राखून असतो. त्याची
बायको धनिया व पुत्र गोबर, सोभा व हीरा हे दोन बंधु आहेत पण ते
वेगळे राहतात. होरीरामास दोन मुली- साना आणि ख्पा. त्यांच्या लम्नाची
चिंता त्याला आहेच, पतिपत्नींत अनेक कारणांवरून नित्य झगडा होत असे..
मोठ्या कष्टार्ने कसें तरी जीवन व्यतीत करणाऱ्या या शेतकऱ्याच्या मनांत
एकच इच्छा- एक गाय पाळण्याची इच्छा- असते. एक भोला नांबाचा
शेतकरी त्याला गाय उघार देतो. होरीरामार्चे त्व साकारले जाते; पण
त्याचा भाऊ गायीस विष देऊन मारून टाकतो. गोबर व भालाची विधवा
कन्या झुनिया यांचा प्रेमप्रसंग ग्रामीण चित्राचा एक वास्तविक नमुना म्हणून
खांगण्यासारखा आहे.
११९ प्रेमचंदांची साहित्यखाधे
*.५”४४>० ५-/१४-/”"२-€"५४४-५१५--/४-५/१-५/%-/४५-४४-४१-०/४./५ “१०४0५.” ५.९१. ४०/०५/५५४० ”५-””
आपली कन्या सोना हिच्या विवाहासाठी होरीराम थोडेसें कर्ज काढतो
आणि तेथून त्याच्यावर अनर्थकारी परंपरा कोसळते. पैसा जवळ नसल्यामुळें
रूपाचा विवाह एका म्हाताऱ्या ग्रहस्थाशीं करणे होरीरामास भाग पडतें.
शेवटीं जमीन विकून मजूर होण्याची पाळी त्यावर येते. अतिदाय कष्टामुळें
त्याचा देह थकून गेलेला असतो; डोळे सुकून गेठेले दिसतात, एके दिवशी
काम करतां करतां होरीराम बेशुद्ध होऊन पडतो. मृत्यूची वेळ जवळ येते.
थनिया गडबडून गठेळी असते. गाय पाळण्याची इच्छा मनांतल्या मनांत
राहिलेली पाहून घरांत उरलेळे वीस आणे हेंच गोदान समजून होरीच्या
निर्जीव हातांतून घनिया दान करते ब मूर्छित होते !
घन निर्माण करणाऱ्या, कष्ट करणाऱ्या भारतीय किसानाचा हा शोक-
दायक अंत ! किसान-जीवबनाचा अनुभव स्वतः प्रेमचंद यांनीं घेतला असल्या-
मुळें होरीरामर्चे चित्र भारतीय वाडूमयांत अमर होऊन राहील. भारतीय
शेतकरीवर्गाचा प्रातिनिधि म्हणजे ' गोदान 'मधील होरीराम. त्याचं दुःसख्थ आपल्या
देशांतील स शेतकऱ्यांचे दुःख आहे. प्रेमचंदांची सवे कलासक्ति * गोदान '-
मध्ये पणास लागलेली दिसते, होरीराम, धनिया, गोबर, झुनिया, सिलिया ही पाते
अत्यंत सजीव व वैशिष्टयपूर्ण वाटतात. एका टीकाकारानें म्हटळें आहे कीं,
येत्या पन्नास वर्षात होरीराम या पात्रास तोंड देईल अर्से एक तरी पात्र हिंदी -
उर्दू भाषेत तयार होईल कीं नाहीं कोणास माहीत ! शेतकऱ्यांच्या स्वभावांतील
गुण आणि दोष यांचें यथार्थ चित्रण या कादंबरींत मिळतें. त्यांच्या आशा,
त्यांची दुःखं, त्यांच्या मनःकामना, त्यांच्या समजुती या सर्वाचा वास्तव दृष्टीनें
परामर्श या कादंबरींत घेतलेला आहे. होरीरामाचा मुलगा गोबर हा नव-
विचाराचा तरुण आहे. व्याजखोरी, जमीनदारी आणि धर्माच्या नांवाखाली
चाललेली फसवणूक बंद व्हावी असें त्याला वाटतें. शहरांत मजुरी करण्यास
त्यार्ने प्रारंम केलेला असतो. “ गोदान ' कादंबरीत प्रेमचंदांची कला, त्यांचें
चिंतन आणि त्यांची शैली यांनीं सीमान्त यश गांठलेलें दिसर्ते.
( १२ ) मंगलसुत्रः-- मृत्युशय्यवर असतांना लिहावयास घेतलेली
प्रेमचंद यांची ही शेवटची कादंबरी. ती पूर्ण होऊं. शकली नाहीं, या अर्धबट
कादंबरीचा नायक देवकुपार एक लेखक आहि, पण लिहिण्यापासून कांहीं
आर्थिक फायदा मात्र त्यास होत नाहीं; उलट दाती. आलेली संपत्ति मात्र तो
मुन्शी प्रेमचंद १२७
१ & क ४. 9-१ - धल्टणे शट नी य र ऱु वी > ४-” ५” > 0 * शण १4८ *-“॥ ४ - ४-२ -“४*-”* ४ ४५.» ४५० /०-
घालवून बसतो. या दारिद्री देवकुमारास दोन मुलें. थोरला मुलगा संतकुमार
वकिली करीत असतो. बापाच्या आदर्शबादाशी त्याचें जमत नसल्यामुळे पैसा
कमावर्णे हेंच एक त्याचे ध्येय असतें. छोटा मुलगा साधुकुमार मात्र बापाच्या
वृत्तीस अनुकूल अशा स्वभावाचा असतो. असें सांगतात की, या कादंअर्रींत
प्रेमचंद आपली जीवनकथाच लिहीत होते.
प्रेमचंदांच्या नाख्यक्कातेः--प्रेमचंद यांना नाटक लिहिर्णे फारसें जमळें
नाही. मार्गे उलेखलेली त्यांची नाटके आहेत, पण नाटक लिहिण्याची प्रवृत्ति
त्यांच्यांत नव्हती. ' संग्राम ' आणि “ कला? या नाटकांखेरीज आणखी नाटकें
लिहिण्याच्या भानगडीत प्रेमचंद पडळे नाहींत. आणि हीं नाटके सुद्धां कादंबरी-
प्रमार्णच आहेत. तीं टटेजवर यशस्वी होण्याची खात्री नाहीं डॉ. इन्द्रनाथ मदन
यांना लिहिलेल्या दि. २९ डिसेजर १९३४ च्या एका पत्रांत मुन्शी प्रेमचंद
म्हणतात, “मी कर्धो गंभीरतेने नाटक लिहिण्याचा प्रयत्न केला नाहीं...
भारतांत, विशेषतः हिन्दी भार्षेत, रंगभमे नाहीं. जर रंगभूमि थाडीशी उरली
असेल तरी पारशी रंगभ़मीचा भम्नावशेषच तो आहि....रिवाय अस की
नास्यकला आणि रंगभूमीर्च कोगल्य यार्चे ज्ञान पण प्राप्त कलून घेतर्ले नाहीं
त्यामुळे माझी नाटकें फक्त वाचनीय आहेत. आणि प्रश्न असा कीं, कादंबरी
लिहितांना मी चरित्रविकास साधीत असतां मी नाटकाचो निर्मित कां करूं;
प्रेमचंदांच्या कथाः --आपग मराठींत ञ्यांना लघुकथा म्हणतों त्यांना
हिंदींत “ कहानी ' असें नांव प्राप्त झाडे आहे. उपन्यास-सप्राटू प्रेम बंद
यांच्या कथाहि हिन्दींत सर्वप्रसिद्ध अशा आहेत. मराठींत त्यांच्या कांईी
कथांचं भाषांतर झाडिळें आहे. ' प्रेमचंदांच्या गोष्टी ? म्हणून एक पुस्तकहि प्रसिद्ध
झाले आहे. नागपरचे श्री. आनंदराव जोशी यांनीं १९२९ साली हें पुस्तक
पुण्याच्या चित्रशाळेमार्फत प्रासिद्ध केळें आहे. राजा हरदौळ, रानी सारन्या
मन्दिर ओर मसजिद, एक्ट्रेस, आअभमि-समाधि, विनोद, आत्माराम, सुजान-
भगत, बूढी काकी, दुर्गा का मंदिर, शतरंज के खिलाडी, पंचपरमेश्वर, बडे
घर की बेटी आणि विध्बंस या चौदा कथा या पुस्तकांत अहित, आणि मह-
तत्वाची गोष्ट अशी कीं, प्रेमचंदांनी स्वतःच्या उत्कृष्ट कथा म्हणून या गोष्टींची
निवड केळेळी आहे. प्रेमचंदांनी एकूग साडेतीनशेपर्येत कथा उदू व हिन्दी
भाषांतून लिहिल्या आहेत. त्या सबीचा निर्देश या छोट्या पुस्तकांत करणें
अशक्य आहे. तरी स्थूळ माहिती खालीलप्रमाणे देतां येईल.
९२१ प्रेम्चेदांची साहित्यखाशि
“८२/२७/४७४४ ४.” ४८४” ४./४१५.४” ४..”0९५”१%/€ १८०४” ४७८” ४०” १-४१४.”४./१-/४ 7 १.४७.” >.
<*५//*-”” १
प्रेमचंद यांच्या प्रारंभिक कथा घटनाप्रधान व अद्भुताच्य़ा मिश्रणाने
युक्त अशा असत. कथानक महत्त्वाचे असून चरित्रचित्रणापेक्षा प्रसंगानोर्भितीस
महत्व फार दिलेलें आहे. चरित्रप्रधान अशा कथा प्रेमचंद यांनीं फार
थोड्या लिहिल्प़रा आहेत. ' माता का हृदय :, 'स्वर्ग की देवी? ही नांबे
नमुन्यादाखल सांगण्यासारखी आहेत, समाजांतील वाईट चालीरीतींवर ब
अज्ञानावर टीका करण्याच्या दृष्टीनें प्रेमचंद यांनीं पुष्कळ कथा लिहिलेल्या
दिसतात. .' स्त्री ओर पुरुष?, “ दिवाला?, 'नैराग्य?, “लीला?
उद्घार ) इत्यादि कथा हेतुपूर्वक लिहिलेल्या असाव्यात असे वाटतें. अशा
प्रकारे त्यांच्या कथांचे वर्गीकरण करतां येण्यासारखे आहे, पण ते तितकेसे
बरोबर होणार नाहीं. त्यांच्या ऐतिहासिक कथांत “ शतरंज के खिलाडी?
डी कथा अत्यंत सुंदर आहे. सरंजामशाही पद्धतीर्चे खोर्टे रूप यांत वर्णन करून
दशशाविळे आहे. त्यांच्या सामाजिक कथांत “ मंत्र? ही कथा विशेष उछेखनीय
अशी आहि. या ' मंत्र 'कथेसंत्रंधी एक आख्यायिका येथें सांगण्यासारखी आहे.
दिल्लीच्या प्रान्तीय साहित्य संमेलनासाठी सभापति म्हणून प्रेमचंद यांची
नियुक्ति झाळेळी होती. चार-पांच दिवस तेथें प्रेमचंदांचा मुक्काम होता.
स्थानीय हिन्दी सभेतर्फे प्रेमचंदांच्या सत्काराची सभा चाळू होती. त्या सभेस
एक पंजाबी ग्रह्ृत्थ येऊन बसला होता. त्याने कांहीं प्रमुख व्यक्त,ची भेट
बेऊन प्रमचंद यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. प्रेमचंद यांना त्याच रात्री
दिल्कहून निघावयार्चे दार्ते, समेचें काभहि ढोकर आटोपावयाचे होर्ते. या
गडप्रडीत त्या बिचाऱ्या ग्रहृत्यास कोण दाद देणार £! सभा समाप्त शेण्याच्या.
वेळीं तो उठला व हात जोडून त्यानें प्राथना केळी, “ या रात्रीं प्रेमचंद
यांना मी. मुळींच जाऊं देणार नाहीं, त्यांच्यासहित या सभेला मी उद्यां
बरी येण्याचे आमंत्रण देत आहि- ? प्रेमचंद हे प्रथम थांभण्यास तयार नव्हते.
तेव्हां त्यानें थोर्डे निवेदन केळे, “। खाजपर्यंत प्रेमचंद यांना पाहण्यासाठी,
भेटण्यासाठी मीं खूप प्रयत्न केळे, लखनौहून दोन वेळां येर्थे आलो. एक वेळ
बनारस येथॅहि गेला होतो. तीन वेळां घरी जाऊन सुद्धां त्यांची भेट होऊं
दाकली नाहीं, .., कित्येक वर्षापूर्वीची गोष्ट आहे. नशीब काढण्यासाठी मी
पूर्वेकडे निघालो होतो. माझ्या खिश्ांतील सर्व पैसे संपण्याच्या बेतांत होते.
मी स्टेशनवर भटकत असतांना खिश्शांतील दोन रुपये खर्च करून प्रेमचंद
मुन्शी प्रेमचंद १२२.
आर्चे एक पुस्तक विकत घेतढ. मी काय करता. हॅच मला समजत नव्हते.
पुर्टे सवच अंधार होता, .. पण त्यांतील मंत्र ' ही कथा वाचली मात्र; माझ्या
मनांतील नैरारय एकदम दूर झालें. मीं मन भक्कम केलें व या आजच्या
ह्थिर्तीत केवळ त्या कथेमुळें येऊन पॉचला आहें. त्या वेळेपासून ' मंत्र ) कथेचा
मंत्रदाता शोधण्याच्या खटपटींत मी आहे. आज तो मला दिसला आहे; मी
त्याला सोडणार नाहीं. घरीं बायको आजारी आहे. ती अंथरुणावरून उटूंहि
शकत नाहीं. केव्हांपासून ती प्रेमचंद येण्याची बाट पाहत असेल. ...?
प्रेमचंद थांभणार नव्हते, पण ही कथा ऐकल्यावर थांबणे भाग पडलें.
प्रेमचंदांनी त्याच्या आदरसत्काराचा मोठ्या आनंदार्ने स्वीकार केला,
५ सोजे वतन' आणि ' सप्तसरोज ? हे प्रेमचंद यांचे प्रारंभींचे कथासंग्रह.
६ सप्तसरोज 'बह्दळ बंगालचे महान् कथाकार शारच्चन्द्र चट्टोपाध्याय यांनी
म्हटलें आहे, “ कथा खरोखरीच अत्यंत भावपूर्ण आणि उत्तम आहेत. रवीन्द्र-
बाबूंशी तुलना करणे अन्यायाचे व अनुचित असें होणार आहे. पण दुसरा
कोणताहि बंगाली ठेखक इतक्या चांगल्या कथा लिहूं शकेल असें मटा वाटत नाहीं.!
वडे घर की बेटी? आणि ' पंचपरमेश्वर ? या संग्रह्मंतील नांवाजळल्या कथा
आहित. प्रेमचंद यांच्या ' नवानाधे ? या कथासंग्रहांतील बहुतेक कथा ऐतिहासिक
आहेत. त्यांतील ' धोखा ?, ' अमावत्या की रात्रि?, ' ममता ?, ' पछतावा ?,
इत्यादि कथा उल्लेखनीय आहेत.
: पानसरोवर *च्या पहिल्या भागांत प्रेमचंद यांनीं कहाती-कडा या विषया-
बरील आपले विचार प्रकट केळे आहेत. ““ कथा जीवनाच्या अगदीं निकट
बेत आहे. तिची जमीन लांधरुद अशी नसते. त्यामुळे तिथ्यांत कित्येक रस,
कियेक चरित्रे, कित्येक घटना यांना स्थान उरत नाहीं. एकाच प्रसंगाचे,
आत्म्याच्या एकाच विशेषाचे सजीव आणि हृदयस्पर्शी चित्र म्हणजे कथा ?
अर्से त्यांनीं त्यांत म्हटळ॑ आहे. कादंबरीप्रमार्गंच कित्येक कथांतून प्रेमचंद
यांनीं देशभक्तीचा प्रचार केला. ' सोजे वतन ची माहिती आपण पाहिलीच
आहे. त्यांचा दुसरा एक कथासंग्रह * समर-यात्रा ! हा सुद्धां सरकारच्या अब-
कुपेमुळें जसत झालला होता.
मुन्शी प्रेमचंद यांनी अनुवाद करण्यांतहि कमीपणा मानला नाही. प्रारमी-
ज्या आयुष्यांत उदू साहित्यांतील कांहीं कथांचा अनुवाद त्यांनीं प्रसिद्ध केला
१२३ प्रेमचंदांची साहित्यखाषधे.
“0४.१५”.
होताच, उत्कृष्ट कलाकृति आपल्या बांधवांना रसास्वादासार्ठी द्याव्यात ही
घूक त्यांची वात्त असल्यामुळें त्यांनीं परभाषेतील कलकृर्तांचे. अनुवाद हिन्दी
भार्षेत केलेले आहेत. त्यांमध्ये ' अहकार ? या अनुवादाचा उल्लेख करण्यासारखा
आहे. युरोपमधील पहिल्या श्रेणीचा फ्रेंच लेखक अनातोल फ्रान्स याच्या
£ थायस ? या सबॉत्कृष्ट ऐतिहासिक कथेचा हा अनुवाद प्रेमचंदांनी भूमिके-
सहित प्रसिद्ध केला आहे. भूमिकेत या अनुवादित कादंबरीचे त्यांना
मार्मिकतेर्न रसग्रहण केळें आणि शेबटीं उत्कृष्ट अनुवाद कसा असावा यासंत्ंधी
कांहीं सूचनाहि केल्या आहेत. याशिवाय प्रेमचंद यांच्या आणखी एका
महत्त्वाच्या पुस्तकाचा उललेख या ठिकाणी करावयास पाहिजे. १९० ३-४ साली
राष्ट्रीय जाग्तीच्या काळांत प्रेमचंदांनी “ जमाना ? पत्रांत कांहीं राष्ट्रपुरुषांची
स्फूर्तिदायक चरित्रे प्रसिद्ध करून ती * बाकमार्लो के दर्शन ' (महापुरुषांचे
दर्शन ) नांवाच्या पुस्तकांत संग्रहितहि झाली होतीं. याचें हिन्दी नामकरण
प्रेमचंद यांनीं मृत्यूच्या आधीच्या दिवशीं ७ ऑक्टोबर १९२६ रोजी ' कलम,
तलवार और त्याग? असे केलें होतें. राणा प्रताप, रणजितसिंह, राणा जंग-
बहादुर, अकतर महान्, स्वामी विवेकानंद, राजा मानसिंह, राजा टोडरमल,
माननीय गोपाल कृष्ण गोखळे, गॅरिभाल्डी, मोलाना वहीउद्दीन ' सलीम ,
डॉक्टर सर रामकृष्ण भांडारकर, बदरुददीन तैयबजी या श्रेष्ठ पुरुषांची जिवंत
चरित्रें या पुस्तकांत एकत्रित झालीं आहेत.
प्रेमचंद यांच्या या साहित्यसृष्टीवर आपण ही जी ओझरती नजर टाकली
आहे तीवरूनहि ध्यानांत येईल कीं, प्रेमचंदांचें महत्व अनन्यसाधारण आहे.
समकालीनांपेक्षा कांहीं वेगळी व वैशिष्ट्यपूर्ण कलाकृति निमीण करणाराच
महान् साहीत्यिक म्हणून नांबारूपास येतो. मनोरंजन आगि मार्गदशन यांचा
उत्कृष्ट मिलाफ प्रेमचंद यांच्या कथासाहित्यांत दिसून येतो. प्रेमचंदपूरवे
लेखकांनी कादंबरीळेखन केळेंच नव्हतें असें नाहीं; पण अदूभुतरम्य प्रेम-
विलास, जादूटोणा आणि कल्पनांच्या भराऱ्या यांनींच तें साहित्य भरून गेलेले
होतें. त्यायोगें वाचकाची जिज्ञासा आणि साहसप्रीति जाग्रत झालेली होती.
रहस्यमय कथानकामुळें बुद्धोस कदाचित् चालनाहि मिळाली असेल. पण
मानवी चरित्रचित्रणास प्रारंम मात्र प्रेमचंद यांनींच केला, गगनविहार
करणारी पार्ले चालती-बोलतीं परथ्वोबरीलच माणसं आहेत; आपल्याप्रमाणेच
-मुन्शी प्रेमचंद १२४
ण ८ “0८0५-१0 0" ऐपो शा ४-८ च्या --20५८ ४४५ ५४५ ४-० *-7 ४५-0१ ४-0७- -टीन्ल
70000 ती ती....म
तीं निराश होतात, दुःख भोगतात, अपयशी होतात, याची जाणीव प्रेम-
चैदांची कथा वाचून हिन्दी वाचकांना पहिल्याने झाळी, आणि या आत्मप्रयया-
मुळें हिन्दी जनतेने प्रेमचंदांना “ उपन्याससम्राटू ' ही पदवी अर्पण केली.
वास्तववाद ब देशकालपरित्थितीस अनुसरून थ्येयवाद यांचा सुंदर संगम
मुन्शी प्रेमचंद यांच्या कथासाहित्यांत दिसून येतो. या त्यांच्या ध्येयवादाचा व
विचारदर्शनाचा जवळून पारेचय आपण पुढल्या प्रकरणांत करून घेणार
आहोंत,
७ ७ ७
प्रेमचद : विचारदरान : १३
स्वराज्य ही एक चित्तवृत्ते आहे. पराधीनतेची जाणाव चित्तांतून
निघून गेळी कीं तुम्हांस स्वराज्य मिळाळढें असे समजा, भीति हीच पराधानता
आहि, निर्भपता हँ स्वराज्य आहे, व्यवल्था व संघटन हाहि एक गौरवाचाच
भाग आहे. * हे मुन्शी प्रेमचंद यांच्य़ा ' समरयात्रा ? नांवाच्या कर्थतील एक वाक्य
आहे. ' समरयात्र ? या नांवाचे एक पुस्तकहि त्यांनीं प्रसिद्ध केल्याचा उल्लेख
मार्गे आलाच आहि. या पुस्तकांत राजकारणविषयक अश्या अकरा कथा एक-
जित केल्या आहेत. तत्क लीन पारोत्यितीशी प्रेमचंद नेहूर्मांच समरस होत
राहिल्याकारणानें त्यांच्या सर्वेच साहित्यांत देशकारण, समाजकारण, घर्मकारण
इत्यादि गोष्टींचं प्रतिनिबे पडलेळें दिसून येतें, त्यांत.ल कांहींचा परिचय या
प्रकएणांत आपण करून घेणार आहोंत. प्रेमचंदसारख्या मोठ्या कलावंताची
दृष्टि द्रगामी असते. चिरकाळ टिकगाऱ्या प्रश्नांवरील त्यांचे विवेचन मार्ग
दर्शन करण्यासाठी सदेव तयार असते; आणि तेंहि रुक्षतेच्य़ा मार्गानें नव्हे तर
मनोरजन करीत करीत. तत्कालीन प्रश्नांचा विचार थोर कलावंत करीत असळे
तरी त्यांवरील त्यांचें भाष्य मात्र तसे प्रश्न भविष्यकाळांत जेव्हां जेव्हां निमाण
दोतील तेव्हां तेव्हां उपयोगी पडण्यासारखें अस्ते. मुन्शी प्रेमचंद हे नुसते
कल्पनारंजित अशा गोष्टी सांगणारे कहानीकारच नव्हते, तर गोष्ट सांगतां
सांगतां एखादे तत्त्व मनावर बिंबावें, एखाद्या बिकट प्रश्नाची चर्चा व्हावी;
१२५ प्रेमचंद : विचारदरशन
एखाद्या सत्पवुक्त चें बीजारोपण व्हावे, इत्यादि हेतु त्यांच्या साहित्याने मितीच्या
पाठीमागें निःसंशय होते. किंबहुना त्याप्रमाणे त्यांनीं साहित्याची ब साहित्य-
शास्त्राची व्याख्याहि करून ठेवलेली आपण पाहिली आहे.
केवळ कलेची उपासना करणें, अ जगतांत दिसेल त्याचा यथातथ्य दृष्टीनें
विचार करणे,एवढॅच काम त्यांनीं पत्करळे नव्हतें. कलेसाठींच कला हा त्यांचा आग्रह
नव्हता. कला मनुष्याला फक्त आनंदच देऊं शकते, साहित्याने दुसरा कोणताहि हेतु
मनाशी न बाळगतां केवळ आनंदानिर्मितीकडे लक्ष द्यार्वे, हें जे एका पथार्चे
तत्त्वज्ञान आहे ते मुन्शी प्रेमचंद यांना मान्य नव्हते. कला ही सुद्धां उपयोगी असावी,
आपल्या सद्भावना उज्ज्वल करणारी असावी, असा आग्रह पदोपदी त्यांनी.
शरलेला दिसतो. त्यावरून प्रेमचंद यांच्या साहित्यनिर्मितीचा हेतु स्पष्ट होण्या-
सारखा आहि. ' प्रेमप्रसून ' या आपल्या कथासंग्रहाला भूमिका लिहितांना ते
म्हणतात, “' ध्येयवादी असे मानीत असतात कीं, यथार्थाचें स्वरूप यथार्थ वर्णन
करून आपणांस काय मिळणार आहे ? तें तर आपल्या उघड्या डोळ्यांनाहि
दिसतेच, कांहीं काल तरी आपण या कुत्सित पण यथार्थ व्यवहारांपासून दूर
राहिलें पाहिजे; नाही तर साहित्याचा मूळ उद्देशच नष्ट होण्यासारखा आहे.
तो साहित्याला समाजाचा दर्पण मानीत नसून दीपक मानीत असतो. प्रकाश
देणे, मार्ग दाखविणे हेंच दिव्याचें काय आहे. भारतार्चे प्राचीन साहित्य ध्येय-
वादीर्चेच समर्थन करणार आहे. आपण सुद्धां याच आदर्शाचे पालन करा-
वयास पाहिजे. आमचा असा विश्वास आहे कीं, कथेचे खालील मुख्य विशेष
असावेत : ( १ ) आध्यात्मिक किंबा नेतिक उपदेश, (२ ) अत्यंत सरळ
भाषा, ( ३) आणि स्वाभाविक वर्णन शेली. ' आणि याच आदशाला
घरून प्रेमचंद यांनीं आपल्या साहित्याची अशी रचना केली आहे कीं, त्यास
प्रचाराचे स्वरूप प्राप्त झालें असले तरी त्यांतील रंजकता व अमरता सहसा
कमी होऊं नये. प्रत्यक्ष उपदेशाचे घडे दरएक कर्थंत किंवा कादुंभरींत जरी
नसले तरी जीवनांतील आदरशेवादाचा मात्र पुरस्कार व्हावयास पाहिजे,
अक्ली प्रेमचंद यांची श्रद्धा होती. आपल्या भारतीय वाड्मयाचा ध्येयवाद
किंबा आदर्शवाद हा एक महत्त्वाचा विशेष आहे, हें त्यांनीं बरोबर हेरले होते.
त्यांनीं आपल्या ' प्रेमद्वादशी ? या कथासंग्रह्माच्या भूमिकॅत तर स्पष्टच म्हटलें
आहे “ ज्या कर्थेत जीवनाच्या कोठल्या ना कोठल्या तरी अंगावर प्रकाश.
मुन्शी प्रेमचंद १२६
-टाकडेला नाहीं, सामाजिक रूटींविषर्यी जीत तीत्र आलोचना नाहो, जौ
मनुष्याच्या सद्भावना दृढ करीत नाहीं व जी मनुष्याची कुतूहूलप्रद्वात्ति जागी
करीत नाहीं, ती कथाच नव्हे. !? युरोपियन कथेला कदाचित् निहंतुकता किंबा
केवळ मनोरंजन हेंच ध्येय मानवत असेल; पण भारतीय भाषांतील कथा
मात्र आपल्या वैरिष्ट्यानें चमकडीच पाहिजे, असा प्रेमचंद यांचा आग्रह
होता. याच भूमिर्केत ते आणखी म्हणतात,
६६ युरोप आणि भारतवर्ष यांच्या आत्म्यांत खूप अंतर आहे. युरोपची
दृष्टि सुंदरतेवर असते, तर भारताची दृष्टि सत्यावर असते. संपन्न युरोप
मनोरंजनासाठी कथा लिहील, तर भारत हा. असला आदश केव्हांहि
त्वीकारणार नाही, नीति आणि धर्म याच आमच्या जॉवनाच्या प्रेरणा होत,
आम्ही परतंत्र आहोत; पण आमची संस्काति पाश्चात्यांपेक्षां उच आहे.
यथार्थावर दृष्टि ठेवणारा युरोप आम्हां ध्येयवादी लोकांशीं जीवनसंग्रामांत
विजयी झाला असला तरी आम्ही आमच्या परंपरागत संस्कारांना सोडू
राकणार नाहीं. साहित्याच्या द्वारांच आम्हांस आमच्या आत्म्याचे रक्षण
करावयाचें आहे. कथा आणि कादंबऱ्या यांचें शरीर आम्हीं युरोपापातून घेतले
असलें तरी त्यांतील आत्मा मात्र भारतीय आहे.
प्रेमचंद यांच्या मनासमोरचा साहित्याचा आदर्श हा असा आहे.
प्रगातेशीळ लेखक संघाच्या अध्यक्षीय भाषणांत त्यांनीं असाच निष्कर्ष
काढलेला आपण पाहिला आहे. दीन-दुःखितांचा व गोरगरिञ्ांचा कैवार घेऊन
त्यांच्या मनांतील वेदना जाणून घेर्गे ब त्यांना सहानुभूति दाखविणे हेंच
साहित्यिकाचें प्रचुख कर्तब्य आहे, असे प्रेमचंद मानीत असत. यासाठींच
६ जीवनाची आलोचना ? अशी त्यांनीं साहित्याची व्याख्या केळेढी आहे.
साहित्यकारानें आपल्याभावतींच्या देशकाल्परिस्थतीची दखल घेतलीच
पाहिजे, असे प्रेमचंद सांगत असत. ' जीवनांतील साहित्याचें त्थान या
आपल्या लेखांत ते म्हणतात, “' साहित्यकार हा बहुधा आपल्या देशकालारने
प्रमावित झालेला असतो. जेव्हां देशांत एखादी लाट उसळते तेव्हां अविचळ
राहणे हें साहित्यिकाला कधीहि शक्य होत नाहीं, त्याचा विशाळ आत्मा
आपल्या देशबांघवांचे कष्ट पाहून विव्हळ होऊन उठत्त असतो; कित्येक वेळां
वतो आक्रंदनाहे करीत असतो; पण त्या आक्रेदनांत एक प्रकारची ब्यापकता.
२०२९७ प्रेमचंद : विचारदर्दान
असते. तो स्वदेशासंबंधीं असूनहि सावभौमिक असतो. ... अमर साहित्य
विध्वंस करीत नाहीं, निर्माण करीत असतें. मानवचरित्रांतील काळिमा वर्णन
करणे हच त्याचें काम नसतं तर त्यास त्याची उज्ज्वलताहि दाखवावी
लागते. ?' यावरून प्रेमचंद यांचा साहित्यविषयक दृष्टिकोन दिसून येईल.
साहित्य हॅ हेतुपूर्वकच असू शककर्ते, अशी श्रद्धा बाळगणाऱ्या प्रेमचंदांनी
लिहिळे आहे, “' वाचकांचे मन आनंदित करणे एवढेच काम साहित्यकाराचें
नाहीं. भाट, बिदूषक, तोंडपुजे आणि स्तुतिपाठक यांचें ते काम आहे.
साहित्यकाराचें पद याहून उंच आहे. आपला पथप्रदर्शक होण्यार्चे काम
साहित्य करीत असते. आपल्यांतीलळ साणुसकी जागत करीत असतें;
आपल्परांतील सदूभावांचा संचार साहित्यामुळेंच जाग्त होत असतो. आपली
दृष्टि विशालहि साहित्यामुळेंच होत असते. ?' तेव्हां साहित्याने केवळ कला
हैंच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून चालणार नाहीं. निदान आपल्या देशांत तरी
हँ ध्येय साहित्यकाराचे ठरत नाहीं. एके ठिकाणी ते लिहितात, “* कलेसाठी
कला या तत्त्वाचा प्रसार जेव्हां देश संपन्न व सुखी असेल तेव्हां. पण जेव्हां
आपण सामाजिक व राजकीय बंधनांत जखडून गेलेला असतो, जेथें दुःख व
दरिद्रता यांचें भीषण हृदय दिसत आहे, विपत्तीमुळें ज्या ठिकाणीं आक्रंदन
ऐकूं येत आहे, तेथें विचारशील प्राण्याचे हृद्य हलल्याखेरीज कर्से राहणार! ??
आणि यासाठींच आपलें साहित्य ध्येयवादी हूर्वे असें प्रेमचंद यांचें म्हणण
होतें. आदर्शवादच आम्हांस आमच्या खऱ्या परिस्थितीची जाणीव करून देत
असतो; आणि याच दृष्टीने प्रेमचंद-साहित्य तपासून त्यांतील विचारदर्शनाचा
-लाभ घेतला पाहिजे,
: समरयात्रा ? या पुस्तकांतील कथांचा जन्म साहित्यकारास वाटणाऱ्या
देशाच्या तीज्न जागिवेतूनच झालेला दिसतो, देशांत सवेत्र स्वाभिमानाची
ज्योत उसळत आहे, सर्वत्र दिशा उजळून निघत आहेत, मृत झालेल्यांना
संजीवनी प्राप्त होत आहे, स्वत्वाचा, स्वदेशाचा, स्वराज्याचा, देशभक्तीचा
डांगोरा सर्वत्र झडत आहे, नवयुगाची तुतारी सर्वाना चेतना देत आहे,
गांधींच्या राजकारणाचा प्रसार खेड्यापाड्यांतून होत आहे, देशाच्या कणा-
-कणांतून देशप्रीति मिनून राहिली आहे- अशा वेळी प्रेमचंद यांची लेखणीच
-अलिप्त राहणार कह्ली ! तिलाहि आपली करामत दाखवावी लढागळढीच.
मुन्शी प्रेमचंद १२्ट
रा -“../९०-//*.
“ सोजे वतन ? या पुस्तकाने देशप्रीतीचा अनुभव त्यांना देऊन ठेवलाच होता;
पश त्या वेळीं ते सरकारी नोकरीत तरी होते. पण त्यानंतर थोड्याच दिवसांत
त्यांच्या पायांतील शुंखला तुटल्या गेल्या व प्रेमचंदांची लेखणी पुनः एकदां;
देशभक्तीरने पावन झाली. त्यांच्या राजकीय विचारांचे दरोन प्रथम त्यांच्याच
कथा-कादंबऱ्यांवरून आपण करून घेणार आहोंत.
महात्मा गांधींच्या विश्वव्यापी चळवळीमुळे प्रेमचंद मारं्भी प्रारंभी तरी
भारावलेले होते. १९ ३,० सालच्या एका लेखांत स्वतःच्या मनातील अमिलाषे-
संबंधी प्रेमचंद लिहितात, “' माझ्या अभिलाषा फारच थोड्या आहेत.
या वेळीं सर्वात मोठी अभिलाषा अशी कीं, आपण स्वातंत्र्य-संग्रामांत विजयी
व्हार्वे, मला घन-दौलतीची इच्छा नाहीं, खाण्यास कसेहि मिळत राहील.
मोटार व बँगला असावा अशीहि होस नाहीं. ..हां, एवर्ढे मात्र वाटते कीं,
दोनचार श्रेष्ठ प्रतीच्या कलाकृति मार्गे ठेवून आपण जार्वे; पण त्यांचा उद्देश
सुद्धां स्वातत्र्यप्रात्ती चा राहील... ...जडर्जावन मला मुळींच पसंत नाहीं.
साहित्य व देशसेवा यांजकडेच माझें सदोदित चित्त असतें. सोनें व रुपें यांच्या
दागिन्यांनी मढवलेला मनुष्य कोणत्याहि दृष्टीन॑ मोठा होऊं शकत नाहीं. जो
धनाचा पुजारी आहे अशा माणसाचा प्रभाव माझ्यावर कर्धीच पडत नाहीं.
मला याच गोष्टीचा अभिमान वाटतो कीं, निसर्ग व भाग्य यांनीं मळा साह्य
दिलें व मळा गरिबांचे दुःख भोगावे लागठे. यामुळेंच मला आध्यात्मिक.
संतोष प्राप्त झालेला आहे. ..
गांधी व काँग्रेसचे राजकारण प्रेमचंदांना पसंत होतेच अर्से मात्र नाहीं.
पण ज्या ठिकाणीं जागति आहे, चमक आहे. तेज आहे, त्या ठिकाणीं मात्र ते
लुब्ध होऊन जात असत. त्यामुळ कोणत्याहि एकाच राजकीय पक्षास ते
चिकटून राहिले नव्हते. तो त्यांच्या मनाचा धर्मच नव्हता. सन १९२३
मध्यें त्यांनी ' जमाना ? च्या संपादकांना लिहिलें होतें, ““ मी कोणत्याहि एका
राजकीय पक्षांत नाही. जी सर्वसामान्य गरीब जनतेची पार्टी निर्माण होईल,
तिचा मी सभासद होईन. ” आणि याच दृष्टीने त्यांची साहित्यनिर्मिति होत
होती. कोणत्याहि एका पक्षाचा प्रचार त्यांत नसला तरी देशभक्तीचा उठाव
मात्र डोळ्यांत भरण्याजोगा असे, “ समरयात्रा ! या कथेत नायक भाषण
करतांना म्हणतो, “' ढोक तुम्हांस लहून नेतात त्याची खबर तुम्हांस कशी
१९९ प्रेमचंद : विचारदर्शान
७५ 200.” 0. “0.” ७ :_,.“ 6.” 0, ७.७५ १.०० ,०७९ ७०९१ &५ १७-०९ उ. ०७०७. _. ०७७0 ७.७. ११ ».४१५ ७.०४.
/-./”*
नाही ! आपल्या हातांतील सर्वे रोजगार हिसकावून घेतळे जात आहेत,
आपला सर्वनाश होत राहिला आह, आपण डोळे उघडून कां बघत नाहीं !
पूर्वी लाखो बांधव स्वतःच्या हाताने सूत काढीत ब कपडा बनवीत; पण
आतां सर्ब कापड वबिदेशांतून थे्ते. पहिल्याने लक्षावाचे लोक येथे मिठाचा
थैेदा करीत असत, आतां मीठहि बाहेरून येतें. येथें मीठ तयार करणें हा
गुन्हा मानला जातो. आपल्प़ा देशांतच मोठ एवढे आहि कीं, सर्व जग'ळा
दोनशें वर्षे पुरेल; पण आपण सात कोटि रुपये केवळ मिठासाठीं खर्च करीत
असतो. अपल्या येथे मिठाचे ढीग आहेत पण त्यास आपण शिवू शकत
नाहीं .,..आपण काय हा अन्याय सहन करणार ६... तुम्हांस तुमच्या शक्तीच
ज्ञान नाहीं. एवढी गोष्ट ध्यानांत अतूं द्या की, या जगांत जो आपलें स्वतःचे
रक्षण करूं शकत नाहीं तो नेहमी दुष्ट व घ्वार्था लोकांची शिकार बनत
असतो. .. तुम्ही काय करणार आहांत १ मददाप्रमाणें आपल्यावर होणाऱ्या
अन्यायाचा प्रतिकार करणार आह़ांत कीं मित्र्याप्रमाणें घरीं बसून नशिबाच्या
नांवाने रडणार आहांत ? पण अर्से कधी होऊं नये... आपण न्याय ब सत्य
यांच्या पायावर उभे आहोंत; हींच आपली हत्यारे आहेत. आपणांस अशा
बीरांची जरुरी आहे कीं, चित्तांतील हिंसा व क्रोध टाकून देऊन धर्मासाठी
इैश्वरावर विश्वास ठेवून कांहींहि करावयास तयार होतील...!? या सध
बक्तव्याचा अर्थ कर्थेतील पात्राच्या तोंडूनच व्यक्त झालेला आहे. वाचकांनी
नेमका बोध त्या वेळीं घेतला असेलच, एवढ्या कडक शब्दांत स्पष्टपर्ण राजकीय
उत्थानाचा पुरस्कार करणारा कथाकार प्रेमचंदांखेरीज दुसरा कोणीहि नव्हता.
याच कथासंग्रह्ांत ' आहुति ' नांबाची एक सुंदर कथा आहि. येणाऱ्या स्वरा-
ञ्याचें स्वरूप कसं असावे, त्यांत वरिष्ठ किंवा धनबान् लोकांची सत्ता किती
असावी याचें विवरण करतांना एक नायिका रूपमणि म्हणते, ““ आणि
स्वराज्य प्राप्त झाल्यानंतरहि हें संपत्तीचे प्रभुत्व कायम राहिलें तर आणि
शिकलांसवरलेला समाज असाच स्वार्थांन्य बनला तर तर मी सांगते की,
असें स्वराज्य न आलें तरी चांगलें, इंग्रजी घनवंतांची धनलोलुपता व
शिक्षितांची स्वहित साधण्याची प्रबळ इच्छा आज आपणांस पीडा देणारी
आहे. या दुःस्थितीबद्दल प्राण हातावर घेऊन आपणांस तोंड द्याबयास
नको का ! हे सर्व लोक त्वदेशींचे असले म्हणून त्यांची गय थोडीच करावी !
९... |
झुन्शी प्रेमर्चंद १३
*२.॥४७/७१%/४१./€४.” १...” ४.” ७.” २” ४.” ७ ७ ४७” ४४८0 “८ ४५-४७” 0५” “€० “०"-€१०”//%-/१-*०/१% “0०-”
"१८/१५/४५४१. ४-८ ७.”
माझ्या मनांत तरी स्वराज्याचा हा अर्थ नाहीं, की जॉनच्या नागी सेठ गोविंद
बसावा, मी समाजाची अशी व्यवस्था होण्याची इच्छा धरते कीं, तेर्थ कर्मीत
कमी विषमता रहावी,
आज स्वराज्य आलेलें आपण पाहिले, पण इंग्रन गेला आणि आपण
आपले शत्रु झालो. अर्से होऊं नये, म्हणून जपण्यासाठी केवढा मोठा इशारा
भप्रमचंद यांनीं या ठिकाणीं दिलेला आहे. प्रत्येकाच्या मनाची ह्वाधीनता रक्षण
करणें, सवीना समान संधि देणें, सवांचा आत्मविकास घडवून आणणें, पीडि-
तांचे दुःख दूर करणें, याचेच नांव स्वराज्य व स्वातंत्प्र, नुसता मनुष्य पदवी-
धर झाला म्हणजे त्यास माणुसक्री येते असेंहि नव्हे. मानवजातीचे विशाळ
सहानुभूतीने दुःखनिवाइण करील तोच खरा शिक्षित, नाही, तर कायत्या
दिश्धणाचा उपयोग ? जी विद्या आपलें पारतत्र्य हरण करीत नाहीं ती विद्या
कसली ? याच कथेत रूपमागि पुरे म्हणते, काय “' डिग्री घेण्यांतच माणसाचे
ज्ञीवन सफळ झालेलें असारबे ? सारा अनुभव, सारें ज्ञान काय पुस्तकांतच
सांठबिळेळ आहे ! पोट भरण्याचे साधन म्हणन का शिक्षण ! राष्ट सग्रामांत
मनोबल वाढावे व चाखतयाची घडण व्हावी हाच शिक्षणाचा हेतु रहावा. ..
याच प्रकारच्या राष्ट्रीय शिक्षणाचा प्रसार प्रेमचंद आपल्या साहित्याच्या द्वारा
करीत होते,
इंग्रज सरकार जुलमी बनलें होते. सर्वत्र धाक दाखवून छळ सुरू होता.
पुढाऱ्यांची धरपकड होत होती. आर्थिक परिस्थिति भीषण होऊन बेकारी
माजत होती, मजरांची व शेतकऱ्यांची उपासमार सरू होती. अशा वेळीं
ग्रेमचंदांची लेखणी त्यांचीं दुःखें वर्णन करण्यासाठीं सरसावली आहि, " जेल ?
नांवाच्या कर्थेतील एक नायिका सजल नेत्रांनी बोलत असते, “' खेडेगांवांतून
आजकाड़ बंदुर्काच्या घाकानें घान्य वसूल केलें जातें; कर वा शेतसारा वसूल
केला जातो. गरीब शेतकऱ्यांपार्शी रुपये कोठून असणार ! घान्याचा भाव
दिवसेंदिवस घटत चालला होता. पावणेदोन रुपयांत मणभर गहं येतात. ..
अम्माजी म्हणत होती कीं, घान्य इतके स्वस्त कधींच झालें नव्हतें, . . . गरीब
किसान सारा कोठून देणार ! आणि सरकारचा हुकूम असा कीं, शेतसारा
जळजबरीने वसूल करावा. ... सरकार आपल्याच फायद्यांत. गुंग. .. इकडे
प्रजा जगो वा मरो, नमीनदाराच्या मदतीला वसुठीसाठी पोलीसहि सग्ज
१३१ प्रेमचंद : विचारदर्शान
*झाळे आहेत. . .. या शेतकऱ्यांची दुःखद कथा कोणे ऐकणार ! ?? किसानांचे
ह दुःख पाहून प्रमचंद अनेक वेळां व्याकुळ होऊन गेलेले असत. इंग्रज
-सरकार व त्याच्या मदतीस आपल्याकडचे धनवान जमीनदार असल्यामुळें
शेतकऱ्यांचे विलक्षण हाळ होत असत. किसानांची हीच परिस्थिति ' कमभामि
-कादजरींत हि वर्णन केळेडी आहे £ “ जेव्हां भाव चांगले होते तेव्हां धान्य
“विकून शेतकरी सारा भरीत असे. पण आतां भावच उतरल्यावर किसान
भिचारा करणार काय ! शेतसारा कोठून देणार आणि कजे तरी कर्से फेडणार !
-मोठा जिकट प्रसंग निर्माण झाला आहे खरा. ..- एक एक दाणा विकून,
जमिनींतीछ एक एक तृण विकून, शेतकऱ्यांनी पैसा उभा केळा पण साऱ्याच्या
- चौथ्य़ा हिश्शानेंहि त्यामुळे भरती झाली नाहीं. ?' देशांत निमोण झालेल्या
आर्थिक संकटाचे किती मार्मिक चित्र प्रेमचंदांनी रेखाट्ळे आहे ! ' समरयाला ?
या पुस्तकांतील सर्वच कथा देशभक्तीच्या भावनेनं भरलेल्या आहित, त्यामुळेच
प्रेमचंदांचें हॅहि पुस्तक जप्त झालें होते, पण त्यामुळें प्रेमचंद यांच्या लेखणीची
' घार थोडीच बोथट दशोणार !
या किसानांच्या पाठीमार्गे लागणाऱ्या सर्व प्रकारच्या शत्रूंचा समाचार
प्रेमचंद यांनीं घेतला आहे. भूमिपाति, उद्योगपति आणि सरकार यांची एक-
सारखी करडी नजर भिचाऱ्या किसानावर खिळून राहिलेली असते.
'* रंगभूमे ' कादंगरींतील उद्योगपतीच्या लीला या दृष्टीर्ने पाहण्यासारख्या
अहित. फार मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या औओद्योगिकीकरणामुळे सर्व ग्रामीण
- वय्नवस्था बिघडून जाते. खेडेगांवांतील शांत व रमणीय निसर्गदृश्यांवर
भाळून गेंडेली जनता निजींव अशा यंत्रांच्या नादाने ब शरीरकट्टा्ने जणुं
- यंलच बनून जाते. या कारखानदारांना व भांडवलदारांना इंग्रज सरकारचे
पाटबळ असल्यामुळें ते करतील ती पूवे ठरत असे. धरणीमातेची सेवा कोण
“करीत बसतो ? गिरणीत जावे, राब-राब राबावे आणि दहा रुपयांचा माळ
-स्वतःच्या श्रमाने निमाण करून दहा आणिच पदर्री घ्यावेत, या तांबेदारीचेच
त्याला सुख वाटूं लागतें, स्वच्छ हवेंत राहून सकस अन्न खाणारा शेतकरी
. मजूर झाला कीं त्याचे जीवन किती भकास व भयाण होऊन जातें ! प्रेमचंद
लिहितात, “' ते मग घाणेरड्या, तुटलेल्या-मोडलेल्या व दुर्गघाने युक्त अश्या
*झोपडींत राहतात. त्यांना पाहतांच द्रिसारी येते. ते असे कपडे वापरीत असतात
सुन्शी प्रेमचंद १३२.
५८.०” %../0% ४९. //0 ८४९५७.४ २५०५४१५ 4 ६...%७७४... ५9 0 “कळ
१७५४ ४०७ १७७७०७७७०७. 3७.०९ ७५७०७ १७-७० कळ” >. १ २० २-८ ७७५ ८ ४७०-४ ४७.५८ ४७७ ७०५४११०४८७”
की, त्यायोगे आपण आपले बूटहि पुसणार नार्ही. ते अस अन्न खातात की, आपण
आपल्या कुत्र्यासद्षि तसळें अन्न घालीत नसतो, एवर्ढे असूनहि हे भांडवलदार
व उद्योगपति होणारा नफा भागीदारांना वाटतात व कष्ट करणाऱ्या मजुरांना
मात्र उपाशी ठेवतात. ?! ही शेतकऱ्यांची-मजुरांची अवस्था, आपल्या इकडील.
दोतकरीहि पुष्कळ वेळां मुंबईस जातात व गिरण्यांतून राबत असतात. त्यांच्यांत
पडलेला फरक नीट पाहिला तर प्रेमचंद यांच्या लिहिण्यांतील सत्यता पटण्या-
सारखी आहे. जमीनदारी पद्धत ब भांडवलशाही यांच्या मिश्रणांतूनच दारि-
द्याचा जन्म होतो. प्रेमचंद यांची ' गोदान ? ही कादंबरी तर भारतीय शेत-
कऱ्याची दुःखद परिश्थिति, हे सावकार व भांडवलदार कशी करून टाक-
तात हँ द्विणारी आहे. या कादंबरीचे परीक्षण करतांना श्री, मदन गोपाल
यांनीं खेडेगांबी एक प्रचलित असणारे छोटेसे प्रहसन दिलें आहे. त्यांत
सावकार व किसान यांची झटपट चांगलीच रंगलेली दिसते. कोणी एक शेत-
करी येऊन ठाकुराचे पाय धरीत आहे. दादा-बाबा केल्यानंतर सावकार दहा
रुपये कर्जे देण्यास तयार होतो. कागदपत्र तयार होऊन त्या शेतकऱ्याचा
आंगठा घेतला जातो. आणि ठाकूर त्याच्या हातावर केवळ पांचच रुपये,
ठेवतात. शेतकऱ्यास मोठेच आश्चर्य वाटून तो विचारतो,
६६ मालक, हे तर पांच रुपय आपण दिले. ??
५६ असे कसें होईल ? पांच नाहींत, दहा आहेत. ”
६६ नाही सरकार, पांचच आहेत. *?
£ नीट मोज पाहूं. दहा आहेत.
६ पुनः मोजा मालक, दहा रुपये नाहींत, पांचच आहेत.
6६ एक रुपया नजराण्याचा झाला कीं नाहीं ! ”
6६ हय सरकार, ”
£६ एक रुपया लिहिणावळ नको द्यायला ! ??
£ ह सरकार. ?
६६ एक कागदाचा झाला. ?
“६ हां सकार, ”
६६ एक सही केल्याचा, ?
६६ बरोबर सरकार. ??
१३३ प्रेमचंद : विचारदर्शन
५६ एक व्याजाचा.
६ होय मालिक. ?
५६ आणि पांच रोख दिले तुला, झाले कीं नाहीं दहा? ”
६ होय सरकार, आतां हे पांच रुपये सुद्धा ठेवून घ्या मालक | ?
५६ काय १ वेडो अहिस काय? ?
६ नाहीं सरकार |! एक रुपया छोटी ठाकुरीण हिच्यासाठी नजराणा, एक
रुपया मोठ्या ठाकुरीणसाठी समजा, एक रुपया छोट्या ठाकुराणीस पान
*खाण्यासाठी, एक रुपया मोठ्या ठाकुराणीस पान खाण्यासाठी आणि उरला
'एक तो मालक, आपल्या क्रियाकमान्तरासाठी- '
सावकाराची निर्देयता आणि शेतकऱ्याची अनुर्कपनीय स्थिति या छोट्या
'प्रहसनांत चांगळीच व्यक्त झालेलो आहे. या किसानाच्या घराचे वर्णन तरी
काय विचारावे £ अर्धे-अधिक्र पडलेले, दारांत एकच बैल बांधलेला आणि
पोरेंबाळें उघड्या अंगाने हिंडत आहेत. ही त्थाति पर्वताएवढें घन ब धान्य
निमीण करणाऱ्या शेतकऱ्यांची !
प्रेमचंद यांचे॑लक्ष अस्यूरय़ांपर्यंत पोंचलेळें होतें. ' ठाकुर का कुओ १
ही प्रेमचंद यांची एक छोटीशी पण अत्यंत रसपूर्ण ब श्रेष्ठ दजाची कथा आहे
ठाकुरांच्या विहिरीवर आजारी बापाला पाणी आणून देण्यासाठी एक अस्पृश्य
मुलगी - गंगा - आलेली होती. तिच्या बापाला हें पसंत नव्हतेच. “' हातपाय मात्र
तोंडून घेशील. गप्प बैस मुकाट्याने. ब्राह्मणाच्या बायका रागे भरतील. ठाकूर
काठी मारतील *' असा इशारा त्यानें पोरीला दिलाच होता. पण बापास न
'जुमानतांच गंगा रात्री पाणी आणावयास गेली खरी; पण तिच्या मनांत
सहल प्रश्न निमोण झाले, हे सवे लोक उच्च वर्णाचे... आणि आम्ही मात्र
नीघ-हँं कोणीं केळे ! या अजाण पोरीच्या प्रश्नाला समाधानकारक उत्तर
अर्से अजन कोणींहि दिलेढें नाहीं
अक्या प्रकार समाज व राजकारण यांचें निरीक्षण प्रेमचंद यांनीं केळे आहे
जीवनांतील विषमता दूर व्हावी व अथेव्यवध्या समान प्रमाणांत रह्दाबी हॅ
साथे सामाजिक तत्त्वज्ञान प्रेमचंद यांचें होते. स्वाधीनता किंबा स्वतंत्रता हे
त्यांचे राजकीय ध्येय आपण अनेक वेळां निरखून पाहिलें आहे. चाळू असणाऱ्या
समाजरचर्नेत अर्थातच त्यांना पुष्कळ दोष दिसून येत असत. अन्याय,
मुन्शी प्रेमचंद १३७
४-५ १-४ २/7५/७ “ ५ 7२. -५<८१-४ > -- --९८-५-४०/९०५-
गुलामागेरी, असत्य, अस्यृश्यता, अज्ञान, इत्यादींचा लोप होऊन सर्वसुखी
असणारा समाज निर्माण व्हावा, हँ प्रेमचंदांचें प्रमख अर्से सामाजिक ध्येय
होते, प्रेमचंद स्वतः कोणत्याहि एखाद्या धर्माला बा संप्रदायाला चिकटलेले
नव्हते. देवघमे प्रेमचंद मानीत नसत याचा अथे जुन्या रूटि किंबा अनिष्ट
परंपरा व भांडणे निर्माण करणारा परमेश्वर त्यांना नको होता. जनता-
जनार्दनाची सेवा-उपासना त्यांनीं कशी केली ते आपण पाहिलेच. या जनतेस
दुःख देणारा देव मानण्यास प्रेमचंद तयार नव्हते व या देवावर आधारलेला,
विषमता निमोण करणारा कोणताहि धे त्यांना नको होता. ' गोदान मधीठढ
मेहता हद्दी व्यक्ति मोठी चिंतनशील दर्शविली आहे. त्यांच्या मानासिक विकासा-
संबंधी लिहितांना प्रेमचंद लिहितात, “' कोणत्याहि सर्व ईश्वरावर त्यांचा
विश्वास नव्ह्ता. जरी ते आपली नास्तिकता वारंवार प्रकट करीत नव्हते तरी
त्यांच्या मनांत हृढ धारणा अशीच बनली होती कीं, प्राण्यांचे जन्म-मरण, पाप--
पुण्य, सुख-दुःख यांमध्ये इंश्रराचा कांहीं संबंध नसावा. त्यांचा असा
विश्वास होता कीं, माणसाचा अहंकार एवढा वाढला कीं त्यानें आपल्या
प्रत्येक कार्यांची प्रेरणा इश्वराशी नेऊन भिडवली. ?' स्वतःच्या वैयक्तिक.
जीवनांत परमेश्वरास स्थान देण्याची जरूरी प्रेमचंद यांना वाटत नसली तरी'
जनतेनें मानलेल्या परमेश्वराची निंदा किंबा तिचा बुद्धिभद प्रमचंद यांनीं कधी
केला नाहीं. दीन-दारद्री माणसांना आपलें दुःख विसरून जाण्यासाठी एक.
साधन म्हणून धर्मांची ब देवाची आवद्यकता असते. अर्थात् हा घर्महि
प्रेमचंद यांना मान्य नव्हता. जगांत दीन-दरिद्री कोणीच असूं नये; परमेश्वर
दयाळू तर मग सर्वच सुखी-समाधानी कां असूं नयेत ! असे विचारु
प्रेमचंदांनी अनेक ठिकाणी व्यक्त केळे आहेत. देवधमे यांच्या नांवाखार्ली'
चाललेले ढोंग व जनतेची चाळू असणारी टूट प्रेमचंद कशी सहज करणार ?
हिन्दु-मुसळमान यांच्या संदैव होणाऱ्या झगड्यांकडे ते याच दृष्टीनें पाहूत..
त्यांच्या कर्थेतील कित्येक पार्त्रे मुसलमान आहेत. हिंदुस्तानी भाषेवरदि त्यांचे
प्रेम असे. उर्दू साहित्याचा अभ्यास त्यांनीं विशेष केळा होता, नवाबराय ब
प्रेमचंद द्दी नार्वेहि त्यांना एका विदिष्ट हेतूनें आवडत असत. त्यामुळें
मुसलमानी धमोबद्दल त्यांना तिरस्कार नव्हता, तसा हिंदु धर्माबद्दलहि
नव्हता. पण दोनहि धर्मीयांचा या देद्यांत नांदण्याचा सारखाच अधिकार
<“€*-/”%-४0४०// ४-१ /*४../€१४४१ “00.7१. ४४७ ७ ७४.७७ ४१.७० किक
१३५ प्रेमचंद : विचारदर्शीन
आहि; दोघांनीं सलोख्याने दिवस काढले तरच कांही निभाव लागेल, असे
विचार मात्र त्यांनीं वेळोवेळी व्यक्त केडेले आहेत. '
अनेक बिंदूर्नी बनलेल्या समुद्रांत जाऊन विलीन होण्याचा मार्ग दाखवि-
णारा प्रकाशकिरण म्हणजे धर्म, धमामुळें आपल्या दृष्टीची विशालता वाढते,
आपली अनुभूति विस्तृत होते. माणसाच्या चित्तांत दया निर्माण होणे हॅ
एक धघरमाचॅच लक्षण आहे, हे प्रेमचंदांचे विचार कोणासहि पटण्यासारखे
आहित. त्याचप्रमार्णे खोट्या धर्मावर प्रेमचंदांनी अनेक ठिकाणा प्रखर
टीका केळेढी आपण पाहिली आहे. “ जे मोठे आहेत, प्राताशित आहेत, त्यांच्या -
साठी ईश्वर दयाळू बनतो, कारण ते दुनियेला लुटणारे आहेत | पण आपल्या-
सारख्यांना ईश्वराची दया कोठेंच दिसत नाहीं. .. पूर्वजन्माची कथ मनोरंजना-
साठींच निर्माण झाली असावी, ज्या शिक्षेचे कारण आपल्यास समजून येत
नाहीं तिचें महत्त्व तरी मानावे कशाला १... आजकाल धर्म हा धू्ताचा व
संधिसाधु लोकांचा अड्डा बनलेला आहे. या निर्मळ अद्या सागरांत अनेक
बलशाली व उपद्रव देणारे मासे निर्माण झाले आहेत.' इत्यादि विचारहि
पटण्यासारखे आहेत. म्हणजे मुळांत देवधर्मांची कल्पना उदात्त असेल ती
मान्य करण्यास प्रेमचंदांची हरकत नाहीं, पण ज्या वेळीं वैयक्तिक स्वार्थ, दंभ,
कटुता, शत्रुत्व, लटारूवणा, फसवेगिरी इत्यादि आम्िष्ट प्रकार देवधर्माच्या
नांबाखालीं सुरू झाले तेव्हां प्रेमचंदांनी त्यावर कडाडून टीका केली.
असे असले तरी भारताच्या प्राचीन संस्कृतीबद्दल प्रेमचंद यांच्या मनांत
नितान्त आदर वसत असे. धम, तत्त्वज्ञान, संस्कृति इत्यादि गोष्टींच रक्षण होणे
आव्यक आहे, अर्से त्यांना वाटे. भारताची आध्यात्मिकता त्यांना अभिमानाची
वाटे, या दृष्टीनें त्यांच्या एका सुंदर कथेचे उदाहरण या ठिकाणी द्यावयास
हरकत नाहीं. “ यही मेरी मातृभूमि है” ही एक प्रेमचंद यांची भावपूर्ण
कथा असून तींत मातृभूमीबद्दळचा त्वाभिमान फारच चांगल्या प्रकारे व्यक्त
झालेला आहे. आणि हिंदुस्थानर्चे खर॑ वैभव कोणते हॅहि चांगल्या प्रकारे
दार्शित केळे गेळें आहे. आधुनिक काळांतील सुखसोर्थीनीं व सुधारणांनी गज-
बजलेल्या आपल्या समाजाने आपणांसमोर कोणता आदर्श ठेवावा, याचीहि
सूचना या कथेत मिळण्यासारखी आहे. कर्थेतील मुख्य कल्पना अशी कीं,
कोणी एक वृद्ध ग्रइस्थ साठ वर्षानंतर अमेरिकेतून आपली मायभूमि पाहृण्या-
मुन्शी प्रेमचंद १्ढ्दे
२.” २.८६ /%७४९../४१. “0 »५./१./१४” १५५८” /४५/४१"-./१./*.<८१०-*-€५६-८४/”५-€५-९>/६-/ -“'७/४१८// १४५४0७0४७४ ४७५४९.» 7४५0५५४५०१ ४४७
साठी परत भारतांत येत आहे. अमेरिकत त्यानें खूप मोठा व्यापार केळा,
दौटत मिळवली, मानसन्मानहि त्याला भरपूर प्रमाणांत प्राप्त झाला; पण या
परक्या देशांत किंमतवान राजवाड्यांत राहण्यापेक्षा आपल्या मातृभूमीच्या
झोपडीत रहार्वे असा विचार करून तो हिंदुस्थानांत येतो. प्रथम तो मुंबईस उतरळा
तेव्हां त्याची थोडी निराशाच झाली. काळे, काळे कोट-पाटडोण घातलेले ब
अर्धेबट इंग्रजी बोलणारे कांही लोक त्याला प्रथम भेटले. इंग्रजी दुकाने, ट्राम-
गाड्या, मोटारगाड्या यांची गर्दीच उसळलेली होठी. रेल्वेतून तो जेव्हां
आपल्या गांवीं येण्यास निघाला तेव्हां त्याच्या डोळ्यांतून अश्रु ओघळत होते.
आपल्प्रा मातृभूमीचे दर्शन घ्यावें, ही लालसा त्याच्या मनांत तीन्रतेनें निर्माण
झाली होती; पण मुंबईला ती कांहीं पूर्ण झाली नाहीं, ज्या देशाच्या दशनाची
इच्छा त्याच्या मनांत होती तो देश जणुं हा नव्हताच, यथे तर इंग्लंड किंवा
अमेरिकाच उतरलेली दिसत होती,
तो आपल्य़ा गांवांत जाऊन पोचला तो त्यास कोण ओळखणार ! त्याच्या
बालपणाचे सर्व साथीदार मरण पावले होते. त्याची मोडकीतोडकी झोपडी
जमीनदोस्त होऊन गेली होती. लहानपणी ज्या ठिकाणीं त्यानें मनसोक्तपर्णे
आनंद लुटला होता, त्याची एकहि साक्ष त्याच्या दृष्टीस पडेना, गांबांत कोर्ट-
कचेऱ्या, पोलीसठाणें इत्यादि गोष्टी नव्यानेच आल्या होत्या. लोकांच्या मुखांवर
दैन्य, चिंता व दुनेळता स्पष्टपणे दिसत होती. सांसारिक चितेने सर्व जण व्यग्र
झालेले होते. दुल, कांतिह्ीन, रोगिष्ट; फाटके कपडे घातलेले ळोक पाहून
त्याला वाटलें, हा का आपला भारतवर्ष ! याच्यासाठी का आपण अमेरिकॅतून
परत आलो ? अशा प्रकाररे तो सर्वत्र हिंडत राहिला, त्याला आपली खरी
मातृभूमि मात्र कोठेंहि सांपडली नाहीं. शेवटी एक अंधाऱ्या रात्री तो उदा
होऊन हिंडत असतांना त्याचे चित्त मातृभूमीच्या चिंतनार्ने भरून आळे.
आपल्प्रा मायभूमीची आति उत्कृष्ट अशी सजीव मूर्ति त्यानें डोळ्यासमोर उभी
केली, पहां2े तीनच्या सुमारास ' इमारे प्रभु अवगुन चित न घरो) या
गाण्याच्या ओळी त्याच्या कानांवर आल्या मात्र-तो चटकन् सावध झाला.
त्यार्चे हृदय सद्गादित झालें, आवाजाच्या अनुरोधाने त्याने पाहिले-हाच
त्याच्या मातृभूमीचा नीवनदायी स्वर ! त्याने पाहिळे तो पंघरावीस वृद्ध स्रिया
घांदरें बसत धारण करून, हातांत लोटे घेऊन गंगास्नानास निघाल्या आहित
१३७ प्रेमचंद : भाषासौंदर्य
आणि रस्त्याने वरील गाणें म्हणत आहेत. शिवशिव, हरहर, गंगे गंगे,
नारायण-नारायण असे शब्द मधून मधून उच्चारले जात आहेत; आणि मधुर
भावमय आणि एक प्रकारचा प्रमाव निर्माण करणारें गाणें गरात आहेत.
हॅ हृद्य पाहतांच आपला भारत जवळ असल्याचें त्याच्या लक्षांत येऊं लागलें,
तो ग्रहृत्थ आनंदाने बेहोष होऊन गेला. त्या लोकांच्या समुदायांत तो
आपोआप मिसळून गेला. पांच-सहा मैलांचे डोंगरमाथ्यावरील अंतरहि
त्यार्ने त्या भरांत तोडळ॑ आणि तो पवित्र गंगा नदीच्या किनाऱ्यावर पोचला.
प्रत्येक हिंदूला या ठिकाणीं येण्यांत अभिमान वाटे, गंगामातेच्या दर्शनाने तो
“पावन होऊन गेढा, शेकडो माणसें भक्तिभावाने स्नान करीत असल्याचा
देखावा त्याच्या दृष्टीस पडल्याबरोबर तो हर्षित होऊन गेला. कोणी मित्र
म्हणत आहे, कोणी ध्यान करीत आहे, कोणी हवन करीत आहे, कोणी गंध वा
भह्म कपाळीं लावून संध्येस असलें आहे, त्याच्या मनावर या हृदयाचा फारच
परिणाम झाला ब तो एकदम बोलला, “ हां | हाच माझा प्रिय असा भारत-
बर्ष आहे. हीच माझी पावित्र अशी भरतभूमि आहे. याच सर्वश्रेष्ठ मारताच्या
दर्शनाची एकमात्र इच्छा मला होती, येथल्याच पवित्र धुळीचा एक कग
बनून राहण्याची लालसा होती. * त्यार्ने मनसोक्तपणे गंगा नर्दीत स्नान केर्ले.
शूचिभूत.होऊन त्यानें सवे देवतेवतांचें दर्शन घेतलें व तेथेंच राहण्याचा
निश्चय केला. अमेरिकेत मोठमोठ्या इमारतींत आधुनिक साधनांनी युक्त
"अश सुघारणा होत्या, पण त्या या ग्रइत्थास मानवल्या नाहीत. गंगातीरावर
एक छोटीशी झोपडी बांधून आपळें आयुष्य व्यतीत करण्याचा निश्चय
त्यानें केला,
भ्रेमचंद : भाषासोंदये १४
प्रेमचंदांच्या चरित्रकथनचा भाग संपवून त्यांच्या वैचारिक वैभवाचीहि
आपण थोडक्यांत ओळख करून घेतली आहे. यानंतर आतां प्रेमचंदांच्या
भाषारसोंदर्यासंत्रंधी थोडा विचार करावयाचा आहे. प्रेमचंद यांच्या साहित्याचे
१५५- १९५..० ११७४४१७७०४ १५८७७०७ ७४४९९ ८७४१७६७०५० ७७०५१०८४०७ ७४७७७७ 71७८. जे ७७४ केक” ८७०७४००७४७ ७७४५७ .. ७७ १७७०४७७०५४ ७७ १७४७ ७४१ ७४४७०0 ७७४०१०...» ७...» क...» _./७४0 ७७ 3९. ७७४७११... "७... ५२... ...७४९ ० ...७४ ७ ७७४१७ ७७ ७७.४४ ७.८.&४७... 40५. ४४ "१४७७४ कक “च
प्रत्यक्ष वाचन आणि मनन झाल्याखेरीज त्यांच्या भाषेसंजंर्धी कांदी निश्चितपर्णे
सांगतां यावयार्चे नाहीं. मनुष्य जसा असतो तशी त्याची भाषारौली असते,
या टीकाकारांच्या मतानुसार प्रेमचंद कसे होते, याचें विवेचन केल्यानंतर
प्रेमचंदांच्या भाघादैलीविषरयी कांहीं अंदाज या ठिकार्णी करावयास हृरकत.
नाहीं. स्वतःची आवडनिवड', स्वतःचे राजकारणवि्रयक सिद्धान्त, समाज,
घमे-नीति यांसंभं्धीचे स्वतःचे विचार, जीवनाकडे पाहण्याची स्वतःची दृष्टि
इत्यादींच्या चिंतनाचा परिणाम लेखकाच्या लिहिण्याच्या पद्धतींत वा भाषा-
सरणींत प्रकट झालेला असतो. प्रेमचंद यांच्या भाषेच्या सौंदर्याचे वर्णन कर-
तांना त्यांची विशिष्ट वर्णनपद्धति, चरित्राचित्रणाचे कांहीं नमुने, सुखःदुखादि
मानसिक अवस्थांचे सूक्ष्म रेखाटन, निसर्गाचे मनोवेधक वर्णन इत्यादाचाहिः
विचार कांहीं उदाहरणे देऊन आपण करणार आहोंत. अ्थातू या सव प्रकारांत
त्यांच्या भाषाशैलीस प्राधान्यॅकरून महत्त्व राहीलच.
प्रेमचंदांची स्वतःची म्हणून एक विशिष्ट प्रकारची भाषासरणी आहे.
आपण पाहिलेच आहे कीं, प्रेमचंद उद् भाषेशी निकटत्बाने परिचित होते.
उदू साहित्याचा व भाषेचा त्यांचा अभ्यास असून त्या भाषेतून त्यांनीं प्रारंभी-
च्या काळांत कांही ठेखनहि केळे. यामुळें त्या भाषेत उदू शब्दांचा किंवा
वाकप्रचारांचा भरणा विशेष दिसेल तर त्यांत फारसे आश्चये नाहीं. भाषा
सरळ, अलंकारारहित पण थोडक्या शब्दांत मोठा आशय व्यक्त करणारी
आहे. पात्रांना अनुसरून त्यांची भाषा बदलत असते. मुसलमान व्यक्ति
चोलूं लागल्या कीं उदू किंवा फारसीमिश्रित हिन्दी या भाषांचा वापर अधिक
प्रमाणांत झाळेला दिसून येतो. खेडुतांच्या भाषेशी तर प्रेमचंद यांचा ल्हान"
पणापासूनचा संभंध होता. ग्रामीण जीवनाचा सारा उठाव त्यांच्या कथाकादं-
बऱ्यांतून जो दिसून येतो, तो पात्रांच्या खास ग्रामीण भाषेमुळेंच. सारी सजी-
वता भाषेपुळेंच पात्रांच्यामध्ये निर्माण होत असते. या दृष्टीर्ने प्रेमचंद यांच्या
भांषच महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यांच्या भाषेंत जोर आहे, प्रवाह आहे,
प्रसाद आहे. अर्थवाही भाषा प्रेमचंदांखेरीज दुसऱया कथाठेखकास क्चितच
जमणारी होती. हिन्दु आणि मुसलमान यांना सहज पचनी पडणारे प्रेमचंद
यांचें साहित्य आहे, याचें कारण त्यांच्या भाषेचे अधिष्ठान विस्तृत होतें हच
होय.
'२-“४५६०”९४..” ७ ..»४१७०४ १ ७०”७ के
१३९ प्रेमचंद : भाषासौंदर्य
सर्व कथांतून किंवा कादंबऱ्यांतून एकच प्रकारची भाषा प्रेमचंदांनी वाप-
रली आहे असें नव्हे. त्यांच्या भाषासरणींत उत्तरोत्तर विकास झालेला दिखून
येतो. साधेपणा व गतिपूर्णता हे गुण उत्तरोत्तर त्यांच्या लेखनांत वाढीस
लागलेले दिसतात. प्राराभिक काळांत त्यांच्या लेखनांत साहजिकपर्णेच थोडी
कृत्रिमता आणि शब्दांची कसरत दाखविण्याची पोरकट होस असली तरी
प्रेमचंद या अवर्घ्वेतून चटकन् बाहेर आले, ज्ञान ब अनुभव यांचें क्षेत्र
वाढीस लागलें की साधेपणा येऊ लागतो. आत्मविश्वासाची प्रचीति येत
राहिली कीं सुबोघधता आपोआप निर्माण होऊं लागते. उर्दू, इंग्रजी किंबा
बंगाली वाड्मय वाचून प्रेमचंदांची दौली आकारास येत होती या म्हणण्यासहि.
फारसा अर्थ नाहीं असें नव्हे. पंडित बनारसीदास चतुर्वेदी यांच्या शैलीविष-
यक प्रश्नाला उत्तर देतांना प्रेमचंदांनी म्हटले, '“। माझ्या ठेखनशैलीवर
दुसऱ्या कोगाचाहि प्रभाव पडलेला नाही. जर थोडा असेलच तर तो पंडित
बिशननारायण दर आणि डॉक्टर रवींद्रनाथ यांच्या शैलीचा असावा, ??
प्रेमचंद हे कथादंजऱ्यांच्या क्षेत्रांत तरी युगप्रबतक ठरलेले आहेत. चरित्र-
चित्रण, कथानक, पारोत्यितीशीं सामरस्य, भाषाशैली आणि मानव्याबद्दल
विशाळ सहानुभूति या प्रेमचंद यांच्या यशाच्या विशेषांचे अनुकरण त्यांच्या
हयातींत व नैतरहि अनेकांनी करण्याचा प्रयत्न केला. प्रेमचंद अनेकांना
गुरुस्थार्नी झालेले दिसून येतात. प्रभावी शौळीकार कथालेखक म्हणून प्रेम-
चंदांचा गौरव यथार्थ आहे.
अमूते वस्तु आपल्या लेखनाच्या विशिष्ट शैलीने मूत करण्यांत प्रेमचंद
यांचा हात धरणारा दुसरा ठेखक हिन्दींत तरी नाहीं. वर्णनांतील सूक्ष्मता,
वैनित्र्य, मार्मिक निरीक्षण आणि सजीवता यांचे कितीतरी नमुने आपणांस त्यांच्या
साहित्यांत पाहावयास मिळतील, कांहींची उदाहरणें आपण पाहिलींच आहेत.
: गोदान ' मधील वर्णनाचा नमुना पाहा : “ ज्येष्ठाचा सूर्य आंब्यांच्या राई-
तून वरती येऊन आकाशांत पसरून राहिलेल्या लाळीस आपल्या रुपेरी तेजाचे
दान करीत आकाशांत आक्रमण करीत होता; इवेंत उष्णता वाढत चालळी होती.
शेतांच्या दोनहि बाजूंना काम करणारे शेतकरी त्यांचें दर्शन घेत व राम राम
म्हणत एकमेकांना सन्मानाने चिलीम देण्याच्या तयारीत होते; पण होरीरामास
एवढा वेळ कोठून मिळणार १ त्याच्या मनांत सन्मानाची दडून राहिलेली
मन्झी प्रेमचंद
र
*२”/€ “€*%.३५४-/ ५-१ .-४५..€१.८/"५./०५./*...४*-.€/ -“%.५*-४१-४€४-४१* 0१...” ..४../”१%..७४९६ ९७.४0.» _../%४७ ५७०७७४७९७७” क री.” ४५.५. ४- 0 “9 १". “४४.” 4 १:7७ 7» व मह प 2 तीय
भावना त्याच्या सुकलेल्या मुखावर गर्वरूपानें प्रकट झालेली होती. !' खेंडे-
गांवांतील निसर्गरम्य वातावरणार्चे वर्णन करतांना प्रेमचंद रंगून जातात.
* रंगभूमि ?, ' कमभूमि ?, ' प्रेमाश्रम ? आणि ' गोदान ? या कादंबऱ्यांतून
अश्या प्रकारची रम्य वणेर्ने किती तरी सांपडतील, ' कर्मभूमि ' कादंबरीतील एका
-गांवार्चे वणन पाहण्यासारखे आहे-
५ उत्तरेकडील गिरिमालांच्या पायथ्याशी एक छोर्ट्से हिरवॅगार गांव
आहे. जवळून गंगा नदी एखाद्या तरुणीप्रमाणे हंसत, खेळत, नाचत, गात
गात वाहत जाते. गांवाच्या पाश्वभूमीवर एक मोठा पहाड एखाद्या वृड
योग्याप्रमा्ग जटा वाढवून काळ्या व गभीर स्वरूपांत विचारमग्न होऊन
खडा झालेला आहे. हें गांव जणुं त्याच्या बाळपणची स्मृति आहे, उल्लास व
मनोरंजन यांनीं परिपूण असलेल्या जबानीतील जणुं तें एक त्वझ आहे
गांब्रांत फार फार तर वीस-पंचवीस झोपड्या दिसतील, दगडावर दगड ठेवून
कशा तरी भिंती रचलेल्या आहेत. ... ”'' भारतदेश हा खेड्यांचाच
बनलेला आहे. झुळझुळ आवाज करून वाहणाऱ्या नद्या, धीरगंमीर
असणारे पर्वत, लहरी-ह्हूरीनीं डोलणारी शेते, कुइ-कुई आवाज करणाऱ्या
मोटा, पहांटेस कोंगड्याने दिलेली बांग, इत्यादींचे वर्णन प्रेमचंद मनापासून
करतात, सारी संस्कृति याच निसगरम्य अशा साध्याभोळ्प़ा जीवनांत
त्यांना दिसून आल्याकारणारने प्रेमचंद निसर्गसोंदर्याचे वर्णन तन्मयतेने
करत'त. आणखी एका प्रसंगाचे वर्गन पाह! । “' माघाचे दिवस होते. वारा
सुरटळेला होता. एकदम अंघार दाटून आलेला होता. एक तर थंडीतील रात्र
व माषांतील पाऊस. मृत्यूप्रमा्णे भयाण शांतता पसरली होती. या वेळीं
होरीराम पुनियाच्य़ा शेतातील बांधावर आपल्या झोपर्डीतून येऊन विश्रांति
घेत पडलेला होता. त्याला बाटत होते, थंडी निवारण होईल आणि आपण
झोपी जाऊं, पग फाटलेली कांत्रळ, फाटलेली रजई व थंडीवाऱ्याने भिजून
गेलेला वृक्ष या शत्रंच्यासमोर येण्याचे साइस थंडीमध्ये नव्ह्त. आज तंत्राखू
पण मिळाली नव्हती कीं ज्यामुळे मनरंजन व्हार्वे, गोबऱ्या पेटवलेल्या दोत्या पग.
थंडीमुळें त्याहि बिझ्लन गेल्या होत्या. पाय पोटाशी घेऊन, हात दाबून धरून
कांबळ्य़ांत तॉड' लपवीत आपल्याच श्वासांनी उष्णता निर्माण करण्याचा त्याचा
प्रयत्न चाळू होता; पण ते कांनळेंहि फाटलेले असल्यामुळें च्बणास निरुपयोगी
१४१ प्रेमचंद : भाषासोद्ये
> >“ 7९% // ९७४
झालेल्या दुखऱ्या दांतांप्रमाणे व्यथं होते, !' या ठिकाणी शेतकऱ्याच्या दुःखद
आणि दरिद्री जीवनाचा अनुभव तर आहेच, पण त्याच्यारभोबती रुष्ट
झालेली सृष्टिह्ि प्रेमचंदांनी रेखीवपर्णे वर्णन केळी आहे. उन्हाळ्याच्या
दिवसांत पाऊस न पडेल तर होणारी जिवाची उढघाल प्रेमचंद कशी वर्णन
करतात तेंहि पाहण्यासारख॑ आहे $। “' श्रावणाचा महिना तर आला होता
आणि वबावटळी तर उठलेल्या असत. विहिरींचे पाणी आटून गेलें होतें.
उन्हामुळे ऊंस करपून चालले होते. नदीच्या पात्रांत थोडें पाणी शिल्लक होतें
पण त्यांच्यासाठी दररोज भांडणं होत असत. ... जागोजार्गी चोऱ्या होत
असून कांहीं ठिकाणी दरोडेहि पडत असत. सर्वत्र हाहाःकार माजून राहिला
होता. '!' आणि या अवस्थेतंतर पावसाची चिन्हे दिसू. लागलीं तर ?
शेतकऱ्याचा झआनंद गगनांत मावेनासा होतो. इषोतिरेकानें ता नाचूं-बागडू
लागतो. आपण दाहरांतील माणसें पाऊसकाळ आला कीं नको ती चिकचिक
म्हणून कंटाळतों, संतापतो, पण जीवनदायी पावसाचें स्वागत शेतकरी
उल्हासाने करीत असतो. घरणीमातेला संतुष्ट करून तिच्यांत धान्याचे सहख
अंकुर निर्माण करणारा पाऊस हें शेतकऱ्याचे देवतच म्हटलें पाहिजे. याहि
परोस्थतीचे प्रेमचंदकृत वर्णन मार्गे आपण थोडक्यांत पाहिलें आहेच,
प्रेमचंद ठिहितात । “' केवढी उत्तम गोष्ट झाली कीं, भाद्रपदांत पाऊस पडला'
आणि किसानाचें चित्त आनंदार्ने मरून आलें. केवढा उत्साह भरून राहिला'
होता ! तहानेने व्याकुळ झालेली पृथ्वी आतां तृप्त झाली असल्यामुळें शेतकरी
संतुष्ट होते. जणुं हॅ पाणी म्हणजे आकाशांतून सुवर्णदृश्िचि होत होती. मनास
वाटेल तेवढ्या मोहरा गोळा कराव्यात, जेथें वावटळी उठत त्या ठिकाणीं
आतां नांगर चालूं झाले होते. ... ?' शेतकऱ्यांची चिंता व त्यांचा उल्हास!
यांचें वर्णन प्रेमचंद समरसतेने करीत असतात.
रंगभूमि ' आणि “ गोदान ? या कादंबऱ्यांतून अशा प्रकारची कितीतरी
वर्गनें वाचावयास मिळतात. या यंत्रयुगांत जेव्हां यंत्रांचा धडघडाट सुरू झाला
तेव्हां कारखानदार व भांडवलदार यांची चैन सुरू झाली; पण अद्या वेळी
शेतकऱ्यांची वा मजरांची अवस्था मात्र शोचनीय होत राहिली, प्रेमचंदां-
सारखा विशाल हृदयाचा साहित्यिक त्यामुळे विरघळून गला. त्यांनी. आति
हळुवारपणार्ने त्यांचीं पित्रे लेखणीच्या सामथ्योनें साकार केली आहेत.
मुन्शी ॥मर्चंद १४९
१. _» “%.//"*%-/*% “10% » 0 शा “४८. क यत ने... गज > “0 ८ प >“ *..” ""४- ५0५/४१५०४ १५४४०७७४७0
शेतकऱ्यांची गरीब मुल बापापा्शी हृट्ट तरी कसा करतात ! त्यांच्या मनांत
कोणत्या आकांक्षा असतात £ ' गोदान ? कादंभरीतील ह॑ चित्र आहे: “ रूपा
रडतच आली. उघड्याबागड्या शरीरावर एखादे फाटक. वस्त्र, विसकटलेले-
विखुरले केस यांनीं बिभूषित असणारी रूपा होरीरामाच्या छातीशी लपेटली
'शेली. तिची थोरली बह्दीण सोना सांगर्ते, ' गाय येईल तेव्हां तिचें शोण मौ
थापीन ?; ख्पाला ते बोलणे सहन झालें नाहीं. ती फणकाऱ्यानें म्हणार्ल', ' सोना
-कोण अक्ली आजीबाई कीं सारे शेण तिनेंच थापार्वे ? मी काय कमी आई!
-सोना भाकऱ्या भाजते तर मी भांडीं घांसर्ते, सोना पाणी झोढते तर मी
विहिरीवर पोहरा-दोरी घेऊन जार्ते,!-?? दारेद्री शेतकऱ्याच्या मुलळींतील गायीचे
शेण थापण्यावरून होणारा हा कलह वास्तववादी तर खराच; पग त्यांच्या
छोट्या व साध्या जीवनांत तो समाधान देगाराहि आहे. होरीराम ब धघनिया
यांच्या भांडणाचे वर्णन आपण मार्गे एकदां पाहिलंच आहे.
प्रकतिवर्णन बा सृष्टिवणन प्रेमचंद जेवढ्या सरसतेनें करतात तेवढ्याच
उत्कटतेने पात्रांच्या मानासिक अवस्थांचेंहि वणेन त्यांनीं अनेक ठिकार्णा केडेळें
आहि. प्रेमचंदांची नजर सर्व प्रकारच्या मानवी व्यवहारांतून फिरलेली दिसते.
नाना प्रकारचे लोक प्रेमचंद यांच्या कथासृष्टींत बाबरतांना दिसतात. नायक,
नायिका, उपनायक, उपनायिका, खलनायक ही सवे सृष्टि प्रेमचंदांनी उभारढी
आहि पण प्रत्येक व्यक्तीचें वोशिष्ट्य वेगळाले आहे. आपल्याकडे हरिभाऊ
आपटे यांच्या कादंभऱ्या कांडी मर्यादित क्षेत्रांतीठ असल्या तरी त्यांत वावरणारी
माणसे मात्र विविध प्रकारचीं व नमुन्याचा आहेत. इंप्रजी भार्षेतीळ श्रेष्ठ
नाटककार शेक्पूपिअर याची महती एवढ्याचसार्डी को त्यान मानवी मनाचे
शेकडों पैलू स्पष्ट करून दाखविणाऱ्या पात्रांची निर्मिति केळी, मनाची जी जी
म्हणून भावना-लहर निमाण होईल तिचें प्रतीक थार साहित्यिकांच्या रचनंत
दिसून येत. कथा-कादंभऱ्यांत पोशाख ब नार्वे बदलून तींच तींच माणसें हिंडू
लागली कीं लेखकार्चे अनुभवदारिद्रय दिस. लागतें, प्रेमचंदांची साहित्यसृष्टि
या दृष्टीनें आति विस्तृत अशा प्रकारची आहे. धर्माचा खोटा अभिमान
बाळगणारे ढोंगी, बेइमानी पोलिस, लुटारू जमीनदार, बेदरकारपणे छळणूक
करणारा अधिकारी, अट्टल दारूबाज, फसवणारा ज्योतिषी, कॉंग्रेसचा जमीन-
दार, स्वार्थी पत्रकार, आदर्शवादी बमीनदार, कजाच्या बोज्याखाळी दडप-
१४३ प्रेमचंद : भाषासोदर्य
२.५४”%./”४./%.५४०%४४../४१./४. ४१७ _.५४./७ ४ ४९.४९ ४४५४१७४
झेला किसान, उदार समाजसुधारक इत्यादि विविध प्रकारचे नतुने प्रेमचंदांच्या
कथासृष्टींत पाहावयास मिळतात, ' प्रेमाश्रमां तील प्रेमशंकर, ' कायाकल्प ?-
मधील चक्रधर, ' रंगभूमी 'मधील विनोद किंवा ' कर्मभूमि ' मधील अमरकान्त
र्या व्यक्ति ध्येयवादी तर अहितच, पण देशांतील तरुणांना मागे दशीैण्यारचे
कार्येहि त्यांनीं केळें आहे. सुशिक्षित नवयुवकांना राष्ट्रीय विचारांची व देश-
भक्तीच्या भावनांची रसभरीत आदर्श चरित्रे प्रेमचंद यांच्या वाडूमयांत ठार्यी
'ठार्यी मिळत राहतात.
प्रेमचंद यांच्या जीवनांत ध साहित्यांत विवाहसंस्था व स्रीजात यांच्यासंबं्षी
"अनेक ठिकाणीं चचा आलेली आहे. जीवन 'सुखी व समृद्ध बनविण्यासाठी
प्रेम ब विवाह यांना फारच महृच्च असल्याचें ते सांगतात. चाळू काळांतीळ
बविवाहूपद्धति तितकीशी त्यांना पसंत नव्हती, ' दो सखिथी ' या कहाणीचा
-नायक विनोद एके ठिकाणी म्हणतो, “' वर्तमान विवाहपद्धाते मला पर्संत
नाहीं, सुधारगेच्या प्रारांभिक काळांत या प्रथेचा जन्म झाला असावा. आतां
जग कितीतरी पुढें गेठेळं आहे, पण आपली विवाहाची प्रथा मात्र जशीच्या
तशी आहि. वर्तमानकाळांत या आहे या प्रथेचा काय उपयोग ! ? अक्शा
विकृत भूमिकेवरून झालेल्या विवाहांचे विपरीत परिणाम व त्यांपासून स्त्रियांना
होणारा त्रास मुन्शी प्रेमचंदांच्या कादंबर््यांतून अनेक ठिकाणीं चित्रित केडेला
आढळतो. ' अभिलाषा ? नांबाच्या एका कथेतील वर्णन या दृष्टीने पाहण्या-
सारखे आहे. “' काल रोजारी मोठीच गडबड उडाली होती. एक पानवाला
आपल्या बायकोस मारीत होता, आणि ती जिचारी रड-रड रडत होती, पण
शोवर्टी त्या स्रीसहि क्रोध आला. तिर्ने उठून उद्गार काढले, पुरे झार्ले,
आतां जर माराल तर ठीक दोणार नाही, आज माझा तुझ्याशी कांदी संनंघ
उरलेला नाहीं, मी भीक मागेन पण तुझ्या घरी राहणार नाहीं. !-?? प्रेमचंदांच्या
कथासृष्टींतील सर्व स्रीपालें अत्यंत हळुवार हातानें निर्माण केळेळीं वाटतात.
समर्पक अशा भाषादौीलीने कथाकारारने त्यांच्यांत प्राण फुकलेला दिसतो.
गोदान 'मधील कामानें व कष्टार्न ऐन वयांत शिजून गेलेल्या धनियाचें वर्णन
पहावें, प्रेमचंद लिहितात, “' तिर्चे बय अर्से काय होते ! अवर्धे छात्तिसार्वे तर
वर्ष तिळा लागलें होते, पण सर्व केस पिकून गेल्यामुळे ती वृद्ध दिसत होती.
चेहऱ्यावर सुरकुत्या पडून सर्व शरीर बेडौल झालेलें शेते. गव्हासारखा सुंदर .
मुरते प्रेमचंद १४४:
रंग आतां काळवंडून गेला होता. डोळ्यांनी दिसण्याचे मानहि कमी झालें
होते, पोटाची चिन्ता नित्य होतीच. पग जीवनांत सुख म्हणून थोर्डे तरी
असावे ना? या चिरस्थायी नीणावध्येनें ती उदास बनून गेली होती. ... !'*
पण हीच घनिया वेळ आली की वाघासारखी घांवून कशी जात असे व.
प्रसंगी लोण्याहून मऊ कशी हात असे हेंहि आपण पाहिले आहे. तिची
मुलगी सोना हिचे वणन प्रेमचंदांनी असेंच रेखीवपर्ण केळे आहे. “' सोना
बयारने किशोरीच होती. दारीराच्या बांध्यावरून युवती पण बुद्धीनें मात्र
बालिका होती, योबन तिला पुढें खेचीत होते आणि बालपण मारे ओढीत
होतें. कांहीं बाबतींत ती इतकी चतुर मुलगी होती की, पदवीधर मुलींनाहि तिनें
शिकवावे, तर कांहीं गोष्टींत एवढी अलूड की, बालकांनींसुद्वां मार्गे हटाव,
उंच, रुक्ष पण प्रसन्न मुख, डोळ्यांत एक प्रकारची तृतते, केसांना तेल नाहीं,
डोळ्यांत काजळ नाहीं, देहावर कोणताहि दागिना नाही. प्रपंचाच्या भाराने
तिचे वय जणुं दडपून गेलें होतें-- *' शेतकऱ्याच्या मुलीचें किती यथार्थ
चित्र हँ !
: कमैभरूमि ? मधील रेणुकादेवीचें रेखाचित्र एका निराळ्याच वगोतील
म्हणून ध्यानांत ठेवण्यासारखे आहे : “ रेणुकादेवी रूप ब वय या दृष्टीने
नव्हे तर विचार आणि व्यवहार यांनीं वृद्ध होती. दान व त्रत यांवर तिचा
फारसा विश्वास नव्हता, पण लोकमताची अवबहेलनाहि ती करूं शकत नव्हती.
विधवांचे जीवन हे एक तप आहे. याच्याविरुद्ध लोकमत कांहीं करूं्शाकत
नाहीं, भोगविलास, ..नाटक-तमाशे यांना पाहून तिच्या जीबनांत स्वस्थता येणार
नव्हती. नुसती चटणी बा भाजी खाऊन कोणाची भूक ह्यांत हाते का!...
कोणत्या तरी एका ध्येयाबरच जीवन उसे राहू शकतें, रेणुकेच्या जीवनाचा
आधार म्हणजे तिला वाटणारे पश्ुप्रेम होतें. तिर्ने आपल्यानरोभर पशुपक्ष्यांचा
एक अजनञखानाच घेतला होता. पोपट, भेना, मांजर, गायी, हरणे, मोर यांना
पाळून त्यांच्या सुखदुः खांत मिसळून जाण्यांतच तिला सार्थकता वाटे, तिनें
प्रत्येकाचे नांब वेगळें ठेवलें होतें, प्रत्येकाचे राहण्याचे ठिकाण वेगळें होते,
स्थाण्यापिण्याची सोय न्यारी होती. त्या सर्व प्राण्यांना ती मातृत्वाच्या प्रेमाने
सांभाळीत असे. जणु तिचीच तीं नातवंडे होतीं. '? याच रणुकादेवीची मुलगी
सुखदा हिचेडि एक शब्दचित्र वाचण्यासारखें आहे : “' संध्याकाळचा समय होता.
12११ प्रेमचंद : भाषासोंद्ये
“४.” २५ ४०४ ४०४१५४
“ ४५.८४. :< १-४ १४.४९. ५५/४४/७४५४" ५-१. ४-८० ४४/४४/१४०५.” ५.0५ १. ४-८. * ५८/१-/४५/-”€ ४/”४-/
*अच्चा पाळण्यांत झोपठेढा होता. सुखदा जेजारींच बसलेली होती, पूर्वीची
'कृशांगी गर्मिमी आतां विकसित अशा मातृत्वाच्या तेजञानें आणि शक्तीने
"फुळून निघाली होती, तिच्या माधुयोत किशोरींतील चपलता नव्हती, गर्मिणीची
आलस्यमय कातरता नव्हती, तर मातेचा शांत, तृप्त, मंगलमय विलास होता. *
*याच कादंबरीतील सकीना ह्या मुसलमानी युबतीचें प्रेमचंद कशा प्रकारें वर्णन
घ्करतात हेहि पाहण्यासारखे आहे, “ सकीनाचा रंग सांवळा होता, रूपरेखा
पाहिली तर तिला सुंदर म्हणतां आलें नसतें. तिच्या अंगप्रत्यंगाचें बर्णन
कवींच्या उपमानांप्रमा्ण खचित नव्हतें, पण रंगरूप, चालढाल, शील-संकोच
-या सर्वोच्या मिश्रणामुळें तिळा शोभा आली होती, ?
प्रेमचंदांच्या विशिष्ट भाषाशैलीमुळें त्यांची सर्व पार्त्रे सजीब वाटतात.
“अमूर्त कल्पनेचे मूत रूप उभे करतांनाहि प्रेमचंदांची भाषासरणी विशेष
डोलाचें रूप घारण करीत असते. जीवनाचें रूपक्र रंगवून सांगतांना प्रेमचंद
: गोदान ? कादंत्ररींत एके ठिकाणीं लिहितात, “' वैवाहिक जीवनांतील प्रमात-
'काळांत लालसा आपल्या गुलान्नी मादकतेसहित उदयास येते आणि हूदयाच्या
“सव आकाशांत आपल्या माधुर्याच्या सोनेरी किरणांनी सुशोभित करीत असते.
नंतर मध्यान्ह्काळचा प्रखर ताप सुरू होतो. क्षणाक्षणाला बावटळी उठतात
आणि प्रथ्बींचा थरकाप होऊं लागतो. लालसेचें सोनेरी रूप हळूहळू नाहींसे
होतं आणि वात्तविकता आपल्या यथाथ स्वरूपांत आपल्यापुढे उभी राहते.
'त्यानंतर विश्राममय संध्याकाळची वेळ होते. शितल आणि शांत असें तिचें
रूप असते. दमल्यामागल्या पथिकास ज्याप्रमाणे दिवसभरल्या यात्रेचा वृत्तान्त
सांगावासा व ऐकाघासा वाटतो, त्याप्रमाणे तटस्थ भावनेने आपण या वेळीं
-अशा एका उच्च स्थानावर बसलेलो असतो कॉ, खालची माणसें आपणांस
-नगण्य वाटतात, ?
किसानाच्या स्वार्थी व निःत्वाथी नीवनाचा परिचय करून देतांना प्रेमचंद
'डिहितात, “' किसान पक्का स्वार्थी असतो यांत शंकाच नाहीं, .. पण त्याचे
संपूर्ण जीवन निसर्गाशी सहयोग देगारें आहे. वृक्षांवर फळें पिकतात, पण तौ
फळे लोक खातात; शेतांत धान्य उत्पन्न होतें आणि तें जगाच्या हितासाठी
उपयोगास येते; गायीच्या त्तनांत दूध असते पण त्याचा तिळा उपयोग
“नसतो; तें दुसऱ्यासाठींच असतें; मेघांतून बर्षाब होतो पण तूत्त होणारी
१ ७, ,,
समुन्वी प्रेमचंद १४६
पुष्षी असते. अशा संगतीत कुत्सित स्वार्थाळा कोठून अवसर मिळणार ('
होरीराम शेतकरी दोता; पण कोणाच्या जळत्या घरावर हात शेकून घ्यावेत
हे त्याला मान्य झाठे नसर्ते.
अशा प्रकारे मुन्शी प्रेमचंद यांची भाषा साधी, अनलंकूुत असली तरी
तिन्यांतील रसवत्ता श्रेष्ठ प्रकारची आहे. मनाची पकड घेणारी तिची शाक्तिः
बिलक्षण आहे. त्यांच्या भाषेतील मुख्य गुण काव्यात्मकतेचा असला तरी ती
अजीबात अलंकाररहित आहे असं मात्र नव्हे. उपमा, दृष्टान्त, रूपक इत्यादींचा
बापर पुष्कळ ठिकार्णी पण उचित अश्या पद्धतीनें त्यांनीं केलेला आहे. कांडी;
उदाहरणे पाहण्यासारखी आहेत.
£: समोर गगनचुंबी पर्वत अंधकाराच्या विशालकाय राक्षसाप्रमाणे उभा
होता. शंखघर जलद गतीने अरुद पायवाटेने चालत होता. त्यानें आपोआप
ती पायवाट स्वतः होऊन पत्करली होती, ती कोठें जाऊन पोंचली होती हॅ त्यास
माहीत नव्हते. आपण सुद्धां जीवनाच्या या अरुंद व खडबडीत अज्ञा पाय-
नाटेनें तीव्र गतीने नाहीं. जात ? आपल्यासमोर त्याच्याहिवेक्षां मोठे असेः
भंघाराचे पर्वत उभे राहत नाहींत १ ?? (' कायाकल्प? ). याच कादंबरीत पुढील
बाक्यें आलीं आहित, तीं अर्शी; “ मनांत वारवार प्रश्न निमोण होत होता
बण पाण्यांत उसळ्या घेणाऱ्या माशांप्रमा्णे पुनः मनांट्ल्या मनांतच विरून
अत होता. ? ; “ चक्रधरला अस समजत आलें कीं, जणुं सव प्रथ्वी डग-
मगू लागली आहे, जणुं सव त्रह्माण्ड एका प्रयल्यकारी भूकंपाने आन्दोल्ति
होत आहे. ?”; “' पिता व पुत्री यांच्या भेटीचे दृश्य मोठें आनंददायक होतें
कामनांच्या वृक्षांवर निराशा-तुषार पडल्यामुळ ते सुकून गेळे होते, पण आज
हवलवणाऱ्या, हिरव्यागार अशा पल्लवांनीं ते सुशोभित झाले, ?” कित्येक
ठिकाणा रूपकांचा आश्रयह्ि प्रेमचंद घेत असतात.
याप्रमाणें त्यांच्या भाषारेलीचे, व्णनशैलीचे कांहीं नमुने पाहिल्यावर आपणांस
इह मान्य करावें लागतें कीं, त्यांची भाषा ही स्वतःची आहे. तिची तुलना दुसऱ्या
कोणाच्याहि भाषेशी होऊच शकत नाही, आणि हच प्रेमचंदांचे सवीत मोठे
वैशिष्टय आहे. प्रेमचंदांच्या भाषेचं सौंदर्य, तिर्चे मार्दव, तिच्यांतीळ रग,
तिच्यांतील प्रवाह, तिच्यांतील व्यंग्य, तिच्यांतील प्रसाद, तिच्यांतीळ काव्य इत-
रत्र सांपडण दुर्मिळ आहे. याच माषासोष्ठवामुळें प्रेमचंदांच्या कथांचे प्रारभ,
२४७ प्रेमचंद : भाषासोंदय
"* /”*-/०"२५/४./९१५”१५-/१४५४१५०/. ४७.५४ १४./€७./९.५५ .“0९.५९९./१९.५”९// ४ »/४५/१.//> १.” ७.५४ ३७४१ १७४०९५४ /४.//१५.
व॒ दोबट झतिदाय आकर्षक ब उत्कंठा निमीण करणारे झाळे आहेत, ' षच-
परमेश्वर ? ही त्यांची सर्वोत्तम कथा या दृष्टीने पाहण्यासारखी आहे. अलगू
चौधरी व जुम्मनशेख यांच्या मैत्रीत अनेक प्रकारे बिघाड झाला असतांहि
'पंचांमध्यें वास करणाऱ्या परमेश्वराच्या अत्तित्वार्ने त्यांची मैत्री पुनः मली,
असे सांगण्याऐवजी प्रेमचंद या कथेचा शेवट करतांना म्हणतात,
“६ अलगू रह्ूं लागला, या पाण्यामुळे दोघांच्याहि मनांतीळ किर्मिष धुऊन
निघाले. मैत्रांची सुकठेढी लता पुनः ताजी टवटवीत झाली, ?
मुन्शी प्रेमचंद यांच्या भाषासोंदयीचा आणखी एक विशेष सांगावयाचा
आहे. प्रेमचंद हे जसे थोर कलावंत होते, त्याचप्रमाणे ते विचारवंतहि शेते.
सामाजिक, राजकीय, धार्मिक वगैरे पुष्कळ विषयांवर त्यांचें चिंतन चादू असे.
त्यामुळें त्यांच्या कादंबर््यांतून या निरनिराळ्या विषयांतील सत्ये सुभाषितबना
'वाकयांतून किंवा म्हणीवजा बाकयांतून त्यांनीं अनेक ठिकार्णी सांगितर्ळी आहेत.
था सुभाषितरत्नांचा सुगंध प्रेमचंद-साहित्यांत सर्वत्र दरवळत असलेला दिवून
ययेईळ, कांडी थोडीं वचरनेंच येर्थे आपण पाहणार आहोंत,
( १) भाषा साधन आहे, साध्य नाहीं.
(२) स्वरें साहित्य कधीहि जुनें होत नाही.
( २ ) साहित्य ही अश्शी जादूची कांडी आहे की, तिच्यामुळे पर्त, बिठा-
'कत्तरांत, झाडांघुडपांत आत्म्याचे दर्शन होऊं ठागते.
(४ ) अन्यायपूर्णे शासन, शासन नसून युद्ध आहे.
( ५ ) ज्यांच्याजवळ पैसा असतो त्यांची पाठ कायदा ब घम राखीत
असतो.
( ६ ) सदेव पुरे जाण्याची इच्छा घरणे याचेंच नांब कर्म,
(७ ) मनुष्यजांतीसमोरचें सवोत बिकट असें कोडें मनुष्य हॅंब आहि.
( ८ ) म्हातारपणांत पत्नी मरणे म्हणने पावसाळ्यांत बर कोसळण्या-
थयॅकींच आहे.
(९) मन हा एक मोठा शत्रु आहे. तें नेहमी पाठीकडून नार करतें.
(१०) मनुष्य स्वभावतः न्यायप्रिय आहे.
२ ७ ७
मुन्शी प्रेमचंद १४८.
“00-०४ १८-// ७७४ १७..”/ १०-७४ ८ १८ क “ > क्ट धी च > २ १२६८ न“
प्रेमचंदांचा जीवनसंदेशा १५.
प्रेमचंदांची जीवनकथा हीच एका अद्भुतरम्य कादंभरीप्रमाणें आहे..
या कादंबरीची बरीचशी प्रकरणें वाचून झाल्यानंतर आतां उपसंहारात्मक भागा-
कडे वळावयाचें आहे. मुन्शी प्रेमचंद यांचें चरित्र व त्यांची वाडूमयीन तपस्या
यांचा परिचय करून घेतल्पानंतर वास्तविकपर्णे सांगावयाचें अर्से कांहीं उरत
नाहीं, सत्रंध चरित्रकथा वाचीत असतांना त्यांच्या जीवनांतील संदेशाची
कल्पना आपणांस ठार्या ठायीं येण्यासारखी आहे. प्रेमचंदांच्या जीविताचा हेतु
कोणता £-- या प्रश्नाच्या उत्तरांतच त्यांच्या जीवनसंदेशाचा पत्ता आपणांस सहज
लागण्यासारखा आहे. विरोधी परिष्थितीश्ीं टक्कर देत प्रेमचंद झिजत राहिले;
पण त्यांच्या झिजण्यांतून चंदनाप्रमार्णे सुगंध दरबळत राहिला, या गोष्टीस
फारच महत्त्व आहे. एका पोस्टळ कारकुनाचा एक साधा मुलगा तो काय आणि
तो राष्ट्रभाषा हिन्दीचा उपन्यास-सम्रादू होतो तो काय, सारेंच आश्चर्यकारक
आहे. प्रेमचंदांनी कितीतरी उद्योग केळे. किती ठिकाणी नोकऱ्या केल्या पण,
सवीकडे' त्यांना पाठ फिरवावी लागली. इंभरानें त्यांचा जन्म ज्या एका कामा-
साठी योजला होता त्याखेरीजकरूनच्या सवे कायीत त्यांना अपयश येत
राहिलें, आणि कोणत्याहि अमयश्यास न मितां निभयपर्णे प्रेमचंद कमे करीत
राहिले, हाच त्यांच्या जीवनांतील मोठा संदेश आहि, दीन-दरिद्री व दुःखितांचा
कैवारी म्हणून त्यांचें नांव प्रासिद्ध होईलच, पण भारतीय किसान-मजुरांचा खरा.
पाठीराखा म्हणून त्यांची योग्यता मोठी आहे. प्रेमचंद स्वतः मजुराप्रमाणे
जगळे आणि त्याच जीवनांत त्यांना संतोष लाभला. त्यांची लेखणी हॅ त्यांचें
फावडे होते. या फावड्यानें त्यांनीं देशांतील, समाजांतील घाण दूर केडी व'
त्याच फावड्याने जे मंगल आहे, उदात्त आहे, रक्षणीय आहे त्याचा संग्रह
केळा. आणि प्रेमचंद-साहित्य हे. आज भारतीय संस्कृतीचे अभिमानाचे
स्थान होऊन बसलें आहे. प्रेमचंदांचें गुणगान दिवर्सेदिवस मोठ्या
प्रमाणावर होऊं लागळें आहे. दोन-तीन वर्षोपूर्बी दिलीच्या ' आद्यकल 'चा
एक 'प्रेमचंद विशेषांक* निघाला होता. त्यांत फिराक गोरखपुरी ( रघुपति सहाय )'
यांचा '* प्रेमचंद की आवाज ' या नांवाचा एक लेख आहे, त्या लेखाचा
समारोप करतांना लेखक म्हणतो, '' प्रेमचंदांची पुस्तर्के वाचतांना असे वाटते
१४९ प्रेमचंदांचा जीवनसंदेश
>“
५*९२€४.१.//५//१-//१-४.४१-/१/€* “१.५४५./”*१ »“१./१९५.””५.”//४.”१५.€१-/०१५-/"१.”२ “१.»५././०४५-/१५-/४१./ ४५४४.” १.”
कौ, मारतमातेनं जणुं आपणांस स्वतःच्या मांडीवर घेतें आहे. प्रेमचंदांच्या
आवाजांत आपल्या हृदयाची धडधड आपणांस ऐकूं येते. भारताचे अश्रु,
भारताचे अत्तित्व, भारताची ऐट, त्याचे सुखदुःख, त्याचें भाग्य, त्याच
मंगलगीत प्रेमचदांच्या जादूच्या लेखणीने निर्माण केलेल्या साहित्यांत ज्याप्रमाणे
मिळतें त्याप्रमाणे अन्यत्र कोठेंहि मिळणे अशक्य आहे. याच कारणासाठी
प्रेमचंद यांना हिन्दी-उदू भाषांतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय ख्यातीहि प्राप्त
झाली आहे.
चित्रपटाच्या धंद्यांत प्रेमचंद पहिल्याच वर्षी कसे वैतागून गेळे हें आपण
पाहिळेंच आहे. मुंबईहून प्रेमचंद बनारसला आले त्या वेळची गोष्ट, श्री. चंद्र-
गुप्त विद्यालंकर त्यांना मेटावयास गेळे आणि एकदम बोलले, “' काय बाबूजी,
किंती दिवस सुट्टी घेऊन आलांत १! ?? त्यावर प्रेमचंद हसतच म्हणाठे, “ मी
. तर कैदखान्यांतून सुटून आलो आहें, भाई, यांत किती दिवसांची सुट्टी या
प्रश्नास अथ कोठचा ! ?? हंसत हंसत बोलणाऱ्या प्रेमचंदांचा चेहरा बदलून
गेला; आणि थोड्या कष्टदायक अवस्थेतच त्यांनीं उत्तर दि, “' माई |! कुठे
आपण आणि कुठे सिनेमावाले, त्यांचे-आपळें कसे जमणार १ माझ्या आयुष्यां-
तील सवीत मोठी चूक केली ती हो कीं, मी त्यांच्याकडे गेलो... .. संधि मिळतांच
आलो झालें दावे तोडून ... कांही पैसा मिळाला ही गोष्ट खरी; पण त्यांनी
माझ्या कादंबरीची जी हत्या केली ती मात्र मळा पाहवत नाहीं. मी सुद्धां त्या
कथेस माझी म्हणून ओळखणार नाहीं, मला सारखें म्हणत, कथेत असें काढून
टाका, असे जोडून द्या. शेवटीं मी साफ सांगितलें की, ' बाबा रे, हे माझ्या-
न्यान होणार नाहीं १-!? आणि याच कारणावरून प्रेमचंद यांनीं मुंबई सोडली
ब ते पुनः आपल्या नेहमीच्या व्यासपीठावर बसून लेखन करूं लागले.
ज्ञीवनांत विविध प्रकारचे अनुभव प्रेमचंद यांनीं घेतलेले असल्यामुळें
प्रेमचंदांच्या कादनऱ्यांचें क्षेत्रहि आति विस्तृत असे आहे, मानवी जीवनाचा
हक विशाल हारिकोन त्यांना प्राप्त झालेला होता. आपल्या ' रंगभूमि !
नांवाच्या प्रसिद्ध कादबरीत मानवी जीवनासंबर्धी प्रेमचंद काव्यमय भाषेत
हिहितात की, “' बीवन काय फुलापेक्षां कोवळे नाहीं !-- जें वाऱ्याचे झोके,
सहन करील पण सुकणार नाहीं, लतेपेक्षां का कोमल नाहीं ! कठोर वृक्षाचे
झोके खाऊन द्वि त्यांनाच लिपटून जाणाऱ्या वेळीप्रमार्णे जीवन आहे. पाण्याच्या
मुन्शी प्रेमचंद १५०
१ ५ "५०-५५. 0७४.” ५००0 ४५०”. “ 0- “ ४४. “ ग९. अशी कअ जक. 0 कक तिक धकरण टे
बुडबुड्याप्रमाणें जीवन असावें, नो ढाटांवर तरंगतो पण तुटत मात्र नादी.
मानवी जीवनांत निर्माण होणाऱ्या सर्व दुःखांना धीमेपणानें तोंड द्यार्ब ब
आपल्या वांट्यास येणारे कर्तव्यकम॑ करीत असावें हाच एक संदेश प्रेमचंद-
साहित्यांतून मिळण्यासारखा आहे. निष्काम कमे, फलत्यागपूर्वक कर्तव्यपाटन,
यशापयक्याकडे दुर्लक्ष करून काम. करण्याची प्रव्रात्ते, या गोष्टी असल्या की
जीवनांतील कटुता पुष्कळ अर्शी कमी होणारी असते. जीवन ही एक क्रीडा
आहे. सर्वत्र खेळकर बृत्तीन॑ आपण वागत राहिलो: तर जीवनांतीळ पुष्कळकी
दुःखें कमी होतील अर्से त्यांना वाटे. माणसाने कांहीं एक ध्येय आपल्या
डोळ्यासमोर ठेवूनच कर्तेब्यपालटन सदोदित करीत राहिळें पाहिजे, नाहींतर
त्याची घडगत नाहीं. थ्येयविद्दीन माणसाच्या जीवनाची काय किंमत !
“ कर्मभूमि ? कादंबरीत प्रेमचंद लिहितात, '' कांही एक ध्येय समोर ठेवून
नीवितभर तै हस्तगत करण्यासाठीं लढत राहणें हॅच खरें पुरुषार्थार्चे टक्षभ
आहे, कदैव्यपराडूमुष्त होतां कामा नये. नाहींतर दोरी तुटलेल्या पतंगाप्रमार्भे
हवा नेईल तिकडे आपणांस जावें लागेल, *” पण ध्येयावर दृष्टि ठेवून संदेब
प्रयत्न करीत राहणें, पुर्टे जाण्याची इच्छा व तसा दीर्घोद्योग करणें, याचेच
नांव मानवी जीवन आहे. आपत्तींशी झगडतांना जो सघ्ष करावा लागतो
स्म्रांतूनच आपणांस शाक्ते प्रास होत असते. या जगांत जिर्वंत माणसाप्रमाथे
नगण्यांतच पुरुषार्थ आहे. मुडद्याप्रमाणें नुसते पडून राहणें यांत काय
फायदा १ व्यथ जगून राहण्यापेक्षा मरण पावणे मासाठी उत्तम, असे प्रेमचंद
सांगत, आपल्या जीवनांतील सकलता आपण गो उद्योग करीत असती
त्यावर अवलंबून असते. ।
सत्य, न्याय ब मानवधमे यांचाच विजय पुढल्या काळांत होणार आहे;
असे प्रेमचंदांना बाटे, आणि सवे प्रकारचे धर्मपंथ याच एका नीतितत्तवावर
उभे राहिळे पाहिजेत, असा त्यांचा आग्रह असे. “ मी तर नीतीळाच धम
समजतो आणि सर्व संप्रदायांत नीतिह्ि एकच असली पाहिजे. हिन्दु, सुसछ-
मान, बौद्ध, खिश्चन यांनीं नेहमीं सत्कम॑ आणि सद्विचार यांचाच पुरस्कार
केला पाहिजे. व्यक्ति, समान, आणि राष्ट्र यांचा उद्धार या प्रकारच्या नीति-
तत्त्वांमुळेंच होईळ. बाह्य अवडंबराचा खोटा घर्भे व खोट्या धर्मकल्पना, दुष्ट
चालीरीती यांना यापुढें थारा मिळून चाढणार नाहीं, अर्से प्रेमचंद प्रतिपादन
१५१ प्रेम्खंदांचा जीवनसंदेश
करीत, मनुष्याचा पराखय शाळेला दिततो; पण तो नर झगडत झगडत
पराभूत झाळा असेळ तर त्यास विबयीच म्हणावें, त्वतः प्रेमचंद कित्येक.
ठिकाणी पराभूत झाले; पण टक्कर देत देत त्यांनी नेइमीं सामना दिलेला होता;
त्यामुळें त्यांचें जीवन हॅ एका रणझुंचार पण घायाळ झालेल्या सेनानीप्रमाणे
होते, प्रेमचंदांनी निमाण केलेलें तूरदास दे पात्र या दृष्टीने अभ्यास करण्या-
सारखें आहे
जग हॅ एका क्रीडांगणाप्रमार्गे आहे. खेळाडूप्रमाणे आपली वृत्ति पाहिजे.
दोन धक्के खावेत व द्यावेत, डाव जिंकावा व हरावा. पडल्यावर रडत बसणे
किंबा विजयानें हुरळून जाणें हे खऱ्या खेळाडूस मान्य नसर्ते. दुसऱ्याच्या
गुणांचे तो मनापासून कौतुक करीत असतो, कोणावर चिडणे किंबा संतापर्णे
हेंहि त्याला ठाऊक नसते. खेळांत रडण्याला त्यान कोठले ? इंसण्यासाठी,,
दुःख विसरण्यासाठी तर आपण खेळ खेळत असता. या ठिकार्णी रडण्याला,
चिडण्याला स्थान नाहीं. प्रेमचंदांच्या मतांवर गांधीवादाची छायाहि थोड्या-
कार प्रमाणांत मिळते, “ कायाकल्प ? कादंगरीतील चक्रधर एके ठिकाणीं म्हणतो,
£ चरोपकार ही अमरत्व प्रदान करता है | कालपर विजय पाने का अर्थ यह
नही है कि हम कृत्रिम साधर्नो से भोग-बिलास में प्रवृत्त हो, वृद्ध होकर
अवान अनने का स्वभ देखें और अपनी आत्मा को घोखा दे । लोकमत पर
विजय पाने का अर्थ है अपने स्दविचारो ओर सत्कर्मो से जनता में आदर
बाना और सम्मान प्राप्त करना । आत्मा पर विजय पाने का आशय निलेजता
खा विषयवासना नही, बल्कि इच्छाओं का दमन करना और कुवृत्तियो को
रोकना दै । प्रेमचंदानीं वर्णन केलेल्या या विजयी वृत्तीचे मनन. आजच्या
तरुण पिढीनं करण्यासारखे आहे.
प्रेमचंदांनी दिलेलें जीवनाचे तत्त्वान फार महत्त्वाचे आहे. समकालीन
लोकांना त्याचें महत्त्व तितकेसे पटे नाहीं तरी पुढील काळांत त्यामुळें निश्चित-
पणें मार्गदर्शन होत राहील. आणि हें मार्गदर्शन कथाकादंबरीच्या माध्यमांतून
असल्यामुळें शेकडो नीरस व्याख्यानांपेक्षां फलदायी ठरणारे आहे. प्रेमचंदांचे
निकटवर्ती मित्र श्री, जेनेन्द्रकुमारांनीं प्रेमचंदांविषयीं म्हटळें आहे, “' प्रेमचंद
ह हिन्दींतील सर्वात मोठे ढेखक आहेत. आपण हिंदी भाषाभाषी त्यांची
किंमत नीटपर्णे ओळखत नाहीं. आपण चित्राच्या इतके नवळ आहोंत कीं,
मुन्शी प्रेमचंद १५२
त्याच्यांतील विविधता, त्याच्यांतील रंग-वेषम्य आमच्या दृष्टात भरत नाहीं.
त्या चित्रांत निवास करणारी ब चित्रास सजीवता देणारी एकता आमच्या
दृष्टीत भरत नाहीं. एखाद्या शतकानंतर जर आपण त्यांना पाहू किंवा
एखाद-दुसऱ्या भाषेचे अंतर मध्ये ठेवून जर प्रेमचंदांकडे आपण पाहूं तर मला
वाटते कीं, प्रेमचंद आपणांस नीट समजतील, या वर्तेमानकाळापेक्षां भविष्यकाळांत
आगि हिन्दी माधिपेक्षां इतर भाषांत प्रेमचंद अनुवाददवारां जातील,
तेथे त्यांचें स्वागत विशेषरूपार्ने केळे जाईल, *' श्री. जेनेन्द्रकुमारांच्या या
मतास फारच मोठा अर्थ आहि. प्रेमचंदांसारख्या थोर कलाकाराचे वैभब
आपल्या चर्मचक्षूंना कित्येक वेळां दिपवून टाकणारं असतें. म्हणून मुद्दाम ते
जरा दूर अंतरावरून पाहिल्यास त्यांतील माबाथे आपणांस समजूं लागतो.
प्रेमचंदांसारख्या कर्मयोगी साहित्यिकार्चे चरित्र ब कर्तृत्व आदर्श म्हणून
ठेवण्यासारखं आहे ते या दृष्टीने. आपल्या ललित कृर्तीतूनच नव्हे तर प्रत्यक्ष
आचडरणांतूनहि दातांची, पीडितांची, गरिबांची बाजू घेऊन अहूर्निश झट-
'णाऱ्या माणसाचे हृदय केवर्ढे असेळ ! या विशाल सहानुभूतीमुळेंच तर प्रेम-
चंद एवढे थोर कडाकार बनले. त्यांची कला जितकी मन रंजविणारी तितकीच
मनास उत्तेजित करणारी आहे; आणि किसान-मजरांच्या या आपल्या देशांत
आच कलादृष्टीची आज फार आवदइयकता आहे.
तुमच्या अधिक अभ्यासासाठी काही प्रश्न !
( १ ) मुन्शी प्रेमचंद यांचें नांव तुम्ही कोणत्या कारणांसाठी लक्षांत ठेवाल !
( २ ) प्रेमचंद यांच्या कांहीं गोष्टी तुम्ही वाचल्या आहेत काय ! बाचल्या
भसतील तर त्या तुम्हांस कां आवडल्या ते लिहा. बाचल्या नस-
तील तर जरूर कांहीं गोष्टी वाचा. उदा.-- ' समरयात्रा 'मधीळ
कथा.
(३) * मी तर मजूर आहे ' असे प्रेमचंद म्हणत असत, या विधानाची
सयता कांद्दी प्रसगांवरून पटवून द्या,
( ४ ) ल्हानपणीं प्रेमचंद यांना कोणकोणत्या आपत्तींना तोंड द्यावें लागले!
त्यांनीं आपला शिक्षणक्रम याहि कष्टदायक स्थिर्तातून कसा पूर्ण
केला !
( ५ ) मुन्ही प्रेमचंद यांना ' किसान-मित्र ) कां म्हणतात ?
( ६ ) चित्रपटांच्या सृष्टीशी प्रेमचंद यांचा परिचय कसा झाला ! त्या
धंद्यांत त्यांना यश कां लामर्ठे नाही !
( ७१) घरगुती वातावरणांत प्रेमचंद कसे वागत असत ? तीन-चार प्रसंग
देऊन त्यांच्या स्वभावाची चचा करा.
(८) प्रेमचंदांचें मूळचें नांब कोणते ! त्यांना प्रेमचंद हें नांव कां स्वीका-
रावे लागळं १
( ९ ) मुन्शी प्रेमचंद यांच्या संपादकीय कायाचे महत्त्व उदाहरणे देऊन
स्पष्ट करा !
( १० ) साहित्याविषर्या प्रेमचंद यांचे विचार कोणत्या प्रकारचे होते ?
त्यांच्या साहित्याशी ते विचार कितपत जुळणारे आहेत !
( ११ ) प्रेमचंद यांच्या त्वमावांत कष्टाळूपणा, मानीपणा व कनवाळूपणा
कसा दवोता, हें उदाहरणे देऊन लिहा.
मुन्शी प्रेमचंद १५४
“१./"-/*१..*-€१./६//६./%*,//%.””४/४./१४.”४/४५/%,/७,/ ४.” ४४” ४.”९.५/१९.४५”९,/४.५५/४५.४९../९..»४-”/ ४.५ ४८/४०/४५४९.” ५८/५५/०४५८”
( १२:) मुन्शी प्रेमचंद यांच्या वैचारिक बेमवाची ओळख तुमच्या शब्दांत
थोडक्यांत करून यया.
( १३ ) मुन्शी प्रेमचंद यांच्या विविध प्रकारच्या साहित्याचा आढावा
अगदीं संक्षेपाने द्या.
( १४) धनवान् व कारखानदार यांच्याविषयी प्रेमचंदांची मर्ते कोणत्या
प्रकारचीं होतीं ? त्यांच्याशी प्रेमचंदांचें कितपत पटत असे १
( १५ ) मुन्शी प्रेमचंद यांच्या जीवनाचे सार वीस-पंचवीस ओळींत लिहून
दाखवा,
( १६ ) तुम्हीं बाचलेल्या चरित्रांत अनेक प्रकरणे आहेत, त्यांपैकी प्रत्येकास
तुम्ही स्वतंत्र अर्से अन्वर्थक शीषैक द्या,
( १७ ) मुन्शी प्रेमचेद हे स्वतः आपली जीवन-कथा सांगत आहेत; अशी
कल्यना करून तीस ओळींत त्यांची जीवन-कथा लिहा.
( १८ ) प्रेमचंदांच्या चरित्रांतील तुमच्या लक्षांत राहतील असे तीन प्रसंग
सांगा ब त्यांचें महृत््व कोणतें तें लिहा,
( १९ ) शिवरानीदेवींच्या स्वमावांतील मुख्य मुख्य वैशिष्टये थोडक्यांत
लिहा.
(२० ) मराठी भाषेतील प्रेमचंदांची पुढील अनुवादित पुस्तर्के वाचा--
१. प्रेमचंदांच्या गोष्टी - आ. ल, जोशी
२. कथा-मंजरी - इ. बा. अत्रे
३. ' प्रेमचतुर्थी - यदुनाथ थत्ते